प्रभाग 22 मधील लोहियानगरामध्ये अर्चना पाटील यांच्या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद
Newsworldmarathi Pune: ‘विकास’ हेच अंतिम ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सातत्याने काम करणाऱ्या भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील यांच्या प्रभाग क्रमांक २२ ‘क’ मधील लोहियानगर येथे काढलेल्या भव्य पदयात्रेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले असून, हा प्रतिसाद त्यांच्या विजयाची नांदी असल्याचे चित्र दिसून आले.
लोहियानगर येथील श्रीराम मंदिरापासून अत्यंत पवित्र आणि मंगलमय वातावरणात या पदयात्रेची सुरुवात झाली. त्यानंतर ही रॅली संपूर्ण प्रभागातून मार्गक्रमण करत पुढे सरकली. रॅलीदरम्यान महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. गेल्या आठ वर्षांत सौ. अर्चना पाटील यांनी रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि अन्य मूलभूत सुविधांसाठी केलेल्या प्रभावी कामाची दखल घेत नागरिकांनी त्यांना पुन्हा संधी देण्याचा निर्धार केल्याचे या रॅलीतून स्पष्ट झाले. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी फुलांची उधळण करत आपला उत्साह आणि प्रेम व्यक्त केले. अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपाच्या या रॅलीमुळे संपूर्ण प्रभाग भाजपमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पदयात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना सौ. अर्चना पाटील यांनी जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “आज मिळालेला हा प्रतिसाद माझ्या आठ वर्षांच्या मेहनतीचे आणि तपश्चर्येचे फळ आहे. सर्व जाती-धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. जनतेने दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अमूल्य असून, याच विश्वासातून पुढील कार्यकाळातही मी अधिक जोमाने जनसेवा करेन,” असे त्या म्हणाल्या.
या रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साह दाखवत सौ. अर्चना पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि मजबूत जनसंपर्कामुळे त्या मोठ्या बहुमताने विजयी होतील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
ग्राहक पेठेत तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन
Newsworldmarathi Pune: स्वदेशी वस्तू विकत घ्याव्यात अशी जेव्हा सुरुवात झाली व मॉल असा प्रकारही नव्हता तेव्हा घरगुती वस्तू योग्य दरात मिळण्यासाठी सहकारी तत्त्वावर ग्राहक पेठेची सुरुवात झाली. आजही मोठ्या मॉलच्या स्पर्धेत ग्राहक पेठ तितक्याच ताकदीने उभी आहे. हे ग्राहक पेठेचे खऱ्या अर्थाने यश आहे असे मत ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्राहक पेठेच्या उपाध्यक्षा संध्या भिडे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक,जयराज अँड कंपनीचे डॉ.राजेश शहा आणि कोहिनूर कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर फिरोज शेख इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ म्हणाल्या मागील 34 वर्षापासून उत्पादक ते थेट ग्राहक या संकल्पनेतून ग्राहक पेठ तांदूळ महोत्सव सुरू आहे. खरा बासमती कोणता बासमती मधील तिबार दुबार म्हणजे काय या सर्वाची माहिती तांदूळ महोत्सवात ग्राहकांना दिली जाते. वर्षाच्या साठवणीसाठी पुणेकरांना उत्तम दर्जाचा तांदूळ रास्त दरात देण्याची प्रथा तांदूळ महोत्सव सुरू झाली. प्रतिवर्षी पुणेकरांचा महोत्सवास वाढता प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी सूर्यकांत पाठक म्हणाले उत्पादकांपासून थेट ग्राहकांपर्यंत वर्षाच्या साठवणी करिता रास्त दरात तांदूळ मिळवण्याकरिता हा तांदूळ महोत्सव सुरू आहे. बासमती पासून आंबेमोहर पर्यंत व इंद्रायणी पासून कोलम चिनोर पर्यंत सुमारे 48 प्रकारचे तांदूळ या ठिकाणी उपलब्ध आहेत. यावर्षी आंबेमोहोर तांदुळाचे दर बासमतीपेक्षा अधिक आहेत व ते वाढतच जाणार आहेत तरीदेखील महोत्सवात बाजारातील दर वाढले तरी याच दरात 25 जानेवारी पर्यंत तांदुळाचा पुरवठा ग्राहकांना केला जाईल.
डॉ.राजेश शहा म्हणाले ग्राहक पेठ गुणवत्ता व विश्वासासाठी ओळखली जाते. तांदूळ महोत्सव ही कल्पना ग्राहक पेठेची आहे. ग्राहक पेठेच्या सहकार्यामुळेच आम्ही उत्पादक तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांना थेट तांदूळ उपलब्ध करून देत आहोत. आजच्या या विशेष कार्यक्रमात अहमदाबाद वरून ग्राहक पेठे तांदूळ खरेदी करण्यासाठी ज्योत्स्नाताई तांबे उपस्थित होत्या.
बाप्पु मानकर यांचा प्रभाग २५ मध्ये घरोघरी संपर्क दौरा
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई येथील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी प्रभागातील विविध भागांमध्ये घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. या वेळी अनेक ठिकाणी नागरिकांनी औक्षण करून त्यांचे स्वागत करत आशीर्वाद दिले.
हा संवाद दौरा शनिवार पेठेतील आपटे घाट, महालिरकर टेकडी, उभा शनिवार, तांबे बोळ, घोडके आळी, वीर मारुती चौक, कडबे आळी, हसबनीस बखळ, काळभे वस्ती, मेहुनपुरा तसेच शनिवार पेठेतील विविध परिसरांमध्ये पार पडला. यावेळी नागरिकांनी ‘२४ तास जनसेवा’ कार्यालय व ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ मार्फत कौतुक करत, झालेल्या कामांच्या आठवणी सांगितल्या. भविष्यात अधिक कामाची अपेक्षा व्यक्त केली.
या प्रचार दौऱ्यात कसबा मतदारसंघ सरचिटणीस निलेश कदम, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, धनंजय डेंबळे, उमेश नवरे, अनंत कुंटे, राम दहाड, भूषण बोकील, अतुल मुरकुटे, अमित मुनोत, सर्वेश पवार, मनीष जाधव, ओंकार डिंबळे, कौस्तुभ गोखले, महेश काटदरे, यश थोपटे, कौस्तुभ गाडे आणि संतोष नामजोशी सहभागी झाले होते. यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भारतीय जनता पक्षालाच विजयी करण्याचे आश्वासन दिले.
प्रभाग २४ मध्ये राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Newsworldmarathi Pune: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा गड असलेला कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल हा प्रभाग क्रमांक 24 हा अधिक बळकट होताना पाहायला मिळत आहे.
भारतीय जनता पक्षाला (भाजप) मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज प्रभाग क्रमांक 24 मधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला प्रभागात मोठा धक्का बसला असून, भाजपसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून प्रभागातील राजकीय चित्र बदलले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेत्यांच्या या प्रवेशाने ते चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या उपाध्यक्ष वनिता विश्वास जगताप, सरचिटणीस अमर सुभाष कोरे आणि सदस्य आयेशा अमर कोरे यांचा समावेश आहे. या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
वनिता विश्वास जगताप या प्रभागात सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय आहेत, तर अमर सुभाष कोरे आणि आयेशा अमर कोरे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या प्रभागातील पायाभूत संरचनेला खिंडार पडले असून, गणेश बिडकर यांच्या विजयला अधिक बळ मिळाले आहे.
गणेश बिडकर यांनी प्रभागात केलेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढला आहे. कमला नेहरू आणि केईएम हॉस्पिटलसारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये सुविधा वाढवणे, ‘लाईट हाऊस’ उपक्रमातून महिलांना रोजगाराच्या संधी देणे यासारख्या कामांमुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास झाला आहे. आम्ही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये येण्याचे कारण म्हणजे हेच विकासाभिमुख नेतृत्व आहे,” अशी भावना प्रवेशावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
बाणेरमध्ये भाजपचा ‘सोसायटी टू सोसायटी’ प्रचार; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
Newsworldmarathi Pune: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील बाणेर परिसर सध्या भाजपच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रोहिणी सुधीर चिमटे, गणेश जानोबा कळमकर, मयुरी राहुल कोकाटे व लहू गजानन बालवडकर यांनी बाणेरमधील प्रमुख गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सलग भेटी देत नियोजनबद्ध, थेट आणि परिणामकारक प्रचार मोहिमेला वेग दिला आहे.
सुप्रीम एस्ताडो, सन हॉरायझन, एस्टोनिया, अंजोर को-ऑप हाउसिंग, पार्क एक्सप्रेस आणि एसेन्सिया हाइट्स या नामांकित सोसायट्यांमध्ये झालेल्या संवाद दौर्यांमुळे बाणेरमध्ये भाजपच्या निवडणूक प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ औपचारिक भेटी न करता, उमेदवारांनी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांवर सविस्तर चर्चा केल्याने प्रचाराला वेगळी धार मिळाल्याचे चित्र आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, सुरक्षितता, स्वच्छता आणि नागरी सुविधा यांसारख्या दैनंदिन ज्वलंत मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडत भाजपच्या विकासाभिमुख धोरणाचा मॅप नागरिकांसमोर ठेवण्यात आला.
विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी नागरिकांनी थेट अपेक्षा मांडत निवडणुकीत सक्रिय सहभाग आणि पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. उमेदवारांकडूनही समस्या सोडवण्यासाठी पारदर्शक, वेळबद्ध आणि जबाबदार कारभाराचे आश्वासन देण्यात आले. या संवादातून भाजपचा प्रचार केवळ राजकीय न राहता विश्वासार्ह आणि लोककेंद्री ठरत असल्याचे स्पष्ट झाले.
बाणेरमधील या सलग प्रचार दौर्यांमुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपची संघटनात्मक ताकद, नियोजन आणि जनाधार अधिक मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. वाढता नागरिक सहभाग, सकारात्मक प्रतिसाद आणि आक्रमक प्रचारयंत्रणा पाहता, बाणेरमधील ही घडामोड निवडणूक गणित बदलणारी ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
एकूणच, ‘कमळ’ चिन्हाभोवती मतदारांचे वाढते ध्रुवीकरण आणि प्रचार फेऱ्या प्रभाग ९ मधील निवडणूक लढतीला निर्णायक वळण देणार असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Newsworldmarathi Pune: पुण्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. सुरेश कलमाडी (वय 81) यांचे आज मंगळवार, 6 जानेवारी रोजी पहाटे 3.30 वाजता दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, सून, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचे पार्थिव कलमाडी हाऊस, एरंडवणे, पुणे येथे दुपारी 2 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार असून दुपारी 3.30 वाजता वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ, पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पायलट ते खासदार: एक संघर्षमय प्रवासभारतीय हवाई दलात ‘पायलट’ म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कलमाडींनी पुढे राजकारणात मोठे स्थान मिळवले. पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. ‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’च्या माध्यमातून त्यांनी पुण्याला जागतिक नकाशावर आणले.
पुणे महापालिका निवडणूक रंगात; नणंद अजित पवार गटात तर भावजई शरद पवार गटात
Newaworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून यंदाच्या निवडणुकीत अनेक नातेवाईक एकमेकांविरुद्ध किंवा वेगवेगळ्या पक्षांच्या वतीने रिंगणात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशाच एका अनोख्या राजकीय समीकरणाची चर्चा सध्या पुण्यात सुरू आहे. प्रभाग क्रमांक २८ (जनता वसाहत, हिंगणे खुर्द) आणि प्रभाग क्रमांक २७ (पर्वती–नवी पेठ) या दोन प्रभागांमध्ये नणंद आणि भावजई या नात्यातील दोन महिला उमेदवार वेगवेगळ्या पक्षांच्या व वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवत आहेत.
विशेष म्हणजे वेगवेगळ्या गटांतून निवडणूक लढवत असतानाही या दोघी एकत्र प्रचार करत असल्याचे दृश्य मतदारांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. दोन्ही उमेदवारांनी निवडणूक जिंकण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला असून आपापल्या प्रभागातील विकासाचा मुद्दा पुढे ठेवत त्या मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.
पुणे महापालिकेच्या या निवडणुकीत प्रिया गदादे पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक रिंगणात आहेत. प्रिया गदादे पाटील या २०१२ पासून पुणे महापालिकेच्या नगरसेविका म्हणून कार्यरत असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रभागातील विविध विकासकामांवर भर दिला आहे. त्यांच्या कार्याचा अनुभव मतदारांसमोर मांडत त्या पुन्हा एकदा जनतेचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, प्रिया गदादे पाटील यांच्या कुटुंबातील अक्षदा प्रेमराज गदादे पाटील यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत राजकारणात सक्रिय प्रवेश केला आहे. वेगवेगळ्या गटांतून उमेदवारी असूनही दोघींचा एकत्र प्रचार हा या निवडणुकीतील चर्चेचा विषय ठरत आहे.
सोरतापवाडी येथे बळीराजा मोफत आरोग्य शिबिर; साडेचार हजार नागरिकांनी घेतला लाभ
Newsworldmarathi Pune: सोरतापवाडी पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सुदर्शन चौधरी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि लक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोरतापवाडी येथे भव्य बळीराजा मोफत आरोग्य शिबिरbआयोजित करण्यात आले होते. या शिबिरास सोरतापवाडी, तरडे, शेंदवणे, वळती तसेच हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातील जवळपास साडेचार हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला.
या शिबिरात सुमारे १६० मोतीबिंदूचे रुग्ण आढळून आले असून १७०० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच सुमारे १८० रुग्णांची स्कॅन व एमआरआय तपासणीसाठी नावनोंदणी करण्यात आली आहे. दिव्यांग नागरिकांसाठी अत्याधुनिक कृत्रिम हातपाय व कॅलिपर्ससाठी सुमारे ३० जणांनी नोंदणी केली.
या आरोग्य शिबिरात हाडांचे आजार, कॅन्सर, दंतरोग, लहान मुलांचे आजार, किडनीवरील आजार, एक्स-रे तपासणीसह विविध व्याधींवर मोफत उपचार करण्यात आले. या उपक्रमात रुबी हॉल क्लिनिक, डॉ. डी. वाय. पाटील फिजिओथेरपी व डेंटल हॉस्पिटल, श्री काशीबाई नवले हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, विश्वराज हॉस्पिटल, प्राईम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांसह पुण्यातील अनेक अत्याधुनिक रुग्णालयांनी सहभाग नोंदवला.
या शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शशिकांतदादा गायकवाड, रोहिदास शेठ उंद्रे, दिलीपदादा काळभोर, प्रशांतदादा काळभोर, राजारामदादा कांचन, प्रकाश हरपळे, लक्ष्मण केसकर तसेच वळती गावचे सरपंच एल. बी. कुंजीर आणि पंचक्रोशीतील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिर भरवण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, ग्रामीण भागातील आरोग्य समस्यांची तीव्रता या शिबिरातून अधोरेखित झाली आहे.
या आरोग्य शिबिरात हाडांचे आजार, कॅन्सर, दंतरोग, लहान मुलांचे आजार, किडनीवरील आजार, एक्स-रे तपासणीसह विविध व्याधींवर मोफत उपचार करण्यात आले. या उपक्रमात रुबी हॉल क्लिनिक, डॉ. डी. वाय. पाटील फिजिओथेरपी व डेंटल हॉस्पिटल, श्री काशीबाई नवले हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, विश्वराज हॉस्पिटल, प्राईम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांसह पुण्यातील अनेक अत्याधुनिक रुग्णालयांनी सहभाग नोंदवला.
या शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शशिकांतदादा गायकवाड, रोहिदास शेठ उंद्रे, दिलीपदादा काळभोर, प्रशांतदादा काळभोर, राजारामदादा कांचन, प्रकाश हरपळे, लक्ष्मण केसकर तसेच वळती गावचे सरपंच एल. बी. कुंजीर आणि पंचक्रोशीतील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिर भरवण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, ग्रामीण भागातील आरोग्य समस्यांची तीव्रता या शिबिरातून अधोरेखित झाली आहे.
पुण्यात ८० हजार कोटींच्या विकासकामांच्या योजना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Newsworldmarathi Pune: पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात सुमारे ८० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यातील कात्रज चौक येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहरातील आमदार व भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे हे सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्ट्या देशातील महत्त्वाचे शहर असून राज्याचे आर्थिक इंजिन आहे. मागील पाच वर्षांत पुणे महापालिकेत सत्तेत असताना शहराचा सर्वांगीण विकास करण्यात आला. त्यामुळे टीका करणाऱ्या विरोधकांनी वस्तुस्थिती तपासावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने पुण्यासाठी भरीव विकास आराखडा तयार केला आहे.
पुणे मेट्रोचे ११० किमी मार्ग नियोजित असून त्यातील ३१ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर २४ किमी मार्ग अंतिम टप्प्यात आहे. २४/७ पाणीपुरवठा योजनेचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून सांडपाणी प्रक्रिया व ८८ किमी नदी सुधार प्रकल्पामुळे पूरनियंत्रण व पर्यावरण संरक्षण होणार आहे. शहरासाठी ४४ हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल, रिंग रोड, ५४ किमी भुयारी मार्ग, तसेच इंटेलिजेंट ट्रॅफिक सिस्टिम योजना राबविण्यात येणार आहे. एआय आधारित सीसीटीव्ही, स्मार्ट शाळा आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, मागील पाच वर्षात पुणे मनपात भाजपने ठोस काम केले त्यामुळे शहरात आमूलाग्र बदल झाला. विविध निवडणुकीत पुणेकर यांनी भाजपला साथ दिली आहे. पुणे शहराचं विस्तारीकरण आगामी काळात होणार त्यामुळे दूरदृष्टी ठेवून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे हे पालकमंत्री अजित पवार यांना कारभार सांभाळताना यापूर्वी लक्षात आले नाही का? आता पुणेकर विरोधकांना सत्तेत येण्यासाठी कोणती संधी देणार नाही. पुन्हा एकदा पुण्याचा महापौर भाजपचाच होईल कारण, जनतेचे आशीर्वाद भाजपसोबत आहे. केंद्रात पंतप्रधान आमचे, राज्यात मुख्यमंत्री आमचे तर पुण्याचा विकास देखील विरोधक नाही तर भाजपच करणार. जनतेने त्यांचा आशीर्वाद भाजपच्या उमेदवारांना द्यावा.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे सरकार वर्षानुवर्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा मध्ये होते. मागील निवडणुकीत बहुमत मिळून सलग पाच वर्ष भाजपचे सरकार दोन शहरात होते त्यामुळे अनेक विकासकामे सुरू झाली. मात्र, अजित पवार मागील काही दिवस विकासकामांच्या नावाने भाजपवर टीका करत आहेत. परंतु अजितदादा अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत त्यांनी त्यांच्या काळात भरीव विकास का केला नाही अशी विचारणा जनता आता करत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे हे सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्ट्या देशातील महत्त्वाचे शहर असून राज्याचे आर्थिक इंजिन आहे. मागील पाच वर्षांत पुणे महापालिकेत सत्तेत असताना शहराचा सर्वांगीण विकास करण्यात आला. त्यामुळे टीका करणाऱ्या विरोधकांनी वस्तुस्थिती तपासावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने पुण्यासाठी भरीव विकास आराखडा तयार केला आहे.
पुणे मेट्रोचे ११० किमी मार्ग नियोजित असून त्यातील ३१ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर २४ किमी मार्ग अंतिम टप्प्यात आहे. २४/७ पाणीपुरवठा योजनेचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून सांडपाणी प्रक्रिया व ८८ किमी नदी सुधार प्रकल्पामुळे पूरनियंत्रण व पर्यावरण संरक्षण होणार आहे. शहरासाठी ४४ हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल, रिंग रोड, ५४ किमी भुयारी मार्ग, तसेच इंटेलिजेंट ट्रॅफिक सिस्टिम योजना राबविण्यात येणार आहे. एआय आधारित सीसीटीव्ही, स्मार्ट शाळा आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, मागील पाच वर्षात पुणे मनपात भाजपने ठोस काम केले त्यामुळे शहरात आमूलाग्र बदल झाला. विविध निवडणुकीत पुणेकर यांनी भाजपला साथ दिली आहे. पुणे शहराचं विस्तारीकरण आगामी काळात होणार त्यामुळे दूरदृष्टी ठेवून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे हे पालकमंत्री अजित पवार यांना कारभार सांभाळताना यापूर्वी लक्षात आले नाही का? आता पुणेकर विरोधकांना सत्तेत येण्यासाठी कोणती संधी देणार नाही. पुन्हा एकदा पुण्याचा महापौर भाजपचाच होईल कारण, जनतेचे आशीर्वाद भाजपसोबत आहे. केंद्रात पंतप्रधान आमचे, राज्यात मुख्यमंत्री आमचे तर पुण्याचा विकास देखील विरोधक नाही तर भाजपच करणार. जनतेने त्यांचा आशीर्वाद भाजपच्या उमेदवारांना द्यावा.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे सरकार वर्षानुवर्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा मध्ये होते. मागील निवडणुकीत बहुमत मिळून सलग पाच वर्ष भाजपचे सरकार दोन शहरात होते त्यामुळे अनेक विकासकामे सुरू झाली. मात्र, अजित पवार मागील काही दिवस विकासकामांच्या नावाने भाजपवर टीका करत आहेत. परंतु अजितदादा अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत त्यांनी त्यांच्या काळात भरीव विकास का केला नाही अशी विचारणा जनता आता करत आहे. प्रभाग २७ मध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद; उमेदवार अक्षाता गदादे पाटील यांना नागरिकांचा पाठिंबा
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) कडून प्रभाग क्रमांक २७ (क) – नवी पेठ, पर्वती परिसरात प्रचाराला वेग आला असून पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. अक्षाता प्रेमराज गदादे पाटील यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या भव्य प्रचार फेरीला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आपला पाठिंबा व्यक्त केला.
या प्रचार फेरीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्वज, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध समाजघटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रचारादरम्यान उमेदवार अक्षाता गदादे पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली.
स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा आणि महिलांच्या सुरक्षिततेसह मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. “नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.
या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रभागात पक्षाची ताकद अधिक भक्कम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

