‘शब्द नाही, काम बोलणार’, सूस गावात लहू बालवडकरांना जनतेचा ठाम पाठिंबा
Newsworldmarathi Pune: सूस गावात भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराने निर्णायक वळण घेतले असून, प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ. रोहिणीताई चिमटे, श्री. गणेश कळमकर, सौ. मयुरीताई कोकाटे आणि श्री. लहू बालवडकर विजयाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. आज भाजपाच्या प्रचारार्थ काढण्यात आलेली भव्य पदयात्रा म्हणजेच सूस गावातील नागरिकांनी दिलेला विजयाचा कौल ठरला आहे.
भगवती नगर येथून सुरू झालेली ही पदयात्रा भैरवनाथ मंदिर येथे समाप्त झाली. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी फुलांची उधळण, औक्षण आणि घोषणाबाजी करत भाजपचे जोरदार स्वागत केले. हा उत्स्फूर्त प्रतिसाद केवळ औपचारिक नव्हता, तर सूस गावाच्या विकासासाठी भाजपच योग्य पर्याय असल्याचा ठाम राजकीय संदेश देणारा होता.
सूस गावातील प्रत्येक घरातून मिळालेला पाठिंबा, ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि तरुणांचा विश्वास यामुळे भाजपचा प्रचार अधिक बळकट झाला आहे. जनतेने दाखवलेला हा विश्वास सूस गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा मजबूत आधार ठरत असून, प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भाजप आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
ही निवडणूक सत्तेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी असल्याची भूमिका भाजपने पुन्हा एकदा अधोरेखित केली. मतदारांनी दिलेले प्रत्येक मत हे सूस गाव आणि संपूर्ण प्रभाग क्रमांक ०९ च्या प्रगतीचा पाया ठरणार असून, विकासालाच प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
भाजपने पुढील पाच वर्षांचा स्पष्ट विकास आराखडा जनतेसमोर मांडला असून, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा, उद्याने, स्ट्रीटलाइट्स आणि वाहतूक व्यवस्थेचा सर्वांगीण विकास केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. विकास कागदावर न राहता तो थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनात दिसेल, असा ठाम दावा लहू बालवाडकर यांनी केला आहे.
यावेळी भाजप नेते लहू बालवाडकर यांनी नागरिकांना संबोधित करत सांगितले की, मला तुम्ही मत देऊन सेवा करण्याची एक संधी द्या; पुढील ५ वर्ष हि तुमच्या आमच्या प्रभागाच्या विकासाची असतील. शब्दांपेक्षा कामातूनच भाजप आपली विश्वासार्हता सिद्ध करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आजच्या या भव्य पदयात्रेनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, प्रभागात भाजपला जनतेचा ठाम पाठिंबा मिळत असून, प्रभाग क्रमांक ०९ मध्ये विजयाचा कल स्पष्टपणे भाजपच्या बाजूने झुकलेला दिसत आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत अर्चना पाटील यांच्या विजयाचा एल्गार
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायप्लॉट) येथील भाजपच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांच्या प्रचार मोहिमेने वेग घेतला असून, नागरिकांचा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्र तरुण मंडळ येथून आयोजित करण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत नागरिकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला.
या विशेष प्रचार पदयात्रेत केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांनी आवर्जून उपस्थित राहून प्रचाराला अधिक बळ दिले. पदयात्रेत सहभागी होत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी अर्चना पाटील यांच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. “गेल्या काही दिवसांत अर्चना पाटील यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित असून, जनता विकासाच्या बाजूने स्पष्ट कौल देईल,” असे ते म्हणाले.
ही पदयात्रा माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांनीही स्थानिक नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील विविध समस्या जाणून घेतल्या. भाजपच्या नेतृत्वाखालीच या प्रभागाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पदयात्रेदरम्यान संपूर्ण परिसर घोषणांनी आणि उत्साहाने दुमदुमून गेला होता. या रॅलीत प्रभागातील शेकडो तरुण, महिला आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. महिलांचा आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग हा अर्चना पाटील यांना मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याचे द्योतक ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकूणच या पदयात्रेमुळे प्रभाग २२ ‘क’ मधील निवडणूक प्रचाराला नवे बळ मिळाले असून, भाजपच्या विजयाची हवा अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रोजगारासाठी शिवसेना उद्योग भवन उभारणार : आबा बागुल
Newsworldmarathi Pune: महिला बचत गट व तरुणांसाठी रोजगारनिर्मितीसाठी पुण्यात शिवसेना उद्योग भवन उभारून बचतगटांसह तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल,अशी ग्वाही शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावतीमधील अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी दिली.
प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावतीमध्ये माजी उपमहापौर आबा बागुल यांना प्रचारात भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः अनेकांकडून पहिल्या निवडणुकीची आठवण काढताना आजही विश्वासाचं नातं कायम असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. सकाळी दुचाकी रॅली, पदयात्रा काढून मतदारांशी आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस या शिवसेनेच्या उमेदवारांनी संवाद साधला.
यावेळी माध्यमांशी बोलताना आबा बागुल म्हणाले की, महिला बचत गट व तरुणांच्या रोजगारासाठी ‘शिवसेना उद्योग भवन’ची निर्मिती केली जाणार आहे.ज्याद्वारे स्थानिक महिला बचत गट, तरुण उद्योजक व स्टार्टअपसाठी स्वतंत्र व्यासपीठ मिळणार आहे. उत्पादन, पॅकेजिंग, ब्रँडिंग व विक्रीसाठी आवश्यक सुविधा यासह कौशल्य विकास व रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
तसेच उद्योगस्नेही कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता विकास कार्यशाळा,आयटी, सेवा क्षेत्र, लघुउद्योग, गृहउद्योगांसाठी विशेष प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध रोजगार व स्वयंरोजगार योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ त्याचप्रमाणे कर्ज, अनुदान, प्रशिक्षण व बाजारपेठ जोडणीसाठी मार्गदर्शन केंद्र असणार आहे. ज्यातून आर्थिक स्वावलंबनाची भक्कम पायाभरणी होणार आहे. महिलांचे सक्षमीकरण, तरुणांना रोजगार, आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना हा उद्देश असल्याचे आबा बागुल म्हणाले.
उद्यानात वॉकिंग ट्रॅक व व्यायाम साहित्य उपलब्ध करणार : बाप्पु मानकर
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथील भाजपाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी सकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉक व व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व व्यायामप्रेमी नागरिकांसाठी स्वतंत्र वॉकिंग ट्रॅक, व्यायामासाठी आवश्यक साहित्य तसेच प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपाचे अधिकृत उमेदवार बाप्पु मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित यांनी वर्तक बाग, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, सारस बाग, महाराणा प्रताप उद्यान व साठे उद्यान या ठिकाणी व्यायामप्रेमी नागरिकांशी संवाद साधला.
या वेळी नागरिकांशी चर्चा करताना राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले, ‘आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व व्यायामप्रेमी नागरिकांसाठी स्वतंत्र वॉकिंग ट्रॅकची उभारणी करणार आहोत. व्यायामासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
यावेळी मा. नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, मतदार संघ अध्यक्ष अमित कंक, बिपिन बोरावके, मनीष जाधव, किरण जगदाळे, कुणाल आहेर, धनंजय डिंबळे व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ९ मधील पदयात्रेला म्हाळुंगेवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
Newsworldmarathi pune: पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक ९ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आज म्हाळुंगे गावांत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी म्हाळुंगेवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदयात्रेचा शुभारंभ झाला. म्हाळुंगे गावाच्या विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी टोकाचे आग्रही असून, सर्वानुमते तो लवकरच मंजूर होईल, असा विश्वास ना. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रत्येक ठिकाणी भरभरुन समर्थन मिळत आहे. महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ९ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भैरवनाथांच्या आशीर्वाद घेऊन पदयात्रेला सुरुवात झाली. या रॅलीचा शुभारंभ ना. पाटील यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी भाजपचे प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, मयूरी कोकाटे, भाजपचे निवडणूक प्रमुख प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, शरद भोते, राकेश पाडाळे, विनायक चिवे, शांताराम पाडाळे, यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा चौफेर विकास, राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गतिमान आणि सर्वसमावेशक कार्यपद्धती; मतदारांचा भरभरुन आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांच्या बळावर भारतीय जनता पार्टीने अनेक निवडणुकीत आजवर यश मिळवले आहे. २०१७-२०२१ काळात पुणे महापालिका क्षेत्रात अनेक प्रकल्प उभे राहिले. मेट्रो, नदीसुधार, समानपाणी पुरवठा असे एक ना अनेक प्रकल्प पूर्ण झाल्याने पुण्याचे चित्र आज बदलले आहे.
ते पुढे म्हणाले की, म्हाळुंगे गावच्या विकास आराखड्यासाठी टोकाचे आग्रही असून, गावच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. तसेच, नागरिकांच्या मतांचा देखील यात समावेश करावा, असे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे सर्वानुमते हा विकास आराखडा मंजूर होईल, आणि गावचा सर्वांगीण विकास केला जाईल, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ना. पाटील पुढे म्हणाले की, पुणे महापालिका निवडणुकीत एकूण ४२ जणांना उमेदवारी नाकारावी लागली. पण कोणतीही तक्रार न करता, पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करत आहेत. प्रल्हाद सायकर यांच्या पत्नी स्वप्नाली सायकर विद्यमान नगरसेविका होत्या, त्यांनाही उमेदवारी देता आली नाही. पण कोणतीही तक्रार न करता स्वप्नालीताई आणि प्रल्हाद सायकर पक्षाचा आदेश मान्य करुन काम करत आहेत. याशिवाय अनेक कार्यकर्त्यांनी देखील उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली होती. पण नाईलाजाने त्यांनाही उमेदवारी नाकारावी लागली. ते कार्यकर्ते देखील आज भाजप उमेदवारांच्या विजयासाठी मेहनत घेत आहेत.
प्रभाग क्रमांक ९ मधून नव्या कर्तृत्ववान नेतृत्वाला संधी देण्यासाठी, एका व्यक्तीला उमेदवारी नाकारावी लागल्यानंतर, आभाळ कोसळल्याप्रमाणे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. माननीय देवेंद्रजींवरही टीका टिप्पणी करत आहेत. वास्तविक, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रहित सर्वप्रथम असते. देशाला सामर्थ्यवान, सुरक्षित, समृद्ध बनवण्यासाठी भाजपा कार्यकर्ते झटत असतात. त्यामुळे अन्य पक्षांपेक्षा भाजपा हा म्हणूनच वेगळा पक्ष आहे. तेव्हा विरोधकांना पराभवाची जाणीव झाली असल्याने आज ते टीका टिप्पणी करत आहेत. प्रभाग क्रमांक ९ मधून लहू बालवडकर हे महाराष्ट्रात विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपचे ‘विकसित पुणे संकल्पपत्र’ जाहीर: पुणे विकसित व स्वच्छ बनवण्याचा भाजपचा प्रयत्न; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन
Newsworldmarathi Pune: पुणेकर हे विकासाला सदैव पाठिंबा देणारे असून शहराला अधिक विकसित, स्वच्छ आणि आधुनिक बनविण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासाठी मांडलेली दूरदृष्टीपूर्ण ‘ब्ल्यू प्रिंट’ प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा जाहीरनामा “विकसित पुण्यासाठी संकल्पपत्र” मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक, रविंद्र साळेगावकर, विश्वास ननावरे आदी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले की, पुणे हे सर्वसमावेशक राहण्यासाठी योग्य शहर बनत असून देशातील एक महत्त्वाचे शहर म्हणून पुणे विकसित होत आहे. स्मार्ट सिटी योजनेत बाणेर–बालेवाडी भागाचा समावेश करून तेथे मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे. मागील पाच वर्षांत महापालिकेत काम करण्याची संधी पुणेकरांनी भाजपला दिली आणि दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. पुणेकरांना आता जुना कारभारी नको आहे हे त्यांनी २०१७ च्या निवडणुकीत दाखवून दिले आहे.
पुण्यात सध्या ३२ किमी मेट्रो सेवा सुरू असून आगामी काळात ती १५० किमीपर्यंत विस्तारित करण्याचे उद्दिष्ट आहे. मागील तीन वर्षांत साडेदहा कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी एक हजार ई-बसना मंजुरी देण्यात आली असून पुढील काळात साडेचार हजार ई-बस शहरात धावतील. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन सुरक्षित प्रवास उपलब्ध होणार आहे.
पुणे विमानतळाच्या विस्तारास प्राधान्य देण्यात येत असून ४४ किमी नदीकाठ सुधार प्रकल्प वेगाने सुरू आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून शहराचा वारसा जपतानाच आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले.
दरम्यान, भाजपच्या जाहीरनाम्यात सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ, करदाते, आरोग्य, वाहतूक, गृहनिर्माण, सांस्कृतिक व आर्थिक विकास यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. पुणे शहराला ‘वर्ल्ड बुक कॅपिटल’ बनविणे, अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटर उभारणे, ‘एम्स’ रुग्णालय आणणे, नवीन मेट्रो मार्ग, डेटा सेंटर विकास आदी महत्त्वाकांक्षी संकल्पनांचा यात समावेश आहे. पुणेकर पुन्हा एकदा भाजपवर विश्वास ठेवतील, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.
भविष्यातील पिढी घडवण्यासाठी शिक्षणालाच प्रथम प्राधान्य; अर्चना तुषार पाटील यांनी मांडला विकासाचा ‘रोडमॅप’
Newsworldmarathi pune : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) च्या लोकप्रिय उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील यांनी प्रचारादरम्यान आपल्या ठोस कामगिरीचा आलेख नागरिकांसमोर मांडला. पायाभूत सुविधांसोबत, त्यांनी समाजातील भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती यावेळी दिली.
प्रचारफेरी दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना अर्चना पाटील म्हणाल्या की, “माझा भर हा केवळ तात्पुरत्या समस्या सोडवण्यावर नसून, येथील मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यावर आहे.” याच दूरदृष्टीतून त्यांनी प्रभागात सावित्रीबाई फुले प्रशालेत अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त अशी नवीन ‘ई-लर्निंग’ शाळेची इमारत उभारली आहे. यामुळे प्रभागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळणे शक्य झाले आहे.
केवळ इमारती उभारून न थांबता, आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचेही शिक्षण थांबू नये यासाठी सौ. पाटील यांच्या वतीने प्रभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना नियमित मोफत शालेय साहित्याचे वाटप केले जाते. तसेच, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य राहावे यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्रात लहान मुलांसाठी मोफत ट्यूशन (शिकवणी) वर्ग चालवले जातात, ज्याचा लाभ अनेक गरजू कुटुंबांना होत आहे.
वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी त्यांनी ‘पुणे पुस्तक महोत्सवाचे’ भव्य आयोजन केले होते, ज्यात प्रभागातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील या भरीव कामगिरीमुळे सौ. अर्चना तुषार पाटील यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे
नागरिकांचा हाकेला तत्काळ प्रतिसाद देणारा ‘आपला माणूस’; २५ वर्षे विश्वासाचं नातं जपणारे गणेश बिडकर
Newsworldmarathi Pune: सक्रिय राजकारणात पदार्पण करून गणेश बिडकर यांना २५ वर्षे पूर्ण झाली. महापालिकेत नगरसेवक ते सभागृहनेता अशी पदे भूषवूनही त्यांनी नेहमी सामान्य कार्यकर्ता हीच ओळख जपली आहे.
प्रभागातील कोणतेही काम असो, नागरिकांनी आवाज दिला की ते आपल्या घरातील सदस्याप्रमाणे लगेच धावून जातात. त्यामुळे वडिलांपासून जपलेली नात्यांची नाळ आजही भक्कम आहे. त्यांच्या या साधेपणामुळेच आपला माणूस म्हणून प्रभागात त्यांची ओळख असून त्यांना नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे.
प्रभाग २४ (कसबा पेठ परिसर) मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेले बिडकर २००२ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. दुसऱ्या टर्मनंतर २०११-१२ मध्ये स्थायी समिती अध्यक्षपद मिळाले. महापालिकेत सत्ता नसतानाही मुत्सद्दीपणामुळे पद मिळून प्रभागातील विकासाला गती दिली.
या काळात श्री नागेश्वर आणि त्रिशुंड गणपती मंदिराचा जीर्णोद्धार, कमला नेहरू रुग्णालयाच्या कामांना गती दिली. नागरिकांचा प्रशासनाशी संवाद साधणारा दुवा म्हणून सातत्याने निधी मिळवून प्रभागातील कामे मार्गी लावली.
मेट्रो, ‘जायका’ प्रकल्पांना मंजुरी मिळवून दिली. २०२०-२२ दरम्यान सभागृहनेता म्हणून चोवीस तास पाणीपुरवठा, नदी पुनरुज्जीवन, कचरा व्यवस्थापन, मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांना गती दिली. समाजाशी असलेली बांधिलकी, विकासाचा असलेला ध्यास आणि पक्षाशी असलेली एकनिष्ठा यामुळेच त्यांना तिसऱ्या टर्ममध्ये गटनेतेपद पक्षाने बहाल केले होते.
स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी पक्ष सोडला , भारतीय जनता पार्टीचा पत्रकार परिषदेत खुलासा
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ०९ हे केंद्रस्थानी आले असताना, अमोल बालवडकर यांच्या पक्षत्यागामागील खरी कारणे उघड करणारी भारतीय जनता पार्टीची पत्रकार परिषद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. विकासाचे मुद्दे पुढे करत केलेले आरोप हे केवळ मुखवटा असून, पदांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा अपूर्ण राहिल्यानेच हा पक्षत्याग झाला, असा गंभीर आणि थेट आरोप भाजपाने केला.
महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद देण्यात यावे, अशी वैयक्तिक अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळेच अमोल बालवडकर यांनी पक्ष सोडला, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्री. अमोल बालवडकर यांनी केलेल्या बिनबुडाच्या, तथ्यहीन व दिशाभूल करणारे आहेत. असे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ०९ मधील अधिकृत उमेदवारी आणि नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेत प्रभाग क्रमांक ०९ चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. लहू गजानन बालवडकर व श्री. गणेश कळमकर, तसेच भाजपाचे पदाधिकारी श्री. प्रकाश बालवडकर आणि श्री. राहुल कोकाटे या पदाधिकाऱ्यांनी अमोल बालवडकर यांनी केलेल्या आरोपांचा सविस्तर व तथ्यात्मक खंडन केले.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अमोल बालवडकर यांनी जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे आरोप पूर्णतः खोटे व बिनबुडाचे आहेत. “महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद देण्यात यावे, अशी वैयक्तिक अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळेच त्यांनी पक्ष सोडला,” असा आरोप यावेळी करण्यात आला.
तसेच गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत अमोल बालवडकर कोणत्याही पक्षकार्यक्रमात सहभागी नव्हते व पूर्णतः राजकीयदृष्ट्या अनुपस्थित होते, हेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. “आज विकासाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी स्वतः आजवर कोणते प्रकल्प राबवले, हे जनतेसमोर मांडावे तसेच भविष्यातील नियोजनही स्पष्ट करावे,” असे आवाहन भाजपाने केले.
“पक्षात अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही, तरीही त्यांनी पक्ष सोडलेला नाही. कारण भारतीय जनता पार्टी हा पदांचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे,” असे स्पष्ट मत भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केले.
विधानसभेपासूनच अमोल बालवडकर यांची पक्ष सोडण्याची तयारी होती आणि पक्षावर दबाव टाकण्याचा हुकुमशाही पद्धतीचा प्रयत्न त्यांनी केला, असा आरोपही यावेळी करण्यात आला. “त्यांच्या आव्हानाला आम्ही प्रचाराचा नारळ फोडून, विकासाच्या कामातून उत्तर देत आहोत,” असे भाजपाच्या उमेदवारांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक ०९ मधील मतदारांनी विकासालाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून, विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जाणार आहे. असे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
६८व्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी स्पर्धेत युवान भोरेची चमकदार कामगिरी; ‘निष्णात नेमबाज’ होण्याचा मान
Newsworldmarathi Pune: दिल्ली येथे पार पडलेल्या ६८व्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी स्पर्धेत युवा नेमबाज युवान भोरे याने दमदार आणि उल्लेखनीय कामगिरी करत नेमबाजी विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. डबल ट्रॅप या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत युवानने ‘निष्णात नेमबाज’ होण्याचा मान पटकावला असून, त्याच्या या यशामुळे क्रीडाविश्वात त्याचे कौतुक होत आहे.
युवान भोरे हा अमनोरा येथील पवार पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेत असून तो शाळेचा स्पोर्ट्स कॅप्टन म्हणूनही जबाबदारी सांभाळतो. मे २०२५ मध्ये नेमबाजी खेळात पदार्पण करून अल्पावधीतच त्याने राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले आहे. केवळ काही महिन्यांतच त्याने सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे.
याआधी मागील महिन्यात दिल्ली येथे झालेल्या शॉटगन शोडाऊन चॅलेंज टूर्नामेंटमध्ये युवानने सुवर्णपदक पटकावत आपली गुणवत्ता दाखवून दिली होती. त्याची ही यशस्वी वाटचाल अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणादायी ठरत आहे.
नेमबाजी क्षेत्रातील युवानचा प्रवास जे. बी. कुसळे फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तेजस कुसळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. त्यानंतर अर्जुन पुरस्कार विजेते आणि वर्ल्ड चॅम्पियन अंकुर मित्तल सर** यांचेही त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच युवानच्या यशामागे त्याचे मामा प्रचीत इंगवले यांचे विशेष योगदान आहे. स्वतः गोल्ड मेडलिस्ट असलेल्या प्रचीत इंगवले यांनी दिलेले योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन यामुळेच युवानने हे उल्लेखनीय यश साध्य केले आहे.

