Homeभारतडॉ. आंबेडकरांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाऊ : आ. अमित गोरखे

डॉ. आंबेडकरांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाऊ : आ. अमित गोरखे

Newsworld Pune : महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी पिंपरी येथील स्मारकावर मान्यवरांचा उपस्थितीत विशेष कार्यक्रम आयोजित केला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यात दिलेल्या महान योगदानाची आठवण ठेवत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.

यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे, प्रसिद्ध व्याख्याते नामदेवराव जाधव, ज्येष्ठ साहित्यिक सोपानराव खुडे, तसेच सुनील भिसे, सोपानराव चव्हाण, भीमराव पवार, विनायक मोहिते, धरम वाघमारे, संभाजी नाईकनवरे, निलेश कांबळे, विशाल कदम, शरद कोतकर, ज्ञानेश पाटील, सागर बहिरवाडे, अभिजीत देढे आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली.

या प्रसंगी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचा आग्रह व्यक्त करण्यात आला. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्यांच्या तत्त्वज्ञानाचे अनुसरण करावे, असा संदेश देण्यात आला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments