पुणेकरांनो काळजी घ्या! पुण्यात ‘गुलेन बेरी सिंड्रोम’ आजाराचे 22 रुग्ण
Newsworldmarathi Pune : पुण्यामध्ये एका रहस्यमयी आजाराचे रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आजाराचं नाव ‘गुईवेल सिंड्रोम’ (Guillain-Barré Syndrome) असं आहे. पुण्यात ‘गुलेन बेरी सिंड्रोम’चे 22 संशयित रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे म्हणजेच आयसीएमआरकडे या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, ‘गुलेन बेरी सिंड्रोम’ संदर्भातील वेगळा कक्ष महापालिकेने स्थापन केला आहे.
‘गुलेन बेरी सिंड्रोम’संदर्भात ‘एनआयव्ही’ इंस्टिट्यूट म्हणजेच ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’चा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण आढळले आहे त्या भागात महापालिकेकडून टीम नियुक्त केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘गुलेन बेरी सिंड्रोम’ हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. म्हणजेच हा मज्जासंस्थेशीसंबंधित एक आजार असून तो एक लाखांमध्ये एका व्यक्तीमध्ये आढळून येतो. वेगळ्या पद्धतीच्या लसी घेतल्या असतील किंवा ‘एच वन एन वन’च्या लस घेतली असेल तर काही प्रमाणात हा दुर्मिळ आजार लोकांना होऊ शकतो, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
गुलेन बेरी सिंड्रोमचे निदान करण्यासाठी ‘स्पाइनल फ्लूड’ची चाचणी केली जाते. ‘गुईवेल सिंड्रोम’वरील उपचार हे महागडे असून यामध्ये उपाय म्हणून ‘प्लाजमा एक्सचेंज’सारखी पद्धत वापरली जाते. हा आजार दुर्मिळ असला तरीही धोकादायक नाही. सध्या पुण्यात आढळून आलेल्या रुग्णांपैकी पुणे शहरात एकणू 6 रुग्ण आहेत. तर उर्वरित 16 रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील इतर वेगवेगळ्या भागांमधील आहेत. यासंदर्भातील माहिती आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांनी दिली आहे
पुण्यात आढळून आलेले 6 रुग्ण उपचारासाठी पुण्यात आलेले होते. त्यामुळे सर्वच रुग्ण हे पुणे शहराच्या बाहेरील आहेत, असं स्पष्ट होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा आजार संसर्गजन्य नसल्याने त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता फारच कमी आहे. सध्या पुण्यामधील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये या रुग्णांची तपासणी केली जात आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये ‘गुलेन बेरी सिंड्रोम’चे हे रुग्ण होते त्या परिसरातही रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.
निःस्वार्थ सेवा हाच खरा धर्म : शिवाजीभाऊ गदादे-पाटील
Newsworldmarathi Pune : गेली 35 वर्षे पर्वती आणि जनता वसाहत परिसरात निस्वार्थीपणे काम करताना मिळालेल्या समाधानाचा उल्लेख करताना सामाजिक कार्यकर्ते शिवाजीभाऊ गदादे यांनी त्यांच्या कार्याची दिशा आणि उद्देश स्पष्ट केला आहे. त्यांनी सांगितले की, या भागाचा विकास, नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि परिसराचा कायपालट घडवून आणणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन काम केले. गदादे परिवार हा नेहमी समाजकारणाशी जोडलेला असून, निस्वार्थी सेवा हेच त्यांच्या कार्याचे प्रमुख सूत्र राहिले आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे विशेषतः माता भगिनींचे प्रेम व पाठिंबा त्यांना मोठ्या प्रमाणात मिळाला आहे.
सामाजिक कार्यकर्ते शिवाजीभाऊ गदादे पाटील यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त हळदी कुंकू आणि वाण वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवाजीभाऊ गदादे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. जवळपास 15 ते 20 हजार महिलांना यावेळी वाण वाटप करण्यात आले. पर्वती मतदार संघातील हजारो महिला यावेळी उपस्थित होत्या.
माजी नगरसेविका प्रिया गदादे पाटील म्हणाल्या, हा कार्यक्रम माझी आई स्वर्गीय छायाताई यांनी सुरु केला. महिलांना यातून एक समाधान आनंद आणि प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा कार्यक्रम सुरु केला. आज 20 वर्ष झाले या कार्यक्रमाला महिलांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे हे पाहून खूप आनंद वाटतो. इथून पुढेही महिलांसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
सामाजिक कार्यकर्ते प्रेम गदादे म्हणाले, आई वडिलांमुळे मला समाज कार्याची प्रेरणा मिळाली आज या परिसरातील नागरिकांची एक नातं जोडलं आहे. हळदी कुंकू हे निमित्त आहे पण नागरिकांचे प्रेम पाहून आनंद वाटतो. इथून पुढेही या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार..
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वारकरी सेवा प्रतिष्ठान आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजीभाऊ गदादे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. जवळपास 15 ते 20 हजार महिलांना यावेळी वाण वाटप करण्यात आले. पर्वती मतदार संघातील हजारो महिला यावेळी उपस्थित होत्या.
माजी नगरसेविका प्रिया गदादे पाटील म्हणाल्या, हा कार्यक्रम माझी आई स्वर्गीय छायाताई यांनी सुरु केला. महिलांना यातून एक समाधान आनंद आणि प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा कार्यक्रम सुरु केला. आज 20 वर्ष झाले या कार्यक्रमाला महिलांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे हे पाहून खूप आनंद वाटतो. इथून पुढेही महिलांसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
सामाजिक कार्यकर्ते प्रेम गदादे म्हणाले, आई वडिलांमुळे मला समाज कार्याची प्रेरणा मिळाली आज या परिसरातील नागरिकांची एक नातं जोडलं आहे. हळदी कुंकू हे निमित्त आहे पण नागरिकांचे प्रेम पाहून आनंद वाटतो. इथून पुढेही या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार..
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वारकरी सेवा प्रतिष्ठान आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजीभाऊ गदादे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे महापालिका निवडणूक होणार सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये
Newsworldmarathi Pune : महापालिकांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवरील उद्या बुधवारी (दि. 22) सुनावणी होणार नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह तब्बल 23 महापालिकांच्या निवडणुका प्रदीर्घ काळापासून रखडल्या आहेत. प्रामुख्याने महापालिका निवडणुकीसाठीची प्रभागरचना, लोकसंख्येत 10 टक्के वाढ धरून निश्चित केलेली सदस्यसंख्या आणि ओबीसी आरक्षण, यावर तब्बल 57 वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. त्यावर एकत्रित सुनावणी उद्या बुधवारी होणार होती.
मात्र, बुधवारी न्यायालयात होणाऱ्या सुनावण्यांच्या यादीत या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसंदर्भातील याचिकांचा समावेश नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. येत्या 28 जानेवारीला ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, सुनावणी लांबल्याने त्याचा थेट परिणाम निवडणुकांवर होणार असून, येत्या एप्रिल-मे महिन्यात महापालिकांच्या होणाऱ्या अपेक्षित निवडणुकाही लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इच्छुकांमध्ये नाराजी:
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. त्यातच महायुतीला मिळालेल्या मोठ्या बहुमतामुळे हे सरकार तातडीने निवडणुकांसाठी प्रयत्नशील आहे, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र सरकारकडून निवडणुका घेण्यासाठी तातडीने कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे इच्छुकांची निराशा होत आहे.
नव्याने प्रभागरचना कराव्या लागणार:
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी तीन सदस्यीय प्रभागरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार प्रभागरचना करून आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पुन्हा चार सदस्यीय प्रभागरचना करण्यात आली. आत्ता पुन्हा चार सदस्यीय प्रभागरचना नव्याने करावी लागणार आहे. 2017च्या रचनेनुसार प्रभागरचना कायम ठेवण्याचा निर्णय झाला, तरी पुणे महापालिकेत 2017 नंतर उरुका देवाची व फुरसुंगी वगळून 32 गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे किमान पुणे महापालिकेत तरी नव्याने प्रभागरचना करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.
…तर निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये
प्रभागरचना करणे, त्यावर हरकती-सूचनांची प्रक्रिया आणि अंतिम प्रभागरचना, यासाठी किमान 90 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जानेवारीअखेरपर्यंत निवडणुकांसंदर्भात निकाल न लागल्यास एप्रिल-मे महिन्यात निवडणुका घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या निवडणुका थेट सप्टेंबर- ऑक्टोबरमध्येच घ्याव्या लागतील, अशी परिस्थिती आहे.
प्रियंका बनतेय तरुणीची ‘आयडॉल’
Newsworldmarathi Pune : भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार म्हणून वेगळी ओळख करून देणारी प्रियंका इंगळे आता तरुणांची एक आयडॉल बनली आहे.भारतात खेळवण्यात आलेल्या पहिल्याच खो-खो वर्ल्डकपवर भारतीय संघाने नाव कोरले आहे. भारत हा खो-खो चा पहिला विश्वविजेता संघ ठरला आहे. नवी दिल्ली येथे आज (दि.9) खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने नेपाळचा 38 गुणांच्या मोठ्या फरकाने एकतर्फी पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून प्रत्येक सामन्यात वर्चस्व राखणाऱ्या भारतीय महिला संघाने अंतिम फेरीतही अशाच प्रकारे चमक दाखवली. टीम इंडियाने नेपाळचा 78-40 असा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलंय. खो-खो हा भारतीय खेळ असून या खेळाचा विश्वचषक पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता.
नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खोखो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांत एक दोन नव्हे तर तब्बल पाच महाराष्ट्रीय खेळाडू आहेत. यामध्ये देशाला खो-खो विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या पुरुष आणि महिला संघात महाराष्ट्राचे भरभरुन योगदान आहे. यामध्ये महाराष्ट्रीयन, पुण्याचा प्रतिक, बीडची प्रियांका यांनी कर्णधारपदाची धुराही सांभाळली आहे.
भारतीय महिला संघाच्या कामगिरीत संघाची कर्णधार प्रियंका इंगळेनं दमदार कामगिरी केली. विशेष म्हणजे प्रियंका ही बीडची असून तिच्या या विक्रमामुळं बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोबतच बीडला जागतिक पातळीवर तीनं ओळख मिळवून दिली आहे. या खो-खो सामन्याच्या वेळी प्रियंकाचे आई आणि वडील दोन्हीही हा सामना पाहत होते. प्रियंकाच्या या कामगिरीमुळं राज्यातूनच नव्हे तर देशातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. यासोबतच तिचे आई-वडील हनुमान इंगळे व सविता इंगळे यांच्यावर देखील नातेवाईकाकडून व मित्र परिवाराकडून कौतुकांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. प्रियंकाच्या आई आणि वडीलांनी देखील तिच्या या यशानंतर मुलीचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलंय.
भारतीय महिला संघाच्या कामगिरीत संघाची कर्णधार प्रियंका इंगळेनं दमदार कामगिरी केली. विशेष म्हणजे प्रियंका ही बीडची असून तिच्या या विक्रमामुळं बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोबतच बीडला जागतिक पातळीवर तीनं ओळख मिळवून दिली आहे. या खो-खो सामन्याच्या वेळी प्रियंकाचे आई आणि वडील दोन्हीही हा सामना पाहत होते. प्रियंकाच्या या कामगिरीमुळं राज्यातूनच नव्हे तर देशातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. यासोबतच तिचे आई-वडील हनुमान इंगळे व सविता इंगळे यांच्यावर देखील नातेवाईकाकडून व मित्र परिवाराकडून कौतुकांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. प्रियंकाच्या आई आणि वडीलांनी देखील तिच्या या यशानंतर मुलीचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलंय.
नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खोखो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांत एक दोन नव्हे तर तब्बल पाच महाराष्ट्रीय खेळाडू आहेत. यामध्ये देशाला खो-खो विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या पुरुष आणि महिला संघात महाराष्ट्राचे भरभरुन योगदान आहे. यामध्ये महाराष्ट्रीयन, पुण्याचा प्रतिक, बीडची प्रियांका यांनी कर्णधारपदाची धुराही सांभाळली आहे.
भारतीय महिला संघाच्या कामगिरीत संघाची कर्णधार प्रियंका इंगळेनं दमदार कामगिरी केली. विशेष म्हणजे प्रियंका ही बीडची असून तिच्या या विक्रमामुळं बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोबतच बीडला जागतिक पातळीवर तीनं ओळख मिळवून दिली आहे. या खो-खो सामन्याच्या वेळी प्रियंकाचे आई आणि वडील दोन्हीही हा सामना पाहत होते. प्रियंकाच्या या कामगिरीमुळं राज्यातूनच नव्हे तर देशातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. यासोबतच तिचे आई-वडील हनुमान इंगळे व सविता इंगळे यांच्यावर देखील नातेवाईकाकडून व मित्र परिवाराकडून कौतुकांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. प्रियंकाच्या आई आणि वडीलांनी देखील तिच्या या यशानंतर मुलीचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलंय.
भारतीय महिला संघाच्या कामगिरीत संघाची कर्णधार प्रियंका इंगळेनं दमदार कामगिरी केली. विशेष म्हणजे प्रियंका ही बीडची असून तिच्या या विक्रमामुळं बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोबतच बीडला जागतिक पातळीवर तीनं ओळख मिळवून दिली आहे. या खो-खो सामन्याच्या वेळी प्रियंकाचे आई आणि वडील दोन्हीही हा सामना पाहत होते. प्रियंकाच्या या कामगिरीमुळं राज्यातूनच नव्हे तर देशातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. यासोबतच तिचे आई-वडील हनुमान इंगळे व सविता इंगळे यांच्यावर देखील नातेवाईकाकडून व मित्र परिवाराकडून कौतुकांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. प्रियंकाच्या आई आणि वडीलांनी देखील तिच्या या यशानंतर मुलीचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलंय. ज्येष्ठ गिर्यारोहक श्री उमेश झिरपे यांना जीवनगौरव पुरस्कार
Newsworldmarathi pune : गिरिप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक, संस्थेच्या अष्ठहजारी शिखर मोहिमांचे नेते, गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरिंग (GGIM) आणि गिरिप्रेमी अॅडव्हेंचर फाऊंडेशनचे (GAF) संस्थापक संचालक, श्री उमेश झिरपे यांना २०२३ चा प्रतिष्ठित तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार अर्जुन पुरस्कारास समकक्ष असून, भारतातील साहस क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कामगिरीसाठी दिला जातो भारताच्या माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपतीच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा उल्लेखनीय पुरस्कार झिरपे यांच्या गिर्यारोहण कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आणि गिरिप्रेमीसाठी एक अभिमानाचा क्षण आहे. श्री झिरपे यांनी आपल्या जीवनाचे समर्पण भारतातील पर्वतारोहणाच्या क्षेत्राच्या प्रगतीसाठी केले आहे, आणि त्यांच्या नेतृत्व, कौशल्य आणि साहसासाठी असलेल्या अढळ भावनांमुळे अनेक नव्या गिर्यारोहकांना प्रेरणा मिळाली आहे.
तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार हे भारतातील साहस क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे, आणि श्री झिरपे यांच्या पर्वतारोहण समुदायातील जीवनभराच्या योगदानामुळे आणि साहसाच्या प्रति असलेल्या निष्ठा आणि उत्साहामुळे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. झिरपे हे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष असून, यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार श्री शिव छत्रपती साहसी क्रिडा पुरस्कार व जगभरातील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
गिर्यारोहण क्षेत्रातील श्री उमेश झिरपे यांची कामगिरी
१९८७ – बेसिक माऊंटेनियरींग कोर्स पूर्ण
१९८८ – अँडव्हान्स माऊंटेनियरींग कोर्स पूर्ण
माऊंट प्रियदर्शनी (५२५० मी.), माऊंट थेलू (६२०२ मी.), माऊंट भ्रीगु (६२८९ मी.), माऊंट मंदा-१ (६५६८ मी.), माऊंट सुदर्शन (६५०७ मी.), माऊंट भागीरथी-२ (६५१२ मी.), माऊंट श्रिकंठ (६१३३ मी.), माऊंट जॉनली (६६३२ मी.), माऊंट नून (७१३५ मी.) या भारतातील हिम शिखरांवर यशस्वी मोहिमांचे यशस्वी नेतृत्व
माऊंट मेरा (६४७६ मी.) या नेपाळमधील हिमशिखरावर यशस्वी चढाई
जगातील सर्वोच्च आठ अष्ठहजारी हिमशिखरांवरील यशस्वी मोहिमांचे नेतृत्व करणारे भारतातील एकमेव व्यक्ती
२०२३ मध्ये जगातील पहिल्या यशस्वी मेरू मोहिमेचे यशस्वी नेतृत्व
लिंगाणा, सिंहगड खंद कडा, तानाजी कडा, कळकराई सुळका, डांग्या सुळका, विसापूर कातळभिंत, वानरलिंगी, ड्युक्स नोज, तैलबैला कातळभिंती, ढाकोबा, कात्राकडा अशा सह्याद्रीतील अनेक प्रस्तरारोहण मोहिमा यशस्वी
कोकण पूर, लेह ढगफुटी, उत्तराखंड भूकंप, नेपाळ भूकंप, हिमालयातील मोहिमांमध्ये बचाव कार्य, कोरोना टास्क फोर्स निर्मिती यासारख्या अनेक संकट काळातील बचाव कार्यात सहभाग
५०० हून अधिक गिर्यारोहणावरील कार्यशाळा
१००० हून अधिक शाळा, कॉलेज, कंपनी, संस्थांमध्ये व्याख्याने
१००० हून अधिक गिर्यारोहण विषयावरील लेख प्रसिद्ध
एव्हरेस्ट, शेर्पा, कांचनजुंगा, मुलांसाठी गिर्यारोहण पुस्तकांचे लेखन
गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्युट ऑफ माऊंटेनियरिंगचे संस्थापक संचालक
गिरिप्रेमी अॅडव्हेंचर फाऊंडेशनचे संचालक
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ या महाराष्ट्रातील गिर्यारोहण या साहसी खेळाच्या सर्वोच्च शिखर संस्थेचे अध्यक्ष
स्वरुपसेवा या समाजातील वंचित घटकांकरिता कार्यान्वित असलेल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन
Newsworldmarathi Pune : संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे (वय 89) यांचे सोमवारी रात्री साडेदहा वाजता चिंचवड येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. आळंदी येथे मंगळवारी (ता. 21) दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. साखरे महाराज यांची प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
किसन महाराज साखरे : (१९३८). वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार, संत वाङ्मयाचे प्रवाचक,अभ्यासक,तत्त्वचिंतक म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील पान चिंचोली येथे झाला. त्यांचे वडील परमगुरू दादा महाराज साखरे,आजोबा नाना महाराज साखरे हे संत साहित्याचे अभ्यासक होते. वेद, उपनिषदे, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, सकल संतगाथेचे अध्ययन आणि अध्यापन साखरे घराण्यात सुरू होते त्यामुळे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता बालवयात किसन महाराजांना संत साहित्याच्या अध्ययन, अध्यापनाचे संस्कार लाभले. नाना महाराज साखरे यांनी ज्ञानेश्वरीचे आणि अन्य संत वाड्मयाचे संपादन केले.
अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांचे चिंतन ही किसन महाराजांची केवळ जीवननिष्ठा नव्हे तर परमश्रध्दा बनली. पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र आळंदी येथील साधकाश्रमात गुरू – शिष्य परंपरेचा अंगीकार करून किसन महाराज यांनी संत साहित्य, तत्त्वज्ञान, व्याकरणशास्त्र याचे अध्ययन केले. प्रख्यात तत्त्वज्ञ एन. पी. मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे शिक्षण घेतले. १९६० साली साधकाश्रमाची धुरा किसन महाराजांच्या हाती आली. तेव्हापासून निस्वार्थीपणे कुठल्याही जातीपातींचा अडसर न ठेवता साधकाश्रमात ज्ञानार्जनासाठी आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना किसन महाराजांनी संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले. कीर्तन, प्रवचनाद्वारे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून त्यांनी आध्यात्मिक उद्बबोधन अनेक वर्षे घडविले. कीर्तन, प्रवचन करणारे शेकड्यावर विद्यार्थी त्यांनी घडविले. मूल्याधिष्ठित शिक्षण प्रणालीचा ध्यास किसन महाराजांनी घेतलेला असल्याने मोफत बाल संस्कार शिबिरांची संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष यशस्वीरित्या राबविली. बाल संस्कार शिबिरातून चांगले नागरिक घडविण्याचा संकल्प त्यांनी कृतीत उतरविला.
गेली ५० वर्षे प्रती वर्षी मे महिन्यात बाल संस्कार शिबिराचा उपक्रम ते राबवितात. श्रीमद्दभगवतगीता आणि ज्ञानेश्वरीच्या प्रचार, प्रसारासाठी किसन महाराजांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर वाराणसी, वृंदावन, रामेश्वर आदी ठिकाणी गीता ज्ञानेश्वरी ज्ञानयज्ञाचे आयोजन अनेकवेळा केले. संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाच्या प्रचार, प्रसारासाठी आधुनिक तंत्रज्ञान अतिशय गरजेचे आहे हे लक्षात घेऊन किसन महाराजांनी सी.डी. ए.सी. म्हणजे प्रगत संगणक अध्ययन केंद्र (भारत सरकारचा उपक्रम) याद्वारे अध्यापनास प्रारंभ केला. अनेक पदवीधर विद्यार्थ्यांना संगणक शास्त्रात शिक्षण देण्यात किसन महाराजांनी मोलाचे योगदान दिले.
त्यांचे या क्षेत्रातील भरीव योगदान लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक आदी विद्यापीठात त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले. विविध विद्यापीठांमध्ये पीएच.डी आणि डी.लिट पदवीच्या परीक्षक मंडळावर सदस्य म्हणून किसन महाराज यांनी काम केले. आकाशवाणी केंद्रावरून आयोजित होणाऱ्या कीर्तन स्पर्धांचे परीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली. गेली ४५ वर्षे स्वस्तिश्री या मासिकाचे संपादन ते करीत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा येथे आयोजित झालेल्या अखिल भारतीय किर्तनकार संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ज्ञानेश्वरी वाचन मंदिर, रंगनाथ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट अशा संस्थांचे विश्वस्त पद त्यांनी भूषविले आहे. कीर्तन प्रवचनातून आध्यात्मिक उद्बोधन करतानाच हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्याचे सामाजिक कार्य किसन महाराजांनी केले आहे. श्री क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली. अन्नछत्र, ग्रंथालय, भक्तनिवास अशा उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद किसन महाराज यांनी भूषविले आहेत. आळंदी-देहू तीर्थ क्षेत्रांची माहिती देणारी संप्रेषण यंत्रणा किसन महाराज साखरे आणि परिसर विकास समितीच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत ज्ञानेश्वर महाराज अध्यासन सुरू झाले त्याची मूळ प्रेरणा अध्यक्ष या नात्याने किसन महाराजांची होती.
ग्रंथराज ज्ञानेश्वरीची दृकश्राव्य प्रत त्यांनी प्रकाशित केली आहे. किसन महाराजांनी संस्कृत आणि मराठीतून एकूण ११५ ग्रंथ लिहले आहेत. सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ एकनाथी भागवत, सार्थ तुकाराम महाराज गाथा, सार्थ भगवद्गीता, सार्थ ब्रह्मसूत्र, सार्थ उपनिषद, सोहम योग, ज्ञानेश्वर महाराज चरित्र या सारखी ग्रंथ संपदा त्यांच्या लेखणीतून साकार झाली आहे. एकूण ५०० ताम्र पटांवर त्यांनी ज्ञानेश्वरी प्रकाशित केली आहे.
किसन महाराज साखरे यांना सन २०१८ सालचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या पाच लाख रुपयाच्या रकमेत स्वतःचे एक लाख रुपये जमा करून ही रक्कम संस्कृतमध्ये शिक्षण घेणाऱ्या अभ्यासकासाठी देता यावी म्हणून ती किसन महाराजांनी महाराष्ट्र शासनाला सुपूर्द केली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डी. लिट या सर्वोच्च पदवीने त्यांना सन्मानित केले आहे. नागपूरच्या जिजामाता प्रतिष्ठानने जिजामाता गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. वारकरी रत्न, मोरया पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू कीर्तनकार, प्रवचनकार, तत्त्ववेत्ते म्हणून ह.भ.प. किसन महाराजांचे कार्य सर्व परिचित आहे. यमुना कंकाळ, यशोधन साखरे, चिदम्बरेश्वर साखरे ही त्यांची मुले आहेत. संत वाड्मयाचे अभ्यासक, लेखक म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे.
मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे : धनंजय मुंडे
Newsworldmarathi Shirdi : मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे. पक्षातील काही लोक देखील दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. मात्र तरीही माझी भूमिका व वस्तुस्थितीची जाणीव असल्याने या कठीण काळातही पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे आहेत. आज कुणी निराधार व बिनबुडाचे कितीही आरोप करून मला अडकवण्याचा, माझा अभिमन्यु करण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाही, कारण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे! अजित दादांनी आता बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे, याचा आनंदच असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित नव संकल्प शिबिराच्या व्यासपीठावरून ते बोलत होते.
बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेली स्व.संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक होती. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवले पाहिजे, हे माझे पहिल्या दिवसापासून स्पष्ट मत आहे. गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती आहे, त्याला जात धर्म नसतो. मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे. सातत्याने आमची मीडिया ट्रायल केली जात आहे, याबद्दल धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केली .
*तुमच्या अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही शिंगावर घेतले*
पक्षात आल्यापासून आजवरच्या वाटचालीत आमचे नेते म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहिलो. अनेक प्रसंगी अजितदादांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही शिंगावर घेतले. २०१४ – १९ या काळात विरोधी पक्षनेतेपदी काम केले. पक्षाच्या पडत्या काळात चार वेळा हल्लाबोल, परिवर्तन, शिवस्वराज्य यात्रांमध्ये सहभागी होऊन सबंध महाराष्ट्र पिंजून काढला. तत्कालीन सरकारला वाकवायचे काम केले.
२०१९ साली पहाटेची शपथ घेऊ नका हे मी सांगितले होते. ती शपथ त्यांनी घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली, अशी खंतही धनंजय मुंडे यांनी आज प्रथमच बोलून दाखवली.
सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी चांगले काम करून दाखवले. गाव – वस्त्यांची जाती वाचक नावे बदलणे, ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ यांसारखे अनेक क्रांतिकारी निर्णय त्याकाळात घेतले.
११ हजार कोटी रुपये पीकविमा एका वर्षात मिळवून देणारा कृषिमंत्री मी, मात्र त्यावरूनही टीका झाली. मात्र अर्धवट माहिती देऊन बदनामी करणारे लोक यावर बोलत नाहीत, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
*खरे दुखणे*
लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी गेलो होतो. त्यावेळी बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी जाऊ नकोस अन्यथा पुढे विधानसभेत त्याचा तुला त्रास होईल, असा सल्ला मला अनेकांनी दिला होता. मात्र तरीही मी गेलो. माझ्यासह अनेकांना विधानसभा निवडणुकीत ठरवून टार्गेट केले गेले. मी माझ्या परळीच्या जनतेच्या आशीर्वादाने एक लाख चाळीस हजार मतांच्या लिडने निवडून आलो, त्याचीच पोटदुखी अनेकांना प्रकर्षाने झाली. ठाण्यात मी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेलो म्हणून तिथले नेते बीडमध्ये येऊन मला टार्गेट करत आहे, हेही उघड झाले.
विधानसभा निवडणुकीत मी केवळ ५ दिवस पूर्णवेळ परळीत होतो, उर्वरित वेळेत मी पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या, बैठका घेतल्या. त्यातील बहुतांश उमेदवार निवडून आले, असेही मुंडे पुढे बोलताना म्हणाले.
*मी काम करणारा कार्यकर्ता*
मी सतत काम करणारा एक कार्यकर्ता आहे, नेता फक्त नावाला आहे. माझ्यातला कार्यकर्ता कधीच मरणार नाही. मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे, पक्ष नेतृत्वाने पाँडिचेरी मध्ये जाऊन पक्ष विस्ताराचे काम कर म्हंटले तर तिथे जाऊन मी काम करेल. पक्षाला सुद्धा कार्यकर्ताभिमुख व्हावे लागेल. कार्यकर्त्याला ताकत देताना संपूर्ण विश्वास देखील ठेवणे आवश्यक आहे, तेव्हाच पक्ष संघटना मजबूत होईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यकर्ता कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
*बीड जिल्हा अन् सामाजिक सलोखा*
स्व.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारनानंतर झालेल्या मीडिया ट्रायल, सोशल मीडियावरील चिखलफेक, साधलेले राजकारण अशा अनेक गोष्टींनी जिल्ह्याचे सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे. आपला पक्ष शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे, त्यामुळे आता आमच्या बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारी सुद्धा सर्वांना घ्यावी लागेल. ऊसतोड करून, कष्ट करून, कोरडवाहू शेती करून जगणारे आम्ही सामान्य लोक आहोत. आमचा जिल्हा बिहार आणि आमची परळी तालिबान नाही. अशीच बदनामी सुरू राहिली तर पुढच्या महिन्यात महाशिवरात्री आहे, बारा ज्योति्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ यांच्या दर्शनाला भाविक येतील का, अशी भीती वाटत असल्याचे सांगून परळीची बदनामी थांबवा असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
दहा लाख रुपये देऊन लग्नाला नकार दिल्याने डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Newsworldmarathi Pune : पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात एका २५ वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या तरुणासोबत लग्नाचं स्वप्न रंगवलं होतं, त्याच तरुणाने धोका दिल्याच्या कारणातून पीडित डॉक्टरने विषारी औषध पिऊन आयुष्याचा शेवट केला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पल्लवी पोपट फडतरे असं आत्महत्या केलेल्या २५ वर्षीय महिला डॉक्टरचे नाव आहे. तर कुलदीप आदिनाथ सावंत असं आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपी कुलदीप याने विवाहित असूनही मेट्रीमोनियल साइट जीवनसाथी डॉट कॉमवर रजिस्ट्रेशन केलं होतं. याच वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी पीडितेशी संपर्क साधला होता. तसेच आपण लग्नासाठी इच्छुक असल्याचं आरोपीनं पीडितेला सांगितलं.
सुरुवातीला पीडित महिला डॉक्टरने आरोपीसोबत लग्न करण्यास नकार दिला. मात्र आरोपीनं पीडितेशी संपर्क साधून तिचा विश्वास संपादन केला. तिला लग्न करण्याचं आमिष दाखवत तिच्याकडून वेळोवेळी दहा लाख रुपये घेतले. ज्यावेळी तरुणीने आरोपीकडे लग्नासाठी विचारणा केली, तेव्हा आरोपीनं लग्न करण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली. तसेच आपण विवाहित असून पत्नी गर्भवती असल्याचं आरोपीनं पीडितेला सांगितलं. होणाऱ्या पतीचा हा भूतकाळ समजल्यानंतर पीडित तरुणीला मानसिक धक्का बसला. एवढेच नव्हे तर आरोपीनं पीडितेकडून घेतलेले दहा लाख रुपये परत देण्यास देखील टाळाटाळ केली
पुण्यामध्ये पुनश्च एकवार नॅशनल गेम्सचे आयोजन होण्यासाठी प्रयत्न करणार : खासदार मोहोळ
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये पुनश्च एकवार नॅशनल गेम्सचे आयोजन व्हायला हवे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूया असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ यांनी केले.
बालेवाडी येथील छत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्यूदो हा खेळ माझ्या आवडत्या कुस्ती खेळाशी खूप साम्य असून यातील डावही कुस्तीमध्ये वापरले जातात त्यामुळे ज्यूदो आणि कुस्ती हे युद्धकलेचे खेळ, भाऊभाऊच आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. यावेळी पुनीत बालन यांनी स्पर्धेतील सहभागी पदक विजेत्यांसाठी रोख दहा लाख रुपयांची बक्षिसांची घोषणा केली, यामध्ये सुवर्णपदक विजेत्यास 11,000 रुपये, रोप्य पदक विजेत्यास 7000 रुपये तर दोन्ही कांस्यपदक विजेत्यास पाच हजार प्रत्येकी असे बक्षीस जाहीर केले.
यावेळी व्यासपीठावर इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सचे तथागत मुखर्जी आणि ज्यूदो फेडरेशनचे पदाधिकारी वीरेंद्र वशिष्ठ, सी एस राजन यांसह द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त जीवन शर्मा, अर्जुन पुरस्कार प्राप्त यशपाल सोलंकी, राज्य ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
समारंभास पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक विजेता अर्जुन पुरस्कार प्राप्त सचिन खिलारे यांना विशेष आमंत्रित केले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य ज्यूदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक यांनी तर आभार प्रदर्शन तांत्रिक सचिव दत्ता आफळे यांनी केले.
स्पर्धेसाठी सबज्युनियर गटामध्ये 29 राज्यातील 235 मुले आणि 230 मुली खेळाडू सहभागी झाले आहेत.
धनंजय मुंडे यांचा पत्ता कट; बीडचे पालकमंत्री अजितदादाच
Newsworldmarathi Mumbai : राज्याच्या पालकमंत्री नियुक्ती संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता बीड आणि पुणे जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. यामुळे ते या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी सांभाळणार आहेत.
तसेच, यासोबत धनंजय मुंडे यांचे नाव पालकमंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांमधील अंतर्गत हालचालींवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या वाढत्या जबाबदाऱ्या आणि मुंडे यांच्या नाव वगळण्यामागची कारणं काय असतील यावर सध्या वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत. या निर्णयाचे राजकीय परिणाम लवकरच दिसून येऊ शकतात.

