Homeपुणेपाणीपट्टी थकबाकीसाठी अभय योजना राबवा: नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांची मागणी

पाणीपट्टी थकबाकीसाठी अभय योजना राबवा: नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांची मागणी

Newsworldmarathi Pune: महापालिकेकडे मार्च २०२६ अखेर पाणीपट्टीची अंदाजे ८०० कोटी रुपयांची थकबाकी असून, ती वसूल करण्यासाठी अभय योजना राबवावी, अशी मागणी नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला असून, तो प्रशासनाच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे.

शहरात नागरिकांना देण्यात येणाऱ्या मूलभूत, तसेच आधुनिक सुविधा या प्रामुख्याने पुणेकरांकडून कर स्वरूपात जमा होणाऱ्या निधीतून उभारल्या जातात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील पाणीपट्टी थकबाकीची वसुली होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मिळकतकर थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून अभय योजना राबविण्यात येते. त्याच धर्तीवर पाणीपट्टीसाठी योजना लागू केल्यास थकबाकीदार नागरिकांना दिलासा मिळेल आणि मोठ्या प्रमाणात थकबाकी वसूल होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊन वसूल झालेला निधी शहराच्या शाश्वत विकासासाठी उपयोगात आणता येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments