पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री फडणवीसांना निमंत्रण

0
Newsworldmarathi Pune : पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची उपस्थिती लाभावी, अशी भेट घेऊन सदिच्छा व्यक्त केली आणि यासाठी आग्रह केला. यावेळी ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत!’ या अभिनव उपक्रमाची माहिती देत त्यात सहभागी होण्याची विनंती देखील केली. गेल्या वर्षी देवेंद्रजींनी महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच अधिवेशन सुरू असतानाही वेळात वेळ काढून ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत!’ या उपक्रमात सहभाग नोंदवला होता. यावर्षीही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाठिंबा दर्शवला आहे.

परभणी बंदला हिंसक वळण

Newsworldmarathi Parbhani : परभणी, महाराष्ट्रामध्ये एका अज्ञात व्यक्तीने रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या बी आर आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केल्यानंतर हिंसक निदर्शने झाली. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली, आंदोलकांनी दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. शहरातील अनेक भागात जाळपोळ, दगडफेक आणि तोडफोडीच्या घटनांसह निदर्शने हिंसक झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून प्रत्युत्तर दिले. या घटनेप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, चौकशी सुरू आहे. अधिका-यांनी पुढील मेळावे टाळण्यासाठी आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार

Newsworldmarathi Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे नेते अमित शहा यांना भेटून महायुतीतील खातेवाटप आणि संभाव्य मंत्र्यांची यादी निश्चित करण्याचा फडणवीस यांचा या भेटीत प्रयत्न आहे. मंत्र्यांच्या यादीवर शिक्कमोर्तब झाल्यानंतर तातडीने मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या १६ डिसेंबरपासून नागपूरला सुरुवात होत आहे. त्यामुळे १४ किंवा १५ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. खातेवाटपावर दिल्लीवारीत शिक्कामोर्तब होणार आहे. आता जरी प्रत्येक पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदे मिळणार हे निश्चित झाले असले, तरी ही सर्व मंत्रिपदे भरली जाणार नसून पक्षाच्या आवश्यकतेनुसार हे ठरवले जाणार असल्याचेही कळते. शिवाय ठरलेल्या संख्येनुसारही एखाद दुसरे मंत्रिपद कमी केले जाणार असल्याचेही समजते. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्लीत दाखल झाले. राज्यात महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार याबाबतचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून सर्वाधिक अर्थात १३२ आमदारांची संख्या असलेल्या भाजपला मंत्रिमंडळातील निम्मी अर्थात २२ मंत्रिपदे मिळणार असल्याचे खात्रीलायक समजते. गेल्या अडीच वर्षांत १०५ आमदार असतानाही भाजपला केवळ नऊ मंत्रिपदे मिळाली होती, मात्र आता ही सर्व कसर भरून निघणार असून पक्षातील अनेकांना मंत्रिपदे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते. त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदे मिळणार असल्याचेही समजते. मागच्या महायुती सरकारच्या काळात या तिन्ही पक्षाच्या वाट्याला समान मंत्रिपदे देण्यात आली होती शिंदे यांच्या शिवसेनेला १२ मंत्रिपदे देण्यात आली असून त्यातील जवळपास निम्मी कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदे असतील. याशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १० मंत्रिपदे मिळणार असून त्यातील पाच कॅबिनेट दर्जाची असतील असे समजते.

पुणे शहरातील ‘शिक्षण पुरक व पर्यावरण पोषक’ वातावरण जोपासण्याची गरज : तिवारी

0
Newsworldmarathi Pune : देशाची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, क्रीडा नगरी व पेन्शनरांचे ‘शांत – संयमी शहर’ अशी ओळख अंगीकारलेले ‘पुणे’ हे शैक्षणीक केंद्र (एज्युकेशनल हब) बनले आहे. शहरात बाहेरील विद्यार्थ्यांची संख्या दिवसें दिवस वाढत असल्याने, विविध प्रकारे रोजगारात देखील वाढ होत असुन, ‘विद्यार्थी सेवा ही देशाच्या भवितव्याची सेवा’ म्हणून पाहिले पाहिजे. पुणे शहराची मुळ शैक्षणिक व ऐतिहासिक ओळख जोपासत, शहराचा बकालपणा न वाढता शिक्षण पुरक व पर्यावरण पोषक वातावरणात शहराचा विकास होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले. नारायण पेठेतील ‘प्रवास यशाचा अभ्यासिके’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी अभ्यासिका केंद्र संचालक श्री देवा आवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी धनंजय भिलारे, ॲड. स्वप्नील जगताप, गणेश शिंदे, राजेश सुतार, ऊदय लेले आदि उपस्थित होते. पुढे बोलताना तिवारी म्हणाले, शहरातील अभ्यासिकांची संख्या वाढणे हे पुणे ‘विद्येचे माहेर घर’ असल्याचे द्योतक आहे, मात्र ‘शैक्षणिक वातावरणास पोषक, संतुलित व पर्यावरणपूरक विकास पुणे शहरा करीता अत्यावश्यक आहे.

तेव्हापासून मुंडे साहेब जॅकेट घालायला लागले…

0
Newsworldmarathi Team : Birthday special माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे या लोकनेत्यांच्या मैत्रीची चर्चा त्या दोघांच्या पश्चात आजही होत असते. दोघांचे पक्ष वेगळे असले तरी त्यांची मैत्री निखळ होती, निस्पृह, घट्ट होती. मैत्रीच्या आड त्यांनी त्यांच्या पक्षांना येऊ दिले नाही. अशी मैत्री महाराष्ट्राच्या राजकारणात विरळाच. दोघे एकत्र आले की, प्रेक्षकांच्या कानांना खमंग, दर्जेदार मेजवानी मिळायची. १९८० साली निवडून आल्यानंतर जेव्हा मुंबईच्या विधानभवनात आमदार म्हणून पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा गोपीनाथ मुंडे पांढरा लेंगा आणि झब्बा घालून आले होते. तर विलासरावही तसाच पांढरा लेंगा आणि झब्बा घालून आले होते. फरक इतकाच होता तो म्हणजे विलासरावांनी त्यावर काळे बंद गळयाचे जॅकेट घातले होते. दोघे समोरासमोर आले आणि एकमेकांना मिठी मारली. दोघेही देखणे होते. या तरुण आमदारांची मुलाखत घेण्यासाठी काही पत्रकार पुढे आले. तेव्हा पत्रकार म्हणाले, ‘‘दोघे सारखेच दिसता. फरक एकच. विलासराव तुम्ही जॅकेट घातल्यामुळे जरा वेगळे दिसत आहात.’’ दुस-या दिवशी सभागृह सुरू होण्यापूर्वी पुन्हा दोघे जण भेटले. आजूबाजूला इतर आमदारांचे कोंडाळे होते. इतक्यात विलासरावांनी आपल्या सहायकाला हाक मारली. तो जवळ आला तशी विलासरावांनी त्याच्या हातातील बॅग घेतली. ती उघडली आणि आपण जसे जॅकेट घातले होते, तसेच जॅकेट त्यांनी बॅगेतून काढले आणि मुंडे यांच्याकडे सोपवले. तिथेच ते मुंडेंना घालायला लावले आणि पुन्हा कडकडून मिठी मारली आणि उपस्थित आमदारांना विचारले, ‘आता दिसतो का आम्ही सारखे?’ सर्वच जण खळखळून हसले. तेव्हापासून गोपीनाथ मुंडेही जॅकेट घालू लागले. विलासरावांचे निधन झाले तेव्हा मुंडे यांनी ही आठवण सांगितली व भावुक होऊन म्हणाले, “मी ज्या ज्या वेळेला जॅकेट घालतो तेव्हा विलासरावांची आठवण येते” स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय आदरपूर्वक घेतलं जातं. आज 12 डिसेंबर रोजी त्यांची जयंती (Birth Anniversary) साजरी केली जात आहे. त्यांचं पूर्ण नाव गोपीनाथ पांडुरंग मुंडे (Gopinath Pandurang Munde) होतं. 12 डिसेंबर 1949 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 3 जून 2014 रोजी दिल्लीमध्ये एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. गोपीनाथ मुंडेंनी लोकनेते (Lokaneta) म्हणून भरतीय राजकारणात आपला ठसा उमटवला. त्यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपदही (Deputy Chief Minister) भूषवले होते. 2014 मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) म्हणून शपथ घेतली होती. परंतु, दुर्दैवाने काही दिवसांनी दिल्लीत एका रस्ते अपघातात त्यांचं निधन झालं. गोपीनाथ मुंडे महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले आणि तेथून त्यांचा राजकारणाशी संबंध आला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात ते सरकारविरोधातील आंदोलनाचा भाग होते. मुंडे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा होता. नंतर त्यांना भारतीय जनता युवा मोर्चा, भाजपची युवा शाखा महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष बनवण्यात आले.

अजित पवार शरद पवारांच्या भेटीला

Newsworldmarathi Mumbai : शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा दिवस आहे. दिल्लीत शरद पवार यांना सर्व पक्षांच्या नेत्यांकडून शुभेच्छा मिळाल्या आहेत, ज्यामध्ये त्यांचा राजकीय अनुभव, नेतृत्व, आणि योगदान यांचा गौरव करण्यात आला आहे. विशेषतः, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे निवासस्थानी पोहचले आहेत. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, आणि पार्थ पवार देखील उपस्थित आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची राजकीय ताकद आणि एकात्मतेचा संदेश पुन्हा अधोरेखित होत आहे. या भेटीला राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्व आहे, विशेषतः अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील सध्या सुरू असलेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आजच्या अजित पवार यांनी निवासस्थानी जाऊन दिलेल्या शुभेच्छा मुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

आनंद दर्शन युवा मंचतर्फे स्नेहमेळावा व हुरडा पार्टी

0
Newsworldmarathi Pune : पुणे येथील पंचम डेव्हलपर्सचे संचालक व धडाडीचे कार्यक्षम असे युवा कार्यकर्ते तसेच युवकांचे प्रेरणास्थान महेंद्र सुंदेचामुथा वा सहकारयांनी गेली सोळा वर्षांपूर्वी आनंद दर्शन युवा मंच (ADYM) या नावाने युवकांसाठी संस्था स्थापन केली असून या संस्थेमध्ये आज जवळजवळ पुणे व पुणे परिसरातील चारशेहून अधिक सदस्य असुन सात-आठ हज़ार युवक जोडले गेले आहेत. त्यामुळे हा एक नूसता मंच राहिला नसून ती एक पुणे शहरातील मोठी संस्था निर्माण झाली आहे. महेंद्र सुंदेचामुथा हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून युवकांसाठी दर महिन्याला ते वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात व वर्षातून दोन वेळा युवकांच्या संपूर्ण परिवारासाठी ते स्नेहमेळावा घेऊन यामध्ये मनोरंजनासाठी कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. दरवर्षी डिसेंबर महिन्यांमध्ये हुरडा पार्टी व गेट टू गेदर म्हणून स्नेहमेळाव्याचे आयोजन केले जाते. महावीर जयंतीला तीन ते चार हज़ार युवकासह अचल जैन याच्या मार्गदर्शन घेऊन बाइकरॅली काढण्यात येते. यावर्षी सुध्दा त्यांनी रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी कोंढवा – सासवड रोडवरील येवलेवाडी येथील नव्यानेच झालेल्या ह्युटोन ग्रीनस् ॲंन्ड रिसाॅर्ट मध्ये हुरडा पार्टी व गेट टू गेटर म्हणून स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते, यामध्ये आनंद दर्शन युवा मंचच्या सर्व युवकांच्या परिवारासह पंधराशे पेक्षा अधिक बंधू भगिनींनी हजेरी लावून या स्नेहमेळावा व गरमागरम सुरती हुरड्याचा आनंद लुटला. या स्नेहमेळावा व हुरडा पार्टीसाठी उद्योगपति सुहासजी खाबिया, श्री ऑल इंडिया जैन काॅन्फरन्स, दिल्लीचे निवर्तमान राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशजी चोरडिया, आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेबजी धोका, उद्योजक डॉ, सुमतिलालजी लोढा, जितोचे पुणे चेप्टर चे अध्यक्ष इंदरजी छाजेड, दिनेशजी ओसवाल, अजयजी मेहता, लक्ष्मीकांतजी खाबिया जीतो चे अनेक पधादिकारी दिलीपजी कटारिया,भाजपा प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदिपजी भंडारी, आय.ए.एस, अधिकारी आनंदजी भंडारी, उद्योजक सचिनजी नहार, जैन संदेश मासिकाचे संपादक सुभाषबाबू लुंकड, जैन परंपराचे संपादिका रुपल चोरडिया, महाराट्र जैन वार्ता चे अजितजी डुंगरवाल, सौ, कविता सेठीया, तसेच ह्युटोन ग्रीनस् रिसाॅर्टचे गोपीनाथ कामटे, सौ अश्विनीताई कामटे, सत्यवान पुणेकर, विकास नाना फाटे, कैलास बापू कामटे, भाऊ निंबाळकर, जयवंतराव होडगे, संपतजी पोकळे, अभिजित दिवेकर, शरद गायकवाड आदी उपस्थित होते, यांनी ह्युटोन ग्रीनस् रिसाॅर्ट‌‌‌ या कार्यक्रमासाठी देऊन विशेष सहकार्य केले, व या सर्व मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून हुरडा पार्टी व महाराष्ट्रीयन जेवणाचा आनंद घेतला, यावेळी आनंद दर्शन युवा मंचच्या वतीने जानेवारी या नवीन वर्षात होणाऱ्या बालेवाड़ी हाय स्ट्रीट ट्रीमोन्ट एडिवाएम क्रिकेट टुर्नामेंट साठी संघाच्या खेळाडूंना विशेष टिशर्टचे वितरण अविनाश चोरडिया यांच्या हस्ते तसेच विजेता व उपविजेता संघाला देण्यात येणाऱ्या करंडक कप याचे प्रकाशन सिरिमिरी बैंक्वेट चे देवेंद्रजी लोढा व चेतक जैन या सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्नेहमेळाव्यासाठी आलेल्यांचे मुख्य प्रवेशद्वारावर आनंद दर्शन युवा मंचच्या वतीने महाराष्ट्रीयन परंपरागत चंदनाचे कुंकुम व चमकीने औक्षण करून गुलाबाच्या पाकळ्यांनी प्रत्येकाचे स्वागत करण्यात येत होते, प्रत्येकजण ढोलीबाज्याच्या तालावर ठेका धरून आपल्या वयाचं भान न ठेवता जोडीने किंवा ग्रुपने नाचत-गाजत आनंद घेत होते, कपलजोडीसाठी एंकर पूजा जैन यांनी काही मजेशीर गेम्स घेतल्या, हुरडा पार्टीमध्ये नेवासा येथील सुरती हुरडा व हुरड्याबरोबर काळ्या मिरीची चटणी, खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, गुळ, दही, रेवडी, गोडीशेव, बोरं, हरभरा, पेरू, आवळे, उकडलेले स्विट काॅर्न कणीस, उकडलेले शेंगदाणे असे अनेक व्यंजन पाहाता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे अनेक पदार्थ ठेवण्यात आले होते. तर महाराष्ट्रीयन जेवणामध्ये मसालेदार कांद्याची भाजी, मटकीची भाजी, सुका बटाटा, कांदा भजी, जिलेबी, मसालेभात, ज्वारीची व बाजरीची भाकरी, चपाती, मिरचीचा ठेचा,लसूणची लाल चटणी, कांदा, काकडी, गाजर, टोमॅटो, मिनरल वॉटर शिवाय चहा-काॅफी, बर्फ गोळा असे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते, या सर्व खाद्यपदार्थाचा लाभ सर्वांनीच मनसोक्तपणे घेऊन आनंद घेतला, विशेष करून या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अत्यंत चांगल्या प्रकारे आनंद दर्शन युवा ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र सुंदेचा कार्याध्यक्ष सौरभ धोका, खजिनदार पंकज बाफना, उपाध्यक्ष उमेदमल धोका, सेक्रेटरी आनंद गादिया, प्रकाश बोरा व दोस्ती ग्रुप सर्व सदस्यांनी केले, तर जेवणाची व्यवस्था दिलीपजी कटारिया व ग्रुपचे काही सदस्यांनी केले, रिसाॅर्ट मधील सर्व व्यवस्था व आलेल्यांची ठेप पाहिल्यानंतर जातांना सर्वजण न विसरता महेंद्रजी सुंदेचामुथा व सर्व सदस्यांचे कौतुक करून आभार व्यक्त करीत होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ धोका, महेश लुंकड यांनी केले.

आबा बागुल यांची पक्षश्रेष्ठींकडे निलंबन मागे घेण्याची मागणी

0
Newsworldmarathi Pune पर्वती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी आता काँग्रेस पक्षाच्या श्रेष्टीकडे आपले निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. बागुल यांनी अपक्ष लढत दिली असली तरी त्यांचा पक्षाशी असलेला प्रदीर्घ संबंध आणि काँग्रेसच्या विचारांप्रती असलेली निष्ठा लक्षात घेता त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेण्याचा आग्रह त्यांनी केला आहे. आबा बागुल हे पुण्यातील एक अनुभवी आणि प्रभावी नेते आहेत. त्यांनी पर्वती मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, ज्यामुळे काँग्रेसला स्थानिक पातळीवर मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला होता. त्यांच्या या पावलामुळे पक्षाने कठोर भूमिका घेत त्यांना निलंबित केले होते. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये एकता टिकवून ठेवण्यासाठी बागुल यांच्या मागणीला पक्ष कसा प्रतिसाद देतो, याकडे लक्ष आहे

‘शांतता… पुणेकर वाचत आहेत..’उपक्रमाला प्रतिसाद

0
Newsworldmarathi Pune : पुणे-राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत शहरात ठिकठिकाणी ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजकारण, सामाजिक, साहित्य, कला, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेतला. केवळ पुण्यातच नाही, तर राज्य, देशभरातून आणि परदेशातूनही या उपक्रमात सहभाग नोंदवण्यात आला. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कोथरूडचे आमदार आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील,आमदार सिद्धार्थ शिरोळे,उद्योजक पुनीत बालन, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, आमदार हेमंत रासने,अभिनेत्री विभावरी देशपांडे, लेखक किरण यज्ञोपवीत, ज्येष्ठ लेखक वसंत वसंत लिमये, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक अशा अनेकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच समता भूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले मंडई, अंधशाळा, मेट्रो स्थानक, पुणे महापालिका अशा ठिकाणी पुस्तक वाचन करण्यात आले.

पुणे महानगरपालिकेची वतीने लक्ष्मी रोडवर पादचारी दिन साजरा

0
Oplus_131072
Newsworldmarathi pune : आज पुणे महानगरपालिकेच्या वतीने लक्ष्मी रोड येथे पादचारी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश पादचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आणि त्यांना वाहतूक व्यवस्थेत अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हा होता. कार्यक्रमात महापालिकेच्या अधिकारी, स्थानिक नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, तसेच विविध संस्था आणि संघटनांनी सहभाग घेतला. यावेळी लक्ष्मी रोडवरील काही ठिकाणी विशेष पादचारी मार्गांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, रस्त्यांवर वाहतुकीचे नियोजन आणि सिग्नल व्यवस्थेची माहिती देण्यासाठी स्टॉल्स लावण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी, पादचाऱ्यांच्या अधिकारांविषयी जनजागृती करणारे पथनाट्य सादर करण्यात आले, ज्याला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.