स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर
Newaworldmarathi Pune: स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजन स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने करण्यात आले. मागील नऊ वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, यंदाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विठ्ठल कांगणे सर उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेविका रूपाली पाटील ठोंबरे, प्रा. सुशीलाताई मोराळे, राहुल भाऊ घुले, युवा उद्योजक भरत गित्ते, संतोष उर्फ दिवाकर मते, रुपेश घुले, स्वातीताई पोकळे, शार्दुल जाधवर, दत्ता कोल्हे, सागर कोल्हे, गोकुळ करंजावणे, निलेश पांडे, कुणाल भाऊ पोकळे, समीर दादा जाधवराव, सौरव नाना मते, रोहिणी ताई राहणे, नगरसेवक गोपाळशेठ मळेकर, अविनाश लगड आणि नरसिंह लगड साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये एकूण ७० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. तसेच सुमारे १२० नागरिकांनी आरोग्य तपासणी करून विविध आजारांबाबत मार्गदर्शन व उपचार घेतले. नागरिकांच्या आरोग्याबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रा. विठ्ठल कांगणे सर यांनी आपल्या भाषणातून स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या शेवटी संतोष मुंडे यांनी सर्व प्रमुख पाहुणे, डॉक्टर, रक्तदाते व उपस्थित नागरिकांचे आभार मानले
महापालिकेचे बिगुल वाजले, १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल
Maharashtra Election Commission Press Conference: राज्य निवडणूक आयोगाची आज (दि. १५ डिसेंबर) बहूप्रतिक्षित पत्रकार परिषद सह्याद्री अतिथी गृह इथं झाली. अनेक वर्षांपासून महानगरपालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा अखेर जीव भांड्यात पडला आहे. राज्यात २९ महापालिका निवडणुका या १५ – १ – २०२६ तारखेला होणार असून या निवडणुकांचे निकाल हे १६ – १ – २०२६ दिवशी लागणार आहे.
राज्यातील २८६९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. १४४२ जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. आजपासून २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी आचार संहिता लागू करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली. राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालने २७ नगर पालिकांची मुदत संपली होती. जालना अन् या दोन नवीन नगरपालिका अस्तित्वात आल्या आहेत. २८ बहूसदस्यीय तर बृह्नमुंबई महापालिका ही एक सदस्यीय निवडणूक असणार आहे.
संपली होती. जालना अन् या दोन नवीन नगरपालिका अस्तित्वात आल्या आहेत. २८ बहूसदस्यीय तर बृह्नमुंबई महापालिका ही एक सदस्यीय निवडणूक असणार आहे.
राज्यात नुकतेच नगर परिषद आणि नगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. मात्र आरक्षण मर्यादा आलोंडल्यामुळं काही नगरपालिका अन् नगर परिषदांचे मतदान ऐत्यावेळी पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर ३ मे रोजी लागणारा निकाल देखील २२ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात यावा असा निर्णय उच्च न्यायालयानं दिला होता.
नगरपरिषद नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतरच महानगर पालिका निवडणुका कधी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. त्यातच राज्य निवडणूक आयोग १५ डिसेंबरला पत्रकार परिषद घेणार अशी चर्चा होती. त्या प्रमाणे आज १५ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली.
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुका…
उमेदवारी अर्ज भरणे ——२३ डिसेंबर
अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस ——३० डिसेंबर
उमेदवारी अर्जाची छाननी —–३१ डिसेंबर
अर्ज मागे घेण्याचे मुदत —–२ जानेवारी
चिन्ह वाटप ——३ जानेवारी
मतदान –१५ जानेवारी
मतमोजणी —–१६ जानेवारी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार; निवडून आयोगाची ४ वाजता पत्रकार परिषद
सर्वांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा राज्य निवडणूक आयोग आज (सोमवार) संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषदेत जाहीर करण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह १५ महापालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक अपेक्षित आहे.
राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्यानिवडणुकांच्या तारखा आज (१५ डिसेंबर) जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोग आज संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची असून यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक घोषित केले जाईल, असे बोलले जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ही पत्रकार परिषद मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत आयोगाकडून महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा आणि संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती समोर येत आहे. राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणाऱ्या या निवडणुकांना मिनी विधानसभा म्हणूनही ओळखले जाते. या निवडणुकीमुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कारभाराची दिशा ठरणार आहे. या बहुप्रतिक्षित निवडणूक कार्यक्रमात प्रामुख्याने खालील १५ मोठ्या महापालिकांचा समावेश असेल, अशी माहिती समोर येत आहे.
‘विश्वास विकास निर्विवाद’ माजी सभागृह नेते गणेश बिडकरांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन!
Newsworldmarathi pune : शहर भाजप प्रमुख नेत्यांमधील मानले जाणारे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन आज शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते पार पडले. पुणे महापालिकेत सभागृह नेता म्हणून केलेल्या कार्यापासून ते प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल भागामध्ये त्यांनी आजवर केलेल्या कार्याचा आढावा या ‘विश्वास विकास निर्विवाद’ घोषवाक्य असणाऱ्या कार्य अहवालातून घेण्यात आला आहे.
सभागृह नेता म्हणून शहरासाठी घेण्यात आलेले दूरगामी परिणाम करणारे निर्णय. प्रभाग क्रमांक २४ — कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल परिसर येथे गेल्या अनेक वर्षांत राबवलेल्या लोकाभिमुख उपक्रमांचा समग्र आढावा या कार्य अहवालातून मांडण्यात आला आहे. नागरी सुविधा, पायाभूत विकास, आरोग्यसेवा आणि जनतेशी थेट संवाद या सर्व बाबींचे ठळक प्रतिबिंब या अहवालात दिसून येते.
महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल येत्या दोन दिवसांत वाजण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये सत्ताधारी भाजपने उमेदवार निश्चितीसाठी जोरदार तयारी चालवली आहे. यामध्ये माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी असल्याने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यापासून ते उमेदवारी ठेवण्यापर्यंत त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
संघर्षातुन घडलेला माणूस आयुष्यात नेहमी यशस्वी होतो; डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन
Newaworldmarathi Pune : “संघर्षातून घडलेल्या माणसाला परिस्थितीची जाणीव असते. त्यातून त्याच्या ज्ञानाची समज अधिक व्यापक झालेली असते. त्यामुळे संघर्षातून घडलेला माणूस आयुष्यात नेहमी यशाच्या मार्गावर चालत राहतो. आज विभक्त कुटुंब पद्धती, परस्परांतील त्वेषामुळे समाज माणुसकीला दुय्यम स्थान देऊ लागला आहे. मात्र, माणुसकीच्या भिंती भक्कम करण्याचे काम आपल्याला करावे लागेल, त्यासाठी परस्परांतील संवाद गरजेचा आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
जीवन करपे लिखित मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रकाशित ‘संघर्ष माझा सोबती – पुणे ते जर्मनी’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात आयोजित सोहळ्यात माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, उद्योजक विजय ढेरे, कायदे अभ्यासक श्रीकांत अगस्ते, वरिष्ठ पत्रकार दिगंबर दराडे, विनोद सातव, जीवन करपे, सौ. पल्लवी करपे आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “मनाची शुद्धता, प्रामाणिकपणा, संस्काराचे महत्त्व, एकमेकांचा आदर, प्रेमभावातून घडलेले जीवन करपे त्यांच्या आयुष्यात हीच मूल्ये जगत आहेत. उद्योग-व्यवसायामुळे जर्मनीत स्थायिक झाले असले, तरी भारताविषयी, कुटुंबाविषयी त्यांच्या मनात असलेली आस्था, अभिमान आणि कुटुंबाला जोडून ठेवण्याचे कसब त्यांच्यातील माणूस प्रभावीपणे दिसून येतो. भारतातले उत्तम परदेशात न्यावे, आणि तिकडचे चांगले इकडे आणावे, या विचारांवर त्यांचे काम सुरु आहे. माणसामाणसातील, धर्मा-धर्मातील संवाद वाढविण्याला त्यांचे असलेले प्राधान्य मला महत्वाचे वाटते.”
पुण्यातील उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित; महसूल मंत्र्यांचे कठोर निर्देश
Newsworldmarathi Pune: मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव मानल्या जाणाऱ्या क्षेत्रात तब्बल ९० हजार ब्रास गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन झाल्याचे उघड झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशी एकूण दहा जणांना तत्काळ निलंबित करण्यात आले.
ईटीएस मोजणीत परवानगीपेक्षा मोठ्या प्रमाणात अधिक उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोषींवर फौजदारी तसेच महसूली अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधीाद्वारे हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनावर अनधिकृत उत्खननकर्त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप केला होता.
विभागीय आयुक्तांच्या चौकशीत गैरव्यवहार उघड
विभागीय आयुक्तांनी केलेल्या दुहेरी चौकशीत गट क्रमांक ३६, ३७ आणि ३८ येथे मंजूर असलेल्या खाणपट्ट्यांव्यतिरिक्त ३५, ४१, ४२ आणि ४६ या गटांवरही अनधिकृत उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाले. ईटीएस मोजणीत ३ लाख ६३ हजार ब्रास परवानगी असताना प्रत्यक्षात ४ लाख ५४ हजार ब्रास उत्खनन झाल्याचे आढळले.
निलंबित अधिकाऱ्यांची नावे
तलाठी – दीपाली सनगर, गजानन सोटपल्लीवार
मंडल अधिकारी – संदीप बोरकर, माणिक साबळे, अजय सोनवणे, रमेश कदम
तहसीलदार – जोगेंद्र कटियार, मनजीत देसाई, मधुसूदन बारगे, विक्रम देशमुख
दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू
संबंधितांवर गुन्हा दाखल करणे, दंड आकारणी, सातबारा उताऱ्यावर नोंदी घेणे आणि दंड न भरल्यास व्याजासह वसूल करणे यासंबंधीचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. निलंबित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करून अहवाल आगामी अधिवेशनात मांडला जाणार आहे.
वनीकरण क्षेत्रातील उत्खननाचा वाद
आमदार शेळके यांनी उत्खनन झालेले क्षेत्र वनीकरणासाठी राखीव असल्याचा मुद्दा मांडल्यानंतर महसूल मंत्र्यांनी उपलब्ध कागदपत्रांनुसार ती खाजगी जमीन असल्याचे स्पष्ट केले. गुगल इमेजमध्ये केवळ १५ झाडे असून त्यांना तोडण्याची परवानगी घेतली होती, अशी माहितीही त्यांनी दिली. वन विभागानेदेखील हा भाग ‘फॉरेस्ट झोन’ नसल्याचे लेखी कळवले असून, म्हणूनच खाणपट्ट्यांना परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पीएमआरडीएच्या प्रस्तावित आराखड्यात ती जमीन खाजगी वनीकरणासाठी राखीव असल्याने हा मुद्दा अधिक तपासण्याची तयारीही मंत्र्यांनी दर्शविली.
राज्यभरात ईटीएस सर्वे
अवैध उत्खननावर अंकुश ठेवण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावात ईटीएस सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. या सर्वेद्वारे परवानग्या आणि प्रत्यक्ष उत्खनन यातील तफावत स्पष्ट होऊन दोषींवर थेट कारवाई करता येणार आहे
महानगरपालिका निवडणुका ‘काउंटडाउन’वर;१५ डिसेंबरनंतर घोषणा होण्याची शक्यता
Newsworldmarathi Pune: गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील महानगरपालिका निवडणुकांना अखेर वेग येणार असून, १५ डिसेंबरनंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नववर्षाच्या पहिल्या महिन्यातच, म्हणजे १४ किंवा १५ जानेवारीला मतदानाची शक्यता अधिक आहे. २०१७ मध्ये निवडणूक जाहीरनाम्यानंतर प्रत्यक्ष मतदानापर्यंत दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होता. मात्र, यावेळी दीर्घकाळ लांबलेल्या निवडणुका आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ‘डेडलाईन’मुळे संपूर्ण प्रक्रिया अवघ्या ३० दिवसांत पूर्ण करण्याचा विचार राज्य निवडणूक आयोगाने सुरू केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, १५ डिसेंबर रोजी राज्यात शंभरहून अधिक महत्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ होणार आहेत. या कार्यक्रमांनंतर लगेचच निवडणूक आचारसंहितेची घोषणा होऊ शकते. महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर येथे ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबलेली आहे; परंतु उर्वरित २७ महानगरपालिकांसाठी मार्ग मोकळा झाला आहे.
विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणूक ही राज्यातील राजकीय दृष्ट्या सर्वात महत्वाची मानली जात असल्याने, जानेवारीतच ती पार पडण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग बुधवार किंवा गुरुवारी मतदान ठेवण्याचा विचार करीत आहे. सोमवारी किंवा शुक्रवारी मतदान झाल्यास सुट्ट्यांमुळे प्रतिसाद कमी मिळतो, असा मागील निवडणुकांचा अनुभव असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
नागरिकांना आपल्या शहराचे ‘स्वतःचे सरकार’ निवडण्याची संधी मिळणार असल्याने सर्वांच्या नजरा आता १५ डिसेंबरकडे लागल्या आहेत.
नाईट क्लब, पब्समधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आयुक्तांकडे मागणी
Newaworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र गटाच्या पुणे शहर शिष्टमंडळाने भेट घेऊन शहरातील नाईट क्लब, पब, बार, लॉज, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि तत्सम व्यावसायिक आस्थापनांमधील वाढत्या अग्निसुरक्षा धोक्यांवर सविस्तर चर्चा केली. अलीकडेच घडलेल्या भीषण आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक विशेष लक्षवेधी ठरली.
शिष्टमंडळाने आयुक्तांसमोर शहरातील अनेक ठिकाणी अग्निसुरक्षा उपकरणांची अनुपलब्धता, अपुरी साधने, नियमांचे उल्लंघन, तसेच सुरक्षा तपासणीत दिसून आलेल्या त्रुटींबाबतचे मुद्दे मांडले. या त्रुटीमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत असून या संदर्भात तातडीची आणि कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. नागरिक सुरक्षितता हा सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता शिष्टमंडळाने स्पष्ट केली.
बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली. आयुक्त नवल किशोर राम यांनी शिष्टमंडळास आश्वस्त करताना शहरातील सर्व संबंधित व्यावसायिक आस्थापनांची टप्प्याटप्प्याने अग्निसुरक्षा तपासणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की उणिवा आढळल्यास संबंधितांवर कठोर, तसेच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.अग्निसुरक्षा नियमांचे पालन अनिवार्य करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.नवीन सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी होईल यासाठी प्रशासन कडक पावले उचलेल.
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत नगरपालिका आवश्यक ती सर्व उपाययोजना करणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. या भेटीवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष किशोर कांबळे, अजिंक्य पालकर, अमोघ ढमाले, अजय पवार, मधुकर भगत, आशिष एरंडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
१०८ रुग्णवाहिकेची राज्यातील १ कोटी १४ लाख नागरिकांना मोफत आरोग्यसेवा
Newaworldmarathi Pune : महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेची १०८ रुग्णवाहिका राज्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. सलग ११ वर्षांपासून “डायल १०८ रुग्णवाहिका” राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देत आहे. आरोग्य संजीवनी ठरलेल्या या सेवेमुळे १ कोटी १४ लाख ४७ हजार २९६ रुग्णांना मोफत सेवा देण्यात यश आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि भारत विकास समूह (बीव्हीजी इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा राज्यात अव्याहतपणे सुरू आहे.
सद्यस्थितीत राज्यात एकूण ९३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यात ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट (ए.एल.एस.) आणि बेसिक लाईफ सपोर्ट (बी.एल.एस.) प्रकारातील रुग्णवाहिकांचा समावेश आहे. रुग्णवाहिकेत पल्स ऑक्सिमीटर, वैद्यकीय ऑक्सिजन यंत्रणा आदी सुविधांचा समावेश आहे. देशातील २४ तास डॉक्टर आणि अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारी ही एकमेव सेवा आहे.
राज्यात ५ डिसेंबरपर्यंत अपघाती घटनांमध्ये १०८ रुग्णवाहिकेमधून ५,४४,२२४ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यात आले. त्याचबरोबर आगीच्या घटनांतील ३१,९२७, हृदयरोगातील १,०३,८८९, उंचावरून पडून जखमी झालेल्या १,५९,५५१, विषबाधेच्या २,६७,४७४, प्रसूतीवेळीच्या १७,९६,६५५ आणि शॉक/वीज पडून जखमी झालेल्या ७,३९९ रुग्णांना सेवा देण्यात आली.
अशा प्रकारे राज्यात १०८ सेवेमार्फत एकूण १ कोटी १४ लाख ५८ हजार ३१६ रुग्णांना मोफत आरोग्यसेवा देण्यात यश आले आहे.
विदर्भातील गोंडवाना विभागातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि अमरावती हे आदिवासी बहुल जिल्हे आहेत. या विभागातील १ लाख ३८ हजार ६६५ नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.
“१०८” रुग्णवाहिका ठरली ४१,५१६ बालकांचे जन्मस्थळ
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेची १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत या रुग्णवाहिकेत ४१,५१६ बालकांचा जन्म झाला आहे. तसेच १७ लाख ९५ हजार २९२ गर्भवती महिलांना यशस्वी सेवा देण्यात आली आहे.
थोडक्यात, १०८ रुग्णवाहिका सर्वसामान्य नागरिकांसाठी अमृतवाहिनी ठरत आहे.
सर्पदंश झालेल्या १,१९,८२४ रुग्णांचे प्राण वाचवले
राज्याच्या ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. सर्पदंश झालेल्या १ लाख १९ हजार ८२४ नागरिकांनी १०८ रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेतला आहे. यात ग्रामीण भागातील बहुतेक शेतकरीवर्गाचा समावेश आहे.
बाबांच्या अस्थींचे अनोखे विसर्जन; हमाल भवन बाहेर लावले चाफ्याचे झाड
Newaworldmarathi Pune : कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर झगडणारे, श्रमिकांच्या वेदना स्वतःच्या हृदयात जपणारे आणि अन्यायाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिलेले श्रमिकांचे नेते, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या अस्थींचे अनोख्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. आयुष्यभर दुसऱ्यांना चाफ्याची फुले भेट देणाऱ्या बाबांच्या अस्थी कोणत्याही धार्मिक विधीशिवाय बुधवारी विसर्जित करण्यात आल्या. मार्केट यार्ड येथील हमाल भवनच्या बाहेर बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ चाफ्याचे झाड लावण्यात आले. या झाडाच्या मुळाशी त्यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या.
यावेळी त्यांची मुले असीम आणि अंबर, पत्नी शीला, लक्ष्मी नारायण, पौर्णिमा चिकरमाने, संतोष नागरे, गोरख मेंगडे (हमाल पंचायत), रिक्षा पंचायत नितीन पवार, शारदा वाडेकर, स्वच्छ आणि केकेपीकेपी लुब्ना अनंतकृष्णन, हर्षद बर्डे, योगेश मंजुळा, सुमन मोरे, राणी शिवशरण, विद्या नाईकनवरे, विविध संघटनांचे, हमाल, माथाडी, रिक्षा पंचायतीचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.

