पुणे : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक अयोगाने दिलेल्या आदेशानुसार नगरविकास विभागाने महापालिका, नगरपालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी प्रभागरचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच राज्यातील ड वर्गातील १९ महापालिकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक या ९ अ, ब, क वर्ग महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभागरचना करण्यात येणार आहे.
तसेच मुंबई महापालिकेसाठी एम सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. कोरोना आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लटकल्याने या निवडणुका रखडल्या होत्या. आता मात्र हालचाल सुरू केली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे.
नगरविकास विभागाने या अ, ब, क वर्ग १० महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार आता तयारी करावी लागणार असून तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच ड वर्ग १९ महापालकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान, प्रभाग रचनेसाठी साधारण अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यासाठी गुगल मॅपचा आधार घेण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे आता इच्छुकांनी देखील जोरदार तयारी केली असून लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी नेते हजर राहत आहेत.


Recent Comments