Newsworldmarathi Mumbai : एसटीची सेवा आणखी वगेवान करण्यासाठी पुढील पाच वर्षांत २० ते २५ हजार बस येणार असून याच महिन्यात कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी बैठक घेऊन त्यांचे प्रश्न आणि विविध मागण्या मार्गी लागतील, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या ५७ वे महाअधिवेशन माणगावमध्ये झाले. त्यावेळी ते बोलत होते.
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिन्ही नेते अत्यंत संवेदनशील आहेत. एसटी चिरकाल टिकली पाहिजे. त्यासाठी सरकार म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेशांद्वारे शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी खा. सुनील तटकरे, रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, एसटी कामगार संघटनेचे संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संदीप शिंदे, सुभाष केकाणे, रायगड जिल्हा अध्यक्ष विलास खोपटे, विभागीय सचिव गणेश शेलार, युवासेना जिल्हाध्यक्ष विपुल उभारे उपस्थित होते.


Recent Comments