Homeबातम्याभारतात सर्व यंत्रणा अलर्टमोडवर; पुढील आदेशापर्यंत 'हे' विमानतळे तात्पुरती बंद

भारतात सर्व यंत्रणा अलर्टमोडवर; पुढील आदेशापर्यंत ‘हे’ विमानतळे तात्पुरती बंद

Newsworldmarathi Delhi: भारत प्रशासित काश्मीरमध्ये आणि सीमावर्ती राज्यांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अनेक विमान वाहतूक कंपन्यांनी आपल्या उड्डाणांमध्ये बदल केले आहेत. जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंडीगड आणि राजकोटसारख्या ठिकाणांवरील उड्डाणे रद्द करण्यात आली असून काही विमानांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

एअर इंडियाने जाहीर केल्यानुसार, वरील सर्व ठिकाणांसाठीची उड्डाणं आज दुपारी १२ वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. अमृतसरकडे जाणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय विमानांचे मार्ग वळवून त्यांना दिल्लीकडे पाठवण्यात आले आहे.

स्पाइसजेटने देखील धर्मशाला, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर भारतातील अनेक विमानतळ बंद झाल्याची माहिती दिली असून, त्यामुळे त्यांच्या उड्डाणांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

इंडिगो एअरलाइन्सनेही सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, बदलत्या हवाई परिस्थितीमुळे काही शहरांमध्ये जाणाऱ्या व येणाऱ्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे.

दरम्यान, हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने लाहोर आणि कराची या प्रमुख शहरांचे हवाई क्षेत्र बंद करण्याची घोषणा केली आहे

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments