व्यावसायिक लक्ष्मण शिंदे हत्या प्रकरण: वडिलांचा शेवटचा संदेश आणि हत्येचं उलगडलेलं गूढ

पुण्यातील कोथरूड परिसरातील या व्यावसायिकाचा पाटणा (बिहार) येथे खून झाल्याच्या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, व्यवसायाच्या संदर्भात बोलावून घेऊन अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्यांचा खून झाला. लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५ रा. डी पी रोड कोथरुड) असे हत्या झालेल्या व्यावसायिकाचा नाव आहे. त्यांचा संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी कोथरूड पोलिसांत धाव घेत त्यांची मिसिंगची तक्रार दाखल केली होती. कोथरुड पोलिसांचे पथक बिहार राज्यातील पाटण्यात तपासासाठी पोहचल्यानंतर त्यांचा खून झाल्याचे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण शिंदे हे व्यावसायिक होते. खेड शिवापूर येथे त्यांची सेंट्रिफ्युगल कास्टिंग बेअरिंगचा व्यावसाय आहे. या व्यावसायाच्या निमित्ताने त्यांचा बिहारमधील काही व्यक्तींशी संपर्क झाला होता. त्या सबंधित व्यक्तीने शिंदे यांना पाटण्यात काम मिळण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. शिवराज सागी असे फोन व ईमेलद्वारे बोलणे झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ११ एप्रिल रोजी लक्ष्मण शिंदे पुण्यावरून विमानाने पाटणा येथे गेले होते. त्यानंतर त्यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही एक टोळी असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. या टोळीची गुन्हा करण्याची पद्धत मोठ्या व्यावासायिकांना बहाणा करून बोलावणे, तिथे आल्यानंतर त्यांना लुटणे तसेच त्यांच्याकडील रक्कम काढून खून करणे असे सांगितले जात आहे. मुलीला आलेल्या मेसेजमध्ये काय?? लक्ष्मण शिंदे हे पाटण्यात पोहचल्यानंतर त्यांचा मुलीशी रात्री साडेआठच्या सुमारास संवाद झाला होता. त्यांनी मोबाईलवरून मी आता झारखंड येथील कोळसा खाणीत मशिन व टूल पाहण्यास जात आहे, असा मेसेज शिंदे यांच्या मुलीला आला होता. ही खान १२०० फूट जमिनी खाली असल्याचे या मेसजमध्ये म्हटले होते. त्यानंतर शिंदे यांच्या मुलीने आणि कुटुंबीयांनी कोथरुड पोलीस ठाणे गाठत याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक लक्ष्मण शिंदे खून प्रकरणातील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही एक टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

विठ्ठलाची वारी जाणार लंडनला…

0
Newsworldmarathi Pune : पंढरीची वारी आता थेट साता समुद्रापार जाणार आहे. मूळचे अहिल्यानगरचे पण सध्या लंडन स्थायिक असलेले विठ्ठलभक्त अनिल खेडकर आणि त्यांची दिंडी पंढरपूर येथून थेट लंडनला श्री विठ्ठलाच्या पादुका घेऊन जात आहेत. १४ एप्रिल ते २१ जून या कालावधीत तब्बल २२ देश आणि अठरा हजार किलोमीटरचा प्रवास या अनोख्या दिंडीतून करणार आहेत. या विठ्ठलाच्या पादुकेचे पूजन विठ्ठल मंदिरात करण्यात आले असून, या अनोख्या दिंडीने लंडनकडे प्रस्थान केले आहे. पंढरी वारीची ख्याती जगभरात पसरली आहे. अनेक अभ्यासक भक्तमंडळी या वारीचा अनुभव घेताना दिसून येतात. मूळ अहिल्यानगरचे पण सध्या लंडन स्थायिक असणाऱ्या खेडकर या भाविकाने विठ्ठलाच्या पादुकांच्या दिंडीचे आयोजन केले आहे. अनिल एकनाथ खेडकर हे भारतात होते. त्यावेळेस त्यांनी आळंदी ते पंढरपूर अशी वारीदेखील केलेली आहे. त्यावरून लंडन येथे विठ्ठल मंदिर उभे करावे आणि त्या पादुका वारकरी संप्रदायाप्रमाणे दिंडीच्या माध्यमातून आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याचे खेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवले. पंढरपूर येथून लंडन असा प्रवास करताना विविध देश, त्यांच्या विविध परवानगी, पास इत्यादी कायदेशीर मान्यता सहा महिन्यांपासून सुरू होती. यासाठी २२ देशांच्या चारचाकी गाडी प्रवासाच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. पुढे त्यांनी १४ एप्रिल ते २१ जून हा कालावधी निश्चित केला. रोज किती किलोमीटर प्रवास, मुक्काम यांचे नियोजन केले.

तनिषा भिसेंच्या बाळांवर उपचार करणाऱ्या सूर्या हॉस्पिटलचा स्वीय सहायकांतर्फे सन्मान

0
Newsworldmarathi Pune : तनिषा उर्फ ईश्वरी सुशांत भिसे यांचा बाळंतपणादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जुळ्या बाळांवर योग्य ते वैद्यकीय उपचार करण्यासह माणुसकीचा हात दिलेल्या वाकड येथील सूर्या मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा महाराष्ट्र विधानमंडळातील स्वीय सहाय्यक परिवाराच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. गर्भवती तनिषा भिसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्या दोन जुळ्या बालिकांसाठी सूर्या हॉस्पिटलने केवळ वैद्यकीय उपचारच नाही, तर माणुसकीचा हात दिला. त्यांचे संगोपन, काळजी आणि भिसे कुटुंबाला दिलेला मानसिक आधार यातून सूर्या हॉस्पिटल व तेथील स्टाफने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे. या कृतज्ञतेच्या भावनेतून महाराष्ट्र विधानमंडळातील स्वीय सहाय्यक परिवाराच्या वतीने सूर्या हॉस्पिटलला विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. सचिन शहा आणि डॉ. दिनकर पासलकर यांनी हॉस्पिटलच्या वतीने, तर स्वीय सहाय्यकांच्या वतीने बाळा शुक्ला, आनंद ठोकळ आणि अजित गरुड यांनी आपल्या भावना निवेदनांमधून मांडल्या. राष्ट्रीय कला अकादमी (न्यास), पुणे यांनी रांगोळीच्या माध्यमातून सद्भावना व्यक्त केली. स्वीय सहायकांच्या वतीने बाळा शुक्ला, एकनाथ बाजारे, मयुर तातुसकर, हर्षद धर्माधिकारी, आनंद ठोकळ, अजित गरुड, शहाजी पवार, किशोर जुमडे, रवींद्र कडू आणि संतोष ढोरे आणि सचिन भामे हे उपस्थित होते.

शुभान सनराजरस ऑक्सफर्ड गोल्फ चषक 2025 चा विजेता

0
Newsworldmarathi Pune : पुण्यात सुरू असलेल्या गोल्फच्या राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचे अंतिम सामने आज पार पाडले.एकूण बारा संघ आणि तीनशे खेळाडू या लीग मध्ये सहभागी झाले होते .शेवटच्या दिवशी चार संघात अतिशय चुरशीच्या लढती झाल्या .त्यात सर्व संघापेक्षा अतिशय दिमाखदार असे गोल्फ खेळाचे प्रदर्शन करीत या वर्षीच्या अतिशय नावजलेला ऑक्सफर्ड गोल्फ चषक शुभान सनराएजेस या संघाने पटकावला आहे .यावेळी गोल्फ इंडस्ट्री असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष व ऑक्सफर्ड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध सेवलेकर ,एस गोल्फिंग चे आदित्य मालपाणी, आयोजक रोहन सेवलेकर,कौशिल वोरा यासह राष्ट्रीय खेळाडू व प्रमुख मान्यवर उपस्थित होते. शुभान सनरायजरस 2025 च्या चषकाचा मानकरी ठरला या संघाने दहा लाखाचे भक्षीस मिळवले .विजयी संघात प्रमुख खेळाडू जॉन विल्कॉक्स,यश वाधवन,अवनय खन्ना,बिजय लेंका,दीपक द्विवेदी,यश शहा,दीपक आनंद,अनिरुद्ध इंदूरकर,गिरीश शिळमकर,दीपक कुमार,अभिजीत गानू,किरण प्रकाश शहा,यशवंत झांजगे,जितेंद्र शहा,कु.अनुराधा बंबवाले हे विजयी संघात सहभागी होते . तर ईगल फोर्सेस ने उपविजेता संघ ठरला त्याने साडेसात लाकाचे बखीस मिळवले .द्वितीय क्रमांक पुना लायन्स संघाने मिळवित पाच लाखाचे भक्षीस मिळवले तसेच रोअरिंग टायगर्स नागपूर ने तृतीय क्रमांक मिळवित तीन लाखाचे बक्षीस मिळवले. गोल्फ खेळाची देशातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि नावाजलेली अशी स्पर्धा समजली जाते .ही स्पर्धा 6 ते 13 एप्रिल दरम्यान पुण्यात पार पडली.यामध्ये एकूण 12 संघ आणि 180 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते .या स्पर्धेचा पारितोषिक वितरन समारंभ आज पुण्यातिल प्रसिद्ध अशा ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट lयेथे पार पडला. अतिशय नावाजलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रिमीअर लीगला प्रचंड प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेमध्ये देशभरातील विविध संघ सहभागी होत आहेत .पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ क्लब येथे भव्य अशा ऑक्सफर्ड गोल्फ लीग 2025 चे सर्व सामने पार पडले .त्यामुळे यावर्षीच्या ऑक्सफोर्ड गोल्फ लीग मध्ये पुणेकराना अतिशय चुरशीचे गोल्फ सामने बघायला मिळाले.या राष्ट्रीय लीग च्या सामन्यासाठी नोंदणीला अनेक गोल्फ खेळाडू आणि संघानी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. या ऑक्सफर्ड प्रीमियर लीगमध्ये तब्बल बारापेक्षा जास्त संघ सहभागी झाले आहेत .आजपर्यत्न ईगल फोर्सेस ,बिनधास्त बॉईज ,सुलतान स्विंग्स ,ब्लिस्ट्रिंग बर्ड्स ,झिंगर्स,ग्रीन गॅडीटर्स,सुझलोन ग्रीन्स,रोरिंग टायगर्स, पुना लायन्स,सुब्बन सनरायजर्स ,द लीगशी क्लब ,बर्डी स्कॉड यासारखे मातब्बर संघ सहभागी झाले होते .

दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे ‘आरोग्य गणेशा’ अंतर्गत ७२ हजार ४८३ जणांची रुग्णसेवा

0
Newsworldmarathi Pune : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारून जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत ‘आरोग्य गणेशा’ मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे २०२४-२५ आर्थिक वर्षात मोठे योगदान देण्यात आले आहे. यामध्ये वर्षभरात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, तपासण्या, साहित्य व औषधे वाटप अशी विविध प्रकारची सर्वतोपरी मदत तब्बल ७२ हजार ४८३ रुग्णांना करण्यात आली आहे. मागील वर्षी २०२३-२४ या वर्षात ४१ हजार ८७७ रुग्णांना मदत करण्यात आली होती, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, पदाधिकारी यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले की, जनतेच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात ट्रस्टचे काम सुरू आहे. ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य विभाग सुरू करण्यात आला असून रुग्णांना सर्वतोपरी मदत होईल असा प्रयत्न करण्यात येतो. ट्रस्टची रुग्णवाहिका सेवा देखील सातत्याने सुरू आहे. ट्रस्टच्या माध्यमातून ससून येथे रुग्ण व नातेवाईकांना भोजन देखील मोफत दिले जाते. महेश सूर्यवंशी म्हणाले, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, हे अनेक रुग्णांना माहीत नसते. त्या रुग्णांना ट्रस्टतर्फे योजनांचा लाभ करून दिला जातो. तसेच, ज्या रुग्णांकडे अपुरी कागदपत्रे असतील, त्यांना नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून कागदपत्रे मिळवून देण्याकरिता देखील ट्रस्ट सदैव तत्परतेने कार्य करीत आहे. वर्षभरात ट्रस्टशी संलग्न विविध २२३ रुग्णालय आणि विविध संस्थांमधून ही सेवा दिली जात आहे. जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य शिबीर व विविध शाळांमध्ये आरोग्य शिबीराच्या माध्यमातून देखील ही सेवा दिली जाते. कर्णबधिर लहान मुलांच्या गुंतागुंतीच्या ८ शस्त्रक्रिया यशस्वी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील जन्मत: कर्णबधिर असलेल्या वयवर्षे १ ते ४ मधील लहान मुलांच्या कॉक्लियर इम्प्लांट या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात आल्या. या प्रत्येक शस्त्रक्रियेचा खर्च १२ लाख रुपये प्रत्येकी असून अशा ८ शस्त्रक्रिया वर्षभरात झाल्या आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलच्या माध्यमातून या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मोफत महाआरोग्य शिबीर रविवारी (दि.२०) जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत यंदा मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन रविवार, दि. २० एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत करण्यात आले आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात हे शिबीर होणार आहे. यामध्ये ह्रदय आजार, कर्करोग, किडनी, नेत्र आजार, दंत उपचार, स्त्री रोग, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, अपंगांना मोफत जयपूर फूट वाटप, रक्त तपासणी, रक्तदान शिबीर, ईएनटी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, अस्थिरोग, विविध थेरपी, रेडिओलॉजी, श्रवण आणि स्पीच थेरपी उपचार विनामूल्य करून देण्यात येईल. नागरिकांसाठी वाहने पार्किंग व्यवस्था नू.म.वि. प्राथमिक शाळा, अप्पा बळवंत चौक येथे करण्यात आली आहे. सन २०२४-२५ वर्षातील आढावा * नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया – ३७,२२२ * दंत रोग उपचार – २३६४ * किडनी विषयक उपचार व शस्त्रक्रिया – २०८९ * कर्करोग शस्त्रक्रिया – १२३० * लहान मुलांच्या शस्त्रक्रिया – ६७२ * ह्रदय शस्त्रक्रिया – ४२९ * अस्थिरोग शस्त्रक्रिया – १३३ * मोफत पॅथॉलॉजिकल टेस्ट – ९२७८ * मोफत फिजिओथेरपी – ७८३१ * श्रवणयंत्र व मोल्ड वाटप – ५१५० * कृत्रिम अवयव व उपकरणे वाटप – ३७४८ * एमआरआय, सिटी स्कॅन (५० टक्के सवलत) – २३३७ * ससून रुग्णालयात भोजनथाळी – १२ लाख रुग्ण श्रवणदोष असणा-या गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंत्र श्रवणदोष असणाऱ्या गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंत्र मोल्ड व श्रवणयंत्र वाटप केले जाते. यावर्षी ५ हजार १५० कर्णबधिर मुले व नागरिकांनी याचा लाभ घेतला. ट्रस्टच्या वैद्यकीय विभागात आलेल्या नागरिकांना खुबा प्रत्यारोपण, गुडघा, प्रत्यारोपण आणि अस्थिरोग विषयक १३३ जणांच्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. तसेच, किडनी स्टो, डायलिसिस, प्रोस्टेट ग्रंथी, पर्मकॅथ, फिस्तुला अशा २ हजार ८९ जणांच्या शस्त्रक्रिया विनामूल्य करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातून आलेल्या लहान मुलांच्या विनामूल्य शस्त्रक्रिया महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या ६७२ लहान मुलांच्या ह्रदय, किडनी, कर्करोग व अन्य शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या गेल्या. तर, एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, मेमोग्राफी यासांरख्या महागड्या तपासण्यांवर ५० टक्के सवलतीच्या दरात २ हजार ३३७ रुग्णांना तपासण्या करून देण्यात आल्या आहेत. दगडूशेठ ट्रस्टचे मोफत पॅथॉलॉजिकल टेस्ट सेंटर – ९ हजार २७८ रुग्णांच्या मोफत तपासण्या पुण्यातील धनकवडी भागात काशिनाथ पाटील नगर येथे दगडूशेठ ट्रस्टचे मोफत रक्त व विविध प्रकारची रुग्ण तपासणी करणारे केंद्र आहे. याकेंद्रामध्ये दररोज किमान ५० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी मोफत केली जाते. रक्त तपासणी व विविध तपासण्या अंतर्गत सीबीसी, रक्तगट, थायरॉइड, लिपिड प्रोइल, लिव्हर फंक्शन टेस्ट, फास्टींग पीपी शुगर, एसजीओटी/एस जी पीटी, युरिया, ईएस आर, युरीन, एच आयव्ही इत्यादी विविध प्रकारच्या तपासण्या विनामूल्य केल्या जात आहेत. वर्षभरात ९ हजार २७८ रुग्णांची रक्ततपासणी केली आहे. मोफत फिजिओथेरपी, कृत्रिम अवयव व साहित्य वाटप, दंतरुग्णवाहिका सेवा आरोग्य शिबीरात व ट्रस्टच्या वैद्यकीय विभागात आलेल्या अस्थिरोग आजार असलेल्या नागरिकांना मोफत फिजिओथेरपी, अ‍ॅक्युप्रेशर थेरपी, न्युरोथेरपी अशा आवश्यक थेरपी ७ हजार ८३१ रुग्णांना करून देण्यात आल्या. तसेच राज्याच्या विविध भागातून आलेल्या ३ हजार ७४८ विकलांग व्यक्तीना मोफत कृत्रिम अवयव व उपकरणे वाटप करण्यात आले. याशिवाय दंत रुग्णवाहिका द्वारे २ हजार ३६४ रुग्णांना दाढ काढणे, सिमेंट भरणे, रूट केनॉल, कवळी बसविणे असे उपचार विनामूल्य देण्यात आले आहेत. *प्रत्येक महिन्याला शहराच्या विविध भागात आरोग्य शिबिर* उत्सवाची पारंपारीक जागा असलेल्या बुधवार पेठेतील दत्त मंदिरासमोर जय गणेश प्रांगण येथे किंवा शहराच्या विविध भागात प्रत्येक महिन्याला आरोग्य शिबिर आयोजित केले जाते. त्यामध्ये विविध रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर्स रुग्णांची विनामूल्य तपासणी करुन आजाराचे रोग निदान करतात तसेच शिबिरात मोफत औषधोपचाराचे वाटप देखील करण्यात येते. दानपेटी आणि देणगीच्या माध्यमातून मंदिरात जमा होणारा समाजाचा पैसा, देवाचे सर्व धार्मिक उपक्रम करुन उरलेला निधी परत समाजाला देण्याचा प्रयत्न यामाध्यमातून ट्रस्ट करीत आहे, यातून ट्रस्टने श्रध्देला सेवेची जोड दिलेली आहे. *तब्बल १३ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अखंडीतपणे विनामूल्य* ट्रस्टच्या एकूण १३ रुग्णवाहिका असून अखंडपणे २४ तास पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात विनामूल्य सेवा दिली जाते. तसेच महाराष्ट्रात डिझेल खर्चात सेवा दिली जात आहे. यामध्ये कान, डोळे, दंत तपासणी व्हॅनसह कार्डियाक रुग्णवाहिकेचा देखील समावेश आहे. याशिवाय संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळानिमित्त वारक-यांना ट्रस्टच्या रुग्णवाहिकाद्वारे तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत वैद्यकिय सेवा औषधोपचार पुणे ते पंढरपूर वाटप केले जाते. तसेच पालखी सोहळा निमित्त वारक-यांसाठी जय गणेश प्रांगण येथे मोफत डोळ्यांची तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिर देखील घेतले जाते. *ससून सर्वाेपचार रुग्णालय पुणे येथे वर्षभरात १२ लाख रुग्णांना मोफत भोजन* जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत राबविण्यात येणारे ससून सर्वोपचार रुग्णालयातील कार्य समाजाभिमुख आहे. यामध्ये वर्षभरात १२ लाख रुग्णांकरीता दररोजचे २ वेळचे भोजन,चहा आणि नाश्त्याची सोय केली जाते. रुग्णालयातील गरोदर महिलांच्या पाच वॉर्डाचे नूतनीकरण हा दगडूशेठ ट्रस्टच्या कार्यातील महत्वाचा टप्पा आहे. याशिवाय ५९ नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग आणि रुग्णांकरीता अतिदक्षता विभाग देखील अद्यावत करण्यात आला. गरोदर महिलांसाठी ५ कक्ष तसेच रुग्णांच्या नातेवाईकांकरीता विश्रांती गृहाची व्यवस्था दगडूशेठ ट्रस्ट तर्फे करण्यात आली आहे. गणेशोत्सव कार्यकाळात ४ बेडचे मोफत आयसीयू गणेशोत्सवामध्ये येणा-या भाविकांची गर्दी पाहता दत्तमंदिर ते मुख्य गणपती मंदिरापर्यंत एकूण ४ वैद्यकिय मदत केंद्रांची व्यवस्था करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रात प्रथमच ४ बेडचे मोफत आयसीयू व २ कार्डियाक रुग्णवाहिका सुविधा देण्यात आली. त्यामध्ये विविध नामांकित रुग्णालयांमार्फत तातडीची वैद्यकिय मदत उपलब्ध करुन दिली जाते. यामध्ये केंद्रावर मोफत औषधोपचार, डॉक्टर्स, नर्सेस व इतर स्टाफ इत्यादी प्रकारची वैद्यकिय सुविधा दगडूशेठ ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांसाठी दिली जाते.

जामखेडमध्ये संध्या सोनवणे मोठा डाव टाकणार; अजितदादा बोलावून कोणाची विकेट घेणार ?

Newsworldmarathi Mumbai: विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा एक-एक आमदार निवडून आणण्याच्या इराद्याने आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यभर फिरत असतानाच कर्जत-जामखेडमधील भाजपचे उमेदवार, आताचे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रचारात अजित पवार उतरले नव्हते. ते साधे इकडे फिरकलेही नाहीत. त्यावरून निकालानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांवर आगपाखड करीत, ते जाणीवपूर्वक प्रचाराला आले नसल्याचा ठपका ठेवला. मात्र, विधानसभा निवडणूक होऊन सहा महिने होण्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जत-जामखेडमध्ये मतदारसंघात जाणार आहेत. तिथे करीत, भाषणही ठोकणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे, या महोत्सवाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात अजित पवार हे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत. त्यापलीकडे जाऊन राम शिंदेंचे स्व:पक्षातील राजकीय शत्रू आणि जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हेही एकमेकांशेजारी बसणार आहेत. एरवी, राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहाणारे अजित पवार, राम शिंदे, राधाकृष्ण विखे-पाटील ही मंडळी एकाच वेळी, एकाच व्यासपिठावर पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांनी पवार, शिंदें,विखे-पाटलांना एकत्र आणण्याचे नियोजन केले आहे. या तिघांना एकत्र आणून संध्या सोनवणे या कर्जत-जामखेडमध्ये आपली राजकीय ताकद दाखविण्याची खेळी करीत आहेत. अजित पवारांना बोलावून, त्यातही जंगी कार्यक्रम घेऊन, संध्या सोनवणे या कर्जत-जामखेडमध्ये कोणाला ‘टशन’ देणार, हे पाहाणे महत्त्वाचे राहणार आहे. काहीही असो, संध्या सोनवणेंनी केलेल्या या राजकीय खेळीने कर्जत-जामखेडचे राजकारण पुन्हा चर्चेत येणार आहे. जामखेडमध्ये येत्या गुरुवारी (ता.१७ एप्रिल) रोज ‘शिव-फुले-आंबेडकर’ संयुक्त जयंती महोत्सव भरण्यात आला आहे. संध्या सोनवणेंच्या पुढाकारातून हा महोत्सव होत असल्याने अजित पवार हे आर्वजून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याजोडीला शिंदे, विखे-पाटलांचीही हजेरी राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेवरून दिसत आहेत. निवडणुकीनंतर आणि संध्या सोनवणे या राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अजित पवार हे जामखेडमध्ये येत आहेत. या महोत्सवात कुठची कसर राहणार नाही, याची काळजी घेत कार्यक्रमाचे नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात येत आहेत. मात्र, या महोत्सवात कुठचे कार्यक्रम आहेत, यापेक्षा महोत्सवात अजित पवार, राम शिंदे, विखे-पाटील एकत्र येऊन कोण, कोणावर काय बोलणार ? याकडे राजकीय वतुळाचे लक्ष असेन. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जत-जामखेडला जाणीवपूर्वक सभा घेतली नसल्याचे मीडियाच्या कॅमेऱ्यापुढे बोलून, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंनी आपल्या पराभवाचे खापर एकप्रकारे अजित पवारांवर फोडले. अशातच ‘थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर…’अशी सूचक आणि मिश्किल टिपण्णी करीत, अजित पवारांनी आमदार रोहित पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिंदेंसह त्यांच्या समर्थकांनी अजित पवारांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यानंतर कर्जत-जामखेडच्या निकालानंतरही हा मतदारसंघ चर्चेत राहिला होता. या मतदासंघातील राजकारण रोज नवनवे वळण घेत असतानाच, अजित पवारांना आणून संध्या सोनवणे या कोणाचा ’गेम’ करणार ? की, राष्ट्रवादी काँग्रेस आपले ‘प्रमोशन’ करून पक्ष संघटनेत आपले स्थान बळकट करणार, हे महोत्सवात नक्की दिसेल.

आजी-आजोबांचा चिकू गेला… माजी आमदाराच्या नातवाच निधन

पुणे : शिरुर तालुक्याचे माजी आमदार सुर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे यांच्या नातवाचे अकस्मात निधन झाले आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ऐन तारुण्यातील शर्विन यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मूळ गावी मुंबईत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. दरम्यान, शर्विन यांचा दशक्रिया विधी शनिवारी मुंबई येथे होणार आहे. शिरूर तालुक्यातील पलांडे कुटुंब हे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या परिचित आहे.. सुर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे हे शिरूर तालुक्याचे माजी आमदार होते, ज्यांनी या भागात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांचे सुपुत्र संजीव पलांडे सध्या कोकण भवन येथे उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. शर्विन ऊर्फ चिकू (वय २०) यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. ते कोकण भवन येथील उपायुक्त संजीव पलांडे यांचे सुपुत्र होते. सोमवारी मुंबई येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कुटुंबातील तरुण पिढी, शर्विन ऊर्फ चिकू, यांच्याकडूनही भविष्यात सामाजिक कार्याची अपेक्षा होती, परंतु त्यांच्या अकस्मिक निधनामुळे कुटुंबाला परिसराला मोठा धक्का बसला आहे. शर्विन यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले. लहानपणापासूनच ते अभ्यासात हुशार होते. सध्या ते वकिलीचे शिक्षण घेत होते. रविवारी मुंबईत त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, एक बहीण, आजी, आजोबा, आत्या, मामा असा परिवार आहे.

खळबळजनक…! बदनामीच्या भीतीने १७ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; मुंबईतील घटना

Newsworldmarathi Mumbai: मुंबईच्या साकिनाका परिसरात बदनामीच्या भीतीने एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विनयभंगासह आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच १९ वर्षांच्या आरोपी मित्राला साकिनाका पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी आणि आरोपी तरुण एकाच परिसरात राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची मैत्री झाली होती. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. अनेकदा सोशल मिडीयावर चॅट करताना तो तिच्याकडे तिचे अश्लील फोटो पाठविण्यास सांगत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तिनेही तिचे काही अश्लील फोटो पाठविले होते. याच फोटोवरुन त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. सोशल मिडीयावर तिचे फोटो व्हायरल करुन तिची बदनामीची तो तिला धमकी देत होता. या धमकीमुळे मुलगी प्रचंड मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने काही दिवसांपूर्वी तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येनंतर तिच्या मोठ्या भावाला हा प्रकार समजला. त्यानंतर त्याने आरोपी मित्राविरुद्ध साकिनाका पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच मित्राला शनिवारी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यात त्याला दिंडोशीतील विशेष सत्र न्यायायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष सत्र न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

खडसे-महाजन वाद विकोपाला; महाजनाकडून खडसेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा; प्रकरण काय?

Newsworldmarathi Mumbai: राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचे राज्यात कार्यरत असलेल्या एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांना महाजन यांनी आपल्या वकिलामार्फत अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. सोबतच खडसे यांनी ज्या पत्रकाराचा हवाला देऊन हे वक्तव्य केले होते, ते पत्रकार अनिल थत्ते यांनाही नोटीस पाठवली असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नेमकं प्रकरण काय? पत्रकार अनिल थत्ते यांनी काही दिवसांपूर्वी यूट्यूबवर अपलोड केलेल्या एका व्हिडीओत मंत्री गिरीश महाजन यांच्यासंदर्भात एक दावा केला होता. महाजन यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा सीडीआर दाखवत रात्री अपरात्री महिला अधिकाऱ्यांशी सातत्याने का बोलत असता? असा जाब विचारल्याचा दावा थत्ते यांनी आपल्या व्हिडीओतून केला होता. याचाच आधार घेत एकनाथ खडसे यांनी महाजनांना लक्ष्य केले होते. एका महिला आयएएस अधिकाऱ्याला रात्री दीड-दोन वाजता महाजन यांनी १०० वेळा कॉल केल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला होता. यानंतर महाजन-खडसे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. अखेर महाजन यांनी आपली बदनामी झाल्याचे सांगत आपल्या वकिलामार्फत खडसे यांच्यासह पत्रकार अनिल थत्ते यांना नोटीस बजावली आहे. नोटिशीमध्ये काय? कोणतेही सबळ पुरावे न देता पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांनी आपल्यावर आरोप केले. जनमानसांत आपली प्रतिमा मलीन केली आहे. याप्रकरणी आपण आता कोर्टातच लढणार असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. दरम्यान, आपल्याला कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नाही, असं एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

शालेय स्वच्छता साहित्य खरेदीची निविदा वादाच्या भोवऱ्यात; माजी नगरसेविका अर्चना पाटील यांचे आयुक्तांना पत्र

0
Newsworldmarathi Pune : महापालिका शिक्षण मंडळासाठी खरेदी करण्यात येत असलेली शालेय स्वच्छता साहित्य खरेदीही आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या खरेदीसाठी एका विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यांसमोर ठेवून तो पात्र नसतानाही त्याला पात्र करून खरेदीची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा आरोप भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना पाटील यांनी केला आहे. ही निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी केलेली साहित्य खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. विभागप्रमुखांनी नकारात्मक अभिप्राय देऊनही चार कोटींची साहित्य खरेदी करण्यात आली. त्यानंतर आता शालेय स्वच्छता खरेदीच्या निविदा प्रक्रियेवरूनही पुन्हा तक्रारी आल्या आहेत. शिक्षण मंडळासाठी पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने लिक्विड अॅसिड, फिनेल व हार्डवेअर साहित्य खरेदीसाठी १ कोटीची निविदा प्रक्रिया | राबवली. मार्चअखेरीस या निविदा उघडण्यात आल्या. त्यात पात्र ठेकेदाराला काम देण्याचा प्रस्ताव भांडार विभागाकडून स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मात्र, माजी नगरसेविका पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित ठेकेदाराने अटी-शर्तीनुसार कागदपत्रांची पूर्तता केली नाही, असे असतानाही प्रशासनाने बेकायदेशीररीत्या त्याला पात्र केले आहे. दक्षता व लेखापरीक्षण विभागाने काढलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेची चौकशी करून ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.