Newsworld Delhi : दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाच्या निर्णयाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. इन्कम टॅक्स विभागाने जप्त केलेली मालमत्ता मोकळी करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. या निर्णयाचा लाभ अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनाही झाला असून, त्यांच्या मालमत्तेसुद्धा मुक्त करण्यात आली आहे.
हा निर्णय पवार कुटुंबासाठी मोठा न्यायालयीन दिलासा मानला जात आहे, कारण या प्रकरणामुळे गेल्या काही काळापासून त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या निर्णयामुळे पवार कुटुंबाची मालमत्ता वापरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राजकीय व सामाजिक वर्तुळात याची चर्चा होत आहे.


Recent Comments