उपमुख्यमंत्र्यांकडून सारथी संस्थेच्या नव्या इमारतीची पाहणी
Newsworldmarathi Pune : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्था (सारथी) मुख्यालयाच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री यांनी नवीन इमारतीच्या कामाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी पवार यांचे स्वागत केले.
यावेळी पवार म्हणाले सारथी संस्थेच्या अडीअडचणीबाबत लवकरच मार्ग काढण्यात येईल व संस्थेस आवश्यक असणारा निधी लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल. सारथी संस्थेच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सारथी संस्थेचे अध्यक्ष निंबाळकर यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा व संस्था राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सारथी संस्थेचे संचालक मधुकर कोकाटे, उमाकांत दांगट, नवनाथ पासलकर, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, निबंधक संजीव जाधव आदी उपस्थित होते.
‘पुरुषोत्तम’चे लॉटस्चे गुरुवारी वितरण
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे लॉटस् गुरुवार, दि. 26 डिसेंबर रोजी काढण्यात येणार असून स्पर्धेला शुक्रवार दि. 27 रोजी सुरुवात होणार आहे.
महाअंतिम स्पर्धा दि. 27 ते दि. 29 डिसेंबर 2024 या कालावधीत पुण्यात होणार आहे. अंतिम स्पर्धेत पोहोचलेले सर्व संघ शुक्रवारी (दि. 26) पुण्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर स्पर्धेचे लॉटस् काढण्यात येणार आहे. पुण्यासह अमरावती, रत्नागिरी, संभाजीनगर आणि कोल्हापूर विभागातील पारितोषिकप्राप्त एकांकिकांचे सादरीकरण होणार असून यातून महाअंतिम फेरीतील विजेता ठरणार आहे. महाअंतिम फेरी भरत नाट्य मंदिर येथे पाच सत्रात होणार आहे. दि. 27 आणि दि. 28 रोजी सकाळी 9 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 9 आणि दि. 29 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळात स्पर्धा होणार आहे. पारितोषिक वितरण सभारंभ दि. 29 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला असून पारितोषिकांचे वितरण ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरून
Newsworldmarathi Pune : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरुन होणारी सर्व उड्डाणे आता नव्या टर्मिनल वरून होणार असून याची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मंत्री मोहोळ यांनी विमानतळाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला.
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आले असून या टर्मिनलवरुन होणाऱ्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली आहे. मात्र इमिग्रेशनच्या यंत्रणेबाबतची निर्माणाधीन प्रक्रिया आता पूर्णत्वास गेली आहे. मंत्री मोहोळ यांनी या सर्व प्रक्रियेचा आढावा घेतला आणि तांत्रिक बाबींसंदर्भात माहितीही घेतली.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पुणे विमानतळावरुन आताच्या घडीला एकूण ३ मार्गांवरून ५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु असून ही सर्व उड्डाणे नव्या टर्मिनलकडे स्थलांतरित करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी पुणेकर प्रवाशांसाठी आजवर जुनेच टर्मिनल वापरले जात होते, ज्यावर अद्ययावत सुविधांचा अभाव होता. आता मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात सुखकर होणार आहे.’
‘इमिग्रेशन संदर्भातील तांत्रिक प्रक्रिया पूर्णत्वास नेऊन नवे टर्मिनल आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुणे विमानतळाच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देण्याची मालिका अशीच अखंडित राहील’, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पुणे विमानतळावरुन आताच्या घडीला एकूण ३ मार्गांवरून ५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु असून ही सर्व उड्डाणे नव्या टर्मिनलकडे स्थलांतरित करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी पुणेकर प्रवाशांसाठी आजवर जुनेच टर्मिनल वापरले जात होते, ज्यावर अद्ययावत सुविधांचा अभाव होता. आता मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात सुखकर होणार आहे.’
‘इमिग्रेशन संदर्भातील तांत्रिक प्रक्रिया पूर्णत्वास नेऊन नवे टर्मिनल आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुणे विमानतळाच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देण्याची मालिका अशीच अखंडित राहील’, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले. चांगले साहित्यिक सक्षम अधिकारीही असतात : नंदकर
Newsworldmarathi Pune : लेखनाच्या माध्यमातून लेखकाला आत्मिक समाधान मिळते. प्रशासकीय अधिकारी म्हणून कामकाज करताना जे अनुभव येतात ते साहित्यकृतीच्या मांडण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे चांगले अधिकारी हे चांगले साहित्यिक असतात तसेच चांगले सहित्यिक सक्षम अधिकारीही असतात, असे प्रतिपादन पुणे महापालिका उपायुक्त राजीव नंदकर केले.
मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात आज (दि. 23) ‘चांगला साहित्यिक कार्यक्षम अधिकारी नसतो का?’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्त (जीएसटी) वैशाली पतंगे यांनी चर्चासत्राचे संचालन केले.
नंदकर पुढे म्हणाले की, आजच्या काळात या विषयावर टीका टिप्पणी केली जाते. पण साहित्यिक अधिकारी कधीच काम टाळत नाही. तर त्याच्या मनातल्या साहित्यकृती समाजासमोर याव्यात असा त्याचा प्रयत्न असतो. प्रत्येक अधिकाऱ्यांनी तीन वर्षातील कामकाजाचा आढावा शासनास सादर करावा. ज्यायोगे अधिकाऱ्यातील साहित्यिकाची लेखनाची आवड वाढण्यास मदत होऊ शकते.
मराठी भाषा संवर्धन समितीच्या उपसंचालक अंजली ढमाळ म्हणाल्या, चांगला अधिकारी साहित्यिक असणे हा मानाचा तुरा आहे; कारण आपण आधी माणूस नंतर अधिकारी असतो. त्यातून सेवेची भावना गतिमान होते. समाजातील बारिक-सारिक बदल, अनुभव अधिकाऱ्याच्या मनात दडलेल्या साहित्यिकाला टिप कागदप्रमाणे टिपता आले पाहिजेत. समोरच्या व्यक्तीच्या मनातील वेदना समजल्यास प्रश्नातून मार्ग काढता येणे शक्य होते.
मानवी मनाचे विविध कंगोरे समजावून घेऊन लेखनाच्या माध्यमातून मांडता आले पाहिजेत. म्हणजे मानवी अवस्थेला शब्दातून व्यक्त करता आले पाहिजे, असे मत आयकर विभागाचे उपायुक्त महेश लोंढे यांनी व्यक्त केले.
विद्या पोळ-जगताप म्हणाल्या, अधिकारी आणि साहित्यिक या दोन स्वतंत्र भूमिका आहेत. असे असले तरीही शासकीय काम आणि साहित्य निर्मित यामध्ये फारकत करता येत नाही; कारण चांगला अधिकारी आणि साहित्यिक परस्परांना पूरक असतात. यासाठीच विविध साहित्यिक उपक्रम ठिकठिकाणी घेण्यात यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
समाजातील प्रत्येक घटकाने साहित्य निर्मिती करण्याचा प्रयत्न करावा जेणे करून समाजातील विविध प्रश्नांची मांडणी समजापुढे येऊ शकेल, असे विचार वैशाली पतंगे यांनी व्यक्त केले.
उल्का नाईक-निंबाळकर म्हणाल्या, संवेदनशील, साहित्यिक हळवे मन कठोर निर्णय घेणार का असा प्रश्न अनेकदा निर्माण होत असतो; पण दोनही विषय वेगवेगळे असतात.
१२५० मृदंगांच्या एकत्रित वादनातून स्वरब्रम्हाची अनुभूती
Newsworldmarathi Pune जय जय विठोबा रखुमाई चा गजर, तब्बल १२५० मृदंगांचा एकत्रित निनाद आणि त्याला टाळांची सुरेख साथ… अशा भारलेल्या वातावरणात हिंदू सेवा महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या १२५० हून अधिक मृदंग वादकांनी भक्तिमय वादन कलेचा सुरेल आविष्कार सादर केला. मृदंगांचा स्वर टिपेला पोहोचताना पुणेकर देखील टाळ्यांच्या माध्यमातून या भक्तीरसात न्हाहून निघाले आणि प्रत्यक्षपणे हा स्वरब्रह्माची अनुभूती घेतली.
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. त्यामध्ये एकत्रितपणे १२५० मृदंगांचे वादन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री, इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल, चरणजितसिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, महेश सूर्यवंशी, ह.भ.प.चिदंबरम महाराज साखरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात नमन आणि त्यानंतर पंचपदीने झाली. रूप पाहता लोचनी… सुंदरते ध्यान उभे विटेवरी… पुंडलिक वरदे हरी विठ्ठल … तुमच्या नामघोषासह मृदंग आणि टाळांचा गजर झाला. वादनाची सांगता सांगता आरतीने ने झाली. यावेळी जेष्ठ वादकांसह युवक-युवती आणि बाल वादक देखील सहभागी झाले होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, देशात कुंभाची तयारी सुरूआहे मात्र इथे देखील एक कुंभच पाहायला मिळत आहे. उपासना आणि आराधनेचे बळ वाढवणे, हा यामागील उद्देश आहे. मंदिरांनी सामाजिक काम करावे आणि माणसात परमेश्वर ओळखावा, ही मूळ कल्पना आहे. हिंदू धर्म पाच हजार वर्षांपेक्षा जास्त काळ आक्रमणे होऊन देखील टिकला. धर्म टिकून ठेवण्याची प्रेरणा मंदिरांनी दिली. त्यामुळे त्यांचे महत्त्व खूप मोठे आहे.
अशोक गुंदेचा म्हणाले, चार दिवसीय महोत्सव विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामधील १२५० मृदुंग वादकांनी एकत्रित मृदंग वादनाचा केलेला कार्यक्रम हा सर्वोच्च बिंदू होता. महोत्सवात १२६ मठ मंदिरांनी सहभाग घेत १८० स्टॉल द्वारे आपल्या सेवा कार्याची माहिती दिली.
पुणे हादरलं! मद्यधुंद डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं
Newsworldmarathi : Pune Wagoli Accident महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनच्या घटना वाढताना दिसून येत आहेत. पुण्यात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या अपघाताने देशभर खळबळ उडाली होती. अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत कारने दोघांना चिरडले होते. त्यानंतर या घटना लगातार होताना दिसून आल्या. अशात पुण्यात आणखी एक भीषण अपघात घडला आहे. पुण्यातील वाघोली परिसरात पुन्हा एक हिट अँड रनचा प्रकार घडलाय. यामुळे एकच खळबळ उडालीये
(Newsworldmarathi Pune news)
वाघोली परिसरात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. यात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. या दुर्घटनेतील मृतांमध्ये दोन बालकांसह त्यांच्या काकाचा समावेश आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
नेमकं काय घडलं?
वाघोली येथील केसनंद फाट्यावरुन पुण्याच्या दिशेने येताना हा अपघात घडला. रात्री 12 ते 1 च्या सुमारास वाघोली चौकातील वाघोली पोलीस ठाण्यासमोरच ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बिल्टवेल इंटरप्राईजेस कंपनीचा हा डंपर असून डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे. (Newsworldmarathi pune News)
फुटपाथवर झोपलेले कामगार हे अमरावतीहून पुण्यात कामासाठी आले होते. अपघात घडला त्यावेळी फुटपाथवर 12 जण झोपले होते. तर काहीजण फूटपाथच्या बाजूला असलेल्या झोपडीत झोपले होते. गाढ झोपेत असतानाच काळाने त्यांचा घात केला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय.
तर, जखमींना तातडीनं ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातात जखमी झालेले सर्व कामगार रविवारी रात्रीच अमरावती येथून कामासाठी आले होते. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. (Newsworldmarathi pune News)
धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत
Newsworldmarathi Pune : सध्या महाराष्ट्रात थंडीने जोर धरला असून पुणे जिल्ह्यातही याचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात थंडीचा जोर वाढला असून, शनिवारच्या पहाटे धुक्याच्या चादरीने संपूर्ण शहर झाकून गेले. यामुळे रस्ते वाहतूक आणि विमानसेवांवरही मोठा परिणाम झाला. धुक्यामुळे दृश्यता कमी झाल्याने तब्बल 22 विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला, ज्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
हे परिस्थिती लक्षात घेता, प्रशासनाने धुक्यामुळे होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी सावधगिरीचे उपाय करणे गरजेचे आहे. यामध्ये वाहनचालकांनी अधिक काळजीपूर्वक वाहन चालवणे आणि प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था ठेवणे याचा समावेश होतो.
शनिवारी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरपडलेल्या दाट धुक्यामुळे सकाळी 6 ते दुपारी 12 दरम्यान विमानसेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. एकूण 22 विमानांच्या उड्डाणांना अडथळा निर्माण झाला, ज्यामुळे उड्डाणांना अर्ध्या तासापासून तीन तासांपर्यंत विलंब झाला. दिल्लीनंतर बेंगळुरू, अहमदाबाद, रांची, हैदराबाद, किशनगड, चेन्नई, बँकॉक या ठिकाणी जाणाऱ्या विमानांना उशीर झाला. धुक्याचा परिणाम फक्त उड्डाणांवरच नाही तर आगमन विमानांवरही दिसून आला. पुण्यात येणारे एक विमान दाट धुक्यामुळे निर्धारित वेळेत उतरू शकले नाही आणि दुसऱ्या शहराकडे वळवावे लागले. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. विमानतळ प्रशासनाने अशा परिस्थितीत प्रवाशांना माहिती देण्यासाठी तत्परता दाखवणे आणि पर्यायी व्यवस्था पुरवणे गरजेचे आहे. तसेच, धुक्याच्या अशा घटनांसाठी विमानसेवेचे नियोजन सुधारण्यासाठी उपाययोजना केली जावी. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलमुळे विमानसेवा अधिक विस्तारली असून, विमान उड्डाणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षीच्या तुलनेत विमानांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत: शनिवार आणि रविवार हे दिवस सर्वाधिक व्यस्त असतात, ज्या दिवशी 200 पेक्षा अधिक उड्डाणे होत आहेत. पुण्यातून देशातील 35 विमानतळांसह तीन आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान केली जात आहे, ज्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास मिळत आहे. तथापि, शनिवारी धुक्यामुळे उड्डाणांना उशीर झाल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ही परिस्थिती विमानतळाच्या कार्यक्षमतेसाठी एक आव्हान ठरू शकते, त्यामुळे व्यवस्थापनाने अशा घटनांवर उपाययोजना करण्यासाठी अधिक प्रभावी योजना आखणे गरजेचे आहे.
अखेर खातेवाटप झाले…गृहखात भाजपकडे तर नगरविकास शिवसेनेकडे
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बहुप्रतीक्षित खातेवाटपाचा निर्णय अखेर जाहीर झाला आहे. यामध्ये प्रमुख खाती पुढीलप्रमाणे वाटप करण्यात आली आहेत: गृहखाते भारतीय जनता पक्षाकडेच राहणार असून नगरविकास खाते शिवसेना शिंदे गटाकडे तर अर्थखाते अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे देण्यात आले आहे.
ही खातेवाटप रचना सत्तेत असलेल्या महायुती सरकारमधील प्रमुख पक्षांमध्ये ताकदीच्या संतुलनाचा भाग मानली जात आहे. गृहखाते भाजपकडे ठेवून या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे राखली आहे, तर नगरविकास आणि अर्थखात्याचे वाटप संबंधित पक्षांच्या जबाबदारीला अनुरूप ठरले आहे.
हे खातेवाटप आगामी राजकीय रणनीती आणि कामकाजाच्या स्वरूपावर महत्त्वपूर्ण परिणाम करणार आहे.
कोणत्या मंत्र्यांना मिळालं कोणतं खातं?
कॅबिनेट मंत्री
1. चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2. राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3. हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4. चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5. गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आ व्यवस्थापन
6. बबनराव पाटील – पाणीपुरवठा
7. गणेश नाईक- वन
8. दादाजी भसे शालेय शिक्षण
9. संजय राठोड : माती व पाणी परीक्षण
10. धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11. मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12. उदय सामंत उद्योग व मराठी भाषा
13. जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14. पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15. अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
16. अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय
17. शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18. आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19. दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20. अदिती तटकरे महिला व बालविकास
21. शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम
22. माणिकराव कोकाटे – कृषी
23. जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24. नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन
25. संजय सावकारे कापड
26. संजय शिरसाट सामाजिक न्याय
27. प्रताप सरनाईक – वाहतूक
28. भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन
29. मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30. नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
21 आकाश फुंडकर – कामगार
32. बाबासाहेब पाटील – सहकार
33. प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री (State Ministers)
34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37. इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन
38. योगेश कदम – गृहराज्य शहर
39. पंकज भोयर – गृहनिर्माण,
महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार : राऊत
Newsworldmarathi Pune : महापालिका निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत आणि विधानसभा निवडणुकीतील यश-अपयशाचे विश्लेषण करत पुन्हा पक्षबांधणीच्या प्रक्रियेत गुंतले आहेत. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुका शिवसेना (ठाकरे गटासाठी) प्रतिष्ठेचा मुद्दा ठरल्या आहेत.
संजय राऊत यांनी पुण्यात केलेल्या वक्तव्याने ही चर्चा अधिक गाजू लागली आहे. त्यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याने शिवसेना (ठाकरे गट) आपली ताकद दाखवण्यास सज्ज असल्याचे दिसते. स्वबळावर लढण्याच्या या भूमिकेमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढू शकतो, पण त्याचवेळी इतर पक्षांशी असलेल्या युतीच्या शक्यता कमी होण्याचीही शक्यता आहे.
सध्या राज्यात सत्ताधारी भाजप-शिंदे गट मजबूत स्थितीत आहे, त्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेला आव्हानात्मक ठरू शकतो. महापालिका निवडणुकीतील निकाल या भूमिकेच्या यश-अपयशाचे खरे मूल्य ठरवतील, आणि त्याचा आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांवरही परिणाम होईल.
संजय राऊत यांनी दिलेले वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर मोठा प्रकाश टाकते. त्यांच्या मते, सध्या सरकारचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि महापालिका निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. अशा वेळी शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षबांधणी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथे कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी बैठका आयोजित केल्याचे त्यांच्या वक्तव्यात स्पष्ट होते.
राऊत यांनी विधानसभेतील पराभवावर जास्त वेळ घालवण्याऐवजी पुढे पाहण्याची गरज असल्याचे सुचवले आहे. ते कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत, विशेषतः गेल्या काही निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवांनंतर कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.
त्यांनी ईव्हीएमविषयी लोकांमध्ये असलेल्या शंका आणि पुन्हा मतदानाची मागणी याचा उल्लेख केला, ज्यामुळे लोकांच्या मनातील रोष व अशांतता समोर येते. राऊत यांनी या भावना समजून घेण्याचा आणि त्याचा आदर करण्याचा संदेश दिला आहे, ज्यामुळे पक्ष लोकांशी जोडलेला राहू शकेल.
त्यांचे हे वक्तव्य आगामी निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती ठरवण्यात आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यात महत्त्वाचे ठरू शकते. तसेच, लोकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा आणि अडचणी समजून घेण्याचा हा प्रयत्न ठाकरे गटाच्या राजकीय रणनीतीतील महत्त्वाचा टप्पा आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महायुतीकडून कायम सन्मान : आ. गोरखे
Newsworldmarathi Nagpur : डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न असेल किंवा त्यांचे लंडनमधील घर असेल सोबतचआंबेडकर जयंतीला सार्वजनिक सुट्टी असेल ,भारतामध्ये संविधान दिन साजरा करणे असेल ही जबाबदारीची काम ही आमच्या केंद्र शासनाने व महायुती सरकारनेच केले याचा मला अभिमान आहे.
असे परखड मत विधान परिषदे 260 अन्वये इंदू मिल वर बोलताना आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाने दिनांक 19 मार्च, 2013 रोजी दादर चैत्यभूमीजवळील इंदू मिल क्र.6, येथील सुमारे 4.84 हेक्टर जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्ती केली.असून . 11 ऑक्टोबर 2015 रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झालेला आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भूमीवर बुद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमीला राज्य शासनाने दिलेली जमीन अपुरी असल्याने तेथे येणाऱ्या अनुयायांसाठी ही जागा अपुरी पडत आहे त्यामुळे दीक्षाभूमीला आणखी 57 एकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारक विकसित करण्यासाठी आपल्या राज्य शासनाने खर्च ३०५ कोटी ६२ लाख २९ हजार १७३ इतका भरून निधी दिला असून आहे. त्यानंतर ११ मार्च २०२४ रोजी झालेल्या बैठकीत अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, चिरागनगर, घाटकोपर येथे बांधण्याबाबत परवानगी देऊन प्राप्त झाली असून लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण होईल.
भारतीय जनता पक्षाने रिकामे आती घेतले आहे ती जवळजवळ 47% होऊन जास्त झालेली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वेळोवेळी सन्मान करण्याचे काम हे भारतीय जनता पक्ष व महायुती सरकारने वेळोवेळी केलेल्या असून आजतागायत काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानच करण्याचे काम केले आहे. शाडो प्राईम मिनिस्ट्री ची स्थापना ज्यावेळी सोनिया गांधी सरकारने केली होती. त्यावेळी सर्वप्रथमता घटनेचे उल्लंघन करण्याचे काम काँग्रेस सरकारने केले आहे.भंडारा पोटनिवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचे कामही याच काँग्रेस सरकारने केलेले आहे.
हिंदू कोर्ट मिल हे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले त्यावेळी सर्वप्रथम त्या विरोध करण्याचे काम देखील याच काँग्रेस सरकारने केलेले आहे आणि त्याचमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा देखील दिला होता.आणि त्याच वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले हे पुस्तक देखील लिहिले होते 1967 साली ज्यावेळी आणीबाणी लागली त्याच वेळी इलाहाबाद कोर्टाने सगळे अधिकार काढून घेतले अशा प्रकारचे संविधान विरोधी काम वेळोवेळी काँग्रेस पक्षाने केलेले असून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करण्याचे काम हे वेळोवेळी आमच्या केंद्र सरकारनेच आणि महायुती सरकारने च केलेले आहे.
त्याबद्दल सरकारच्या अभिनंदन केले व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मूळ गाव असणाऱ्या वाटेगावात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे यासाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. सोबतच अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची गरज असून राज्य शासनाने ही या गोष्टीचा विचार करावा. सोबतच मातंग समाजासह संपूर्ण साहित्यिकांची असलेली मागणी म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी हिवाळी अधिवेशनात बोलताना आमदार अमित गोरखे यांनी केली.

