Homeबातम्यालग्नाच्या आनंदावर काळाची छाया; ट्रक-कार अपघातात ९ जणांचा करुण अंत

लग्नाच्या आनंदावर काळाची छाया; ट्रक-कार अपघातात ९ जणांचा करुण अंत

Newsworldmarathi team: West Bengal Accident : पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील पुरूलिया-जमशेदपूर राष्ट्रीय महामार्ग-१८ वर शुक्रवारी पहाटे एक हृदयद्रावक रस्ते अपघात घडला. भरधाव ट्रकने एका कारला जोरदार धडक दिल्याने कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला.

ही कार लग्न समारंभ आटपून घरी परतणाऱ्या वऱ्हाडी मंडळींनी भरलेली होती. अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments