Newaworldmarathi Pune : हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने पुन्हा एकदा आनंदाची घोषणा केली असून, सध्या सुरू असलेल्या ४१८४ घरांच्या सोडतीनंतर येत्या मार्चमध्ये आणखी ३ हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. गेल्या अडीच वर्षांत २० टक्के सर्वसमावेशक योजनेतून सुमारे २५ हजार घरे उपलब्ध करून दिल्याची माहिती मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
खासगी विकासकांकडून जादा शुल्क आकारल्याच्या तक्रारींवर कारवाई करत वाढीव रक्कम रद्द करण्याचे आदेश देण्यात आले असून, विजेत्यांना ५० टक्के पार्किंग अनिवार्य राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. चंदनगर-खराडी येथील १५ गुंठे जमीन अतिक्रमणमुक्त करून म्हाडाच्या ताब्यात देण्यात आली आहे. ‘आयएचएलएमएस २.०’ प्रणालीद्वारे विजेत्यांनी मुदतीत घराचा स्वीकार किंवा नकार नोंदवणे आवश्यक असून, उर्वरित घरे ‘बुक माय होम’ पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध राहणार आहेत.



Recent Comments