Homeपुणे30 वर्षा नंतर भरला पाचवीचा वर्ग,राष्ट्रगीत,हजेरी घेऊन भरला गणिताचा तास

30 वर्षा नंतर भरला पाचवीचा वर्ग,राष्ट्रगीत,हजेरी घेऊन भरला गणिताचा तास

Newsworldmarathi Pune : वाशी तालुक्यातील पारगाव येथील महात्मा फुले विद्यालयात इयत्ता पाचवी 1995 बॅचच्या वर्गातील मुला – मुलींनी स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जुन्या नव्या आठवणीला उजाळा देत कार्यक्रम संपन्न झाला. स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या प्रारंभी या मुलांनी गावातून चालत शाळेत गेले.शाळेत गेल्या नंतर राष्ट्रगीत गाऊन वर्ग भरवण्यात आला, त्यावेळचे वर्गशिक्षक तुकाराम कांबळे यांनी वर्गाची हजेरी घेऊन गणितातील बेरीज,वजाबाकी शिकवून आजच्या काळात ही समाजात वावरताना कोणत्या गोष्टीची गोळा बेरीज केली जावी व कोणत्या गोष्टीची वजाबाकी करावी म्हणजे आयुष्य सुखकारक होईल यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत आखाडे यांनी केले तर अनुमोदन राहुल डोके यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बडे सर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त थोरवे मॅडम,दत्तात्रय कोठावळे,धोंडीराम बटुळे,तुकाराम कांबळे,सुभाष मोटे,मधुकर इंगोले हे उपस्थित होते.

सदरील कार्यक्रमाच्या वेळी अभिजित डुंगरवाल,राहुल डोके, हनुमंत आखाडे,राजेंद्र डोके,अमोल गावडे,सुदर्शन नारटा,संजीवनी हावळे, संजीवनी कोकणे,बानू गायकवाड,संतोष शेंडगे,या सह इतरही माजी विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त करत शाळेच्या जुन्या नव्या आठवणीला यावेळी उजाळा दिला. कार्यक्रमाला सेवानिवृत्त गुरुजनांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमानंतर सर्वांनी सोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन,दरवर्षी एक दिवस एकत्र येण्याचा संकल्प केला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments