Homeबातम्यामाजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गायक पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गायक पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार

Newsworldmarathi Delhi : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून अनेकांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शारदा सिन्हा, ओसामु सुझुकी यांच्यासह ७ जणांना पद्मविभूषण जाहीर झालेला आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी आणि गायक पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण जाहीर करण्यात आलेला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर दिवंगत गायक पंकज उधास यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

मनोहर जोशी यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील योगदान लक्षणीय मानले जाते. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. तसेच ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे ते शिवसेनेच्या इतिहासातील एक महत्त्वाचे नाव मानले जाते.

दिवंगत गायक पंकज उधास यांनी गझल गायनाच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र छाप पाडली. त्यांच्या मधुर आवाजाने भारतीय संगीताला जागतिक स्तरावर पोहोचवले. त्यांची गाणी आजही संगीत प्रेमींमध्ये लोकप्रिय आहेत.

तसेच दिग्दर्शक शेखर कपूर यांना देखील पद्मभूषण जाहीर झाला आहे. १९ जणांना पद्मभूषण पुरस्कार घोषित झालेला आहे. पैकी तिघे जण महाराष्ट्राचे आहेत. एकूण १९ जणांना यंदा पद्मभूषण जाहीर झालेला आहे. एकूण ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यात ११ जण महाराष्ट्रातील आहेत.

यंदा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पद्म पुरस्कार जाहीर झाले असून यावर्षी एकूण १९ जणांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्यापैकी तीघे महाराष्ट्रातील आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी, दिग्दर्शक शेखर कपूर, दिवंगत गायक पंकज उधास – गझल गायनाच्या क्षेत्रातील अमूल्य योगदानंबद्दल हा पुरस्कार दिला जाणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. कला, सामाजिक कार्य, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, व्यापार, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा यामध्ये समावेश आहे.

पद्मश्री पुरस्कारामध्ये अशोक सराफ हे अभिनय क्षेत्रातील महान व्यक्तिमत्त्व आहेत, तर अश्विनी भिडे देशपांडे आणि जसपिंदर नरुला यांनी संगीत क्षेत्रात आपल्या गायनकौशल्याने ठसा उमटवला आहे. मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल ओळखले जाते, तर राणेंद्र भानू मजुमदार बासरी वादन क्षेत्रातील एक आदरणीय नाव आहे. कृषीतज्ज्ञ सुभाष खेतूलाल शर्मा यांनी कृषी क्षेत्रात नवी दिशा दिली आहे, तर वासुदे कामत यांचे चित्रकलेतील योगदान महत्त्वाचे आहे. डॉ. विलास डांगरे यांचे कामही उल्लेखनीय आहे यामुळे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments