पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न

Newsworldmarathi pune: २७व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत आज आयोजित केलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १३ ते २० वर्षे, २१ ते ४० वर्षे आणि ४१ वर्षांपुढील असे महिलांचे गट होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेचा सुंदर आविष्कार घडवीत देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडविले. शिवदर्शन-सहकारनगर येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात झालेल्या महिलांच्या या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विविध वयोगटांतील २००हून अधिक महिलांनी भाग घेतला होता. स्पर्धेत अनेक महिला कालीमाता, मीनाक्षी देवी यांच्या प्रभावी वेशभूषेत सहभागी झाल्या. त्याचप्रमाणे काहींनी भारत माता, जिजाबाई, सावित्रीबाई फुले, जनाबाई, शेतकरी स्त्री यांच्या रूपात अवतरून आपल्या सशक्त आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची छाप सोडली. विशेष म्हणजे एका स्पर्धक महिलेने प्लॅस्टिकचे रूप धारण करून समाजात पर्यावरणसंवर्धनाचा संदेश दिला. त्याला प्रेक्षकांकडून दाद मिळाली. संपूर्ण स्पर्धा रंगतदार वातावरणात पार पडली. सहभागी महिलांनी सादर केलेली वेशभूषा, आत्मविश्वास व आकर्षक प्रस्तुतीमुळे प्रेक्षक भारावून गेले. महिलांचा सहभाग व उत्साह यांमुळे नवरात्रौ महिला महोत्सवाचे सौंदर्य आणखीनच खुलून आले. प्रारंभी महिलांनी देवीची आरती केली. या उपक्रमाबद्दल पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी समाधान व्यक्त केले. महिलांच्या अशा सहभागामुळे समाजात संस्कृती जपण्यासोबतच प्रेरणादायी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे आणि सामाजिक संदेश अधोरेखित होत आहेत, असे मत व्यक्त करण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : ४१ वर्षांपुढील वयोगट प्रथम क्रमांक – रोहिणी टिळक द्वितीय क्रमांक – नंदा जोशी तृतीय क्रमांक – स्वाती पवार चतुर्थ क्रमांक – रत्नमाला खिवंसरा २१ ते ४० वयोगट प्रथम क्रमांक – राजश्री हबीब तृतीय क्रमांक – योगिता पिंपळगावकर चतुर्थ क्रमांक – मयूरी देवकर १३ ते २० वयोगट प्रथम क्रमांक – श्रुती विश्वकर्मा द्वितीय क्रमांक – स्वरांगीता जाधव तृतीय क्रमांक – प्रांजल अवचिते चतुर्थ क्रमांक – सृष्टी धस बक्षिसे ३००० रुपये, २००० रुपये, १००० रुपये आणि ५०० रुपये अशी होती. सर्व स्पर्धकांना प्रसाद व भेटवस्तू देण्यात आल्या.

ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी आमदार योगेश टिळेकरांची मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सात लाख ऐंशी हजारांचा धनादेश

0
Newsworldmarathi Pune: राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ओल्या दुष्काळाच्या छायेत बळीराजा आणि त्यांचे कुटुंब दडपून गेले असून, त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीतून विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सात लाख ऐंशी हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती देण्यात आला. हडपसर विधानसभा मतदारसंघ हा स्थलांतरित मजूर, कामगार आणि शेतमजुरांचा मोठा केंद्रबिंदू आहे. या भागातील नागरिकांशी संवाद साधताना शेतकऱ्यांच्या घराघरांत ओल्या दुष्काळाचे तीव्र स्वरूप स्पष्ट दिसत होते. त्यातूनच तत्काळ आर्थिक मदतीचा निर्णय घेतल्याचे आमदार टिळेकर यांनी सांगितले. “शहराचे शहरपण विसरून गावचे गावपण जपणे, हा आपला सामाजिक धर्म आहे,” असेही ते म्हणाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आधार देण्याची भूमिका स्पष्ट केली. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर पुणे शहरातील तसेच राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्था आणि व्यक्तींनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार टिळेकर यांचे आभार मानले. “शेतकऱ्यांच्या संकटावर मात करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, मात्र समाजातील प्रत्येक घटकाने यात हातभार लावणे गरजेचे आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या ग्रामीण भागात ओल्या दुष्काळाचे संकट गडद होत असताना लोकप्रतिनिधी, संस्था आणि नागरिक यांच्या अशा मदतीच्या हातांमुळे शेतकऱ्यांच्या दु:खावर थोडासा मरहम पडेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मार्तंड भैरव खंडोबाच्या विवाह सोहळ्याच्या भव्य जिवंत देखाव्यास आमदार हेमंत रासने यांची उपस्थिती

0
Newsworldmarathi Pune: कसबा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार हेमंत रासने यांनी अशोक तरुण मंडळ व संयुक्त अण्णा भाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित “मार्तंड भैरव खंडोबाचा विवाह सोहळा” या भव्य जिवंत देखाव्यास भेट दिली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे या सोहळ्याला एक वेगळी उंची प्राप्त झाली. हा अद्वितीय सांस्कृतिक उत्सव नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाच्या संयुक्त प्रयत्नांतून मोठ्या उत्साहात पार पडत आहे. देखाव्यात कलात्मकता, श्रद्धा आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. या भेटीदरम्यान आमदार हेमंत रासने यांनी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी मंडळाच्या वतीने आमदारांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, तसेच उमेश धुरांडे, छगन भुलाके, राजू परदेशी, माधव साळुंखे, पप्पू कोठारी, सुरेंद्र ठाकूर आणि इतर अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका अर्चना पाटील, भाजप उपाध्यक्ष तुषार पाटील आणि अशोक मित्र मंडळाने केले. मंडळाच्या सदस्यांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे संपूर्ण सोहळा सुरळीत आणि दिमाखदार पार पडला. यावेळी नगरसेविका अर्चना पाटील यांनी व्यक्त केले की, “अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे आपली परंपरा जपली जाते, आपली मुळे अधिक घट्ट होतात आणि सामाजिक एकोपाही दृढ होतो. हा सोहळा खर्‍या अर्थाने सामूहिक शक्ती व एकीचे दर्शन घडवणारा ठरला असून, नागरिकांच्या मनात कायम स्मरणात राहील.” मार्तंड भैरव खंडोबाच्या विवाह सोहळ्याचा हा देखावा फक्त धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित न राहता सांस्कृतिक व सामाजिक एकात्मतेचा उत्सव ठरला. या भव्य सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आणि पारंपरिक संस्कृतीला नवे अधिष्ठान लाभले.

मशाल मोर्चातून महाराष्ट्र युवक काँग्रेसचा ज्वालामुखी उद्रेक – मतदान चोरी आणि बेरोजगारीविरोधात सरकारला इशारा!

Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आज पुण्यात भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शेकडो युवकांनी हातात मशाली घेऊन “मतदान चोरी बंद करा”, “तरुणांना नोकरी द्या”, “लोकशाही वाचवा” अशा आक्रमक घोषणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी मोरे यांच्या नेतृत्वात देत रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संताप व्यक्त करत म्हटले की –”सरकारने लोकशाहीची गळचेपी करून निवडणुकांमध्ये उघडपणे मतदान चोरी केली आहे. बेरोजगारीचा राक्षस प्रत्येक तरुणाच्या आयुष्याशी खेळत आहे. युवकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही गप्प बसणार नाही. ही मशाल आता तरुणांच्या हातून उठलेली ज्वाला आहे, जी भ्रष्ट सत्तेला राखेत मिळवेल.” त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी आक्रमक भाषेत सरकारला इशारा देत म्हटले – “युवकांच्या भविष्याशी गद्दारी करणाऱ्या या सरकारला आम्ही रस्त्यावर उतरून सणसणीत उत्तर देत आहोत. मतदान चोरी करून सत्तेत आलेले लोकशाहीचे खुनी आम्ही कधीच स्वीकारणार नाही. रोजगार, शिक्षण आणि हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक तरुणाचा आवाज आज मशालीतून पेटला आहे. ही लढाई आता रस्त्यावरून संसदेत जाईल आणि जनता हुकूमशाही पाडूनच थांबेल.” या मशाल मोर्चामध्ये हर्षवर्धन सपकाळ, डॉ विश्वजीत कदम, प्रदेश प्रभारी अजय चिकारा, युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, माजी मंत्री सतेज (बंटी) पाटील, अभय छाजेड, अरविंद शिंदे, मा.आ. मोहन जोशी, मीडिया विभाग प्रमुख व युवक सरचिटणीस अक्षय जैन, सौरभ अमराळे, प्रथमेश अबनवे आदी मान्यवर उपस्थित होते.

दि पूना गुजराती केळवणी मंडळाची शताब्दी वर्षातील निवडणूक बिनविरोध

0
Newsworldmarathi Pune: शिक्षण क्षेत्रात गेल्या शंभर वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दि पूना गुजराती केळवणी मंडळाची नियतकालिक निवडणूक यंदाच्या शताब्दी वर्षात बिनविरोध पार पडली आहे. या संदर्भातील माहिती संस्थेचे चेअरमन डॉ. राजेश शहा यांनी दिली. २०२५-२०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी मंडळाचे प्रमुख म्हणून नितीनभाई देसाई यांची निवड झाली आहे. तर किरीटभाई शहा आणि राजेंद्रभाई शहा हे विश्वस्त म्हणून निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे २०२५-२०३१ या सहा वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारिणी सभासद म्हणून जनकभाई शहा, हेमंतभाई मणियार, विनोदभाई देडिया, दिलीपभाई जगड, मोहनभाई गुजराती, ब्रजेशभाई शहा, निलेशभाई शहा, किरणभाई शहा, दिपेनभाई शहा व निकुंजभाई शहा हे दहा सभासद बिनविरोध निवडून आले. “शिक्षण हे केवळ ज्ञानदान नसून सामाजिक परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे,” या दृष्टीकोनातून संस्था गेल्या शंभर वर्षांपासून कार्यरत आहे. पारंपरिक मूल्ये व अत्याधुनिक शिक्षण यांचा समन्वय साधत संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या मंडळ आर. सी. एम. गुजराती प्रशाला आवार (कसबा पेठ), हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय आवार (बुधवार पेठ), आणि PGKM स्कूल आवार (कोंढवा) या तीन ठिकाणी शैक्षणिक केंद्रे चालवित आहे. संस्थेच्या शैक्षणिक प्रवासात अलीकडेच एक मोलाची भर घालण्यात आली आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्ये आत्मसात करता यावीत, यासाठी हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात २०२५ पासून *बी.एस्सी. सायबर सुरक्षा (B.Sc. Cyber Security)* हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ऑनलाइन आर्थिक व्यवहार, सोशल मीडिया वापर आणि डेटासुरक्षेच्या पार्श्वभूमीवर या अभ्यासक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. हॅकिंग, फसवणूक, डेटाची चोरी यांसारख्या घटनांमुळे सायबर सुरक्षा क्षेत्रात कुशल तज्ज्ञांची मागणी झपाट्याने वाढत आहे. याशिवाय मंडळाच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातून, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी या केंद्राचा लाभ घेत आहेत. माफक शुल्कात दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देत, आजवर शेकडो विद्यार्थी राज्य व केंद्रातील विविध सेवांत उत्तीर्ण होऊन वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. सध्या मंडळाच्या विविध संस्थांमध्ये मिळून सुमारे दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, शताब्दी वर्षात बिनविरोध निवडणुकीमुळे मंडळाच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला अधिक बळ मिळाले आहे.

500 महिलांनी केले श्री लक्ष्मी माता मंदिरात श्री सूक्त व सहस्त्र विष्णुनामाचे सामूहिक पठण

0
Newsworldmarathi Pune: पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या निमित्ताने 27 वर्षांपासून पुणे नवरात्रौ महिला महोत्सव सौ. जयश्री बागुल यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखात चालू आहे. महिलांच्या कला गुणांना संधी मिळावी याकरिता महिलांना पुरस्काराने सन्मानित करावे आणि धार्मिक श्रद्धा परंपरा जोपासली जावी यासाठी शिवदर्शन-सहकारनगर परिसरात मा उपमहापौर आबा बागुल यांच्या अध्यक्षतेखाली उभारलेल्या दाक्षिणात्य धाटणीच्या श्री लक्ष्मी माता मंदिरासमोर प्रांगणात भव्य नवरात्रोत्सव 10 दिवस हा संपन्न होतो. अशा श्री लक्ष्मी माता मंदिराच्या प्रांगणात 500 हुन अधिक महिलांनी सामूहिक आरती केली आणि सूक्त व सहस्त्र विष्णुनामाचे सामूहिक पाच – पाच वेळा पठण सामूहिक पद्धती केले या प्रेक्षणीय सोहळ्यासाठी महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. गेली 27 वर्षे हा अनोखा चालू असून महिलांनी समाधान व्यक्त केले. नंतर या कार्यक्रमात पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल स्वतः सहभागी झाले होते. याबद्दल देखील सर्व महिलांनी समाधान व्यक्त केले.

कबीरच्या पाठीवर कौतुकाची थाप, एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने कबीरचा यथोचित सन्मान

0
Newsworldmarathi Pune: बोलके डोळे, निरागसता, नैसर्गिक अभिनय आणि बालवयातच प्रगल्भ अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या ‘जिप्सी’ चित्रपटांत झळकलेल्या बालकलाकार कबीर खंदारे चा एकता सेवा प्रतिष्ठान च्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश शेरला यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मोत्याची माळ व महाराष्ट्राच्या शौर्य, प्रेरणा, आणि आस्थेचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देत कबीर च्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात. यावेळी बोलताना गणेश शेरला म्हणाले “जिप्सी” चित्रपटासाठी नुकताच महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार तसेच भारत सरकारचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार कबीर खंदारे ला महामहीम राष्ट्रपती श्रीम. द्रोपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते मिळाला असून कबीर च्या या दैदिप्यमान यशामुळे मराठी चित्रपट क्षेत्रात दक्षिण उपनगराचा नावलौकिक वाढला आहे. चित्रपट क्षेत्रातील कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कार मिळवत असल्याची बाब निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे शेरला यांनी सांगितले. यावेळी अजय गुटगे, शिशी खंदारे,बद्रीनाथ जन्म, धन्यकुमार गुगळे, सचिन पाटोळे,अश्विनी चिन्नी, अरुण गांजे, भारतीय जनता पार्टी पर्वती मतदार संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते व एकता सेवा प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सोमवार पेठेतील नवरात्र महोत्सवाला सभागृहनेते गणेश बिडकर व अभिनेता प्रविण तरडे यांच्या उपस्थितीने उत्साह

0
Newswroldmarathi Pune: प्रभाग क्र. २४ मधील सोमवार पेठेत नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित भव्य देवीची आरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली. या प्रसंगी नगरसेवक तथा मा. सभागृहनेते गणेश बिडकर आणि सुप्रसिद्ध अभिनेते प्रविण तरडे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. देवी आरतीच्या या सोहळ्यात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गणेश बिडकर आणि प्रविण तरडे यांनी मंडळाच्या कार्याची आणि नवरात्र महोत्सवाच्या भव्यतेची प्रशंसा केली. आरतीनंतर मंडळाचे विश्वस्त अध्यक्ष सुनील पवार आणि अध्यक्ष प्रसाद गोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक प्रविण तरडे तसेच सैरभ कर्डे यांच्या उपस्थितीमुळे उत्सवाला अधिकच ऊर्जस्वल वातावरण लाभले. समाजातील बंधुभाव, ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरा अधोरेखित करण्याचे कार्य या महोत्सवातून घडत असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
Oplus_16908288
नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सोमवार पेठेतील नवरात्र महोत्सव अधिकच भव्य आणि उत्साहपूर्ण होत असून धार्मिक भावनांसह सांस्कृतिक एकतेचा संदेश देत आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या स्वाती चिटणीस आता अजित पवार गटात

0
Newsworldmarathi Pune: शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या कार्यकर्त्या स्वाती चिटणीस यांनी आज औपचारिकपणे अजित पवार गटात प्रवेश केला. पुण्यात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी स्वाती चिटणीस यांनी सांगितले की, “अजित दादांसोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ऊर्जा आणि जोमाने प्रामाणिकपणे काम करून महाराष्ट्रात त्यांचे हात बळकट करण्याचे काम करू.” त्यांनी सांगितले की, या प्रवेशादरम्यान त्यांच्या वतीने अनेक महिलांचा देखील पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला. या प्रवेश सोहळ्यात इतर अनेक मान्यवरांचा पक्षप्रवेश झाला. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जालिंदर कामठे, भूविकास बँकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर तसेच काँग्रेस नेते रोहन सुरवसे यांचा समावेश आहे. यामुळे अजित पवार गटाची ताकद आणखी वाढली असल्याचे मानले जात आहे. या कार्यक्रमाला शहराचे अध्यक्ष सुनील आण्णा टिंगरे, सुभाष जगताप, पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, हडपसर मतदारसंघ अध्यक्ष शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष संदीप बधे, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राकेश कामठे, बचत गट शहराध्यक्षा अश्विनीताई वाघ, रोहिणी शिरसागर, बिना कटंबनी, वैशाली शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वाती चिटणीस यांच्या प्रवेशामुळे अजित पवार गट अधिक मजबूत होणार असून, शरद पवार गटासाठी मात्र हा धक्का मानला जात आहे. या घडामोडीनंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणात बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत.

काँग्रेसला पुन्हा धक्का : रोहन सुरवसे पाटीलसह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

Newsworldmarathi Pune : पुणे शहर आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील गळती थांबण्याचे नाव घेत नाही. पक्षातील अंतर्गत कुरघोडीला कंटाळून युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजीत पवार यांच्या हस्ते प्रवेश केला. विशेष म्हणजे सुरवसे पाटील यांच्यासह युवक काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत दाखल होत पक्षाला संघटनात्मक बळ दिले आहे. त्यामुळे आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहन सुरवसे कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. अलीकडेच बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात त्यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आज (शुक्रवारी) शिवाजीनगर येथील पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी औपचारिक पक्ष प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यांनी सुरवसे पाटील यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत “पक्षात चांगले काम कराल” असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष सुनील टिंगरे, आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार रमेश थोरात, महादेव बाबार, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, तसेच सुभाष जगताप, राकेश कामठे, प्रदीप देशमुख, रुपेश संत आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात रोहन सुरवसे पाटील यांच्यासह सागर नायकुडे, पुष्कर ढमाले, आकाश नवले, देवेंद्र खाटेर, ज्ञानेश्वर जाधव, सोनू आंधळे, सचिन मोरे, सत्यजित गायकवाड, दीपक चौगुले, आदित्य शेटे, निखिल मुळीक, अॅड. सुधीर शिंदे, प्रशांत मोरे आणि गणेश शिंदे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. “अजित दादांसोबत काम करणार” – रोहन सुरवसे “अजित पवार यांच्यासारखे कोणताही नेता काम करत नाही. त्यांचे काम पाहुन आम्ही प्रभावित झालो असून, त्यामुळेच त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. दादा जे जबाबदारी देतील, त्यानुसार मी आणि माझे सहकारी पूर्ण ताकदीने काम करू,”असा विश्वास रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त केली.