आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे लहू बालवडकर यांना मतदानाचे आवाहन

0
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ९ मध्ये मराठवाडा भागातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, त्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा मित्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी उपस्थिती लावली. या वेळी त्यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधत सामाजिक एकोप्याचे आणि परस्पर सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. आमदार बोर्डीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मेघना बोर्डीकर यांच्या निवडणुकीदरम्यान लहू अण्णा बालवडकर यांनी अत्यंत सक्रिय आणि प्रामाणिक सहकार्य केले होते. त्या काळात त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजहितासाठी आणि पक्षाच्या कामासाठी योगदान दिले होते. आज त्या सहकार्याची परतफेड करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लहू अण्णा बालवडकर हे सर्वसामान्य नागरिकांशी जोडलेले नेतृत्व असून, त्यांनी नेहमीच मराठवाडा समाजासह सर्व घटकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची आणि लोकांशी असलेल्या थेट नात्याची आठवण करून देत आमदार बोर्डीकर यांनी मतदारांना आवाहन केले की, या वेळी लहू बालवडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. प्रभाग क्रमांक ९ मधील विकास, सामाजिक सलोखा आणि सर्व घटकांना न्याय देणारे नेतृत्व घडवण्यासाठी योग्य निर्णय घेण्याची ही संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले. लहू बालवडकर यांना मतदान करूनच पूर्वी मिळालेल्या सहकार्याची खरी परतफेड होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी उपस्थित मतदारांना एकजुटीने निर्णय घेण्याचे आवाहन केले.

हातात कमळ, विकासाचं व्हिजन’; लहू बालवडकरांच्या प्रचाराला प्रभाग ९ मध्ये उस्फूर्त प्रतिसाद

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांनी शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा उकळी आणली असताना, प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपचा प्रचार निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. सूस गावात काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेने ही लढत केवळ औपचारिक न राहता जनतेचा कौल कुणाच्या बाजूने झुकतोय, याची स्पष्ट झलक दिली. प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार लहू बालवडकर, रोहिणी चिमटे, गणेश कळमकर आणि मयुरी कोकाटे यांना मिळालेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा केवळ पक्षीय पाठिंबा नसून, तो “विकासाच्या दिशेने मत” असल्याचे चित्र या पदयात्रेतून स्पष्ट झाले. विशेषतः लहू बालवडकर हे या प्रचाराचे केंद्रबिंदू ठरत आहेत. “हातात कमळ, विकासाचं व्हिजन” हा नारा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलेला दिसत असून, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सूस आणि परिसरातील नागरिकांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. टीका नाही, फक्त विकासाची भाषा राजकीय वातावरणात आरोप–प्रत्यारोपांचे राजकारण रंगलेले असताना, लहू बालवडकर यांनी पूर्णपणे वेगळी भूमिका घेतली आहे.त्यांचा प्रचार नकारात्मक टीकेवर नव्हे, तर सकारात्मक विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित आहे.“देश ज्या दिशेने पुढे चाललाय, महाराष्ट्र ज्या वेगाने बदलतोय, तोच वेग प्रभाग ९ मध्ये आणायचा आहे,” असा त्यांचा स्पष्ट संदेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासवादी नेतृत्वाचा संदर्भ देत, बालवडकर आपला अजेंडा स्पष्टपणे मांडताना दिसत आहेत. गावभेट दौऱ्यांतून थेट संवाद प्रचाराच्या धावपळीतही लहू बालवडकर यांनी गावभेट आणि पदयात्रा सुरूच ठेवल्या आहेत. घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधताना, प्रभागातील खरे प्रश्न समोर येत आहेत — पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, खराब रस्ते, रखडलेली कामे. या तक्रारी केवळ ऐकून घेण्यापुरते न थांबता, त्यावर ठोस उपाय करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याने नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होत आहे. “हा नेता ऐकतो, समजतो आणि काहीतरी करेल,” ही भावना प्रभागातील अनेक मतदारांमध्ये तयार होत असल्याचे स्पष्ट दिसते. प्रभाग ९ मध्ये ‘काम करणारा नेता’ म्हणून ओळख लहू बालवडकर यांची प्रतिमा आता भाषणांपेक्षा काम करणारा नेता अशी तयार होत चालली आहे. टीका-टिप्पणीपासून दूर राहून, थेट विकासावर भर देणारी ही भूमिका सुशिक्षित, नागरी मतदारांमध्ये विशेषतः भावते आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक ९ मध्ये आज राजकीय चर्चा ही कोण काय बोललं यावर नाही, तर कोण प्रत्यक्ष काम करतोय यावर केंद्रित होताना दिसते. आशेचा चेहरा म्हणून लहू बालवडकर एकूणच, प्रभाग क्रमांक ९ मध्ये लहू बालवडकर हे केवळ उमेदवार म्हणून नाही, तर विकासाचा आशेचा चेहरा म्हणून पुढे येत आहेत. लोकांच्या दैनंदिन समस्यांना समजून घेणारा, त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असलेला आणि वादाऐवजी कामावर भर देणारा नेता — अशी त्यांची प्रतिमा आता मतदारांच्या मनात ठामपणे तयार होत आहे. प्रचाराच्या रणांगणात ही शांत पण ठाम विकासाची लाट शेवटी मतपेटीत किती मोठा प्रभाव टाकते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

काशेवाडी-डायस प्लॉटच्या विकासासाठी कटिबद्ध; प्रचारादरम्यान अर्चना पाटील यांनी मांडला कामाचा लेखाजोखा

0
​Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. प्रभागातील पदयात्रा आणि कोपर सभांमधून नागरिकांशी संवाद साधताना सौ. अर्चना पाटील यांनी आपल्या नगरसेवक कार्यकाळात केलेल्या विकासकामांची आणि मंजूर करून घेतलेल्या महत्त्वपूर्ण ठरावांची माहिती दिली. ​प्रचारादरम्यान बोलताना पाटील म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षांत केवळ रस्ते-पाणीच नाही तर सर्वसामान्य नागरिक आणि कामगारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आपण ठोस काम केले आहे. काशेवाडी येथील राजीव गांधी हौसिंग सोसायटी (एस.आर.ए प्रकल्प) च्या रहिवाशांवर थकीत वीज बिलाचे मोठे संकट होते. या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी आपण पाठपुरावा करून सोसायटीचे तब्बल २ कोटी २८ लाख रुपयांचे सामाईक वीज बिल पुणे महानगरपालिकेमार्फत भरण्याचा ठराव मंजूर करून घेतला. ​महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या (उदा. मेहतर कामगार) प्रश्नांनाही त्यांनी वाचा फोडली. या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या उचल रक्कमेत (Advance) वाढ करून ती ८,००० वरून १२,००० रुपये करण्याचा निर्णय त्यांच्याच कार्यकाळात घेण्यात आला. ​याशिवाय, सामाजिक आणि सांस्कृतिक बाबींवरही त्यांनी प्रकाश टाकला. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले पुरंदर येथे पुणे मनपाच्या वतीने महाराजांचे भव्य शिल्प उभारण्याच्या प्रस्तावास आणि कोरोना काळात पालक गमावलेल्या अनाथ मुलांचा खर्च राज्य शासनाने करावा, या संवेदनशील ठरावास त्यांनी मान्यता मिळवून दिली असल्याचे त्यांनी मतदारांना सांगितले. मतदारांनीही त्यांच्या या कामांचे कौतुक करत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

निवडणूक काळातही अविरत स्वच्छता; ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’

0
Newsworldmarathi Pune: स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा मोहिमेला बळ म्हणून, आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई भागात सुरू असलेले ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ अविरतपणे सुरू असल्याची माहिती राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिली. प्रभागातील स्वच्छतेविषयक गरज लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेले ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ चा बाप्पु मानकर यांनी प्रचाराच्या धामधुमीतही नियमित अढावा घेतला. नागरिकांकडून प्राप्त होत असलेल्या अस्वच्छतेविषयक तक्रारी त्यांचे निराकरण, लागणारा वेळ याबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच स्वच्छता सेवकांच्या आरोग्याची विचारपूस केली. निवडणुकीची घोषणा झाल्यावरही निवडणूक आयोगाच्या नियमांच्या अधीन राहून हे अभियान सुरू ठेवण्यात आले आहे.
निवडणूक आली की हे अभियान बंद होईल असे वाटले होते. मात्र, आमच्या शनिवार पेठ भागात आज पाचव्या वेळेस ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ टीम स्वच्छता करत आहे. यासारखे अभियान नियमितपणे राबविले जाईल अशी ग्वाही आम्हाला बाप्पु मानकर यांनी दिली आहे.
-जयेश पंडित, नागरिक
मिशन स्वच्छ प्रभागच्या २५ माध्यमातून अनेक रस्ते व अरुंद गल्ल्या स्वच्छ करून घेण्यात आल्या. मिशनच्या सुरुवातीला कचऱ्याची विल्हेवाट लागावी यासाठी डस्ट बिनचे वाटप करण्यात आले. आजवर ८० टन कचरा उचलण्यात आला आहे.
-राघवेंद्र बाप्पु मानकर

आता इतिहास घडवा; प्रभाग ३६ मधून आपल्या आबांसह सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना संधी द्या; एकनाथ शिंदे यांची नागरिकांना साद

0
Newsworldmarathi Pune: ज्यांच्या पाठीशी लाडक्या बहिणी त्यांना चिंता नाही.विधानसभा निवडणुकीत हे आपण पाहिले आहे .आता महापालिका निवडणुकीत पुन्हा दाखवून द्या, इतिहास कसा घडतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर – पद्मावतीमधील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार रॅलीतून नागरिकांना अभिवादन करून मतदारांशी संवाद साधला. ‘सहकारनगर – पद्मावती’मध्ये काढलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे यावेळी ‘लाडक्या बहिणी राहणार एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांच्या पाठीशी ‘ या महिलांच्या घोषणा लक्षवेधी ठरल्या आणि उपस्थितांसह खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दाद दिली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की,प्रभाग ३६ मध्ये विविध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून आबा बागुल यांनी नागरिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या आणि पुनर्विकास आदी सर्व कामां साठी आबा बागुल यांना नगरविकास विभागाच्या माध्यमातून भरघोस निधी देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली, मात्र त्यासाठी आबांना सातव्यांदा महापालिकेत पाठवून इतिहास घडविण्याची आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी सोडू नका असे आवाहनही शिंदे यांनी मतदारांना केले. तत्पूर्वी क्रांतिसूर्य महात्मा फुले चौकातील सभेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती आणि युवकांचा सहभाग पाहता आता परिवर्तन अटळ असल्याचे स्पष्ट केले. आबा बागुल यांचा प्रभाग पाहायला लोकं बाहेरून येतात,त्यामुळे पुण्यातील प्रत्येक प्रभाग आबा बागुल यांच्या प्रभागासारखे झालेच पाहिजे. पुण्याचे वाहतूक, पाणी, आरोग्य असे कोणतेही प्रश्न असो शिवसेना सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे आणि पुण्याच्या विकासाला गती देण्यासाठी आबा बागुल हे सज्ज आहेत. झोपडपट्टीवासियांना हक्काची घरे देण्याबाबत नगरविकास खाते असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच दिलासा देतील. ५०० चौ. फूट घरांचा मिळकतकर माफ करण्याची घोषणाही उदय सामंत यांनी केली. तसेच उद्योगभवन पुण्यात उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.आबा बागुल यांची ताकद आणखी वाढविण्यासाठी आम्ही सर्वजण निश्चितच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारच असेही ते म्हणाले. आबा बागुल म्हणाले, येत्या १५ तारखेला मतदान करताना फक्त धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबायचे आहे. शिवसेना म्हणजे सर्वांगीण विकास हेच लक्षात ठेवायचे आहे. निश्चिंत रहा…सर्व मागण्या मार्गी लावणार यावेळी आबा बागुल यांनी विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या प्रभागातील जागांवर विविध प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीचे निवेदन सादर केले.त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले,नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी तातडीची गरज म्हणून तळजाई टेकडी येथे ३०० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीस मान्यता दिली जाईल. दर्जेदार व आधुनिक शिक्षण सुविधा वाढविण्यासाठी तळजाई टेकडी येथे राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या धर्तीवर नवीन शाळा उभारणीला प्राधान्य दिले जाईल.आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण सुलभ व्हावे यासाठी वाळवेकर नगर येथे अत्याधुनिक इंजिनिअरिंग कॉलेज (मोफत / सवलतीत शिक्षण) सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. प्रभाग व शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दृष्टीने झोपडपट्टीधारकांना स्वयंपुनर्विकासातून हक्काची घरे मिळण्यास परवानगी व शाहू वसाहतीच्या एसआरए प्रकल्पाला दिलेली स्थगिती कायम ठेवून तेथील रहिवाशांना स्वयंपुनर्विकासाची मुभा देण्याबाबत कार्यवाही होईल असे आश्वासन देताना ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्या नगरविकास विभागामार्फत निश्चित मार्गी लावल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एचसीएमटीआर (रिंग रोड) प्रकल्पाला तातडीने गती देण्याबाबतही निर्णय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले

कल्पना मुळीक यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४० मध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार कल्पना उदयसिंह मुळीक यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. साई दत्त मंदिरापासून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेदरम्यान कल्पना मुळीक यांनी घराघरांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा तसेच महिला व युवकांच्या प्रश्नांबाबत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. या सर्व प्रश्नांना प्राधान्य देऊन सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन कल्पना मुळीक यांनी दिले. प्रचारादरम्यान ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पहार देऊन कल्पना मुळीक यांचे स्वागत केले. त्यांच्या सामाजिक कार्याची आणि विकासाभिमुख भूमिकेची नागरिकांकडून प्रशंसा करण्यात आली. कल्पना मुळीक यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे, मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारणे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट आहे. महिलांचे सक्षमीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी, तसेच स्वच्छ व सुरक्षित प्रभाग निर्माण करण्यावर भर दिला जाईल. या पदयात्रेमुळे प्रभाग ४० मध्ये काँग्रेसच्या प्रचाराला नवचैतन्य मिळाले असून आगामी निवडणुकीत आपल्याला निश्चितच नागरिकांचे भरघोस समर्थन मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रभाग ४१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग

Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४१ महंमदवाडी–उंड्री परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार झपाट्याने वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती आण्णा बांदल, श्वेता घुले, फारूक सय्यद आणि अश्विनी सूर्यवंशी यांनी प्रभागातील विविध भागांत प्रत्यक्ष भेटीगाठी घेत नागरिकांशी संवाद साधला. या प्रचारादरम्यान उमेदवारांनी घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा तसेच महिलांसाठी व युवकांसाठी रोजगाराच्या संधी या प्रमुख मुद्द्यांवर नागरिकांनी आपली मते मांडली. उमेदवारांनी निवडून आल्यानंतर या सर्व प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले. निवृत्ती आण्णा बांदल यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस नियोजन असल्याचे सांगत पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. श्वेता घुले यांनी महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि आरोग्य सेवांवर विशेष लक्ष देण्याची भूमिका मांडली. फारूक सय्यद यांनी अल्पसंख्याक समाजासह सर्व घटकांना सोबत घेऊन विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला, तर अश्विनी सूर्यवंशी यांनी युवकांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. या प्रचार मोहिमेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आगामी निवडणुकीत प्रभाग ४१ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रभाग २५ मध्ये भाजपाचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’

0
Newsworldmarathi pune: मतदार यादीचे वाचन, मतदारांना स्लिप पाठवणे आणि घरोघरी प्रचाराची तयारी अशा निवडणूक वातावरणाने, प्रभाग २५ मधील भाजपाची निवडणूक कचेरीत गजबजली आहे. तळागाळात संघटनेचे जाळे पसरलेल्या भारतीय जनता पक्षाने, प्रभाग २५ मध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा निश्चय केला आहे. प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई या प्रभागात भाजपाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित निवडणूक लढवीत आहेत. ‘आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागात आम्ही निवडणूक लढवीत आहोत. निवडणूक ही नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन, भाजपा गांभीर्याने लढते. ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मेहनतीने, अनेक वर्षांपासून उभी राहिलेली संघटनेची फळी, निवडणुकीचे मायक्रो मॅनेजमेंट आणि प्रत्येक विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचवत असलेले कार्यकर्ते या जोरावर प्रभाग २५ मध्ये मोठा विजय मिळवण्याचा निर्धार आम्ही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे’ असे भाजपाचे कसबा विधानसभा अध्यक्ष अमित कंक यांनी सांगितले. प्रभाग २५ चे पदाधिकारी मनोज खत्री, किरण जगदाळे, निलेश कदम, संतोष फडतरे, मनीष जाधव, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, प्रणव गंजीवाले, अनंत कुंटे, धनंजय डिंबळे, अजित सुकादने, योगिता गोगावले, रुपाली कदम, दिलीप पवार, सोहम भोसले, आदेश पारवे, अमित सोनवणे, अनिल पवार, बिपीन बोरावके, श्रेयस लेले यांच्यासह सर्व हजारी भाग प्रमुख व सर्व कार्यकर्ते या विजयासाठी परिश्रम घेत आहेत.

प्रभाग क्रमांक २४ अधिक सुरक्षित : गणेश बिडकर यांच्या दूरदृष्टीमुळे प्रभागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे

Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या भाजपचे अधिकृत उमेदवार गणेश बिडकर यांच्या दूरदृष्टी व भविष्यकालीन व्हिजनमुळे समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार पेठ परिसरात महापालिकेच्या निधीतून १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. या यंत्रणेमुळे गुन्हेगारांवर प्रभावी वचक बसला असून प्रभागाची एकूण सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. प्रचारादरम्यान नागरिकांकडून प्रभागाच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे कौतुक होत आहे. बिडकर यांच्या माध्यमातून कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल या प्रभागा मधील मध्यवर्ती भागात येणारे २४ मुख्य चौक, ६० मोक्याच्या ठिकाणे, महत्त्वाच्या शाळा, रुग्णालये, एटीएम आणि बस थांबे अशा गर्दीच्या भागांची काळजीपूर्वक निवड करून हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे समर्थ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ८० टक्के भाग आता या कॅमेऱ्यांच्या निगरानीखाली आला आहे. यामुळे पोलिसांना गर्दीवर सतत लक्ष ठेवणे सोपे झाले असून पोलिस यंत्रणेवरील ताण लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. पेठांचा हा परिसर पालखी सोहळा, गणेशोत्सव आणि इतर सामाजिक कार्यक्रमांच्या काळात प्रचंड गजबजलेला असतो. अशा वेळी या प्रगत सीसीटीव्ही यंत्रणेमुळे नागरिकांची सुरक्षा वाढली आहे आणि गुन्हेगारांवर मजबूत वचक निर्माण झाला आहे. याबाबत बोलताना बिडकर म्हणाले, भविष्यात प्रभागाच्या सुरक्षेसाठी आणखी प्रगत सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. आधुनिक साधनांचा वापर करून प्रभागातील नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देणं आणि त्यांचं जीवनमान सुधारणा हा माझा प्रमुख उद्देश असणार आहे. प्रभागातील नागरिकांना दहशतमुक्त राहता यावं यासाठी कायदा आणि सुव्यवस्था सुधारणा हा माझा मुख्य उद्देश असून त्यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता भविष्यात देखील माझ्याकडून करण्यात येईल असा विश्वास बिडकर यांनी व्यक्त केला आहे.

सत्तेची दडपशाही मोडून काढण्याची वेळ; गोकुळनगरात राष्ट्रवादीचा एल्गार

0
Newsworldmarathi Pune: गोकुळनगर येथे आयोजित प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत नागरिकांना परिवर्तनासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. गेल्या काही वर्षांत एकाधिकारशाही पद्धतीने सत्ता राबवली जात असून, सामान्य माणसाचा आवाज दडपला जात आहे. ही अन्यायकारक व्यवस्था उलथवून लावण्यासाठी क्रांतीची गरज आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. कोंढवा–येवलेवाडी प्रभाग क्रमांक ४० मधील गोकुळनगर परिसरात झालेल्या या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गंगाधर विठ्ठल बंधे, सतीश मार्कड, सपना अमोल धमवट व सुरेश लक्ष्मण कवडे यांच्यासाठी प्रचार करण्यात आला. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. शिंदे म्हणाले की, पुणे शहरात सत्ताधाऱ्यांनी सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेच्या माध्यमातून भाजपकडून एकाधिकारशाही आणि दडपशाही सुरू असून, याला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. “भीती बाळगू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असे सांगत त्यांनी नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी समन्वयक अंकुश काकडे यांनी सांगितले की, कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, कात्रज-कोंढवा रोड परिसरातील जनता सुज्ञ असून, यावेळी बदल घडवून आणण्याचा ठाम निर्णय नागरिकांनी घेतला आहे. दोन तृतीयांश बहुमताने संपूर्ण पॅनेल निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सभेला कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत पाटील, महिला शहराध्यक्ष स्वाती पोळके, सतीश मार्कड, अमोल धमवट, विश्वास वाघमोडे, बिभीषण खरात आदींसह गोकुळनगर व कात्रज-कोंढवा रोड परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.