उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का; बाळासाहेबांचा विश्वासू शिवसैनिक शिंदे गटात!

0
Newsworldmarathi Mumbai: मुंबई मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईचे माजी महापौर, ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दत्ता दळवी यांच्यासह धारावी, विक्रोळी, कांजुर, भांडुप, मुलुंडमधील महिला विभाग अध्यक्ष, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख ५०० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. विक्रोळीत ठाकरेंना खिंडार पडले. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मागील अडीच वर्षांपासून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, महायुती सत्तेत आल्यानंतर सरकारने मुंबई स्वच्छ करण्याचे काम केले. ब्रिटिशांनंतर महायुतीकडून पहिल्यांदा मुंबईचे रस्ते धुतले गेले, मात्र त्याआधी काहीजणांनी मुंबईची तिजोरी साफ केली, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी केली. या वेळी मंत्री भरत गोगावले, खासदार संदिपान भुमरे, शिवसेना नेत्या मीना कांबळी आदी उपस्थित होते. ७० विद्यमान नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई महापालिका काहीजण स्वतःची जहागिरीदारी समजत होते. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मुंबईतील रखडलेले प्रकल्प सुरू केले. मुंबईकरांना हक्काची घरे, आरोग्य सुविधा देण्याचे काम सरकार करतेय. आतापर्यंत शिवसेनेचे (ठाकरे गट) ४५ ते ५० नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत. मुंबई पालिकेतील विविध पक्षांच्या जवळपास ७० विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.

पुण्यात २८ लाखांच्या बनावट नोटा जप्त; २ महिलांसह ५ जणांना अटक, असा झाला भांडाफोड?

Newsworldmarathi Pune : पुण्यात बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २८ लाख रुपये मूल्य असलेल्या दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीची व्याप्ती मोठी असून त्यामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मनीषा स्वप्नील ठाणेकर (वय-३५, रा. नागपूर चाळ, येरवडा), भारती तानाजी गावंड (वय-३४, रा. केशवनगर, चिंचवड), सचिन रामचंद्र यमगर (वय-३५, रा. गहुंजे), नरेश भीमाप्पा शेट्टी (वय-४२, रा. लोहगाव) आणि प्रभू गुगलजेड्डी (वय-३८, रा. चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटक महिंद्रा बँकेतर्फे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनंतर हा प्रकार उघडकीस आला. या बँकेच्या शिवाजीनगर शाखेत १७ एप्रिल २०२५ ला २०० रुपयांच्या बनावट नोटा जमा झाल्या असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. तेथील व्यवस्थापकांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा प्रकार कळवला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक महेश बाळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सखोल तपास करण्यात आला. असा झाला भांडाफोड? बँकेत कोणत्या खात्यात ही रक्कम भरली गेली तेथून तपासाला सुरुवात झाली. संबंधित खातेधारकाने या नोटा खऱ्या असल्याचे समजून त्या खात्यात भरल्या होत्या. त्या व्यक्तीला ही रक्कम आरोपी मनीषा ठाणेकर हिने दिली असल्याचे चौकशीत उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यावर या टोळीचा छडा पोलिसांना लागला. ठाणेकर ही खासगी बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे व तत्सम आर्थिक व्यवसाय करते. तिच्याकडून पोलिसांनी दोनशे रुपयांच्या बनावट शंभर नोटा जप्त केल्या. तिच्या चौकशीत आरोपी भारती गावंड हिचे नाव उघडकीस आले. तिच्याकडून दोनशे रुपयांच्या तीनशे नोटा पोलिसांनी जप्त केल्या. तिच्या चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सचिन यमगर याला ताब्यात घेतले. या तिघांनी कोल्हे नावाच्या व्यक्तीकडून या बनावट नोटा मिळवल्या असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्ष तपासात कोल्हे हे नाव आरोपी शेट्टी धारण करीत असल्याचे निष्पन्न झाले. लोहगावमधील त्याच्या घरावर छापा टाकल्यावर पोलिसांना त्याच्या घरी चार लाख रुपये मूल्य असलेल्या दोनशे रुपयांच्या नोटा आढळल्या. या टोळीमध्ये प्रभू गुगलजेड्डी हाही सामील असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्यालाही अटक केली. एक लाख रुपयांना बनावट दोन लाख रुपयांच्या नोटा ही टोळी देत असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. त्याचबरोबर या टोळीमध्ये सामील असलेल्या अन्य आरोपींचीही माहिती पुढे आली असून त्यांच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पायाभूत प्रकल्पांचा आढावा

0
Newsworldmarathi Mumbai :पुणे महानगरपालिका आणि महाप्रीत यांच्या संयुक्त विद्यमान पुणे शहरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक मंगळवारी बीकेसी येथील महाप्रीत कार्यालयात झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान नगरविकास व सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी भूषवले. या बैठकीस महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक माळी, पुणे महानगरपालिकेचे सिटी इंजिनिअर प्रशांत वाघमारे, उपायुक्त महेश पाटील, विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा सेकटकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनवणे तसेच महाप्रीतचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली: विद्युत दिवे एलईडीमध्ये रूपांतर : नव्याने समाविष्ट गावांमध्ये विद्युत पोलवरील जुने दिवे एलईडी तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक दिव्यांमध्ये बदलण्याचे महत्त्वाकांक्षी काम सुरू असून, एकूण ७०,००० विद्युत दिवे टप्प्याटप्प्याने बदलण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत सुमारे ९,००० दिव्यांचे रूपांतर पूर्ण झाले आहे. यामुळे ऊर्जेची बचत होण्याबरोबरच देखभाल खर्चातही मोठी घट होणार आहे. सौरऊर्जेचा प्रभावी वापर : स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ५० मेगावॅट क्षमतेच्या सौर विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. याबाबत शासन स्तरावरून प्रकिया सुरू असुन पुढील कालावधीत हा प्रकल्प पुर्ण केला जाणार आहे यासोबतच इंटरनेट कमांड सेंटर व आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने पुणे शहरात एकात्मिक आदेश व नियंत्रण केंद्र (ICCC) स्थापन करण्यात येणार आहे. सुमारे २८३ कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, सार्वजनिक सुरक्षितता, जल व घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या सेवा एका केंद्रीकृत प्लॅटफॉर्मवर नियंत्रित केल्या जाणार आहेत. यामुळे पुणे शहराचे व्यवस्थापन अधिक वेगवान व कार्यक्षम होणार आहे. बैठकीत बोलताना राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कामांची गती वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. “प्रकल्पांची गुणवत्ता अबाधित ठेवत, वेळेचे काटेकोर नियोजन करावे व नागरिकांना वेळेत सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच, पुणेकरांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि नव्याने समाविष्ट गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका आणि महाप्रीत यांच्यातील सहकार्यामुळे पुणे शहराचे स्वरूप अधिक विकसित आणि स्मार्ट सिटीच्या दिशेने जलदगतीने पुढे जात आहे, हे या बैठकीतून स्पष्ट झाले.

Supriya Sule : पहलगाम हल्यात मृत्युमुखी पडलेल्या ६ जणांच्या कुटुंबीयांना शौर्य पुरस्कार द्या

0
Newsworldmarathi Mumbai: काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील सहा जणांच्या कुटुंबीयांना येत्या महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरवण्यात यावे. तसेच या कुटुंबातील व्यक्तींना राज्य सरकारने शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रीतील ६ व्यक्तींच्या कुटुंबीयांपैकी एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी. पुण्यातील संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिचे कायद्याचे शिक्षण पूर्ण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देऊन महाराष्ट्रीची सेवा करण्याची संधी द्यावी, असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. जम्मू-काश्मीर या राज्यातील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांची हत्या करून दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील डोंबिवलीमध्ये राहणारे संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने हे तिघे जण, पनवेल येथे राहणारे दिलीप देसले, पुण्यामध्ये राहणारे कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे हे हे मरण पावले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही घटना आपल्या भारतावर झालेला हल्ला असून या दहशतवादी कारवाईचा निषेध करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत नागरिक एकजूट झाले आहेत. आम्ही सर्वजण एक देश म्हणून भारत सरकारच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत. या घटनेचे वृत्तांत ऐकूनच अंगाचा थरकाप उडतो, मग प्रत्यक्ष अनुभवलेल्या नागरिकांची काय स्थिती असेल याची कल्पनाही केली जात नाही, असं त्या म्हणाल्या. पुढे बोलताना म्हणाल्या की, आपल्या घरातील कर्त्या पुरुषांना दहशतवादी अगदी टिपून-टिपून मारत असताना इतर कुटुंबीयांनी या कठीण प्रसंगाचा धीरोदात्तपणे सामना केला. या या संपूर्ण घटनेत त्यांनी दाखवलेली हिंमत अतिशय मोलाची आहे. आपली जीवाभावाची माणसे डोळ्यांदेखत मारली जात असताना अशी हिंमत दाखवणे सोपे नाही, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

पुणे विमानतळावर आता १० रुपयांत चहा, २० रुपयांत वडापाव

0
Newsworldmarathi Pune : उडान याेजनेच्या माध्यमातून छाेटी व माेठी शहरे एकमेकांशी जाेडली जात अाहे. या याेजनेच्या माध्यमातून दीड काेटी नागरिकांनी मागील दाेन ते अडीचवर्षात प्रवास केला अाहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी याबाबत पुढाकार घेतल्याने विमान प्रवास सर्वसामान्यांचे अावाक्यात अाला अाहे. केंद्राचे अर्थसंकल्पात अर्थमंत्री यांनी उडाण याेजना पुढील दहा वर्ष कायम ठेवणार अाहे. पुढील पाच वर्षात चार काेटी लाेक या याेजनेतून प्रवास करतील. विमानतळावर सर्वसामान्य प्रवाशांना खाद्य पदार्थ महाग मिळतात अशा तक्रारी येत हाेत्या. त्यानुसार उडाण याेजने प्रमाणे उडाण यात्री कॅफे सुरु करण्यात अाले. कलकत्ता, चेन्नई, अहमदाबाद, याठिकाणी हे कॅफे सुरु झाले असून अाता प्रवाशांना याचा लाभ पुणे विमानतळावर देखील मिळणार अाहे. २० रुपयात काॅफी, सामाेसा, मिठाई , दहा रुपयात चहा, पाणी बाॅटल प्रवाशांना उपलब्ध हाेईल अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली. लवकरच ही याेजना मुंबई विमानतळावर देखील सुरु हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Oplus_131072
माेहाेळ म्हणाले, देशात दहा वर्षापूर्वी ७४ विमानतळ हाेते ती संख्या अाज १६० पर्यंत वाढलेली अाहे. पूर्वी लाेक एसटी, रेल्वे मागणी करत हाेते अाज विमान मागतात हा बदलत्या भारताचा अाणि विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकेत अाहे. २०४७ चा विकसित भारत संकल्प पंतप्रधान यांनी देशासमाेर ठेवला असून यात विमान क्षेत्राचा वाटा माेठा असणार अाहे. ४०० विमानतळे विकसित करण्याचा संकल्प अाहे. पुणे विमानतळ मध्ये माेठा बदल झाला अाहे. पुण्यात दरराेज २०० विमाने ये-जा करत अाहे. ५२ हजार चाैरस मीटर नवीन टर्मनिल झाले असून दरवर्षी ९० लाख लाेक या विमानतळावरुन प्रवास करत अाहे. ३४ चेकिंग काऊंटर निर्माण झाली. २५ डीजी यात्रा सुरु झाले अाहे. जुने टर्मिनल देखील पुर्नविकास हाेणार असून १४ नवीन काऊंटर निर्माण हाेतील त्यामुळे अधिक १० ते १५ लाख प्रवासी प्रवास करु शकतील. १०.६६ टक्के प्रवासी क्षमता वाढ, ६० टक्के प्रवासी वाढ, कार्गे वाहतूक ८.४५ टक्के वाढली असल्याने अामूलाग्र बदल पुणे विमानतळावर दिसून येत अाहे. पुणे- भाेपाळ, त्रिवेंद्रम, चेन्नई, इंदाैर, डेहराडून विमानसेवा नव्याने सुरु झाली अाहे. विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणबाबत सातत्याने बैठक सुरु अाहे. २०० एकरपेक्षा अधिक जागा ताब्यात घेण्याचे सुत्र ठरले अाहे. विमानतळ विस्तारीकरणसाठी राज्यशासन भूसंपादन करेल. कार्गाेसाठी प्राेत्साहन देण्यात येणार अाहे. पुणे विमानतळ मेट्राे मार्गशी जाेडणार खडकवासला ते खराडी हा मेट्राे मार्ग पुणे विमानतळाला जाेडण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक व चर्चा झाल्या अाहे. महा मेट्राे, मनपा यांच्याशी संबंधित विषय असून मनपा अाणि मेट्राे याबाबत डीपीअार करण्यासाठी प्रयत्न करेल. पुण्यातील चार मेट्राे मार्ग निगडी ते स्वारगेट, हिंजवडी ते शिवाजीनगर, वनाज ते रामवाडी ,खडकवासला ते खराडी हे सर्व मेट्राे मार्ग विमानतळाशी मेट्राेने थेट जाेडण्याचे नियाेजन सुरु अाहे. पुणे शहराची लाेकसंख्या ६० लाख तर जिल्हामिळून एक काेटीपेक्षा अधिक अाहे. त्यामुळे पुढील ५० वर्षाचा विचार करता अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न राहिली असे माेहाेळ यांनी सांगितले.

अभिजित रामदास चौधर यांची UPSC परीक्षेत उज्वल कामगिरी

0
Newsworldmarathi Pune: रुई (ता. बारामती) गावचे सुपुत्र अभिजित रामदास चौधर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत देशात ४८७ वा क्रमांक मिळवून IAS/IPS सेवेसाठी यशस्वी निवड मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महावितरण, बारामती परिमंडळातर्फे मा. मुख्य अभियंता पेठकर साहेब यांच्या शुभहस्ते अभिजित यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. अभिजित रामदास चौधर यांचा प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या अभिजित यांनी पाच वेळा अपयशाचा सामना केला, मात्र हार न मानता सहाव्या प्रयत्नात देशात ४८७ वा क्रमांक मिळवून अखेर स्वप्नपूर्ती केली. येत्या वर्षभरात ते आयपीएस अधिकारी म्हणून सेवेत रुजू होणार आहेत. त्यांच्या वडिलांनी रामदास चौधर यांनी परिस्थिती कठीण असतानाही मुलाच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले. शेती आणि इतर कष्टाची कामे करत त्यांनी आर्थिक तजवीज केली व अभिजितला शिक्षणासाठी सदैव प्रोत्साहन दिले. अभिजित यांनी जिद्द, अथक परिश्रम आणि सचोटी या त्रिसूत्रीचा अवलंब करून दाखवून दिले की, प्रतिकूल परिस्थितीतूनही स्वप्नवत यश मिळवता येते. त्यांच्या या यशाने रुई गावासह संपूर्ण बारामती तालुक्याचा अभिमान वाढवला आहे.

कॅनडात भारतीयांसाठी राहणं कठीण का झालंय?

Newsworldmarathi Team : कॅनडामध्ये राहणारे भारतीय अनेक समस्यांचा सामना करत आहेत. देशातील घरभाड्याचे दर प्रचंड वाढले आहेत, ज्यामुळे नागरिकांना घराच्या हफ्त्यांमध्ये अडचणी येत आहेत. ‘घराचे हफ्ते थकले, घरभाडं परवडेना अन् नोकऱ्याही नाहीत’ अशी परिस्थिती अनेक कॅनडियन भारतीयांच्या जीवनात आहे. कॅनडामध्ये अलीकडील काळात घरभाड्याचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत, जेणेकरून मासिक खर्च अधिक वाढला आहे. त्याच वेळी, कामाच्या संधी कमी होण्याची समस्या देखील गंभीर बनली आहे. अनेक भारतीयांना नोकरी मिळवण्यासाठी लांब प्रतीक्षा करावी लागते. तसेच, काही लोकांना कॅनडाच्या रोजगार बाजारात योग्य संधी मिळत नाहीत, ज्यामुळे जीवनावश्यक खर्च पूर्ण करणे कठीण होऊन बसले आहे. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक आधाराशिवाय, कॅनडामध्ये जीवन जणू अधिक किचकट आणि खर्चिक होऊन बसले आहे. सध्या, कॅनडामध्ये वस्ती वाढल्यामुळे अनेक भारतीयांसाठी आपल्या आर्थिक स्थितीला सुसंगत ठेवणे एक मोठे आव्हान बनले आहे. कॅनडात भारतीयांसाठी राहणं कठीण होण्याचे मुख्य कारण म्हणजे घरभाड्याचे वाढलेले दर, नोकऱ्यांच्या संधींची कमतरता, आणि उच्च जीवनमानाची मागणी. 1.घरभाड्याचे वाढलेले दर: कॅनडात घरभाड्याचे दर अत्यधिक वाढले आहेत, खासकरून टोरंटो, वॅन्कुव्हर आणि ओटावा सारख्या मोठ्या शहरांमध्ये. काही ठिकाणी घरभाड्याचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत, ज्यामुळे अनेक कुटुंबांना घराच्या हफ्त्यांची भांडी भरणे कठीण झाले आहे. यामुळे भारतीय स्थलांतरितांना मोठ्या आर्थिक दबावाचा सामना करावा लागतो. 2.नोकऱ्यांची कमतरता: कॅनडामध्ये एकाच वेळी अनेक लोक स्थलांतर करतात, त्यामुळे नोकऱ्यांच्या संधी कमी होतात. भारतीय नागरिक, जेथे उच्च शिक्षण आणि कौशल्य असतानाही, त्यांना कॅनडातील रोजगार बाजारात त्यांचे स्थान मिळवण्यासाठी जास्त वेळ लागतो. तसेच, कॅनडातील काही नोकरींच्या मागणीतील बदल आणि डिजिटल क्षेत्रातील स्पर्धा नोकरी मिळवणे आणखी कठीण करते. 3.आर्थिक दबाव: कॅनडात उच्च जीवनमान आणि महागाईमुळे, कुटुंबांना गरजेच्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसले आहे. या सर्व कारणांमुळे भारतीयांसाठी कॅनडात राहणं अधिक कठीण होत आहे.

क्रिकेटविश्वात नवा तारा: वैभव सूर्यवंशी!

Newsworldmarathi Mumbai : अवघ्या १२ व्या वर्षी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी आता आयपीएलमध्येही चमकला आहे. २८ एप्रिल २०२५ रोजी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूत धडाकेबाज शतक ठोकले. त्याच्या खेळीत ११ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. वैभवचा जन्म ताजपूर गावातील शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांच्या पाठिंब्यामुळे आणि कुटुंबाच्या संघर्षामुळे त्याने लहान वयातच क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले. स्थानिक स्पर्धांतून सुरुवात करत त्याने बिहार क्रिकेट असोसिएशनचे लक्ष वेधले. आज त्याच्या कामगिरीने संपूर्ण देशाचे लक्ष त्याच्याकडे वळवले आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, वैभवमध्ये भारतीय क्रिकेटला नवे क्षितिज गाठण्याची ताकद आहे. बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्यातील ताजपुर गावातून आलेला वैभव सूर्यवंशी सध्या संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेत आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेला वैभव अवघ्या चार वर्षांपासून बॅट हातात धरून मैदान गाजवत आहे. वडील संजीव सूर्यवंशी यांनी मुलाच्या स्वप्नासाठी सर्व काही पणाला लावले; आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी वैभवला खेळण्याची संधी दिली. स्थानिक क्रिकेट स्पर्धांमधील कामगिरीतून वैभवने आपली चमक दाखवली आणि बिहार क्रिकेट असोसिएशनच्या (BCA) दृष्टीत भरला. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करत त्याने भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात तरुण खेळाडूचा मान पटकावला. कोण आहे वैभव सूर्यवंशी? बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्यातील ताजपुर गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वैभवने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी त्याच्या क्रिकेटच्या स्वप्नांना पंख दिले. कुटुंबाने आर्थिक अडचणींना तोंड देताना जमीन विकण्यापर्यंत मजल मारली, पण वैभवच्या प्रतिभेला खुलवण्यासाठी त्यांनी कधीच माघार घेतली नाही वैभवने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमधून आपली चमक दाखवली आणि लवकरच बिहार क्रिकेट असोसिएशनच्या (BCA) नजरेत आला. त्याच्या विस्फोटक फलंदाजीमुळे त्याला वयाच्या 12व्या वर्षीच रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पणाची संधी मिळाली, ज्यामुळे तो प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला. 28 एप्रिल 2025 रोजी राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने क्रिकेट विश्वाला थक्क करणारी कामगिरी केली आहे. अवघ्या 35 चेंडूत 100 धावा ठोकत त्याने आयपीएलमधील सर्वात कमी वयातील शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला. या खेळीत त्याने तब्ब 11 षटकार आणि 7 चौकार लगावले. त्याच्या आक्रमक फलंदाजीने गुजरात टायटन्सच्या दिग्गज गोलंदाजांचा आत्मविश्वासही ढासळला.

पुणे जोधपूर पुणे दैनंदिन रेल्वेसेवेला मान्यता; राजस्थानी समाज संघाच्या पाठपुराव्याला यश

0
Newsworldmarathi Pune: पुणे-जोधपूर-पुणे दैनंदिन रेल्वेसेवेला रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. ही घोषणा केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. रेल्वे क्रमांक २०४९५ व २०४९६ या दोन रेल्वेगाड्या नियमीतपणे हडपसरवरून धावणार आहेत. त्यामुळे राजस्थानी समाज संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. लवकरच रेल्वे प्रवासाचे बुकिंगही सुरु करण्यात येणार आहे. जिल्हयातील संपूर्ण राजस्थानी समाजातर्फे मागील अनेक वर्षापासुन ही सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. राजस्थानमधील खासदार पी. पी. चौधरी, गजेंद्रसिंग शेखावत, पुण्याचे खासदार आणि केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह इतर मान्यवरांनी ही सेवा सुरु करण्यासंबंधी राजस्थानी समाजाच्या वतीने रेल्वे मंत्र्यांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता, अशी माहिती राजस्थानी समाज संघाचे अध्यक्ष मगराज राठी यांनी दिली.
Oplus_131072
रेल्वेसेवेची मागणी पूर्ण झाल्याने संपुर्ण राजस्थानी समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून पुणे-जोधपूरदरम्यान रोज साधारणतः ६० ते ७० बसेस सुरु आहेत. रोज अपघात होत असून निष्पाप जिवांना आपले प्राण गमवावे लागत होते. संघटनेने केलेल्या मागणीनुसार साप्ताहिक रेल्वे सुरु झाली परंतु सर्वांची मागणी ही नियमित रेल्वेची होती ती आज पुर्ण झालेली आहे त्याबद्दल रेल्वेखाते आणि अश्विनी वैष्णव यांचे आभार व्यक्त करत ही सेवा लवकरात लवकर सुरु व्हावी असेही राठी यांनी सांगितले.

काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांची कन्या भारतीताई लाड यांचे निधन; सोशल मीडियावर पोस्ट करत विश्वजीत कदम भावूक..

Newsworldmarathi Sangali : काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या कन्येचे निधन झाले आहे. भारतीताई महेंद्र लाड यांच्या अकाली मृत्यूने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी याबाबत माहिती दिली. विश्वजीत कदम यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ताईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘माझी मोठी बहीण आदरणीय भारतीताई महेंद्र लाड यांचं निधन झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद व वेदनादायी आहे. आजवरच्या वाटचालीत त्यांचं पाठबळ, प्रेम आणि स्नेह नेहमीच ऊर्जादायी राहिले. त्यांच्या निधनाने कदम व लाड परिवाराची कधीच न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आदरणीय ताईला भावपूर्ण श्रद्धांजली.’ पतंगराव कदम यांनी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली होती. लाडकी कन्या ‘भारती’ यांच्या नावावरुन या विद्यापीठाचे नामकरण करण्यात आले होते. भारती लाड या रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांच्या पत्नी होत. भारती यांच्या पश्चात पती महेंद्र लाड, भाऊ विश्वजीत कदम, बहीण अस्मिता जगताप असा परिवार आहे. त्यांचे पती महेंद्र लाड हे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.