पुण्यातील उच्चशिक्षित रुपाने जयपूरमध्ये आयुष्य संपवलं

Newsworldmarathi Pune : पुण्यातील एका तृतीयपंथीयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमभंग झाल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. विष प्राशन करुन तृतीयपंथीयाने आपल्या आयुष्याची अखेर केली. रुपा देवी माहेश्वरी (सारंग पुणेकर पूर्वाश्रमीचे नाव) असे त्यांचे नाव असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होत्या. रुपा माहेश्वरी या सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुण्यात काम करत होत्या. पुण्यात त्यांनी अनेक आंदोलन आणि सामाजिक कार्य केलं आहे. नितेश राणे यांनी तृतीयपंथीयांसाठी हिजडा शब्दाचा प्रयोग केल्यानंतर बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या समोर रस्ता रोखत त्यांनी आंदोलनही केलं होतं. रूपा यांनी प्रियकराच्या घरापासून अगदी काही अंतरावर कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट सुद्धा लिहिली होती. रूपा यांचा मृतदेह प्रियकराच्या घरापासून जवळच्याच परिसरात आढळून आला. त्यांच्या मृतदेहाजवळ ही सुसाईड नोट आणि कीटकनाशकाची रिकामी बॉटलही सापडली. त्यामुळे या प्रकरणाची आता पोलिसांनी देखील दखल घेतली आहे रुपा माहेश्वरी या उच्चशिक्षित आणि कवयित्री होत्या. जयपूर येथील एका तरुणासोबत त्यांचे प्रेम संबंध प्रस्थापित झाले होते. दोघांमध्ये परस्पर संमतीने प्रेमसंबंध सुरु होते. गेल्या तीन ते चार वर्ष हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी रुपा नेहमी जयपूरला जात असे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या दोघांची भेट झाली नव्हती. रूपा यांच्या प्रियकराचं वागणं बदलल्याची त्यांची तक्रार होती. आपला मुलगा एका तृतीयपंथीयाच्या प्रेमात असल्याचं कुटुंबीयांना कळाल्यानंतर त्यांनी संबंधित तरुणाला रुपा यांच्याशी बोलणं बंद करायला सांगितलं. तेव्हापासून प्रियकर रुपाशी बोलत नव्हता. हाच विरह सहन न झाल्याने १३ जानेवारीला रूपा जयपूरला पोहोचल्या. तिथे प्रियकराच्या घरासमोर जाऊन त्याला हाका मारल्या. अनेक तास त्याची वाटही पाहिली. मात्र तो बाहेर आलाच नाही. त्यामुळेच रूपा यांना नैराश्य आलं

दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रूरल एन्हान्सर्सचा १० हजार कोटी गुंतवणुकीचा करार

Newsworldmarathi Team : दावोसमधील (स्वित्झर्लंड) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने पुण्यातील रूरल एन्हान्सर्स संस्थेशी १० हजार कोटींच्या गुंतवणुकीचा क्रेडिट लाईन सामंजस्य करार केला. आरोग्यसेवा, रुग्णालय, पायाभूत सुविधा, बंदरे व सामाजिक क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी हा सामंजस्य करार महत्वपूर्ण असून, मुख्यमंत्री फडणवीस व संस्थेचे प्रमुख अंबर आयदे यांनी करार आदानप्रदान केला. महाराष्ट्रातील स्टार्टअपसाठी, तसेच पुण्यासाठी ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट असल्याचे केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन करताना म्हटले आहे. राज्य शासनाच्या वतीने परकीय गुंतवणूक विभागाचे सचिव कौस्तुभ धावसे यांच्या पुढाकारातून नेदरलँड येथील शासकीय संस्थांचा त्रिपक्षीय करार झालेला आहे. यावेळी कौस्तुभ धावसे, राज्य शासनाचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन, एमआयडीसी विभागाचे सचिव पी. वेलारसू, नेदरलँड शासनामार्फत एडविन सीएसवरदा, रुरल एन्हान्सर्स समूहाचे चेअरमन इन डेस्क सुब्रह्मण्यम येडावली, मुख्यमंत्र्यांचे सहायक जयंत येरवडेकर उपस्थित होते. अंबर आयदे यांच्या संस्थेला राज्य शासनामार्फत दावोस येथे उपस्थित राहण्याचे विशेष आमंत्रण देण्यात आलेले होते. अंबर आयदे म्हणाले, “ही गुंतवणूक पुढच्या दोन वर्षांमध्ये राज्यातील आरोग्य व्यवस्था, राज्य शासनासाठी लागणारी ॲम्बुलन्स व्यवस्था, पुण्यातील लोहगाव येथील पोलीस बांधवांचा रखडलेला गृहप्रकल्प, पायाभूत सुविधांची उभारणी आणि महाराष्ट्र राज्य शासनाची बंदरे, शिपिंग इन्फ्रास्ट्रक्चर बळकट करण्याच्या दृष्टीने उपयोगात आणण्यात येणार आहे. यापूर्वी संस्थेच्या माध्यमातून भारतातील पहिली ईसीए आधारित गुंतवणूक पुणे महापालिकेसोबत वारजे येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी २०२३ करण्यात आलेली आहे. हे हॉस्पिटल २०२७ मध्ये पुणेकरांच्या सेवेत येणार आहे. मार्चमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे ईसीए आधारित भारतातील पहिली आर्थिक परिषद घेण्यात येणार आहे.” कौस्तुभ धावसे म्हणाले, रुरल एन्हान्सर्स संस्थेचे अंबर आयदे हे मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वकांक्षी ‘कंट्री डेस्क’ या परकीय गुंतवणूक बघणाऱ्या टीमचे सदस्य आहेत. २०२१ पासून महाराष्ट्रात ईसीए गुंतवणूक कशी आणता येईल यावर ते काम करत आहेत. दावोसमध्ये झालेल्या १० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारामुळे राज्याला मोठा फायदा होणार आहे.

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
Newsworldmarathi Pune : लोकप्रतिनिधी हा नागरिकांच्या तक्रारी सोडवणे इतक्यापुरता मर्यादित नसतो. त्याने नागरिकांना भेटून त्यांची मत जाणून घ्यावीत अणि यातून नागरिकांशी संवाद कायम ठेवावा ही सर्वसामान्यांची अपक्षा असते. हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच पुण्यात दर महिन्याला “खासदार जनसंपर्क सेवा अभियान राबवण्यात येत आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या या अभियाना पुणेकरांचा वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे शिवाजीनगर मतदारसंघात झालेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानात अधोरेखीत झाले. पुणेकरांनी आपला खासदार म्हणून मोहोळ यांची भरघोस मताधिक्याने निवड केली. त्याचा योग्य सन्मान राखण्यासाठी खासदार जनसंपर्क सेवा अभियान सुरू करण्यात आले. यात खासदार मोहोळ यांच्यासह मतदारसंघाचे आमदार, माजी नगरसेवक असे स्व लोकप्रतिनिधी उपस्थित असतात.याची सुरूवात कोथरूड मतदारसंघातून झाली. आतापर्यंत कोथरूडसह कसबा, कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघात हा कार्यक्रम झाला. हा कार्यालय तास-दोनतासांचा कार्यक्रम असणार या समजुतीला सुरूवातीपासून छेद दिला गेला. प्रत्येक मतदारसंघात किमान पाच ते सहा तास म्हणजे अखेरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून त्याचे समाधान करूनच कार्यक्रमाची सांगता प्रत्येक मतदार संघात झाली. या ठिकाणी महानगरपालिका, राज्य शासनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित असतात. नागरिकांच्या तक्रारी किंवा सूचना खासदार पहिल्यांदा ऐकून, त्यावर त्यांना योग्य अधिकाऱ्याकडे पाठवतात. तक्रारीचा निपटारा जागेवरच करण्यावर त्यांचा भर असतो. केंद्र, राज्य सरकार, महानगरपालिकेच्या कल्याणकारी योजनांची महिती तेथे उपस्थित राहणार असलेले भाजपचे कार्यकर्ते करून देत नागरिकांकडून अर्ज भरून घेतात. सर्व प्रकारचे सहाय्य नागरिकांना करण्यासाठी कार्यकर्ते राबत असतात. नागरिकांच्या चहा, पाणी, नाष्टा किंवा जेवण याचीही काळजी अभियानस्थळी घेतलेली असते. या अभियानात केवळ तक्रारी सोडवल्या जात नाहीत तर नागरिकांचे कोणत्याही सार्वजनिक हिताच्या सूचना, संकल्पना ऐकून घेतल्या जातात. त्याची लिखीत नोंद घेतली जाते. चांगल्या संकल्पना लेखी स्वरूपात मांडण्याची संधी नागरिकां इथे दिली जाते. तसेच प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी दिली जाते. शासनाच्या कामाचीही महिती देण्याचा संधी या अभियानात मिळते. त्यातून नागरिकांचे गैरसमज दूर केले जातात. खासदार जनसंपर्क सेवा अभियानाबद्दल खासदार मोहोळ म्हणाले की, ‘हे अभियान प्रामुख्याने मतदारांशी संवाद साधण्यासाठीचे अभियान आहे. प्रत्यक्ष अभियानावेळी जे करता ते कार्यालयात बसूनही करणे शक्य होते. पण एकाच वेळी संपूर्ण मतदार संघातून नागरिक आले तर प्रत्येकाला फार वेळ देता येत नाही. म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन तेथे नागरिकांशी संवाद साधण्याला आम्ही प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नागरिकांची संख्या मर्यादित राहते आणि आलेल्या प्रत्येकाशी बोलताही येते. ‘प्रशासन व नागरिक आमनेसामने असल्याने तक्रारींचा लवकर निपटारा जागीच करता येतो. यातून नागरिकांना मिळणारे समाधान आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींसाठी जास्त महत्वाचे आहे. आमचे लोकप्रतिनिधी भेटतच नाहीत या तक्रारीची संधी देऊ इच्छित नाही. या निमित्ताने कार्यकर्त्याशीही बोलता येते. शासन व प्रशासनाबद्दल नागरिकांच्या भावना समजतात. त्याचा उपयोग पक्षसंघटनेलाही होतो असा अनुभव आहे’, असेही मोहोळ म्हणाले

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत लोकाभिमुख योजना तयार करा

0
Newsworldmarathi Pune : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेतून नवीन उद्योजकांसाठी नवीन योजना तयार करण्यात याव्यात सोबतच काही कालबाह्य झालेल्या योजनेचा अभ्यास करून त्या नव्याने तयार करून या योजनेची सांगड महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या योजनेशी घालावी त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढ होईल . असे मत राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी व्यक्त केले आहे. मुंबईतील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री .लहूराज माळी, महाव्यवस्थापक श्री .राकेश बेत, उपमहाव्यवस्थाप श्री शरद लोंढे उप महाव्यवस्थापक श्रीमती वैशाली जाधव, प्रादेशिक व्यवस्थापक शिंदे उपस्थित होते. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळतील विविध योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला लाभार्थ्यांना महामंडळाबाबत देण्यात येणार्या प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली प्रशिक्षण संस्था दर्जेदार प्रशिक्षण देत असल्याची खात्री करावी चांगल्या प्रशिक्षण संस्थेची निवड होईल याची दक्षता घ्यावी सफाई कामगार यांच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, महामंडळाच्या योजनांचा लाभ घेत असताना लाभार्थ्यांच्या उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करण्यासंदर्भात धोरण ठरविण्यात येत आहे . महामंडळामध्ये लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या महामंडळचा उत्पन्न वाढीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा ज्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देता येईल मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळाने प्रयत्न करावेत अशा सूचना सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी यावेळी दिल्या.

धक्कादायक! लहान मुलासमोरच पत्नीची हत्या

Newsworldmarathi Pune : पुण्यातील ही घटना अत्यंत भयानक आहे आणि समाजाच्या मानसिकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते. प्रॉपर्टी वादाच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या करत संपूर्ण कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या घटनेमुळे केवळ पुण्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. पुण्यातील गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या असून बुधवारी पहाटे झालेल्या एका खुनामुळे पुणेकर हादरले आहेत. कौटुंबिक वादातून पतीने त्याच्या पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार करून तिची हत्या केली एवढंच नव्हे तर त्यानंतर त्या पतीने या संपूर्ण घटनेचा, रक्ताच्या थारोल्यात पडलेल्या पत्नीचा व्हिडीओही तयार केला. हे सर्व कृत्य आपल्या लहान मुलासमोर केले. आणि त्यानंतर तो स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर झाल्याचा हादरवणारा प्रकार उघड झाला आहे. पुण्यातील खराडी परिसरात बुधवारी पहाटे झालेल्या हत्याकांडाने खळबळ माजली. प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली, नंतर त्याचा व्हिडीओ बनवून त्यात या हत्येचं कारणंही कथन केलं.पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. कुठे भर रस्त्यात गाड्यांची तोडफोड होते तर कुठे गोळीबार होतो. आणि हे कमी की काय म्हणून पतीनेच पत्नीची हत्या करून त्याचा व्हिडीओ बनवल्याचा क्रूर प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खराडीमध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला. पतीने कात्री घेऊन पत्नीच्या गळ्यावर वार केला. तिची हत्या केली. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या पत्नीचा व्हिडीओ शूट करत पतीने या हत्येचे कारणही सांगितलं. प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून त्याने त्याच्या बायकोलाच संपवलं.आणि हे सगळं केल्यानंतर तो आरोपी पती स्वत:च पोलीस स्टेशनला गेला आणि त्याने हत्येची कबुली दिली. पुण्यातील चंदननगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत, त्यामध्ये आणखी काय माहिती समोर येत हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत स्वच्छता अभियान

0
Newsworldmarathi Pune : मा.उप आयुक्त , परिमंडळ क्र. ४ व मा. उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग पुणे महानगरपालिका यांचे माध्यमातून ब्रँड ॲम्बेसिडर विक्रांत सिंह यांच्या उपस्थितीत कोंढावा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत ऐतिहासिक पेशवे तलाव,VIT कॉलेज या परिसरात स्वच्छता अभियान रबविण्यात आले. या अभियानात बिबवेवडी येथील ९० पेक्षा जास्त विद्यार्थी तसेच क्षेत्रिय कार्यालय अधिकारी कर्मचारी, स्थानिक नागरीक यांनी सहभाग घेतला. यावेळी परीसर स्वछ करुन १६१५ किलो कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छता अभियान दरम्यान नागरिकांमध्ये उघड्यावर्ती कचरा न टाकने, प्लास्टिक वापर न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये इत्यादी बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. याप्रसंगी मा.महापालिका सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांनी मार्गदर्शन करुन स्वच्छतेविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी कोंढवा येवलेवडी व धनकवडी क्षेत्रिय कार्यालय वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.

दावोस मधील करारामुळे महाराष्ट्राला असा होईल फायदा

Newsworldmarathi Team : दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्‍या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल. आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले. दुसरी मोठी गुंतवणूक ही अ‍ॅमेझॉन करणार असून, ती 71,795 कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून 83,100 इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या 2 दिवसांत जे सामंजस्य करार झाले, त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने 11.71 कोटींचे करार केले असून, एमएमआरडीएने 3.44 लाख कोटी तर सिडकोने 55,200 कोटींचे करार केले आहेत. टोनी ब्लेअर यांची भेट दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान ही भेट झाली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली. टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलाएम आणि त्यांचे भारताचे प्रबंध संचालक, सीईओ रिझवान सोमर यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रात इंडस्ट्रीयल पार्क, लॉजिस्टीक इत्यादी क्षेत्रात सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली. सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे: 21) सिएट क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही गुंतवणूक : 500 कोटी रोजगार : 500 कोणत्या भागात : नागपूर 22) व्हीआयटी सेमिकॉन्स क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स गुंतवणूक : 24,437 कोटी रोजगार : 33,600 कोणत्या भागात : रत्नागिरी 23) टाटा समूह क्षेत्र : बहुविध क्षेत्रात गुंतवणूक : 30,000 कोटी 24) रुरल एन्हान्सर्स क्षेत्र : रुग्णालयादी सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक गुंतवणूक : 10,000 कोटी 25) पॉवरिन ऊर्जा क्षेत्र : हरित ऊर्जा गुंतवणूक: 15,299 कोटी रोजगार : 4000 26) ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज क्षेत्र : हरित ऊर्जा गुंतवणूक : 15,000 कोटी रोजगार : 1000 27) युनायटेड फॉस्परस लि. क्षेत्र : हरित ऊर्जा गुंतवणूक : 6500 कोटी रोजगार : 1300 28) ईरुलर्निंग सोल्युशन्स क्षेत्र : शिक्षण गुंतवणूक: 20,000 कोटी रोजगार : 20,000 29) ऑलेक्ट्रा ईव्ही क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही गुंतवणूक: 3000 कोटी रोजगार : 1000 30) फ्युएल क्षेत्र : पुण्यात स्किलटेक युनिव्हर्सिटीचा मनोदय राज्यातील 5000 युवकांना एआय, डिजिटल मार्केंटिंग, बिझनेस अ‍ॅनालिटिक्सचे प्रशिक्षण ………. दि. 21 जानेवारीपर्यंत एकूण गुंतवणूक : 6,25,457 कोटी एकूण रोजगार : 1,53,635 …………. दि. 22 जानेवारी रोजीचे सामंजस्य करार 31) रिलायन्स इंडस्ट्रीज लि. क्षेत्र : पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट गुंतवणूक: 3,05,000 कोटी रोजगार : 3,00,000 32) ग्रिटा एनर्जी क्षेत्र : स्टील आणि मेटल्स गुंतवणूक : 10,319 कोटी रोजगार : 3200 कोणत्या भागात : चंद्रपूर 33) वर्धान लिथियम क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स (लिथियम रिफायनरी, लिथियम बॅटरी) गुंतवणूक : 42,535 कोटी रोजगार : 5000 कोणत्या भागात : नागपूर 34) इंडोरामा क्षेत्र : वस्त्रोद्योग गुंतवणूक : 21,000 कोटी रोजगार : 1000 कोणत्या भागात : रायगड 35) इंडोरामा क्षेत्र : टेक्निकल टेक्सटाईल्स गुंतवणूक: 10,200 कोटी रोजगार : 3000 कोणत्या भागात : रायगड 36) सॉटेफिन भारत क्षेत्र : पायाभूत सुविधा गुंतवणूक: 8641 कोटी कोणत्या भागात : एमएमआर 37) ब्लॅकस्टोन क्षेत्र : पायाभूत सुविधा गुंतवणूक : 43,000 कोटी कोणत्या भागात : एमएमआर 38) सिलॉन बिव्हरेज क्षेत्र : अन्न आणि पेये गुंतवणूक : 1039 कोटी रोजगार : 450 कोणत्या भागात : अहिल्यानगर 39) लासर्न अँड टुब्रो लि. क्षेत्र : संरक्षण उत्पादन गुंतवणूक : 10,000 कोटी रोजगार : 2500 कोणत्या भागात : तळेगाव 40) नेल्सन मिडिया प्रा. लि. क्षेत्र : आयटी गुंतवणूक: 450 कोटी रोजगार : 1100 कोणत्या भागात : एमएमआर 41) इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लि. क्षेत्र : अंतरिक्ष आणि संरक्षण गुंतवणूक : 12,780 कोटी रोजगार : 2325 कोणत्या भागात : नागपूर 42) एमएसएन होल्डिंग्ज लि. क्षेत्र : सौर गुंतवणूक : 14,652 कोटी रोजगार : 8760 कोणत्या भागात : नागपूर 43) प्रियम सोल्युशन्स प्रा. लि. क्षेत्र : ड्रोननिर्मिती गुंतवणूक : 300 कोटी रोजगार : 300 कोणत्या भागात : जालना 44) रेनिसन्स सोलार अँड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स क्षेत्र : हरित ऊर्जा गुंतवणूक: 5000 कोटी रोजगार : 1300 कोणत्या भागात : विदर्भ, मराठवाडा अथवा उत्तर महाराष्ट्र 45) हॅझेरो इंडस्ट्रीज क्षेत्र : हरित ऊर्जा गुंतवणूक : 16,000 कोटी (दोन प्रकल्प) रोजगार : 10,000 कोणत्या भागात : बुटीबोरी 46) टॉरल इंडिया क्षेत्र: अ‍ॅल्युमिनियम आणि मेटल्स गुंतवणूक : 500 कोटी रोजगार : 1200 कोणत्या भागात : अहिल्यानगर 47) टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट क्षेत्र : पायाभूत सुविधा गुंतवणूक : 43,000 कोटी कोणत्या भागात : एमएमआर 48) हिरानंदानी समूह क्षेत्र : पायाभूत सुविधा गुंतवणूक : 51,600 कोटी कोणत्या भागात : एमएमआर 49) एव्हरस्टोन समूह क्षेत्र : पायाभूत सुविधा गुंतवणूक : 8600 कोटी कोणत्या भागात : एमएमआर 50) अ‍ॅमेझॉन क्षेत्र : डेटा सेंटर गुंतवणूक : 71,795 कोटी रोजगार : 83,100 कोणत्या भागात : एमएमआर 51) युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिमिंगहम क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: शाश्वत परिवहन सुविधा कोणत्या भागात : एमएमआर 52) एमटीसी समूह क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: सर्क्युलर इकॉनॉमी पार्क कोणत्या भागात : एमएमआर 53) क्रॉसरेल इंटरनॅशनल क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: वाहतूक सुविधा कोणत्या भागात : एमएमआर

कोण आहेत उल्लासनगर महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त?

0
Newsworldmarathi Mumbai : संघर्ष, जिद्द आणि अपार मेहनतीचे प्रतीक ठरलेल्या आयएएस अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी उल्हासनगर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महिला आयुक्त म्हणून आपले नाव कोरले आहे. गुरुवारी त्यांच्या नियुक्तीने उल्हासनगर शहरासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या कामकाजाला नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे. उल्हासनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिवपदी बदली झाल्यानंतर आयुक्तपदाचा तात्पुरता कारभार अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे होता. त्यानंतर आयुक्तपदासाठी अंबरनाथ नगरपरिषदेचे प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ आणि जमीर लेंगरेकर यांची नावे प्रबल दावेदार होती. मात्र, अखेर गुरुवारी पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली. उल्हासनगर महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच एका महिला आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. मनीषा आव्हाळे यांची उल्हासनगरच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून नोंद झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे शहराच्या प्रशासकीय व्यवस्थापनाला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. प्रेरणादायी प्रवास मनीषा आव्हाळे यांचे वडील शिक्षणप्रेमी होते. स्वतः उच्चशिक्षित होण्याचे स्वप्न त्यांनी आर्थिक अडचणींमुळे सोडले, मात्र मुलगी कलेक्टर व्हावी, असे स्वप्न पाहिले. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. २०१८ मध्ये त्यांनी ३३ वी रॅंक मिळवत देशभरात लौकिक मिळवला. या यशाचे श्रेय त्यांनी वडिलांच्या प्रेरणेला दिले. यूपीएससीच्या तयारी दरम्यान मनीषा यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. वडील गंभीर आजारी पडले, तर आईला कॅन्सर असल्याचे निदर्शनास आले. अशा परिस्थितीत संपूर्ण कुटुंबाने आयुष्याच्या परीक्षेला सामोरे जात त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केला. मनीषा आव्हाळे यांनी आयुष्यभर संघर्ष करत आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले. आई-वडिलांचे आजारपण आणि यूपीएससीची तयारी माझ्या वडिलांना स्वत: शिकण्याची खूप इच्छा होती. त्यांच्या भावांना आणि बहिणींना शिकवण्यासाठी त्यांनी स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडले. उच्चशिक्षित होण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिले. इयत्ता चौथीनंतर माझे शिक्षण धुळे, राहता, पुणे अशा विविध शहरातील बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. पुण्यातील आयएएलएस लॉ कॉलेजमधून एलएलबीची पदवी घेतल्यानंतर यूपीएससीची तयारी करण्यासाठी वडिलांनी मला दिल्लीला पाठविले. पहिल्याच प्रयत्नात मला 833 वी रॅंक मिळाली. मात्र, ही परीक्षा देत असताना माझे वडील आजारी पडले. त्यांना उपचारासाठी अकोल्यावरून पुण्यात आणण्यात आले. तब्बल दोन महिने ते आयसीयूमध्ये होते. मुख्य परीक्षेचा निकाल लागला तेव्हा मला माहितीही नव्हते. आठ दिवसांनी मी माझा निकाल बघितला. मुख्य परीक्षेचा अभ्यास एक महिन्यात करून मी परीक्षा दिली. दरम्यानच्या काळात आईलाही कॅन्सर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अतिशय हलाखीच्या परिस्थितीत संपूर्ण कुटुंबाने यूपीएससी नाही तर आयुष्याच्या परीक्षेला तोंड देऊन रॅंक मिळविला होता. आयुष्यातील हा क्षण आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचेही सहाय्यक जिल्हाधिकारी आव्हाळे यांनी सांगितले.

ब्रेकिंग! अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात बंद दाराआड चर्चा

0
Newsworldmarathi pune : गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटांमधील संभाव्य एकत्रिकरणाची चर्चा चांगलीच गाजत आहे. बारामतीतील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाने या चर्चांना अधिक बळ दिले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांचा एकत्रित मंचावर येणं, तसेच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात झालेला संवाद यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही ठोस घोषणा झालेली नाही. शरद पवार यांनी यापूर्वी अजित पवार यांच्या भूमिकेबाबत टीका केली होती, त्यामुळे या एकत्रिकरणाच्या चर्चांना राजकीय रंग येणे स्वाभाविक आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना खूप महत्त्व दिलं जातं आहे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका निर्णायक ठरू शकते. यानंतर आता आजही अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवारांनी घाई घाईने शरद पवारांच्या दालनात प्रवेश केला. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात अजित पवार ‘प्रेसिडेंट’ असं लिहिल्याला खोलीत शिरताना दिसत आहे. घाईघाईत त्यांनी पीएसोबत केलेला संवाद देखील समोर आला आहे. कार्यक्रमाच्या व्हिडीओत अजित पवार घाईघाईत चालत येताना दिसत आहेत. आल्यानंतर ते ‘कुठे बसायचं रे’ असं पीएला विचारताना दिसत आहेत. यावर ‘साहेब इकडे आत बसलेत’ असं पीएने सांगितल्यावर अजित पवार प्रेसिडेंट बोर्ड लावलेल्या दरवाज्यातून आतमध्ये शिरले. यानंतर याच दालनात दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. खरं तर, आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आल्याचं बोललं जातंय. मात्र मागील काही दिवसांपासून काका-पुतण्यांमधील संबंध सुधारत असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं, यासाठी विठुरायाकडे साकडं घातलं होतं. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमधी दरी कमी झाल्याचं दिसत आहे.

ज्युनिअर मिस इंडिया स्पर्धेत अद्विका प्रथम

0
Newsworldmarathi Pune : अन्न व औषध प्रशासन पुणे विभागात कार्यरत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती शितल गजानन घाटोळ याची मुलगी कु. अद्विका हिने इंदौर येथे घेण्यात आलेल्या ज्युनिअर मिस इंडिया स्पर्धेत २०२५ च्या विनर चा किताब पटकाविला आहे. अद्विका ही पुणे येथील बालेवाडीतील एम आय एस इंटरनॅशनल स्कुल मधिल इयत्ता सातवीची विद्याथ्यांनी असून तिला सिरियलची आवड आहे. यापूर्वीही तिने विविध ठिकाणी पार पडलेल्या नामांकित स्पर्धेत दोन वेळा यश मिळविले आहे. तरुण प्रतिभावतांना फॅशन माडेलिंग आणि अभिनयात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्यासाठी मदत करणारे व्यासपिठ , ज्युनिअर मिस इंडिया २०२५ चा भव्य फिनाले इंदौर येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये अद्विका हि भारतातुन प्रथम आली आहे. पुणे येथील फिनिक्स मॉल येथे २२ सप्टेबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या ऑडिशनमध्ये पाच ते तेरा वयोगटातील १०० मुली सहभागी झाल्या होत्या. त्यामधुन निवड झालेल्या मुलींचा इंदौर येथील हॉटेल मॅरीयट येथे नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धत अद्विकाने संपुर्ण देशातुन प्रथम क्रमांक पटकावित.
Oplus_131072
महाराष्ट्रातील पारंपरिक वस्त्र असलेली नऊवारी आणि मराठी साज केलेल्या स्त्रिया त्यांच्या मराठमोळ्या लुकने अनेकांचे मन जिंकून घेतात. अद्विकाने देखील सांस्कृतिक कार्यक्रमात मराठमोळी नऊवारी साडी परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. २०२५ (११ ते १३ वयोगट) चा किताब पटकाविला. यावेळी इंटरनॅशनल ब्युटी एज्युकेटर उन्नती सिंग, टीव्ही कलाकार मोनिका खन्ना, कास्टिंग डायरेक्टर शोभा गौरी, टिव्ही कलाकार शिल्पा कटारिया सिंग, गायक व कलाकार हरीश मोयाल आदी जज उपस्थित होते.