Homeपुणेपरकीय घुसखोरी रोखण्यासाठी सिटीझन कार्ड महत्वाचे : आबा बागुल

परकीय घुसखोरी रोखण्यासाठी सिटीझन कार्ड महत्वाचे : आबा बागुल

Newsworldmarathi पुण्यात म्यानमारमधील दोन रोहिंग्या नागरिकांचा प्रकार उघडकीस आल्याने देशाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परकीय शक्तींच्या घुसखोरीमुळे केवळ पुणेच नव्हे तर देशातील इतर शहरेही धोक्यात येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर ‘सिटीझन कार्ड’ या संकल्पनेची गरज निर्माण झाली आहे, जी नागरिकांच्या नोंदणी व ओळखीचे प्रभावी साधन ठरू शकते असे माजी उपमाहापौर आबा बागुल यांनी सांगितले.

माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रस्तावित केलेल्या या कार्डाचे उद्दिष्ट नागरिकांची ओळख व स्थलांतरावर नियंत्रण ठेवणे आहे. परकीय शक्तींवर नजर ठेवणे. नागरिकसंख्येची घनता मोजणे व त्यानुसार योजनांची आखणी करणे. पायाभूत सुविधांवरील ताण नियंत्रित करणे. कायदा व सुव्यवस्थेचे व्यवस्थापन सोपे होणार असल्याचे बागुल यांनी सांगितले.

देशाच्या सुरक्षिततेसाठी परकीय नागरिकांचा मागोवा घेण्यासाठी आणि घुसखोरी रोखण्यासाठी सिटीझन कार्ड उपयुक्त ठरेल. लोकसंख्या आणि स्थलांतराचा अचूक डेटा स्थानिक प्रशासनाला मिळेल, ज्यामुळे विकासाच्या योजनांची आखणी सुकर होईल. महाराष्ट्रात हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास, तो देशभरात लागू केला जाऊ शकतो.

आबा बागुल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि सर्व पक्षनेत्यांना पत्राद्वारे या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली आहे. सिटीझन कार्डच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर सादरीकरणाला वेळ देणे आणि निर्णय घेणे महत्वाचे आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments