Newsworldmarathi Mumbai : Devendra Fadnavis : सायबर सुरक्षेसाठी देशातील अत्याधुनिक सुविधा महाराष्ट्रात आहेत. या माध्यमातून सायबर गुन्हे, सायबर फसवणूक व मानवी तस्करीपासून लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळातही सायबर फसवणूक टाळण्यासाठी अधिक परिणामकारकपणे काम करणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सायबरच्या आर्टिफिशियल इंटिलिजन्स बॉट व सायबर जागरुकता माहितीपट या नाविन्यपूर्ण नागरिक केंद्रीत उपक्रमांचे अनावरण सह्याद्री अतिथिगृहात करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव, पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे, पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, अभिनेता शरद केळकर, अभिनेत्री अमिषा पटेल, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते. या वेळी सायबर सुरक्षाविषयक माहितीपट दाखवण्यात आला.
मराठी आणि हिंदी भाषेत असलेल्या या माहितीपटात शरद केळकर, अमिषा पटेल यांनी काम केले आहे. या माध्यमातून सायबर गुन्हेगारी, सायबर फसवणूकसंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे.
तसेच महाराष्ट्र सायबरच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट बॉटचे सादरीकरण करण्यात आले. हा चॅट बॉट महाराष्ट्र सायबरच्या १९४५ या हेल्पलाइनशी जोडले गेले आहे. तक्रार कशी करावी, यासंबंधीची माहिती मिळणार आहे. मानवी तस्करीमध्ये लोकांना वाईट पद्धतीने वागवले जाते. यासारखे अमानुष प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबरने जनजागृती करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.


Recent Comments