Homeबातम्याअमानुष छळ...! आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात

अमानुष छळ…! आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात

Newsworldmarathi Beed: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आईच्या मृत्यूनंतर पाच वर्षांची गतिमंद रिहाना वडिलांच्या अमानुष वागणुकीची शिकार झाली होती. बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात तिच्या व्यसनी बापाने तिला जनावरांच्या गोठ्यात तिच्या पायाला दोरी बांधून डांबून ठेवले होते. तसेच तिला अक्षरश: केळी, टरबुजाच्या साली खाण्यास देऊन तिचा अमानुष छळ केला.

वडिलांच्या अमानुष वागणुकीने जिवंतपणी मृत्यूच्या वेदना दिल्या. मात्र, एका महिलेने तिचा आक्रोश ऐकून दत्तक घेण्याचा खूप प्रयत्न केला. सहा महिन्यांनंतर, सोमवारी रिहानाचा दामिनी पथकाच्या मदतीने कायदेशीर पुनर्वसन करण्याचा मार्ग मोकळा झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिहानाच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. ती गेवराईची रहिवाशी होती. व्यसनी वडिलांना रिहाना डोईजड झाली होती. रिहानाचा नैसर्गिक मृत्यू होण्याच्या उद्देशाने त्याने तिचे मोठ्या प्रमाणात हालहाल केले. जन्मदात्या पित्यानेच रिहानाला अक्षरशः जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून ठेवणे सुरू केले. सकस आहार, माणसांच्या सहवासाच्या अभावी रिहानाची बौद्धिक, शारीरिक वाढच झाली नव्हती. ती बोलूही शकत नव्हती.

दरम्यान, पैठणच्या हिना नामक महिलेला हे कृत्य समजले. हिना माहेरी गेलेली असताना तिला रिहानाचा सतत रडण्याचा आवाज येत असे. तिने गोठ्यात जाऊन पाहिल्यावर रिहाना तिला दिसली. रिहानाची अशी अवस्था पाहून तिला मायेचा पाझर फुटला. तिने तिच्या वडिलांकडे रिहानाचा ताबा मागितला. निर्दयी बापाने बॉण्डवर लिहून देत, रिहानाला हिनाकडे सुपुर्द केले.

अचानक झालेल्या बदलामुळे, रिहानाचे वागणे बदलले…

हिनाच्या घरी आल्यानंतर माणसांमध्ये आलेल्या रिहानाच्या वागण्यात मोठा बदल घडला आहे. अधिक हिंस्त्र झालेली होती. इतरांना मारहाण करून, सतत आदळआपट करू लागली होती. त्यामुळे हिना यांनी हज हाऊसजवळील खालिद अहमद यांच्या अनाथ आश्रमात तिला नेऊन सोडले. त्यावेळी खालिद यांनी तिच्यावर योग्य ते उपचार केले. मात्र, आश्रमात सर्व मुलेच असल्याने त्यांनी दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक कांचन मिरधे यांना संपर्क केला. तसेच मिरधे यांच्यासह अंमलदार निर्मला निंभोरे, लता जाधव, सरिता कुंडारे, अंबिका दारुंटे, प्रियंका भिवसने, पूजा जाधव, मनीषा बनसोडे परळकर यांनी आश्रमात धाव घेत तिला ताब्यात घेतले.

दरम्यान, उपचार समुपदेशनानंतर रिहानाच्या वागणुकीत मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. ती थोडं थोडं बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचे, पोलिसांनी सांगितले. महिला-बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. आशा शेरखाने यांच्या सहकार्याने रिहानाची भारतीय सेवा केंद्र येथे राहण्याची व्यवस्था करून पुनर्वसन केले आहे.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments