सोलापुरात कारखान्याला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू

Newsworldmarathi solapur : शहरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्यात मध्यरात्री भीषण आग लागली. ही घटना शनिवार-सोमवारच्या मध्यरात्री सुमारे 3 वाजता घडली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. आगीच्या धुरामुळे आणि उष्णतेमुळे कारखान्यात अडकलेल्यांना बाहेर काढणे कठीण झाले होते. मात्र, जवानांनी जीव धोक्यात घालून तीन जणांना बाहेर काढले. दुर्दैवाने, या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. आगीमुळे कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून, आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, प्रशासनाकडून तपास सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरूच आहेत. मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ मदत कार्य सुरू केलं आहे.

Kedarnath Helicopter Crash : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

Newsworldmarathi Team : Kedarnath Helicopter Crash : उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये एक हेलिकॉप्टर कोसळले आहे. आपत्कालीन लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. हेलिकॉप्टरचा मागचा भाग तुटून खाली पडला. हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुरक्षित असले तरी, हेलिकॉप्टर अपघाताची बातमी कळताच पोलिस आणि प्रशासनात घबराट पसरली आहे. गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, एम्स ऋषिकेशच्या हेली रुग्णवाहिका सेवेचे हेलिकॉप्टर केदारनाथमध्ये कोसळले आहे. हेलिकॉप्टरच्या मागील भागाचे नुकसान झाले. हेलिकॉप्टरमध्ये असलेले सर्व तीन प्रवासी, एक डॉक्टर, एक कॅप्टन आणि एक वैद्यकीय कर्मचारी सुरक्षित आहेत. अपघाताची चौकशी सुरू आहे, अपघातामागील कारणे लवकरच कळतील. तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर केदारनाथ हेलिपॅडवर उतरत असताना अचानक हेलिकॉप्टरची शेपटी तुटली. हेलिकॉप्टर खाली पडताना पाहून प्रवाशांमध्ये आरडाओरडा सुरू झाला. जवळपास उभ्या असलेल्या लोकांमध्ये घबराट पसरली, पण पायलटने हुशारी दाखवली आणि हेलिकॉप्टर उतरवले. त्याने प्रवाशांना खाली उतरवले आणि नंतर तो स्वतःही खाली उतरला. हे हेलिकॉप्टर एम्स ऋषिकेशच्या हेली रुग्णवाहिका सेवेचे होते. त्यात प्रवास करणारे तीन डॉक्टर एका रुग्णाला घेण्यासाठी केदारनाथ धामला जात होते. रुग्णाला केदारनाथ धाम येथून एम्स ऋषिकेश येथे हलवावे लागले. लँडिंगच्या अगदी आधी, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि पायलटने आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु लँडिंग करताना हा अपघात झाला.

मान्सूनचा वेगवान प्रवास; मालदीव, श्रीलंकेत दाखल, अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता

0
Newsworldmarathi Pune: यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा प्रचंड वेगाने प्रगती करीत असून, तो शनिवारी 17 मे रोजी मालदीव आणि श्रीलंकेत दाखल झाला. हवामान शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, येत्या 21 मे रोजी अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून, त्यामुळे केरळ आणि कर्नाटकात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यंदा हवामानातील दाब प्रणाली वेळेवर अनुकूल झाल्यामुळे मान्सून फारसा अडखळत न थांबता जलदगतीने पुढे सरकत आहे. 13 मे रोजी मान्सून अंदमान बेटांवर पोहोचला. त्यानंतर 15 मे रोजी बंगालच्या उपसागरात आणि 17 मे रोजी श्रीलंकेत दाखल झाला आहे. या वेगाने होत असलेल्या प्रगतीमुळे केरळ आणि कर्नाटकात चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, त्या भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आगामी सात दिवसांत अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा हवामान विभागाचा अंदाज असून, त्याचा परिणाम पुढील मान्सून प्रवासावरही होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर हवामान विभाग आणि आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहण्याचे संकेत दिले आहेत. मान्सूनच्या वेगवान गतीमुळे देशातील पर्जन्यमानावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

संदीप सिंग गिल्ल पुणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक

0
Newsworldmarathi Pune : पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षकपदी संदीप सिंग गिल्ल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले पंकज देशमुख यांची पदोन्नती होऊन त्यांची नियुक्ती पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी आता संदीप सिंग गिल्ल यांची बदली करण्यात आली आहे. संदीप सिंग गिल्ल सध्या पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असून, एक कार्यक्षम आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पुणे शहरात अलिकडे गाजलेल्या कोयता गॅंगविरोधातील मोहिमेत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी आक्रमक आणि प्रभावी भूमिका बजावली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला रोखणे, कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणे आणि नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास वृद्धिंगत करणे ही त्यांच्या पुढील कार्यकाळातील प्रमुख जबाबदाऱ्या असतील. जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी ते कोणती धोरणं राबवतात आणि यंत्रणा कशा पद्धतीने कार्यान्वित करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संदीप सिंग गिल्ल यांच्या नियुक्तीमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात नव्या उर्जेसह कामकाज होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याकडेही त्यांचा भर राहणार आहे.

परळीत पुन्हा गुंडाराज; तरुणाचे अपहरण व अमानुष मारहाण; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Newsworldmarathi Beed : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचे पडसाद ताजे असतानाच बीड जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील पेट्रोल पंपाजवळून एका तरुणाचे अपहरण करून त्याला लाठ्या आणि बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित तरुणाचे नाव शिवराज हनुमान दिवटे असून, तो परळी तालुक्यातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे पेट्रोल पंपाजवळून अपहरण करण्यात आले. त्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी त्याला निर्घृण मारहाण केली. लाठ्या आणि बेल्टने झालेल्या मारहाणीमुळे तो गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिस यंत्रणेवर विश्वास व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आरोपींनी शिवराज दिवटे यांना निर्दयपणे मारहाण करतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकारामुळे बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीती आणि संताप पसरले आहेत.

विद्येच माहेरघर हादरलं…! दुकानासमोरून ५ वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण, ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न

Newsworldmarathi Pune: पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये साडेपाच वर्षांच्या चिमुकलीचे अपरहण करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना दौंड तालुक्यातील मळद गावच्या परिसरातील ऊसाच्या शेतात १६ मे २०२५ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. नवनाथ रिठे (वय-२७) असं नराधमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावामध्ये माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. साडेपाच वर्षांची मुलगी ही पुणे-सोलापूर महामार्गावरील किराणा दुकाना समोर उभी होती. त्यावेळी कुरकुंभ येथील भागवतवस्ती जवळ एका किराणा दुकानासमोरून आरोपीने पीडित चिमुकलीचे अपहरण केले. अपरहणानंतर आरोपीने चिमुकलीला मळद गावातील उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्याने चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडून तिला जखमी केले.तसेच चिमुकलीच्या अंगावरील कपडे काढून मारहाण देखील केली. दरम्यान, तेथील स्थानिकांनी मुलीच्या रडण्याचा तसेच किंचाळण्याचा आवाज ऐकला. त्यांनी तातडीने ऊसाच्या शेताकडे धाव घेतली. तेव्हा हा भयानक प्रकार उघडकीस आला. गावकऱ्यांनी आरोपीला पकडून चांगला चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

0
Newsworldmarathi Pune: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘भारतीय वारकरी मंडळा’च्यावतीने सादर केलेल्या ‘वासंतिक उटी भजना’ने भाविकांना मंत्रमुग्ध केले. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. शुक्रवारी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून श्रींच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावला जातो. त्यानुसार भाविकांकडून श्रींच्या मूर्तीला चंदन, गुलाबजल, अत्तर, केशर, गंधा या मिश्रणाचा लेप लावण्यात आला आणि संपूर्ण मंदिर परिसर मोगऱ्यासह इतर फुलांनी सजवण्यात आले. यावेळी ‘भारतीय वारकरी मंडळा’च्यावतीने भजनसेवा करण्यात आली. त्यांच्या सुश्राव्य भजनाच्या स्वरांनी आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Ramraje Nimbalkar : रामराजे निंबाळकर यांची पोलिसांकडून साडेचार तास चौकशी; राजकीय वर्तुळात खळबळ

Newsworldmarathi Kolhapur : Ramraje Nimbalkar : राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची वडूज पोलिसांनी तब्बल साडेचार तास चौकशी केली आहे. रामराजेंच्या निवासस्थानीच ही चौकशी केली असून त्यांनी चौकशीला सहकार्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काहींचा सहभाग असल्याचे तपासात आढळून आले आहे. यानंतर संबंधितांना नोटिसा बजावून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात रामराजे नाईक-निंबाळकर यांचाही ऑडिओ व्हायरल झाला होता. शुक्रवारी (दि. १६) वडूज पोलिस फलटणमध्ये सकाळी रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या ‘लक्ष्मीविलास’ या निवासस्थानी दाखल झाले. या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन ते फौजफाट्यासह पोहोचले होते. मात्र, स्थानिक कार्यकर्त्यांनी चौकशीवेळी कोणताही अडथळा आणला नाही. उलट चौकशी सुरू असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार ‘लक्ष्मीविलास’ निवासस्थान परिसराकडे कार्यकर्ते फिरकले नाहीत. चौकशीसाठी पोलिस आत गेल्यानंतर बाहेरचे मुख्य गेट बंद केले होते. आत कोणालाही प्रवेश दिला गेला नाही. चौकशीवेळी रामराजेंसह त्यांचे वकीलही उपस्थित होते. या चौकशीला रामराजेंनी पूर्ण सहकार्य केले. या तपासप्रकरणी आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांची आवश्यकता भासल्यास पुन्हा चौकशी होऊ शकते, असेही सांगण्यात आले. संबंधित महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली होती. मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात याआधी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांची देखील या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. त्यांना देखील चौकशीसाठी नोटीस देण्यात आली होती. रामराजे नाईक निंबाळकर यांना चौकशीला हजर राहण्यासाठी वडूज पोलिसांनी नोटीस दिली होती. मात्र, या नोटीशीनंतर देखील रामराजे हे पोलिस ठाण्यात हजर राहिले नव्हते. त्यामुळे रामराजे यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, ही घटना समोर येताच जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून, जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे.

संजय राऊतांचा खळबळजनक गौप्यस्फोट : “ईडीच्या अटकेपूर्वी एकनाथ शिंदेंचा मला फोन आला होता..

Newsworldmarathi Mumbai : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की, ईडीकडून अटक होण्याआधी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. शिंदे यांनी फोनवर विचारलं होतं, “मी वरती बोलू का? गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलू का?” यावर राऊत यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं की, “नको, काही गरज नाही. तुम्ही वरती बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही.” हा संवाद स्वतः संजय राऊत यांनी आज माध्यमांपुढे उघड केला. या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांचं “नरकातला स्वर्ग” हे नवीन पुस्तक आज प्रकाशित झालं. या पुस्तकातही त्यांनी अनेक खळबळजनक दावे केल्याचं समजतं. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, ईडी अटकेच्या काही काळ आधी शिंदे यांचा फोन येणं, आणि त्यात दिल्लीपर्यंत पोहोचून मदतीची ऑफर देणं, हा प्रकार अत्यंत गंभीर असून, त्यामुळे राजकीय दबाव आणि यंत्रणांच्या वापराबाबत नवे प्रश्न निर्माण होतात. राऊत यांनी हेही स्पष्ट केलं की, अशा कोणत्याही दबावाला ते बळी पडणार नाहीत आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडत राहतील. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरूच; पुण्याच्या पंकज देशमुखांसह अनेकांना बढती; वाचा पूर्ण लिस्ट

0
Newsworldmarathi Pune : Police Pankaj Deshmukh Transferred : राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना बदलीपर बढती देण्यात आली असून उप महानिरीक्षक पदावर त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासहित राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे अपर पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली असून त्यांच्यासहित अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांचा नावाचा समावेश आहे. त्यानुसार, पुणे ग्रामीणच्या पंकज देशमुख यांना पुणे शहर अपर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. आयपीएस मोक्षदा पाटील यांना राज्य राखीव पोलीस बल गटाच्या समादेशक पदावरुन पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना मुंबईच्या अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तर, शशिकुमार मीना हे मुंबईच्या उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने हे मध्य प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त, तर शैलेश बलकवडे हे गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त असतील. तर लोहमार्ग पोलीस आयुक्तपद अवनत करून राकेश कलासागर यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १४ वरिष्ठ उपायुक्तांना अपर आयुक्तपदी बढती व नियुक्ती प्रसाद अक्कानवरू – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ पंकज देशमुख पुणे शहर अमोघ गावकर – राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (प्रशासन-पुणे), जी. श्रीधर – पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग (पुणे) मोक्षदा पाटील राज्य राखीव पोलीस बल (मुंबई), राकेश कलासागर – पोलीस आयुक्त लोहमार्ग (पद अवनत करून), प्रियंका नारनवरे – वाहतूक (मुंबई) अरविंद साळवे महाराष्ट्र पोलीस अकादमी (नाशिक) सुरेश मेंगडे मुख्य दक्षता अधिकारी (सिडको) धनंजय कुलकर्णी – विशेष शाखा (मुंबई) विजय मगर – राज्य राखीव पोलीस बल, पुणे (पद अवनत करून) राजेश बनसोडे – पुणे शहर विक्रम देशमाने – मध्य प्रादेशिक विभाग (मुंबई) राजेंद्र दाभाडे – नागपूर शहर १४ उपायुक्तांना उपमहानिरीक्षकपदी बढती अनिल पारसकर – संरक्षण व सुरक्षा (मुंबई), शैलेश बलकवडे – गुन्हे शाखा (मुंबई) एम. रामकुमार – महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे (संचालक) शशिकुमार मीना – उत्तर प्रादेशिक विभाग (मुंबई) प्रवीण पाटील नागपूर शहर संजय पाटील – पुणे शहर वसंत परदेशी नागपूर शहर एस. डी. आव्हाड पिंपरी चिंचवड एस. टी. राठोड- अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स पी. पी. शेवाळे – दहशतवाद विरोधी पथक ए. एच. चावरिया – पोलीस आयुक्त अमरावती शहर (पद अवनत करून) विनिता साहू सशस्त्र पोलीस दल (मुंबई).