Pune Crime: माझ्या लग्नाला का आला नाही म्हणत मारहाण, जीवे मारण्याची धमकी, 5 अटकेत

0
Newsworldmarathi Pune : माझ्या लग्नाला का आला नाही? म्हणत पिस्तूल दाखवत 6 ते सात जणांकडून कुटुंबाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे. पुण्याच्या सासवड पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी केतकी धनंजय झेंडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, 24 मे रोजी महाराजा लॉन्स सासवड हडपसर येथे फिर्यादीच्या चुलत भावाचा साखरपुडा होता. या कार्यक्रमाला नवरदेवाला जाण्यासाठी फिर्यादीची मर्सीडीज गाडी नियोजित करण्यात आली होती. फिर्यादीसह भाऊ सुनील कोलते, धर्मराज कोलते, मलिनी कोलते, सारीका यादव, निलेश यादवसह पती योगेश यादव असे सर्व नातेवाईक हजर होते. हा कार्यक्रम सुरु असतानाच याठिकाणी चुलत भाऊ संकेत यादव विनय यादव, दिलिप यादव सुनिता यादव शुभांगी दौंडकर अक्षता यादव भुजंग यादव महेश यादव यांच्यासह इतर आरोपी पोहोचले. यापैकी एकाने फिर्यादीकडे 7/05/2025 रोजी माझ्या लग्नाला आला नाहीत मग आज या साखरपुड्याला कसे आलात? असे म्हणत अंगावर धावून आले. यापैकी अक्षता यादव, सुनिता यादव, शुभागी दौंडकर यांनी दोन्ही भावांना बेदम मारहाण केली.

Mumbai Crime News : लग्नमंडपाला कुत्रा बांधल्याच्या वादातून नवरदेवाला मारहाण

Newsworldmarathi Mumbai: ठाणे जिल्ह्यातील शीळ गावातील भोईर कंपाउंड येथे एका लग्नमंडपाला कुत्रा बांधल्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन नवरदेवाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंदवले आहेत. नवरदेवाची तक्रार नवरदेव भावेश लोलगे (२७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३१ मे रोजी त्यांच्या आजीच्या घरासमोर लग्नमंडप उभारण्यात आला होता. विशाल म्हात्रे यांनी त्यांच्या कुत्र्याला मंडपाच्या लाकडाला बांधले, ज्यामुळे कुत्र्याने मंडप फाडला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावेश यांना विशालच्या पत्नी दर्शना यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर विशाल यांनी लाकडी दांडक्याने भावेश यांच्या डोक्यावर मारले. विशालचा भाऊ अविनाश आणि त्यांची पत्नी धनश्री यांनीही भावेश यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि धमकी दिली. म्हात्रे कुटुंबाची तक्रार दर्शना म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भावेश लोलगे यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्या घरी येऊन शिवीगाळ केली. त्यांनी फायबर काठीने दर्शना आणि तिच्या भाची अक्षरा रणजित फुलोरे हिला मारहाण केली. विशाल यांनी हस्तक्षेप केल्यावर भावेश यांनी त्यांनाही मारहाण केली. भावेश यांचे भाऊ रवी लोलगे यांनी धनश्री म्हात्रे आणि अक्षरा फुलोरे यांना मारहाण केली, तर ललिता पाटील आणि कविता यांनी शिवीगाळ केली. या प्रकरणात शीळ डायघर पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे 11 वर्षानंतर गोपीनाथगडावर एकत्र

Newsworldmarathi sambhajinagar :भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयातील लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त परळी येथील गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमाने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. या स्मृतिदिन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे, मुंडे कुटुंबातील दोन महत्वाचे चेहरे – पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे – तब्बल ११ वर्षांनंतर एका मंचावर एकत्र दिसले. दोघांनीही कार्यक्रमात हजेरी लावल्याने हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. कार्यक्रमादरम्यान पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी दिवंगत वडिलांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. दोघांनीही परस्परांविषयी आदरयुक्त भाव व्यक्त करत उपस्थित कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. या भावनिक वातावरणाचा शिरकाव अधिक गडद झाला जेव्हा कार्यक्रमाच्या शेवटी दोघेही एकाच ताटात जेवत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. हा क्षण उपस्थित कार्यकर्त्यांसाठी केवळ आश्चर्यकारक नव्हता, तर तो आनंद आणि आशेचा किरणही ठरला. राजकीय मतभेदांमुळे अनेक वर्षे एकमेकांपासून दूर राहिलेल्या या दोघा भावंडांनी एकत्र आलेल्या या प्रसंगाने कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा एकत्र येण्याची आशा निर्माण केली आहे. गोपीनाथगडावरील हा कार्यक्रम केवळ श्रद्धांजलीपर कार्यक्रम न राहता, कुटुंबीयांतील दूर गेलेल्या संबंधांमध्ये सौहार्द निर्माण करणारा महत्त्वपूर्ण क्षण ठरला.

खळबळजनक…! गुंगीचे औषध पाजून तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार

Newsworldmarathi Mumbai: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंब्रा भागात राहणाऱ्या एका तरुणाने २२ वर्षीय तरुणीला महापे एमआयडीसीतील एका लॉजवर आणून तिला पाण्यातून गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. फरदीन खान (वय-२४) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा परिसरात राहणारा फरदीन व २२ वर्षीय पीडित तरुणी यांची लग्न जुळवणाऱ्या साईटवरून ओळख झाली. दरम्यान, त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर फरदीन याने त्याच्या मोबाईलमध्ये असलेले या तरुणीचे अश्लील फोटो दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी तिला दिली व २८ मे २०२५ रोजी महापे येथील साची लॉजिंगमध्ये आणले. तत्पूर्वी त्याने तिला पाण्यातून गुंगीचे औषध पाजले. त्यामुळे ही तरुणी लॉजच्या खोलीत चक्कर येऊन बेशुद्ध होऊन पडली. त्यावर फरदीन याने या बेशुद्धावस्थेत पडलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. काही वेळाने पीडित तरुणीला जाग आल्यानंतर फरदीन याने तिच्या शरीराला स्पर्श करून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याला विरोध करत त्याच्याविरोधात तक्रार करण्याची धमकी दिली. त्यावर फरदीन याने यात तुलाच त्रास होईल, अशी तिला धमकी दिली. या प्रकारानंतर ही तरुणी घरी गेली व अंघोळ करत असताना फरदीन याने ती बेशुद्धावस्थेत असताना, तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे तिच्या लक्षात आले. त्यावर तिने स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेऊन फरदीनविरोधात तक्रार दाखल केली. रबाळे पोलिसांनी फरदीन खान याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Solapur Shock : पुण्यानंतर सोलापूरमध्ये खळबळ! ३ महिन्याच्या गर्भवतीचं टोकाचं पाऊल, हत्या की आत्महत्या? गूढ कायम

0
Newsworldmarathi solapur: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्याभरात संतापाची लाट असतानाच, आता सोलापूर हादरले आहे. सासरच्या होणाऱ्या जाचाला कंटाळून ३ महिन्याच्या गर्भवती महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोलापूरजवळील चिंचोली एमआयडीसी येथील राहत्या घरी घडली आहे. आशाराणी भोसले असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबियांनी मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल दिली आहे. त्यावरून सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरजवळील चिंचोली एमआयडीसी येथे विवाहित आशा भोसले राहत होत्या. त्यांना तीन वर्षाची मुलगी आहे. विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नातेवाईकांनी गळफास बनाव असल्याचा आरोप केला आहे. आशाराणी हिने गळफास घेतल्यानंतर मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे टोकाचा निर्णय घेतला, त्यावेळी आशा भोसले या तीन महिन्याची गरोदर असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली आहे. विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ होत होता. आतापर्यंत चार ते पाच वेळा घरगुती वाद मिटवल्याचेही तपासात समोर आले आहे. मात्र, आशाराणी यांनी आत्महत्या केली नसून, तिची हत्या झाल्याचा आरोप यावेळी कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. तिच्या आई-वडिलांकडून सासरच्या लोकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आशाराणी भोसले यांनी टोकाचे पाऊल का उचलले? आशाराणी यांची हत्या की आत्महत्या? असा प्रश्न तिच्या नातेवाईकांनी उपस्थित केले आहेत. पुढील तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.

पुण्यात होणार नवी प्रभाग रचना, पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जैसे थे’

0
Newsworldmarathi Pune : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोकळा झाला असून, राज्य सरकारने यासंदर्भात प्रभाग रचनेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेची प्रभाग रचना नव्याने केली जाणार आहे, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच ‘जैसे थे’ राहणार आहे. राज्यात हद्दवाढ झालेल्या ९ महापालिकांची प्रभाग रचना नव्याने केली जाणार आहे. यामध्ये पुण्यासह इतर काही महापालिकांचा समावेश आहे. दुसरीकडे, १७ महापालिकांची सध्याची प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम निश्चित केला असून, त्यासंबंधीचे आदेश लवकरच जाहीर होणार आहेत. महायुती सरकारने या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्येही हाच फॉर्म्युला लागू करण्यात आला होता. दरम्यान, २०१७ नंतर अनेक महापालिकांमध्ये हद्दवाढ झाली आहे. तसेच काही महापालिकांमध्ये पूर्वी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू होती. त्यामुळे अशा महापालिकांमध्ये नव्याने प्रभाग रचना केली जाणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला असून, सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे.

निसर्गछाया उपक्रम कोथरुड सह सर्वांसाठी खुला; आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

0
Newsworldmarathi Pune: कोथरूड मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्ग छाया हा उपक्रम सुरू केला होता. मात्र, अल्पवधीत हा उपक्रम अतिशय लोकप्रिय झाला. राज्यातील विविध ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांकडून या उपक्रमाबाबत विचारणा होत होती. त्यामुळे या उपक्रमाचा प्रतिसाद पाहता, कोथरुडसह इतरांनाही याचा लाभ घेता येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या निसर्ग छाया उपक्रमाने लाभार्थ्यांचा दहा हजारचा टप्पा नुकताच पूर्ण केला. त्या अनुषंगाने कोथरुड मधील पंडित फार्म येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ना. पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील, निसर्गछाया उपक्रमाचे संयोजक मंदार देवगावकर, अमृता देगावकर, नवचैतन्य हास्य योगचे मकरंद टिल्लू, उद्योजिका स्मिता पाटील, भाजपा कोथरूड मंडल दक्षिणचे माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरुड मधील ज्येष्ठ नागरिकांना लांबचा प्रवास शक्य नसल्याने सहलीचा आनंद लुटता यावा; यासाठी दीड वर्षापूर्वी कोथरुडपासून काही अंतरावर असलेल्या भूगाव येथे निसर्गरम्य ठिकाणी निसर्ग छाया हा उपक्रम सुरू केला. हा उपक्रम सुरू करताना, एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल, असा विचार केला नव्हता. मात्र पुण्यासह, रत्नागिरी वगैरे अनेक जिल्ह्यांतूनही यासाठी चौकशी होत होती. कोथरुड मधील या उपक्रमाच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे याची क्षमता देखील वाढविली आहे. त्यामुळे आता कोथरुडसह इतर ठिकाणच्या ज्येष्ठांना याचा लाभ घेता यावा; यासाठी हा उपक्रम सर्वांसाठी खुला करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले की, कोथरुड मतदारसंघात विविध २२ लोकोपयोगी प्रकल्प सुरू आहेत. याचे प्रकटीकरण आणि सर्वांना याची माहिती व्हावी, एकत्रिकरण व्हावे, या उद्देशाने प्रयत्न सुरू आहे, यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या होत्या. यातील ज्येष्ठ नागरिकांचा निसर्ग छाया उपक्रमाने दहा हजार लाभार्थ्यांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे या सर्व नागरिकांना एकत्रित करुन; मनसोक्त आनंद लुटता यावा; यासाठी आजचा सस्नेह मेळावा होत आहे. आजच्या या मेळाव्याला देखील ज्येष्ठ नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून अतिशय आनंद होतो, अशी भावना व्यक्त केली. दरम्यान, या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर आयोजित या मेळाव्याचा ज्येष्ठ नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला.

श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठात सुवर्ण महोत्सवी रक्तदान शिबिराचे उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते उद्घाटन

0
Newsworldmarathi Pune: ५० व्या सुवर्ण महोत्सवी रक्तदान शिबिराचा शुभारंभ मा. आमदार उल्हास पवार व उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाला. यावेळी ३२१ भाविकांनी रक्तदान केले. दर महिन्याच्या दुर्गाष्टमीस सातत्याने ५० महिने रक्तदान शिबीर आयोजीत करणारी शंकर महाराज समाधी ट्रस्ट ही एकमेव संस्था असून या पुर्वीच महाराष्ट्र शासनाने संस्थेस गौरव चिन्ह देऊन सन्मानीत केले आहे. ट्रस्ट तर्फे दररोज ५,००० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत खिचडी प्रसादाचे वाटप होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भाऊ रंगारी गणपती मंडळ आणि धर्मवीर संभाजी शाळा नवी पेठ या तीन ठिकाणी दररोज मोफत भोजन प्रसादाचे वाटप होते, अशी माहिती विश्वस्त सुरेंद्र वाईकर यांनी दिली. या प्रसंगी उल्हास पवार म्हणाले आज मठ, मंदिर या सारख्या धार्मिक संस्थांनी आध्यात्मिक उपक्रमां बरोबरच समाजामध्ये सेवाभाव वाढवण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवण्याची अत्यंत गरज आहे, ज्या योगे तरूणांना श्री सद्गुरू शंकर महाराजांची भक्ती आणि नामस्मरण यासोबतच समाजाची सेवा करण्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळेल. तसेच सामाजिक कार्याला धार्मिक अधिष्ठान प्राप्त होईल. पुनीत बालन यांनी मठाच्या अन्नदान उपक्रमास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासीत केले. याप्रसंगी शिबीर सम्नवयक श्री राम बांगड यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी डॉ. मिहीर कुलकर्णी (अध्यक्ष), सतीश कोकाटे (सचिव), सुरेंद्र वाईकर, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. मिहीर कुलकर्णी, राजाभाऊ सुर्यवंशी, निलेश मालपाणी, प्रताप भोसले उपस्थित होते.

तब्बल १८ वर्षांनी स्वप्नपूर्ती…! पंजाबवर मात करत आरसीबीनं पटकावलं विजेतेपद…

गुजरातमधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज (दि.०३) पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिल्यावहिल्या आयपीएल जेतेपदासाठी घमासान युद्ध पाहायला मिळालं आणि यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाजी मारत आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे आणि यासह त्यांची १८ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. अखेर विराट कोहलीचा संघ चॅम्पियन बनला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाबचा सहा धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत नऊ गडी गमावून १९० धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ सात गडी गमावून केवळ १८४ धावाच करू शकला. यासह आरसीबी संघ आयपीएलचा आठवा विजेता संघ ठरला आहे. याआधी राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, डेक्कन चार्जर्स, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ चॅम्पियन बनले आहेत. विजयासाठी १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाची सुरुवात चांगली झाली. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी ४३ धावांची भागीदारी केली. २४ धावा काढल्यानंतर प्रियांशला हेझलवूडने माघारी धाडलं. त्यानंतर २२ चेंडूत २६ धावा काढल्यानंतर प्रभसिमरन सिंग बाद झाला. अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरची बॅट चालली नाही. एक धाव काढल्यानंतर तो बाद झाला.

पुण्यासह महाराष्ट्रात तीन स्वच्छ रोप निर्मिती केंद्रे; केंद्र सरकारकडून ३०० कोटींचा निधी

0
Newsworldmarathi Pune : शेतकऱ्यांना कीड व रोगमुक्त दर्जेदार रोपे मिळावीत आणि उत्पादन खर्चात कपात व्हावी यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात नऊ ठिकाणी स्वच्छ रोप निर्मिती केंद्रे उभारण्यात येणार असून, त्यातील तीन केंद्रांची स्थापना महाराष्ट्रात केली जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. पुण्यात द्राक्ष, नागपुरात संत्रा आणि सोलापुरात डाळिंब या पिकांसाठी खास स्वच्छ रोप निर्मिती केंद्र उभारली जातील. यासाठी केंद्र सरकारकडून ३०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचेही चौहान यांनी स्पष्ट केले. पुण्यात आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन निरीक्षण केल्यानंतर त्यांना अनेक अडचणी जाणवत असल्याचे लक्षात आले असून, रोगमुक्त रोपांची अनुपलब्धता ही मोठी समस्या असल्याचे चौहान यांनी नमूद केले. त्यामुळे उत्पन्नात घट आणि उत्पादन खर्चात वाढ होत आहे. या नव्या केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उच्च दर्जाची व रोगविरहित रोपे सहज उपलब्ध होतील. यामुळे शेतीत उत्पादनवाढीसोबतच आर्थिक स्थैर्यही मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.