त्या १२ रुग्णालयांवर ठोस कारवाई करण्याची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची मागणी; रोहन सुरवसे पाटील यांचे निवेदन

0
Newsworldmarathi Pune : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चुकीच्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. शहरात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासह एकूण ५८ धर्मादाय रुग्णालयांची नोंदणी आपल्याकडे आहे. या ५८ रुग्णालयांपैकी १२ रुग्णालयांनी वर्षभरात एकही खाटा रिकाम्या ठेवल्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासह या रुग्णालयांनी सगळ्याच रुग्णांना सरसकट शंभर टक्के शुल्क लावल्याची बाब देखील समोर आली आहे. याअनुषंगाने बुधवारी (दि. १६) महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी धर्मादाय अधीक्षकांकडे त्या १२ रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच, या रुग्णालयांवर जर २ दिवसात कोणतीही कारवाई केली नाही तर जोरदार आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी धर्मादाय अधीक्षक शंकर गडाळे यांना निवेदन देण्यात आले.धर्मादायच्या निर्देशांनुसार संबंधित रुग्णालयांवर ‘धर्मादाय’ असा ठळक उल्लेख असणे अपेक्षित आहे. गरीब व निर्धन रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव असल्याचा फलक दर्शना भागात लावणे देखील आवश्यक आहे. तसेच या योजनांची माहिती देणारा स्वतंत्र प्रतिनिधी आणि त्याचा संपर्क क्रमांक प्रदर्शित करणे देखील गरजेचे आहे. मात्र, शहरात बहुतांश सगळ्याच धर्मादाय रुग्णालयांकडून या निर्देशांना केराची टोपलीच दाखवल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून येते. धर्मादायचे नियम न पाळल्याने गरीब व गरजू रुग्ण शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. या रुग्णांकडून अनामत रक्कम घेण्यास देखील मनाई असताना, या नियमाचे देखील पालन शहरातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये होताना दिसून येत नाही. महात्मा गांधी नेत्र रुग्णालय, रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, हरजीवन हॉस्पिटल, जोशी हॉस्पिटल, एन. एम. वाडिया हॉस्पिटल, दीनदयाळ मेमोरियल हॉस्पिटल, परमार हॉस्पिटल, मीरा हॉस्पिटल, गिरीराज हॉस्पिटल, मातोश्री मदनाबाई धारीवाल हॉस्पिटल, काशीबाई नवले जनरल हॉस्पिटल आणि डॉ. जल मेहता रुरल क्रिटिकल केअर सेंटर या १२ रुग्णालयांनी नियमानुसार गरीब रुग्णांसाठी बेड राखीव न ठेवल्याची माहिती आपल्याच कार्यालयाद्वारे समोर आली आहे. यामुळे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, नागरिकांना मरणास कारणीभूत ठरणाऱ्या, मनमानी पद्धतीने पैसे उकळणाऱ्या ‘धर्मादाय’च्या नावाखाली लोकांना लुबाडणाऱ्या रुग्णालयांवर आपण कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच, लवकरात लवकर या रुग्णालयांवर आपण योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या विरोधात ‘आपलीही या प्रकाराला मूक संमंती’ असल्याचे समजून तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच भविष्यात ही ‘धर्मादाय’च्या नावाखाली चालणारी रुग्णालये नियमाप्रमाणे काम करतायेत की नाही, याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. रोहन सुरवसे पाटील यांच्यासह यावेळी दिपक चौगुले आणि ज्ञानेश्वर जाधव या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बुधवारी आम्ही सहाय्यक धर्मादाय आयुक्त परदेशी यांना भेटलो. त्यांनी निवेदनाची दखल घेऊन तात्काळ योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. दोन दिवसांमध्ये जर धर्मादाय आयुक्त यांनी धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या १२ हॉस्पिटलने गेल्या वर्षभरापासून गोरगरीब लोकांना योजनेचा लाभ दिला नाही त्या बारा हॉस्पिटल वरती दोन दिवसात कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.
– रोहन सुरवसे पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

बॉक्सिंग असोसिएशनच्या कारभाराची चौकशी व्हावी : एजाज हुसेन

0
Newsworldmarathi Pune : गरीब, तरूण आणि क्रीडा क्षेत्रात अत्यंत हुशार असलेले विद्यार्थी केवळ आवड म्हणून नव्हे तर क्रीडा कोट्यातून सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी आणि मुख्य प्रवाहात शिक्षण घेत असताना काही सवलतीचे गुण मिळवण्यासाठी खेळाची निवड करतात. मूळ खेळाडूंना गुणवत्ता असताना डावलून काही विशिष्ट खेळाडूंचीच निवड होत असल्याने महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या चौकशीची मागणी पालक आणि सामाजिक कार्यकर्ते एजाज हुसेन यांनी पत्रकार परिषदेत केली आहे .तसेच लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले . दयनीय अवस्थेतील (एमबीए) ही महाराष्ट्रातील बॉक्सिंगशी संबंधित सर्व उपक्रमांसाठी जबाबदार असलेली नोडल संस्था असल्याने या गरीब तरुणांची स्वप्ने धुळीस मिळत आहेत. कलह, स्वार्थी हेतू, राजकारण, अहंकार, कायदेशीर खटले, गटबाजी, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचा खेळ या सर्वांनी या संस्थेचा ताबा घेतला आहे, अन्यथा ही क्रीडा संघटना चांगली चालवायला हवी होती. सध्या ही संघटना वरील कारणांमुळे विसर्जित झाली आहे. त्यामुळे, दैनंदिन व्यवहार काही सदस्यांच्या पुनरावलोकन समितीद्वारे व्यवस्थापित केले जातात, जे केवळ माहिती प्रसारित करण्याचे काम करते. पालक संस्था या नात्याने महाराष्ट्रातील होतकरू मुली आणि मुलांमधील बॉक्सिंग टॅलेंट वाढवणे आणि जोपासणे हे एमबीएचे प्राथमिक कर्तव्य असायला हवे होते आणि त्यांना सर्वोत्तम सुविधा आणि प्रशिक्षण, तसेच स्पर्धांचे आरामदायक वेळापत्रक दिले जाईल याची खात्री करून घेतली पाहिजे. जेणेकरून बॉक्सर त्यांचे सर्वोत्तम देऊ शकतील. यासाठी महाराष्ट्र शासनाचा निधी एमबीएला दिला जात असतो. शूर योद्ध्यांचा इतिहास असलेल्या आपल्या महान राज्याला गौरव मिळवून देऊन महाराष्ट्राचे बॉक्सर्स राष्ट्रीय स्तरावर चमकतील याची खात्री करण्यासाठी हे सर्व केले पाहिजे. या सर्व न संपणाऱ्या समस्यांमुळे, गरीब आणि तरुण बॉक्सरचे करिअर धोक्यात आले आहे कारण ते कोणत्याही राष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता असूनही केवळ व्यवस्थापनातील गैरकारभारामुळे चमकू शकत नाहीत. जिल्हा आणि राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा ज्या पद्धतीने आयत्यावेळी आयोजित केल्या जातात त्यावरूनही हा गैरप्रकार दिसून येतो. शेवटच्या क्षणी होणाऱ्या योजना, वार्षिक स्पर्धेच्या कॅलेंडरच्या नियोजनाचा पूर्ण अभाव, कायमस्वरूपी निधीची कमतरता, दुरावस्थेतील क्रीडा स्थळे, दयनीय प्रवास व्यवस्था, इ. या बॉक्सर्सना भेडसावणाऱ्या काही समस्या आहेत. शेवटी ते गुणवान बॉक्सर असतात ज्यांना अत्यंत कठीण परिस्थितीत आपला खेळ खेळावा लागतो. यावर्षी राष्ट्रीय चॅम्पियनशिप (युथ) 20 एप्रिल 2025 पासून ग्रेटर नोएडा (UP) येथे आयोजित केली जात आहे आणि महाराष्ट्र राज्यासाठी प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2025 (संख्येनुसार) आणि 17 एप्रिल 2025 (नावानुसार) आहे. या महिन्याच्या सुरुवातीला तथाकथित पुनरावलोकन समितीकडे ही माहिती आली परंतु राज्यस्तरीय निवड चाचण्या 15 ते 17 एप्रिल 2025 या कालावधीत यवतमाळ (मह) येथे शेवटच्या क्षणी आयोजित केल्या आहेत. यावेळी पुन्हा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील बॉक्सर्सना यवतमाळला शेवटच्या क्षणी प्रवास करण्यासाठी त्रास सहन करावा लागला आहे आणि येथील विजेत्यांना लगेच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नोएडा येथे पोचून आपले कौशल्य पणाला लावावे लागेल. संबंधित पालक, प्रशिक्षक, सजग नागरिक आणि या खेळाचा अभ्यासक या नात्याने, महाराष्ट्र सरकार आणि माननीय क्रीडा मंत्री यांना आमची नम्र विनंती आहे की त्यांनी मध्यस्थी करून या गंभीर समस्यांचे निराकरण करावे, जेणेकरुन महाराष्ट्राच्या कष्टकरी बॉक्सर्सच्या हितासाठी पावले उचलली जातील आणि राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाऊ शकेल. या पत्रकार परिषदेस सामाजिक कार्यकर्ते एजाज हुसेन ,योगेश देशपांडे,शरद कंक,फिरोज पांडोले,नझरुद्दीन सय्यद ,सोनिया राव ,अजित ओसवाल,एस.आर .नरवणे उपस्थित होते .

बावधन येथे ‘भीम जयंती महोत्सव 2025’ उत्साहात

0
Newsworldmarathi pune: विकास प्रतिष्ठाण बावधन, सुजाता महिला मंडळ  यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134  व्या जयंती निमित्त तीन दिवाशीय  ‘भीम जयंती महोत्सव 2025’ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  महोत्सवाचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटक परशुराम वाडेकर यांच्या हस्ते,  आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी  प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वराज कांबळे आणि मुख्य आयोजक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)  युवक आघाडीचे प्रदेश संघटक उमेश कांबळे,  माजी  नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेवक किरण दगडे पाटी, लमाजी सरपंच वैशाली कांबळे,  दत्ता जाधव पाटील, तुषार दगडे पाटील . निलेश दगडे पाटील, गोविद  निकाळजे, स्वप्नील दगडे पाटील,  विजय दगडे पाटील  आदि उपस्थित होते.  महोत्सवाची सुरुवात भीमस्पंदन  या सांस्कृतिक भीम गीतांच्या कार्यक्रमाणे झाली.  या नानंतर  न्यू होम मिनिस्टर हा सिने अभिनेता क्रांती नाना माळेगावकर आयोजित महिलांसाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला  होता, यामध्ये पहिल्या क्रमांकाचे दुचाकी चे प्रथम पारितोषिक पूनम धनंजय साळवे यांनी तर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक दक्षणा देढे यांनी पटकावले.  या कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला त्या सर्वांना भेटवस्तू देण्यात आल्या.  तर 14 एप्रिल रोजी एसबीआय बँक एनडीए रोड ते सिद्धार्थ नगर बावधन बुदुक दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.  मिरवणुकीचा शुभारंभ पोलिस अधिकारी अनिल विभूते यांच्या हस्ते झाला. महोत्सवातील सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सुजाता महिला मंडळच्या  रेखा सरोदे (अध्यक्ष), आशा भालेराव (उपाध्यक्ष), मंगल कांबळे (सेक्रेटरी), छाया कांबळे (खजिनदार), वर्षा कांबळे (कार्य अध्यक्ष) यांच्यासह युवा नेते यशराज कांबळे,प्रेम कांबळे (उत्सव कमिटी अध्यक्ष),  सुजल नितवणे (उपाध्यक्ष),  रोशन खाडे(खजिनदार), सम्राट लालसरे, चैतन्य कुंदन यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

तनाएराचे ‘समर सॉन्ग्स’ कलेक्शन

0
Newsworldmarathi Business : मोठे दिवस, गरम हवा अशा वातावरणात तुम्हाला तजेला आणि आनंद देईल असे नवे ‘समर सॉन्ग्स’ कलेक्शन तनाएराने आणले आहे. सूर्यप्रकाशाने लख्ख उजळलेले दिवस, हलक्या हवेच्या झुळुका आणि निसर्गातील ताल यांचे सार ‘समर सॉन्ग्स’ मध्ये सामावले आहे. शानदार आणि तरीही आरामदायी कपडे ज्यांना आवडतात अशा महिलांसाठी डिझाईन करण्यात आलेल्या या कलेक्शनमध्ये आरामदायी कॉटन, नाजूक सिल्क, सिल्क कॉटन, हवेशीर ऑर्गन्झा आणि कोटा असे विविध प्रकार आहेत, भारतातील सर्वोत्तम टेक्स्टाईल्सची, प्रत्येक काळात पसंद केली जाणारी कारीगरी यामध्ये पाहायला मिळेल. ग्रीष्माच्या कवितेने प्रेरित होऊन तयार करण्यात आलेले हे कलेक्शन ऋतूच्या बदलत्या रंगांचा आनंद साजरा करते. उन्हामुळे शुष्क झाल्यामुळे सोनेरी छटा आलेल्या पानांपासून समुद्रकिनारी चमकणाऱ्या कोरल गार्डन्सपर्यंत या कलेक्शनमधील प्रत्येक पीस ऋतूच्या तजेलदार, चमकदार, मनमोहक पॅलेट्स दर्शवतो. मऊशार पेस्टल्स, हिरवाई आणि चमकदार कोरल्स या कलेक्शनमधील नाजूक प्रिंट्स, हाताने रंगवलेले डिटेल्स आणि नव्या-जुन्या प्रत्येक काळात पसंद केल्या जाणाऱ्या विणकाम परंपरांमधून जिवंत साकार झाल्या आहेत. दररोजच्या कपड्यांपासून विलक्षण सुंदर आणि शानदार कपड्यांपर्यंतचा बदल तुमच्या वॉर्डरोबमध्ये अगदी सहजपणे घडवून आणण्याचे काम हे कलेक्शन सराईतपणे करते. हवेशीर, आरामदायी कापडापासून तयार करण्यात आलेल्या, नव्या-जुन्या सर्व काळात पसंद केल्या जातील अशा, आधुनिक गरजांना अनुरूप बहुउपयोगी, विचारपूर्वक डिझाईन करण्यात आलेल्या, साड्या आणि रेडी-टू-वेयर कपडे या कलेक्शनचा मुख्य भाग आहे. साड्यांच्या रेन्जमध्ये राजस्थानच्या संगानेरी ब्लॉक प्रिंट्स, बंगालच्या मलमल आणि जामदानी या विणकामांनी सजवलेल्या प्युअर कॉटन साड्या आहेत, दररोज वापरता येतील आणि तरीही अतिशय सुंदर व शानदार दिसतील अशा या साड्या वापरायला अगदी सहज आहेत. कोटा साड्यांची तजेलदार शान, हाताने रंगवलेल्या मुर्शिदाबाद सिल्कस् आणि सिल्क कॉटन व ऑर्गन्झा साड्या, त्यावरील प्रिंट्स, एम्ब्रॉयडरी, हाताने केलेल्या रंगकामाची शान यामुळे या साड्या ऑफिसमध्ये घालता येतील आणि कॅज्युअल समारंभांमध्ये देखील तितक्याच उठून दिसतील.

सोनियाजी व राहुलजींवरील ईडीची कारवाई राजकीय सुडबुद्धीने, कारवायांनी काँग्रेस डगमगणार नाही: रमेश चेन्नीथला

Newsworldmarathi Mumbai: भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व खासदार राहुलजी गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली असून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. याआधीही ईडीने सोनियाजी व राहुलजी यांची चौकशी केली आहे. काँग्रेस पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवायांना घाबरत नाही. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एकजूट होऊन या कारवाईचा निषेध करेल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. नागपूर शहरात सामाजिक सौहार्द व शांतता नांदावी यासाठी काँग्रेसने सद्भावना शांती मार्च काढला. आजच्या पदयात्रेत दिक्षाभूमी, ताजुद्दीन बाबा व टेकडी गणेश मंदिरात दर्शन घेऊन सद्भावनेचे साकडे घालण्यात आले. या मोर्चात प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनिल केदार, अनिस अहमद, खासदार प्रतिभा धानोरकर, नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आ विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, इंटकचे प्रदेशाध्यक्ष कैलाश कदम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, जाती धर्माच्या नावावर सुरु असलेला भेदभाव थाबंवण्यासाठी काँग्रेसने सद्भावना यात्रा काढली असून अशा सद्भावना यात्रा राज्यभर काढल्या पाहिजेत. भाजपा जाती धर्माच्या नावाखाली भेदभाव करत आहे. नागपुरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असताना या शहरात हिंसाचार झाला त्याला जबाबदार कोण? मुख्यमंत्री तथा गृहमंत्री नागपूरचे आहेत तरीही त्यांना या घटनेची माहिती कशी मिळाली नाही? गुप्तचर विभागाने त्यांना माहिती दिली होती का? याचे उत्तर द्यावे लागेल आणि दंगलीची चाहुलच लागली नसेल तर हे गुप्तचर विभागाचे अपयश आहे. महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री यांनी या दंगलीची निष्पक्षपातीपणे चौकशी करुन दोषींना शिक्षा केली पाहिजे असेही रमेश चेन्नीथला म्हणाले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, नागपुरात झालेल्या हिंसाचारावेळी मुख्यमंत्री पोलिसांना फोन करत होते पण पोलीस फोन उचलत नव्हते असे भाजपा आमदार सांगत होते, यातून दंगलीचे प्रायोजक कोण होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राज्य टिकण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत व या दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटला जात आहे. उद्योगपतींना जमिनी दिल्या जात आहेत. आपल्याला एकजुटतेने सद्भावनेच्या मार्गाने जावे लागणार आहे. संविधानाचा, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे आणि राहुल गांधी यांचे ‘मोहब्बत की दुकान’ उघडायचे आहे. सत्तेसाठी काही लोक भावाभावात, जातीपातीत भांडणे लावत आहेत. सत्तेसाठी अशांतता पसरवणाऱ्यांनी जाती धर्मात, भावा भावात भांडणे लावू नये, असे आवाहन सपकाळ यांनी केले. विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, पुरोगामी विचाराने चालवणाऱ्या महाराष्ट्रात आग लावणारे लोक सत्तेत आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकरून काढत राज्यात तेढ निर्माण करण्याचे काम केले. संविधानाची शपथ घेतलेले मंत्री जाती धर्माच्या नावाने वाद निर्माण करत आहेत. एक मंत्री मशिदीत घुसून मारण्याची धमकी देतो पण मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाहीत. नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर एका आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवून घर पाडले त्याप्रकरणी अधिकाऱ्यांना आता माफी मागावी लागली. सर्वोच्च न्यायालयाने महायुती सरकारचा नपुंसक सरकार असा उल्लेख केला हे लाजीरवाणे आहे असे वडेट्टीवार म्हणाले. माजी मंत्री नितीन राऊत, सुनिल केदार, माणिकराव ठाकरे, अनिस अहमद यांनीही यावेळी भाषणे केली.

Nanded Crime: पत्नीला मूल होत नाही म्हणून मारहाण; तहसीलदाराने पिस्तूल रोखल्याचा प्रकार, जादूटोण्याचाही आरोप

Newsworldmarathi Nanded: नांदेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पत्नीवर पिस्तूल रोखण्याचा आणि जादूटोण्याचा प्रयत्न तहसीलदाराने केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी तहसीलदाराचे नाव अविनाश शेंबटवाड असून, नांदेड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नेमकं काय आहे प्रकरण: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश शेंबटवाड हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून त्यांचे सासर मगनपुरा परिसरात आहे. त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीत असे म्हटले आहे की, पत्नीला मूल होत नाही म्हणून शेंबटवाड यांनी तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला, शिवाय तिच्यावर जादूटोण्याचा प्रयोग करण्याचाही प्रयत्न केला. पत्नीवर पिस्तूल रोखणं, शारीरिक-मानसिक छळ करणं आणि मूलबाळ होण्यासाठी जादूटोण्याचा प्रयत्न करणं, अशा गंभीर आरोपांखाली नांदेडचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर 11 मार्च रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 13 एप्रिल रोजी त्यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. फिर्यादीतील गंभीर आरोप: – लग्नाच्या दीड वर्षांतच छळ: फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, अविनाश यांच्याशी मोठ्या थाटामाटात विवाह लावण्यात आला होता. लग्नानंतरच त्यांच्यासह कुटुंबीयांनी छळ सुरू केला. – कर्तव्यावर असताना मारहाण: पतीसोबत कर्तव्यस्थळी असताना वेळोवेळी कारण काढून मारहाण केली जायची. – पिस्तूल रोखल्याचा आरोप: जीवे मारण्याच्या उद्देशाने पतीने पिस्तूल रोखल्याचा धक्कादायक आरोप पत्नीने केला आहे. – जादूटोणा आणि अघोरी उपचार: मूलबाळ होण्यासाठी जादूटोण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. कोणाविरुद्ध गुन्हा? या प्रकरणात केवळ तहसीलदारच नव्हे तर त्यांचे आई-वडील आणि डॉक्टर असलेले दोन भाऊ यांच्याविरुद्धही कौटुंबिक छळ तसेच जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तहसीलदार पोलिसांच्या ताब्यात असून अधिक तपास सुरू आहे. या प्रकारामुळे महसूल विभागात आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस तपास सुरू आहे आणि या प्रकरणातील प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधातील गंभीर आरोपांमुळे संपूर्ण यंत्रणेत खळबळ माजली आहे.

महाआरोग्य शिबिराचा दोन हजार नागरिकांनी घेतला लाभ

0
Newsworldmarathi Pune: कै. सुनिल भंडारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त चंद्रय्या मारय्या भंडारी सामाजिक व शैक्षणिक संस्था, पुणे आणि रेड स्वस्तिक सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या एकदिवसीय मोफत महाआरोग्य व रोगनिदान महाशिबिराचा दोन हजारापेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरात तपासणी केलेल्या 85 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून ब्रेस्ट कॅन्सर निदान झालेल्या महिलांवरही मोफत उपचार करण्यात येणार आहेत. शिवाजी नगर मेट्रो स्टेशन समोरील मोकळ्या जागेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 165 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. रक्तदान करणाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. डोळ्यांची तपासणी करून 700 गरजूंना चष्म्यांचे वितरण करण्यात आले. 215 रुग्णांची हृदय तपासणी करण्यात आली असून यातील 40 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मणका (स्पाईन), मेंदू, कॅन्सर, स्त्रीरोग आणि अर्धांगवायू या सारख्या आजारांवरही तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून मोफत सल्ला व प्राथमिक उपचार करण्यात आले. या आरोग्य शिबिरात डॉ. संजय तरलेकर, डॉ. स्मिता वाबळे, डॉ. गुरुतेजसिंग ब्रार (कॅनडा), आणि डॉ. सुनील साबळे यांनी रुग्णांची तपासणी केली. सीआयडीचे डीआयजी सारंग आव्हाड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, माजी नगरसेवक सनी निम्हण, बाळासाहेब बोडके, उदय महाले, प्राचार्य वाल्हेर, प्रसाद भिमाले, तिरुपती भंडारी आदींनी शिबिरास भेट देऊन समाजभिमुख कार्याचे कौतुक केले. या आरोग्य शिबिरामुळे शेकडो गरजू नागरिकांना मोफत औषध वाटप करून आरोग्यविषयक सेवा देण्यात आल्या. या उपक्रमाचे आयोजन सामाजिक बांधिलकीतून करण्यात आल्याचे चंद्रय्या मारय्या भंडारी सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मारुती भंडारी, रेड स्वस्तिक सोसायटीचे राज्य सचिव अशोक शिंदे यांनी सांगितले.

“मी पोलिसांच्या हाती लागणार नाही” म्हणणारा, रणजीत कासले अखेर येणार शरण..

0
Newsworldmarathi Mumbai: “मी पोलिसांच्या हाती लागणार नाही” म्हणणारा, अखेर शरण येणार! निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेने खळबळजनक दावा केला आहे. 20 वर्षे सायबर पोलिस दलात काम केलेल्या, आणि सध्या निलंबित असलेल्या रणजीत कासलेने पोलिसांपासून लपून राहण्याचा दावा करत, दररोज दोन गाड्या बदलून लोकेशन बदलत असल्याचं सांगितलं होतं. “पोलिसांनी कितीही प्रयत्न केले, तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही,” असा टोकाचा इशारा देणाऱ्या कासलेने आता शरण येण्याची तयारी दाखवली आहे. कासलेने यापूर्वी बीड पोलीस आणि धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याला ‘वाल्मिक कराडसारखं एन्काऊंटर’ करण्याची ऑफर मिळाल्याचा दावाही केला होता. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. बीड पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता, पण तो अचानक गायब झाला होता. आता कासलेने स्वतःहून शरण येण्याची घोषणा करत, पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. त्याच्या आरोपांची आणि शरणागतीची दखल घेतली जात असून, पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे. रणजीत कासलेचा नवा व्हिडीओ: “पळून उपयोग नाही… आता लढणारच!” बीड पोलिसांकडून शोध घेत असलेला आणि सायबर विभागातील निलंबित अधिकारी रणजीत कासले याने शेअर केलेल्या नव्या व्हिडीओने खळबळ उडवली आहे. “मी कालपासून अनेकांच्या प्रतिक्रिया वाचल्या, काहींशी संवादही साधला. वकिलांशी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर मला जाणवलं – आता पळून काही होणार नाही. मी आतापर्यंत प्रत्येक संकटाचा सामना केला आहे, आणि याही वेळेस करणार आहे,” असं कासले म्हणतो. व्हिडीओमध्ये कासलेने स्पष्टपणे जाहीर केलं आहे की तो बीड पोलिसांसमोर शरण जाणार आहे. “सिस्टीमच्या विरोधात जास्त काळ लढता येत नाही. माझा बळी जाणार हे आता मला स्पष्ट झालं आहे. पण मी जे आरोप केले, ते सिद्ध करून दाखवेन,” असं ठाम वक्तव्य त्याने केलं. प्रमुख मुद्दे: – “मी पोलीस खात्याचं मीठ खाल्लं आहे, माझी लढाई आता कायदेशीर मार्गाने लढेन.” – “मी लवकरच दोन्ही मोबाईल सुरु करणार आहे. कॉल नको – मेसेज करा, मी वाचतो आणि रिप्लाय देतो.” – “ज्यांच्यावर आरोप केले, ते आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. वॉशिंग मशीनमधून स्वच्छ बाहेर येणार आहेत.” – “बीड पोलिसांनी मला पकडलं तरी हरकत नाही. मी पोलिसांसमोर हजर होणारच.” या व्हिडीओनंतर रणजीत कासले पोलिसांच्या ताब्यात आल्यावर त्याच्या चौकशीतून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. पुढील काही तास या प्रकरणात निर्णायक ठरणार आहेत. कासलेचे गंभीर आरोप: 10, 20, 50 कोटींच्या ऑफर देऊन एन्काऊंटरसाठी दबाव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत घेतले जातात निर्णय विश्वासू टीम तयार करून ‘बोगस एन्काऊंटर’ घडवले जातात चौकशी झाली तरी “आमचं सरकार आहे” असं म्हणत पोलीस अधिकाऱ्यांना आश्वासन रणजीत कासले सध्या पोलीसांच्या ताब्यात नाही, मात्र त्याने स्पष्ट केले आहे की, “लवकरच दोन्ही मोबाईल सुरु करेन, कॉल करू नका, मेसेज करा. मी प्रतिसाद देईन.” या प्रकरणात आता पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

नवजात बालकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या अराध्या फाउंडेशनच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी अभिनेता हर्षद अतकरी

0
Newsworldmarathi Pune : नवजात बालकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या अराध्या फाउंडेशनला आनंद आहे की प्रसिद्ध अभिनेता हर्षद अतकरी, आमच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सामील झाले आहेत. हर्षद अतकरी हे “दुर्वा”, “फुलाला सुगंध मातीचा” सारे तुझ्यासोबत, कुण्या राजाचि तू ग राणी या सारख्या लोकप्रिय मराठी मालिकांमधील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जातात, त्यांनी आमच्या फाउंडेशनसाठी सामाजिक कारणांप्रती त्यांचे आवड आणि वचनबद्धता आणली आहे. अशा शब्दांत अराध्या फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश येलदी यांनी या नवीन भागीदारीबद्दल आपला उत्साह व्यक्त केला: अभिनेता हर्षद अतकरी यांचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अराध्या फाऊंडेशन मध्ये सहभाग याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत येलदी बोलत होते.यावेळी अभिनेता हर्षद अतकरी,पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार,अभिनेत्री पूजा वाघ,प्रियांका मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना येलदी म्हणाले, “आम्हाला हर्षद अतकरी यांना अराध्या फाउंडेशनचे चेहरा म्हणून मिळाल्याचा सन्मान आहे. त्यांच्या कलेप्रतीची निष्ठा आणि सामाजिक समस्यांप्रतीची खरी काळजी आमच्या मिशनशी पूर्णपणे जुळते, ज्यामध्ये आम्ही अल्पवजन आणि अकाली जन्मलेल्या मुलांच्या विकासासाठी आवश्यक पोषण आणि वैद्यकीय काळजी प्रदान करतो.” हर्षद अतकरी यांनी या सहकार्याबद्दल आपले विचार करताना सांगितले की, “अराध्या फाउंडेशनशी संबंधित असणे हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. अकाली जन्मलेल्या आणि अल्पवजन मुलांना समर्थन देण्याचे त्यांचे कार्य खरोखर प्रशंसनीय आहे. या मुलांना योग्य पोषण आणि वैद्यकीय काळजी मिळणे त्यांच्या निरोगी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या उपक्रमांना समर्थन देण्यासाठी आणि समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी मी उत्सुक आहे.” अराध्या फाउंडेशन विविध सामाजिक उपक्रमांच्या आघाडीवर आहे, ज्यामध्ये अकाली जन्मलेल्या आणि अल्पवजन मुलांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. फाउंडेशन आवश्यक वैद्यकीय सुविधा, पोषण समर्थन आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत प्रदान करते. आम्हाला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाशी विशेष स्तनपान वाढवण्यासाठी आणि कांगारू मदर केअर (केएमसी) प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी सहकार्य करण्याचा अभिमान आहे. याशिवाय, सोलापूर महानगरपालिका आणि एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) सोबतच्या आमच्या भागीदारीमुळे आम्हाला पूरक पोषण, आरोग्यसेवा आणि पूर्व-शालेय शिक्षण यासह सेवा पॅकेज प्रदान करता येते.

Pune Police ; जिथे कोयत्याची दहशत माजवली; तिथेच पुणे पोलिसांनी गुंडांची मस्ती उतरवली…

Newsworldmarathi Pune : पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळीची पुणे पोलिसांनी धिंड काढून चांगलीच अक्कल शिकवली आहे.सिंहगड कॉलेजसह भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ज्या ठिकाणी कोयते नाचवले त्याच ठिकाणी पोलिसांनी आरोपींची लाज काढली. आरोपींचा माज उतरवण्यासाठी पुणे पोलिसांचा पुन्हा धिंड पॅटर्न सुरू झाला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपींना गुडघ्यावर आणत आरोपींचा उतरवला आहे. काही दिवसापूर्वी ही घडली होती घटना काही दिवसांपूर्वी आरोपींकडून सिंहगड कॉलेज परिसर आणि इतर परिसरात कोणत्या हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.आरोपींनी काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली होती. या सर्व आरोपींना अटक करत पोलिसांनी काढली धिंड