राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी किती, शाळा कधी सुरू होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती…

0
Newsworldmarathi Pune : Maharashtra School Start Date : राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांना २ मे पासून सुट्टी जाहीर झाली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विदर्भातील शाळा वगळता इतर शाळा १६ जूनपासून सुरू होतील. विदर्भातील शाळा मात्र २३ जूनपासून सुरू होणार आहेत. उष्णतेमुळे विदर्भातील शाळा उशिरा सुरू होणार आहेत. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. उद्या १ मे रोजी निकाल व २ मे पासून शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे. शिक्षण विभागाने शाळांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. संकलित मूल्यमापन चाचणीमुळे यंदा शाळा २५ एप्रिलपर्यंत सुरू होत्या. १ मे रोजी निकाल व २ मे पासून सुट्टी जाहीर झाली आहे. अपवादात्मक परिस्थितीत शाळा ३० जूनपासून सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. तीव्र उन्हाळाच्या परिस्थितीत विदर्भातील शाळा २३ ते २८ जून या कालावधीत सुरू होतील, असे शिक्षण विभागाकडून कळवण्यात आले आहे. विदर्भ वगळून राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरू कराव्यात, त्या दिवशी सुटी असल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू कराव्यात, तर विदर्भात ३० जून रोजी शाळा सुरू कराव्यात, त्या दिवशी सुट्टी असल्यास त्याच्या पुढील दिवशी शाळा सुरू कराव्यात, असे परिपत्रकात नमूद केले आहे. याचा अर्थ, सुट्टी असली तरी शाळा त्यानंतर लगेच सुरू होतील.

रमणबाग प्रशालेचा प्रत्युष धाडगे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या गणित परीक्षेत राज्यात प्रथम

0
Newsworldmarathi Pune: न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथील सहावी यलो वर्गात शिकणारा विद्यार्थी प्रत्युष गणेश धाडगे याने टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या गणित विषयाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याने या परीक्षेत १०० पैकी ९७ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. प्रत्युषला या यशासाठी शाळेच्या गणित शिक्षिका सारिका रणदिवे यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई तसेच शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्युषचे कौतुक करून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आटपाडीत विनयभंगप्रकरणी शिक्षक बँकेच्या माजी अध्यक्षावर गुन्हा दाखल

Newsworldmarathi Aatpadi : कोरोना काळात दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षक व जिल्हा शिक्षक बँकेचा माजी अध्यक्ष पोपट सुखदेव सूर्यवंशी (मूळ रा. खांजोडवाडी, सध्या रा. आटपाडी) यांच्यावर आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना १९ एप्रिलला सकाळी साडेदहा वाजता आटपाडी तालुक्यातील कुचरेवाडी पळसखेल येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेने पोपट सूर्यवंशी यांना कोरोना काळात काही पैसे दिले होते. हे पैसे परत मागण्यासाठी पीडित महिला भावाला घेऊन सूर्यवंशीच्या शेतातील घरी गेली होती. यावेळी सूर्यवंशी यांने पैसे देण्यास नकार दिला. पीडितेला शिवीगाळ करत त्याने तिचा विनयभंग केला. ‘मी अनेकांना जेलमध्ये बसवले आहे आणि तुम्हालाही कामाला लावतो. तुम्ही परत पैसे मागितले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी त्याने दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी सुर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा? जाणून घ्या सविस्तर…

0
Newsworldmarathi Mumbai : राज्यातील धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असूनही संभाव्य टंचाईची शक्यता लक्षात घेता पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांनी राज्यातील धरणसाठा व पाणीपुरवठ्याबाबत सादरीकरण केले. सध्या 18 जिल्ह्यांतील 644 गावे व 2051 वाड्यांमध्ये 796 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मागील वर्षी याच कालावधीत 2564 टँकर सुरू होते. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षी 263 टँकर होते, सध्या तेथे एकही टँकर नाही. छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात सर्वाधिक म्हणजेच 275 टँकर कार्यरत असून त्यातील 192 टँकर केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत. मुख्यमंत्री यांनी टंचाईग्रस्त गावांमध्ये पुरेशा व नियोजनबद्ध पाणीपुरवठ्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील एकूण पाणीसाठा मोठी धरणे: 10,401 दलघमी मध्यम धरणे: 2,572 दलघमी लघु धरणे: 2,101 दलघमी मुख्य धरणांतील उपयुक्त साठा (24 एप्रिल 2025 रोजीचा साठा) गोसीखुर्द – 5.67 दलघमी (गेल्या वर्षी – 09.47) तोतलाडोह – 20.74 दलघमी (गेल्या वर्षी – 20.46) ऊर्ध्व वर्धा – 09.64 दलघमी (गेल्या वर्षी – 09.97) जायकवाडी ३३.५१ दलघमी (गेल्या वर्षी – ८.८७) मांजरा – 02.03 दलघमी (गेल्या वर्षी – 0.28) हतनूर – 04.51 दलघमी (गेल्या वर्षी – 04.51) गंगापूर – 03.07 दलघमी (गेल्या वर्षी – 02.48) कोयना – 34.14 दलघमी (गेल्या वर्षी – 35.98) खडकवासला – 0.96 दलघमी (गेल्या वर्षी – 01.06) भातसा – 14.65 दलघमी (गेल्या वर्षी – 12.91) धामणी ‌- 0.07 दलघमी (गेल्या वर्षी – 0.07)

दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

0
Newsworldmarathi Pune : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली हि आंब्यांची आरास पाहण्याबरोबरच भाविकांनी पहाटे पासूनच गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवालेचे मंदार देसाई आणि कुटूंबियांच्या वतीनं हा महानैवैद्य देण्यात आला तत्पूर्वी पहाटे तीन वाजता ब्रह्माणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला त्यानंतर वेदश्री खाडिलकर ओक यांनी बाप्पाच्या चरणी आपली गायन सेवा सादर केली सकाळी आठ ते बारा या वेळात गणेश याग हि आयोजित करण्यात आला

मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह ५४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय? घ्या जाणून…

Newsworldmarathi Ahilyanagar : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्यासह पद्मश्री विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन, संचालक व अधिकारी अशा ५४ जणांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून ८ कोटी ८६ लाख १२ हजार २०६ रुपयांचा अपहार करत कर्जमाफीस पात्र नसतानाही कर्जमाफी प्राप्त करून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत बाळासाहे ब केरुनाथ विखे (वय-६६, रा. लोणी बुद्रुक, ता. राहाता) यांनी फिर्याद दाखल केली आहे. नेमकं प्रकरण काय? याबाबत अधिक माहिती अशी की, कारखान्याच्या तत्कालीन संचालकांनी बनावट कागदपत्रे तयार करून बेसल डोस कर्जाचा प्रस्ताव तयार केला. युनियन बँक व बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने ३ कोटी ११ लाख ६० हजार ९८६ तसेच ५ कोटी ७४ लाख ४२ हजार २२० रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. परंतु शेतकरी सभासदांना ती रक्कम प्रदान करण्यात आली नाही. कारखान्याचे तत्कालीन संचालक व बँकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून मोठा आर्थिक अपहार केला. शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून ८ कोटी ८६ लाख १२ हजार २०६ रुपयांचा आर्थिक लाभ स्वतःच्या फायद्याकरिता केला. कर्जमाफी प्राप्त नसताना ती प्राप्त असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी आपण सर्वोच्च न्यायालयात आवाज उठवला होता. सर्वोच्च न्यायालयाने १८ मार्च २०२५ रोजी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या इसमांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

मोठी बातमी…! रावसाहेब दानवेंच्या गाडीला अपघात, दुचाकीची कारला जोरदार धडक

Newsworldmarathi Pune : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणावळ्यातील जयचंद चौकात घडली आहे. कामानिमित्त रावसाहेब दानवे हे लोणावळ्यातील बाजारपेठेत आले होते. त्यावेळी एक मोटारसायकलने रावसाहेब दानवे यांच्या अर्टिका गाडीला जोराची धडकदिली. या अपघातात कोणतीही दुखापात झाली नसून दानवे यांची प्रकृती उत्तम असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रावसाहेब दानवे हे कामानिमित्त लोणावळ्यात आले होते, यावेळी त्यांच्या गाडीला दुचाकीने जोराची धडक दिली. यामध्ये मोटरसायकल स्वाराच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.. या अपघातानंतर मोटारसायकलस्वाराने रावसाहेब दानवे यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यानंतर तेथील स्थानिक रिक्षा चालकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार? कामाचा वेग वाढवण्याच्या अजित पवारांच्या सूचना

0
Newsworldmarathi Mumbai : पुणे शहरासह उपनगरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात द्यावे. पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडसह मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड तसेच सुरु असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढविण्यात यावा. यासाठी या प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागाने योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे विभागाचे मुख्य अभियंते अतुल चव्हाण उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात सुरु असणाऱ्या विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते, ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी लोणावळा येथील नियोजित स्काय वॉक, टायगर पॉईंट, पुणे नाशिक ग्रीन फिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेच्या नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, संभाजीनगर, अमरावतीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, सातारा सैनिक स्कूल, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, वडाळा येथील जीएसटी भवन, रेडिओ क्लब मुंबई, रत्नागिरीचे मिरकरवाडा बंदर, वढू व तळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक, पुणे येथील वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारक, कृषीभवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, पुरंदर विमानतळ आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना 50 लाखांचे अर्थसहाय्य; शासकीय नोकरीही देणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

0
Newsworldmarathi Mumbai : पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाकडे, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच मृतांपैकी ज्यांच्या कुटुंबात रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या थेट वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विशेषाधिकारात जाहीर केला. हल्ल्यातील मृतांपैकी जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता.

Maharashtra Cabinet : हडपसर ते यवत सहापदरी रस्त्याला मान्यता, राज्य मंत्रिमंडळाचे सर्वांत मोठे ११ निर्णय, वाचा संपूर्ण यादी…

0
Newsworldmarathi Mumbai: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाचे अकरा निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे ११ निर्णय टेमघर प्रकल्प, ता. मुळशी, जि. पुणे येथील उर्वरित कामे व धरण गळती प्रतिबंधक कामासाठी रु.488.53 कोटी किमतीच्या सुधारित खर्चाला प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा) मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम, 1951 अंतर्गत महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध नियम, 1964 मधील नियम 27(ब) (3) मधील तरतूदीमध्ये सुधारणा. भिक्षागृहातील व्यक्तींना 5 रुपये ऐवजी आता 40 रुपये प्रतिदिन. 1964 नंतर प्रथमच बदल (महिला व बाल विकास) PM-YASASVI या एकछत्री योजनेअंतर्गत ओ.बी.सी., ई.बी.सी. व डी.एन.टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्र शासनाने सन 2021-22 ते 2025-26 या वर्षांकरिता निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्याचा निर्णय. (इतर मागास बहुजन कल्याण) हडपसर ते यवत राज्य मार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग व अस्तित्वातील रस्त्याचे सहापदरी बांधकाम करण्यास मान्यता. 5262.36 कोटी रुपयांचा मार्ग (सार्वजनिक बांधकाम) सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत महा इनविट (पायाभूत सुविधा गुंतवणूक संस्था) Maha InvIT (Infrastructure Investment Trust) स्थापन करण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम) महाराष्ट्र राज्यात जहाजबांधणी व जहाजदुरुस्ती सुविधा (Shipyard)आणि जहाज पुनर्वापर सुविधा (Ship Recycling) विकसित करण्याबाबतच्या धोरणास मान्यता. (परिवहन व बंदरे) महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2025 ला मान्यता. (परिवहन व बंदरे) ॲप बेस वाहनांसाठी समुच्चयक (Aggregator) धोरण. (परिवहन व बंदरे) सर्वसमावेशक पीकविमा योजनेत बदल करून केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीकविमा योजना राबवणार तसेच कृषि क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषि पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबविणार (कृषी) आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजबांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय (इतर मागास बहुजन कल्याण) म. रा. इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्याचा निर्णय (इतर मागास बहुजन कल्याण