अजितदादा घेणार मोठा निर्णय? धनंजय मुंडेच्या अडचणीत वाढ
अजित पवार यांनी केलेलं “चुकीची माणसं बाजूला करावी लागतात” हे विधान सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय बनलं आहे. विशेषतः, धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील ही वक्तव्यं असल्याचं मानलं जातंय.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप आणि त्यांचं राजकीय भविष्य यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. काहींनी असा अंदाज वर्तवला आहे की, लवकरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सुपूर्द होऊ शकतो. यामुळे अजित पवार गटाच्या अंतर्गत हालचालींवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
हे वक्तव्य पवारांच्या नेतृत्वाखालील गटातील शिस्त आणि जबाबदारी कायम ठेवण्याचा इशारा असू शकतो. मात्र, या वक्तव्यामुळे राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरतील.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल केल्यानंतर आणि त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांसह काही सत्ताधारी नेतेही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोरदारपणे करत आहेत.
अशा परिस्थितीत, अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर स्पष्ट भूमिका घेतली, ज्यामुळे मुंडेंना मोठा धक्का बसल्याचं दिसतंय. अजित पवार यांनी यापूर्वी मुंडेंची पाठराखण केली होती, परंतु आता त्यांच्या “चुकीची माणसं बाजूला करावी लागतात” या वक्तव्यामुळे संकेत मिळतात की, पवार गटाने याप्रकरणी आपली भूमिका कठोर केली आहे.
या घटनाक्रमामुळे मुंडेंच्या मंत्रीपदाचे भवितव्य धोक्यात आले असून, सत्ताधारी गटात अंतर्गत दबाव आणि अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. पुढील निर्णयांवर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.
नेमक अजितदादा काय म्हणाले?
वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आल्यानंतर माध्यमांनी अजित पवारांना घेरले. यावेळी त्यांनी पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित केला. त्यावर बोलताना अजित पवारांनी स्पष्ट भुमिका मांडली. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार…कुणाकडे काही पुरावे असतील त्यांनी आम्हाला द्यावे, त्यांच्यावर आम्ही कारवाई करु, मी पण शेतकरी आहे. शेतकरी म्हणूनच बोलतोय. चुकीची माणसं असतील तर बाजूला करावे लागते. आम्ही चौकशी कर…कोणालाही पाठीशी घालणार नाही, अस पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.
बीड जिल्ह्याची लेक करणार भारताचं नेतृत्व
Newsworldmarathi Beed : आपल्या बीड जिल्ह्यातील मौजे कळंबअंबा, ता-केज येथील सुकन्या कु. प्रियंका हनुमंत इंगळे हिची खो – खो वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील एका कन्येने देशाचे नेतृत्व करण्याचा मान मिळवणं ही गोष्ट खूपच अभिमानास्पद आहे………..!!
बीडच्या केज तालुक्यातील कळमअंबा येथील मूळ रहिवासी असलेल्या प्रियंका हनुमंत इंगळे या युवतीची “खो-खो ” च्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झालीय. आज 13 पासून सुरू होणाऱ्या खो-खो वल्डकप स्पर्धेत प्रियंका ही भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे.
आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी प्रियंका इंगळेची निवड करण्यात आली आहे. तिच्या निवडीबद्दल तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून तिचे अभिनंदन केले जात आहे.
तालुक्यातील कळंबआंबा येथील हनुमंत इंगळे हे मागील काही वर्षांपासून रोजगाराच्या निमित्ताने भोसरी (जि. पुणे) येथे स्थायिक झाले. वडील हनुमंत इंगळे व आई सविता इंगळे या दाम्पत्याला प्रियंका व प्रणय अशी दोन मुले आहेत. शालेय शिक्षण घेत असताना प्रियंकाला खेळाची आवड निर्माण झाली. त्यामुळे तिची खेळातील आवड विचारात घेऊन त्यांनी तिला राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षक अविनाश करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खो-खो प्रशिक्षण दिले. तिने निवडलेल्या क्षेत्रात मेहनत व सराव करून खो-खो सारख्या क्रीडा प्रकारात नैपुण्य संपादन केले. त्यामुळे तिला सात वेळा खो-खो च्या राष्ट्रीय संघात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या मिळालेल्या संधीचे सोने करत तिने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात आपले योगदान दिले. तिच्या या उत्कृष्ट कामगीरीची दखल घेऊन तिला यापूर्वी क्रीडा क्षेत्रातील राणी लक्ष्मीबाई व राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 12 ते 19 जानेवारी 2025 याकालावधीत नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टडियमवर होणार्या खो-खोच्या विश्वकपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मुलीच्या संधाची कर्णधार म्हणून प्रियंका हनुमंत इंगळे हिची निवड झाली आहे. सध्या दिल्लीत खो-खो च्या वर्ल्डकपची जोरदार तयारी सुरू आहे. भारतीय खो -खो संघाचे अध्यक्ष सुधांगु मित्तल यांच्या नेतृत्वाखाली गेल्या एक महिन्यापासून खेळाडू सराव करत आहेत.
खो-खो स्पर्धेत जगभरातील चोवीस देशांचे खो-खो संघ सहभागी होत आहेत. कर्णधारपद प्रियंका इंगळे हिला मिळाले आहे. तिच्या या संघात आश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निरमला भाटी, निता देवी, चैत्रा आर, सुभाश्री सिंग, मगाई माजी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, मसरीन शेख, मिनू, मोनिका व नाझिया या खेळाडूंचा भारतीय खो-खो संघात समावेश आहे. प्रशिक्षकपदी प्राची वाईकर यांची निवड झाली आहे. सव्वीस वर्षीय प्रियंका इंगळेने आतापर्यत खो-खोच्या 17 राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या प्रियंका खेळाडूंच्या कोट्यातून पुणे येथे क्रीडा अधिकारी पदावर नुकतीच सेवेत रूजू झाली आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राबवा : निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम
Newsworldmarathi Pune : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बर्न्ट मेमरी, मायक्रो कंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवा, असे निर्देश श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी दिले.
यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव कनिष्क कुमार, पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जितेंद्र डूडी यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे (बीईएल) अभियंता उपस्थित होते.
श्री. चोक्कलिंगम यावेळी म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होती. त्याबाबत न्यायालयाने सुनावण्या घेऊन, पक्षकारांचे म्हणणे ऐकून ईव्हीएम पूर्णतः विश्वसनीय असल्याचा निकाल दिला. याबरोबरच लोकांच्या ईव्हीएममधील मायक्रोकंट्रोलर चीपबाबत ज्या तक्रारी, शंका आहेत त्या देखील दूर व्हाव्यात यासाठी यंत्रणा निर्माण करावी, असे न्यायालयाने भारत निवडणूक आयोगाला निर्देशित केले. त्यादृष्टीने आयोगाने बीईएलच्या साहाय्याने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बर्न्ट मेमरी, मायक्रो कंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसाठी तांत्रिक प्रमाणित कार्यपद्धती तयार केली आहे.
ते पुढे म्हणाले, निवडणुकीनंतर या चीपमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप करून निकालात बदल (मॅनीप्युलेशन) करण्यात आलेले नाही या बाबत नागरिकांची खात्री करणे यादृष्टीने या कार्यपद्धतीला महत्त्व आहे. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहावा यासाठी ही कार्यपद्धती राबवायची आहे. त्यामुळे ही तपासणी व पडताळणी प्रक्रिया व्यवस्थितरित्या राबविण्याची मोठी जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर आहे. ही नवीन पद्धती असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी समजून घ्यावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. चोक्कलिंगम म्हणाले.
किरण कुलकर्णी म्हणाले, राजकीय पक्ष आणि उमेदवारांमधील संभ्रम दूर व्हावा या उद्देशाने या कार्यपद्धतीबाबत संक्षिप्त माहिती देणे ही जिल्हा निवडणूक अधिकारी यांची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने पक्ष आणि उमेदवारांसोबत बैठक आयोजित करण्यात यावी, असेही ते म्हणाले.
यावेळी बीईएलच्या अभियंत्यांनी या तांत्रिक कार्यपद्धतीबाबत सादरीकरण केले तसेच ईव्हीएमच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मांडलेल्या विविध शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले.
मस्साजोगमध्ये आज आंदोलन; देशमुख यांच्या भावाचा आत्महत्येचा इशारा
Newsworldmarathi Pune : संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी लढा उभारला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी गावकऱ्यांची आणि कुटुंबियांची मागणी आहे.
आज संपूर्ण गावकऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाद्वारे संबंधित प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, जेणेकरून आरोपींवर त्वरीत व कठोर कारवाई केली जाईल.
हा लढा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून, या प्रकरणावर प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना होऊनही आरोपींवर कठोर कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मीक कराडवर मोक्का (MCOCA) लावण्यात यावा, अशी ठाम मागणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख व गावकऱ्यांनी केली आहे.
ग्रामस्थ व कुटुंबीयांनी वारंवार न्यायाची मागणी केली असतानाही ठोस कारवाई झाली नाही, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यांनी थेट मोबाइल टॉवरवर चढून आत्महत्येचा इशारा दिला आहे.
ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये यासाठी प्रशासनाने त्वरीत हस्तक्षेप करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. या मागण्या मान्य न झाल्यास ग्रामस्थांचा रोष आणखी वाढू शकतो आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महिना झाला असूनही आरोपींवर ठोस कारवाई न झाल्याने गावकऱ्यांमध्ये संताप उफाळला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांसमोर शरण आला होता, तर आणखी तीन आरोपींना बीड पोलिसांनी अटक केली होती. प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी आणि एसआयटी मार्फत सुरू आहे.
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मुख्य आरोपी वाल्मीक कराडवर मोक्का लावण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप मोक्कासारखा कठोर कायदा लागू करण्यात न आल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
ग्रामस्थ व देशमुख कुटुंबियांनी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आज मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढून आरोपींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक झाले आहे.
पुणे ते जोधपूर रेल्वे दररोज सुरू करा : मगराज राठी
Newsworldmarathi Pune : पुणे ते जोधपूर रेल्वेसेवा नियमित करण्याची मागणी राजस्थानी समाज संघाकडून करण्यात आली आहे. या मागणीचे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना संघाचे अध्यक्ष मगराज राठी यांनी दिले आहे. मागणीबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन वैष्णव यांनी दिले असल्याचे राठी यांनी सांगितले.
शहरात मुख्यतः जोधपूर, बाडमेर, पाली, सिरोही, जालोर या जिल्ह्यांमधील नागरिकांचे पुण्यात मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असून सद्यःस्थितीत पुणे ते जोधपूर आठवड्याला एकच रेल्वेसेवा आहे. ती पुरेशी नसून ही रेल्वेसेवा दररोज सुरू करावी, तसेच चिंचवड रेल्वे स्थानकावरही या रेल्वेचा थांबा सुरू करावा, असे निवेदनात नमूद केले आहे.
पुणे ते जोधपूर दररोजची रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी राजस्थानी समाजाकडून महत्वाची मानली जात आहे. पुण्यात राहणाऱ्या राजस्थानी समाजाचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य लक्षात घेता, त्यांची त्यांच्या मूळ जिल्ह्यांशी नियमितपणे जोडणी होणे आवश्यक आहे.
सध्या पुणे ते जोधपूर फक्त आठवड्यातून एकदाच रेल्वे चालते, जी समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरी ठरत आहे. त्यामुळे ही रेल्वेसेवा दररोज सुरू करावी, तसेच चिंचवड स्थानकावर थांबा मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. ही सेवा नियमित झाल्यास प्रवाशांसाठी मोठा फायदा होईल आणि महाराष्ट्र-राजस्थान या दोन राज्यांतील संपर्क अधिक सुलभ होईल.
तीन-चार महिन्यात महापालिका निवडणुका; देवेंद्र फडणवीसांचे संकेत
Newsworldmarathi Pune : शिर्डी येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महाराष्ट्र अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही उपस्थिती होती, ज्यामुळे या कार्यक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात महापालिका निवडणुकीवर जोर देत राज्यातील सर्व महापालिका जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, विरोधकांकडे कोणतेही ठोस नेतृत्व किंवा धोरण नाही आणि त्यांची भूमिका केवळ टीका करण्यापुरती मर्यादित आहे.
फडणवीस यांनी भाजपच्या भविष्यातील योजनांचा उल्लेख करत सांगितले की, राज्यात विकासाचे नवे पर्व उभारण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. याशिवाय, त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला राज्यभरातून भाजप नेते, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थक जमले होते. राज्यात पक्षाचे अस्तित्व बळकट करणे, तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधणे आणि आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाच्या राजकीय चर्चेत गुंतणे हा या अधिवेशनाचा उद्देश होता. देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग हा पक्षासाठी महत्त्वाचा क्षण होता.
शिर्डी येथील भाजप अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहाद भाग २ या संदर्भात गंभीर आरोप करत राज्यातील बांगलादेशी घुसखोरांबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, नाशिकच्या अमरावती आणि मालेगावसारख्या तालुक्यांमध्ये अशा सुमारे १०० प्रकरणांची नोंद झाली आहे, जिथे ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे मिळवत आहेत.
फडणवीस यांनी या प्रकरणाकडे लक्ष वेधत असेही स्पष्ट केले की, अशा घुसखोरांना महाराष्ट्रात राहू दिले जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी सांगितले की, ही बाब फक्त एका जिल्ह्यापुरती मर्यादित नाही तर राज्याच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे.
मुख्यमंत्र्यांनी याबाबत प्रशासनाला कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारांच्या विरोधात राज्य सरकार शून्य सहनशीलतेची भूमिका घेत आहे, आणि बेकायदेशीर घुसखोरीला थारा दिला जाणार नाही.
हे विधान फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधण्यासाठीही वापरले, असे सांगून की, अशा गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष करून काही राजकीय नेते फक्त आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत.
शिर्डी येथील भाजप अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य केले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना “एकजूट आणि तयारी” या दोन गोष्टींवर भर देण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले, “‘एक हैं ते सुरक्षित हैं’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मंत्र आपल्या मार्गदर्शनासाठी आहे.” यावर आधारित, त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आणि आगामी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयारी करण्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या नागरी संस्थांच्या निवडणुका 2022 च्या सुरुवातीपासून प्रलंबित आहेत. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून, येत्या तीन ते चार महिन्यांत या निवडणुका पार पडतील, असे त्यांनी जाहीर केले.
फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना असेही सांगितले की, विधानसभा निवडणुकीतील यशावर विसंबून राहण्याऐवजी, नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवरील सशक्त संघटना आणि जनतेशी संपर्क वाढवणे, ही आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी महत्त्वाची रणनीती असेल.
त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना तळागाळातील जनतेशी नाळ जोडून पक्षाचे बळ वाढवण्याचे आवाहन केले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आगामी विजयासाठी जोरदार तयारी करण्यास सांगितले.
आजचे युग हे महिला उद्योजिकांचे आहे : चंद्रकांत पाटील
Newsworldmarathi Pune : आज सर्वच क्षेत्रामध्ये महिलांना आघाडी घेतली आहे आजच्या आंतरराष्ट्रीय उद्योजकता परिषदेत महिलांचे संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे त्यामुळे आता महिला उद्योजिकांचे युग सुरू झाल्याचे राज्याचे उच्चभ्रू तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले .ते उद्योजकता परिषदेत बोलत होते .यावेळी पिंपरी चिंचवड विद्यापीठाने हा कार्यक्रम यशस्वी करून शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले .
पुढे ते म्हणाले की आज भारत देशाकडे जगातील गुंतवणुकीचा ३७ टक्के वाटा आहे .त्यामुळे जगातील सर्व कंपन्या गुंतवणुकुसाठी आपल्याकडे येतात .याच गोष्टीचा विचार आता नव्याने उद्योजक होणाऱ्या पिढीने करून यामध्ये आपले स्थान निर्माण करावे असे पाटील यांनी आवाहन केले .
या सत्रात बिल्डिंग मीनिंगफुल पार्टनरशिप बिटविन युनिव्हर्सिटी एंड बिझनेसस ऑर्गनायझेशन या विषयावर महत्त्वपूर्ण असे आंतराष्ट्रीय चर्चासत्र झाले त्याला जगभरातील शंभरहून अधिक मान्यवर सहभागी झाले होते .यावेळी उपस्थितांनी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला.
यावेळी बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांनी आपल्या आयुष्यात उद्योजक होण्यासाठी केलेला संघर्ष सांगून नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले .
दुबई प्रशासनातील अधिकारी सोमनाथ पाटील यांनी दुबईतील उद्योग विश्वाची माहिती उपस्थितांना दिली. समतोलाचा सत्रात सहभागी नव उद्योजकांसाठी त्यांच्या उद्योजकीय संकल्पनांना वाव मिळण्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती त्यानुसार एकूण तीन विभागात ९ संघ विजयी करण्यात आले त्यांना एक लाख ,पन्नास हजार आणि पंचवीस हजार अशी अनुक्रमे बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आले .
दोन दिवसाच्या या परिषदेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी,डॉ.अभय जेरे,समीर मैत्रगोत्री हॉर्वर्ड विद्यापीठ अमेरिका,डॉ.विनोद मोहितकर संचालक तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन,शैलेंद्र देवळणकर संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र शासन,नील फिलिप सिटी विद्यापीठ न्यूयॉर्क,डॉ.प्रणिता सेन आदि मान्यवर विचारवंत आणि तज्ञ मार्गदर्शकानी विविध विषयावर उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले .
आंतरराष्ट्रीय उद्योजकता परिषदेच्या समारंभास माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गणेश नटराजन ,सिंगापूरचे उद्योजक आनंद गोविंदलूरी,डॉ.राजेंद्र जगदाळे ,पिंपरी चिंचवड ट्रस्ट चे अध्यक्ष राहुल काळभोर,कार्यकारी संचालक गिरीश देसाई ,संयोजक सचिन इटकर यासह देशातील आणि प्रदेशातील प्रमुख वक्ते आणि सहभागी उद्योजक उपस्थित होते.
आदर्श नागरिक बालवाडीपासून घडतात : ॲड संपत कांबळे
Newsworldmarathi Pune : के जी टू पि जी शिक्षणात प्राथमिक शाळेपासून काॅलेजपर्यंत शिकवणे त्या तुलनेने सोपे आहे मात्र तीन ते पाच वर्षाच्या चिमूरड्यांना सांभाळत आयुष्यभराचे संस्कार करणे तितकेसे सोपे नाही. शिवाय मानधनात तफावत असूनही भविष्यातील आदर्श नागरिक खऱ्या अर्थाने बालवाडीत घडतात. तीन ते पाच वर्षात मेंदूचा विकास अधिक गतीने होत असल्याने बालवर्गात समृद्ध अनुभव देणे महत्त्वाचे असते. हे अनुभव बालवाडी शिक्षिका खूप कष्टाने आणि प्रयत्नपूर्वक देत आहेत असे प्रतिपादन बॅ नाथ पै संस्कार केंद्र आयोजित बाल अभिनय गीत स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात ॲड संपत कांबळे यांनी केले.
स्वातंत्र्यसैनिका स्व विमलताई गरुड यांनी ४५ वर्षांपूर्वी बालचमूंना व्यासपीठ मिळावे या हेतूने या स्पर्धा सुरू केल्या. या वर्षी या स्पर्धेत पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील २० बालवाडी संघ स्पर्धेत उतरले होते. संस्कारक्षम अशी बहारदार गीते स्वतः रचत संबंधित शाळेतील शिक्षिकांनी सादर केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यावसायिक सुदर्शन इंगळे, उद्योजक क्रिष्णा आरगुळा, अंजली अरगुळा, मिलिंद पानसरे, महादेव खंडागळे उपस्थित होते. बालवर्गातील हे बालचमू एवढ्या उत्तम पद्धतीने गीत सादर करु शकतात त्याबद्दल क्रिष्णा आरगुळा यांनी आश्चर्य व्यक्त केले. महादेव खंडागळे यांनी शिक्षिकांना भावी शैक्षणिक समृद्धीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले.
बॅ नाथ पै संस्कार केंद्राच्या वतीने दरवर्षी बालवाडी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षिकांस गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात येतो.त्या पुरस्काराचे मानकरी शिरिष कुमार बालक मंदीर हडपसरच्या मनिषा पवार व ज्ञानेश पूर्वप्राथमिक शाळा बालाजीनगरच्या वृषाली देशपांडे या ठरल्या.
यावेळी राष्ट्र सेवादलाचे निष्ठावंत कार्यकर्ते दिवंगत सलीम शेख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कॅलेंडर प्रकाशन केले गेले
यावेळी व्यासपीठावर सचिव सोपान बंदावणे, शिवाजी खांडेकर, मीना काटे,रजनीताई धनकवडे,मंगला कांबळे,तुकाराम कदम उपस्थित होते..
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक कोषाध्यक्ष प्रा भगवान कोकणे यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल शेवते,शीतल खेडकर यांनी केले,आभार महादेव हेरवाडकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय ससे, तेजस्विनी फुलफगर, संगिता गोवळकर, मोनिका पोटे, शीतल रूपनूर ,लक्ष्मी कांबळे, नवनाथ लोंढे, प्रकाश कदम निशा नाईकनवरे यांनी परिश्रम घेतले.स्पर्धेचे परीक्षण विश्वास पांगारकर,निधी घारे, जलाल सय्यद यांनी केले.
स्पर्धेचा निकाल
प्रथम : हिंदुस्थान ॲंटीबायोटीक्स स्कूल पूर्वप्राथमिक शाळा , पिंपरी,पुणे.
द्वितीय : ज्ञानेश पूर्वप्राथमिक शाळा बालाजीनगर, पुणे
तृतीय : महेश्वरी प्रांगण प्री स्कूल धायरी , पुणे
तृतीय विभागून – वनाझ परिवार विद्यामंदिर पूर्व प्राथमिक विभाग कोथरूड पुणे.
स्वरचित
१) सविता लोखंडे ( हिंदूस्थान ॲंटीबायोटीक्स स्कूल, पूर्वप्राथमिक
२) रविंद्र यादव ( आशापुष्प बालक मंदिर,नर्हेगाव,पुणे)
निलेश आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
Newsworldmarathi Pune : रिपाइं सर्वसमावेशक युवा नेतृत्व, निलेश आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त व कालकतिथ सागर (चिंग्या ) सोनकांबळे यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबीर , शासन आपल्या दारी , व दुध वाटपाचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरात एकूण 48 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी आल्हाट यांनी स्वतः रक्तदान करत वाढदिवस साजरा केला. मंगळवार पेठ येथे कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे आयोजन रिपाइं (आठवले)शहर युवती आघाडी उपाध्यक्षा रिना आल्हाट यांनी केले.
अभीष्टचिंतन सोहोळ्यात अनेक राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंद साठे, प्रशांत म्हस्के, राज पडसाले ,प्रशांत वाघमारे, अमर कांबळे, लखण साबळे, रेहान शेख, जुबेर शेख, विजय गोंडणे,अभि मोझर, मयूर सुपेकर, संदीप वाघमारे, यांनी परिश्रम घेतले. तसेच शिबिर प्रसंगी रुबी हॉल क्लिनिक ब्लड सेंटरचे डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
खासदार सुळे यांची नाराजी; अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र
Newsworldmarathi Baramati : सुप्रिया सुळे यांनी अंजनगाव येथील वीज उपकेंद्र उद्घाटनाच्या निमंत्रणाबाबत व्यक्त केलेली नाराजी हे प्रोटोकॉलचा भंग आणि नियोजनाच्या अभावाकडे लक्ष वेधणारे उदाहरण आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत नाराजी व्यक्त केली आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचे संकेत दिले, हे त्यांच्या गंभीर भूमिकेचे निदर्शक आहे.
कार्यक्रमासाठी ऐनवेळी दिलेले निमंत्रण हे त्यांच्या नियोजित दौऱ्यात बदल करणे कठीण करणारे ठरले, हे त्यांनी स्पष्टपणे मांडले. तरीही त्यांनी उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली जबाबदारी निभावली. मात्र, उद्घाटनानंतर सभेसाठी थांबण्याऐवजी पुढील दौऱ्यासाठी रवाना झाल्या, यावरून त्यांची अस्वस्थता दिसून येते.
अंजनगाव वीज उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमामुळे सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना एकाच व्यासपीठावर पाहण्याची संधी मिळाली, जी राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली. लोकसभा निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या काही मोजक्या शासकीय बैठकींपर्यंत, या दोघांमध्ये फारसे सार्वजनिक संवाद झालेले नव्हते. त्यामुळे बारामतीत त्यांचा हा पहिला सार्वजनिक एकत्रित कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातो.
कार्यक्रमात, सुळे या पवार यांच्या आगमनापूर्वीच पोहोचल्या आणि दोघांमध्ये केवळ नमस्कारापुरता संवाद झाला. त्यानंतर, त्यांनी उद्घाटनात सहभाग घेतला पण सभेसाठी थांबण्याऐवजी पुढील दौऱ्यासाठी रवाना झाल्या. या गोष्टीने या दोन नेत्यांमधील संबंधांच्या सध्याच्या स्थितीबद्दल विविध चर्चा रंगल्या आहेत.
राजकीय दृष्टिकोनातून पाहता, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या सार्वजनिक कार्यक्रमातील सहभागावर बारीक नजर ठेवली जाते, कारण हे दोघे सध्या वेगवेगळ्या रणनीतींवर काम करत आहेत. महाविकास आघाडीतील ताणतणाव, त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय भूमिकांमधील भिन्नता, तसेच बारामतीतील राजकीय स्थिती, हे सर्व या कार्यक्रमामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने दोघे एकत्र दिसले असले तरी, त्यांच्यातील संवादाचा अभाव आणि कार्यक्रमानंतरचा वेगळा मार्ग यामुळे तणाव कायम असल्याचे संकेत मिळतात.
हा प्रकार प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाच्या उणीवेकडे लक्ष वेधतो. प्रोटोकॉलचे पालन आणि नियोजनाची वेळेवर माहिती मिळणे हे प्रभावी कामकाजासाठी महत्त्वाचे आहे, आणि अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

