Newsworldmarathi Mumbai: : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुपेकर यांनी तुरुंगातील आरोपींकडून ३०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा केला आहे. या आरोपांमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सुपेकर-कराड कनेक्शन
अंजली दमानिया यांनी दावा केला आहे की, सुपेकर यांचा बीड येथील वाल्मिक कराडशी व्यावसायिक संबंध आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असून, त्याच्यावर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल आहे. दमानिया यांनी यासंदर्भातील कागदपत्रे सादर केली आहेत.
चौकशीत काय समोर येणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गृह विभागाकडे असलेल्या ६०० प्रकरणांपैकी ३०० प्रकरणांचा अहवाल तयार झाला असून, उर्वरित प्रकरणांचा तपास सुरू आहे. अंजली दमानिया यांनी सांगितले की, “या चौकशीतून अनेक बाबी समोर येतील. तुरुंगातील भ्रष्टाचार आणि पैशाच्या मागणीची प्रकरणे उघडकीस येणे आवश्यक आहे.” यामुळे सुपेकर आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांवरील कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.
जालिंदर सुपेकर यांच्याकडून प्रत्येक जेलमध्ये पैशांची मागणी केली जाते. सुरेश धस यांनी सुद्धा आता सुपेकर यांनी 300 कोटींची मागणी होती असा आरोप केला आहे. यामुळे यावर आता अनेक खुलासे होतील. गन लायसन्स प्रकरणातही सुपेकर यांनी पैशाची मागणी केली होती.
पुण्याचे तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरही आरोप
जालिंदर सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता या दोघांनी शस्त्र परवान्यांचे वाटप करण्यात प्रचंड प्रमाणात पैसे खाले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही याची चौकशी लावली आहे. 600 प्रकरणे अशी आहेत ज्यात पैसे खाल्ले गेले आहेत. यापैकी 300 प्रकरणाचा अहवाल गृह विभागासमोर आला आहे. त्याची माहिती घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. अनेक प्रकरणे बाकी आहेत. यातून आता अनेक खुलासे होतील, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.


Recent Comments