Newsworldmarathi Beed : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या दुःखद प्रसंगानंतर देशमुख कुटुंबावर मोठा आघात झाला. मात्र या कठीण काळातही संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख हिने आपल्या जिद्दीचे दर्शन घडवत बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
आज (५ मे २०२५) जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात वैभवीने ८५.३३ टक्के गुण मिळवत आपल्या दिवंगत वडिलांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. वैभवीला इंग्रजीत ६३, मराठीत ८३, गणितात ९४, फिजिक्समध्ये ८३, केमिस्ट्रीत ९१ आणि बायोलॉजीत तब्बल ९८ गुण मिळाले आहेत. तिने एकूण ६०० पैकी ५१२ गुण मिळवत हे यश मिळवले आहे.
वैभवीच्या या यशाने संपूर्ण गावात आणि परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत असून, ती अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कठीण प्रसंगातही हार न मानता पुढे जाण्याचे उदाहरण वैभवीने आपल्या कृतीतून घालून दिले आहे.


Recent Comments