चिंतामणी चौक ते निलगिरी चौक रस्ता घेतला दत्तक; अप्पा रेणुसे मित्रपरिवारचा पुढाकार
Newaworldmarathi Pune : चिंतामणी ज्ञानपीठ, पुणे महानगरपालिका आणि अप्पा रेणुसे मित्रपरिवार यांच्या सहकायनि चिंतामणी चौक ते निलगिरी चौक हा रस्ता दत्तक घेण्याच्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या चांगल्या कामाला जेव्हा अजित पवार यांच्यासारख्या जाणकारांची कौतुकाची थाप मिळते तेव्हा त्या सगळ्या प्रयत्नांचे खऱ्या अथनि सार्थक होते.
पुण्यातील हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प ठरला आहे याचे समाधान मोठे आहे. या रस्त्याचे पूर्वीचे स्वरूप पाहिलेले दक्षिण पुण्यातील नागरिक हे नवे बदल अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. पी. पृथ्वीराज, ओमप्रकाश दिवटे, मुख्य अभियंता पथ अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त विजय थोरात, प्रसाद काटकर, माधव जगताप, सहायक आयुक्त सुरेखा भणगे, दत्ता धनकवडे, सुभाष जगताप, अभय मांढरे व परिसरातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.
स्मार्ट सिटीच्या स्वप्नाला बळ देणारे हे पाऊल आहे. जर आपण ठरवले तर काय घडू शकते याचा वस्तुपाठ या योजनेच्या शुभारंभातून दिसतो आहे. विकासकामात नागरिकांनी असाच सहभाग दाखवायला हवा. एका बाजूला विकासाचे सार्वत्रिक प्रयत्नशासनस्तरावर सुरू असताना समाजाचा घटक म्हणून आपली जबाबदारीसुद्धा मोठी आहे. पुणे शहरातील या पथदर्शी प्रकल्पाचे इतरांनीही अनुकरण करायला हवे. अनेक रस्ते अशा रीतीने दत्तक पेण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि नागरिकांनी सजगता आणि सुजाणता दाखवायला हवी, असे मत अजित पवार यांनी या वेळी व्यक्त केले. अप्पा रेणुसे मित्रपरिवारातील सर्व जण या वेळी उपस्थित होते.
उपाययोजना कुचकामी ठरतायत का? अपघातांना जबाबदार कोण – रोहन सुरवसे पाटील यांचा सवाल
Newsworldmarathi Pune: मुंबई–बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील गंभीर अपघातांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) राबवलेल्या उपाययोजनांचा कुचकामीपणा पुन्हा एकदा उघड झाला असून, या उपाययोजनांवर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केला आहे. महामार्गावरील वाढत्या दुर्घटनांसाठी जबाबदार कोण आणि राबवलेल्या उपाययोजना अयशस्वी का ठरत आहेत, याची चौकशी केंद्र सरकारने तातडीने करावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
पाटील यांनी सांगितले की, नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या मार्गावर अपघात रोखण्यासाठी वेगमर्यादा ताशी ६० वरून ४० किमीपर्यंत कमी करण्यासह वाहतूक तपासणी चौकी, मानवीबल तैनाती, गस्त वाहने आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात या चौक्यांवर मनुष्यबळ नसणे, अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आणि महामार्गावर कोणती ही शिस्तबद्ध देखरेख नसल्यामुळे उपाययोजना कागदोपत्रीच राहिल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
NHAI कडून उपाययोजनांनंतर अपघातांची संख्या ६४ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा करण्यात आला होता; परंतु प्रत्यक्षात अपघात थांबलेले नाहीत, हे गुरुवारी झालेल्या दुर्घटनेवरून सिद्ध होते, असे पाटील म्हणाले. महामार्गावरील निष्काळजीपणा, अपुरे पथ सुरक्षा उपाय आणि ढिसाळ अंमलबजावणीमुळे जनजीवन धोक्यात येत असून, या परिस्थितीची गंभीर दखल घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा; रावसाहेब पटवर्धन विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा
Newsworldmaratahi pune: 9 नोव्हेंबर 2011 रोजी 2002 आणि 2004 च्या शैक्षणिक वर्षातील अकरावी व बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्राचार्य अनिल कांबळे, पर्यवेक्षक जीवन इंगळे, शाळा समिती अध्यक्ष तुषार शिंदे, तसेच सेवाजेष्ठ निवृत्त शिक्षक चंद्रकांत गोले, बाळकृष्ण माडगूळकर, बाळाराम धुलप, मानसिंग गायकवाड, पुष्पक कांदळकर आणि माजी विद्यार्थी दलप्रमुख अविनाश खंदारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या वर्गखोलीत जाऊन तेथील आठवणी ताज्या केल्या. विद्यार्थीदशेतील अनुभवांवर मनमोकळा संवाद साधताना अनेकांनी आपल्या शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली.
प्राचार्य अनिल कांबळे आणि पर्यवेक्षक जीवन इंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत जुन्या शाळेशी जोडलेला भावनिक आणि शैक्षणिक बंध अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.
स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी योगेश रसाळ, राकेश गुंड, राजेश माने, विकास राऊत, विजय दिंडले, अश्विनी कासार, सारिका अडसूळ, धनश्री आढाव आणि पूजा कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
उत्साह, आठवणी आणि मैत्रीने भरलेल्या या स्नेहमेळाव्याने सर्वांच्या मनात पुन्हा एकदा विद्यार्थी जीवनाचा सुवर्णकाळ उजळला.
मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या वर्गखोलीत जाऊन तेथील आठवणी ताज्या केल्या. विद्यार्थीदशेतील अनुभवांवर मनमोकळा संवाद साधताना अनेकांनी आपल्या शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली.
प्राचार्य अनिल कांबळे आणि पर्यवेक्षक जीवन इंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत जुन्या शाळेशी जोडलेला भावनिक आणि शैक्षणिक बंध अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.
स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी योगेश रसाळ, राकेश गुंड, राजेश माने, विकास राऊत, विजय दिंडले, अश्विनी कासार, सारिका अडसूळ, धनश्री आढाव आणि पूजा कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
उत्साह, आठवणी आणि मैत्रीने भरलेल्या या स्नेहमेळाव्याने सर्वांच्या मनात पुन्हा एकदा विद्यार्थी जीवनाचा सुवर्णकाळ उजळला.
नवले पूल अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणार; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अपघातस्थळाची पाहणी करत घेतला आढावा
Newsworldmarathi Pune नवले पूल परिसरात गुरुवारी रात्री झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल. अल्पकालीन उपाययोजनांसंदर्भात उद्या (शनिवारी) संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेतली जाईल. तसेच नऱ्हे ते रावेत व्हाया सुतारवाडी या उन्नत मार्गाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) मंजूर झाला असून त्याला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल,’अशी माहिती पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली.
नवले पूल येथे गुरुवारी झालेल्या अपघातानंतर शुक्रवारी सकाळी मोहोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम आदी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, ‘२०२२ मध्ये येथे मोठा अपघात झाला होता. त्यानंतर जांभूळवाडी ते वडगावपर्यंत सातत्याने होणारे अपघात थांबविण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. त्यातील रम्बलर्सची संख्या वाढवणे, स्पीड गन्स वाढवणे, पंक्चर्स बंद करणे यासारख्या काही अल्पकालीन उपाययोजना अमलातही आणल्या गेल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षात अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु, गुरुवारच्या दुर्दैवी अपघातात आठ जणांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे कायमस्वरूपीच्या उपाययोजनांना गती देणे आवश्यक आहे,’.
‘मागील अपघातानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत पुण्यात तसेच दिल्लीतही बैठक झाली होती. त्यात जांभूळवाडी ते सुतारवाडी व सुतारवाडी ते रावेत या ३२ किलोमीटर लांबीच्या व सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रोड) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा ‘डीपीआर’ही मंजूर झाला आहे. त्यामुळे येथील अपघात थांबविण्यासाठीच्या या दीर्घकालीन उपाययोजनेला गती देण्यासंदर्भात गडकरीजींची भेट घेऊन पाठपुरावा केला जाईल, असे मोहोळ यांनी नमूद केले.
‘अल्पकालीन उपाययोजनांमध्ये या मार्गावरून येणाऱ्या ट्रक्सची खेड शिवापूर टोल नाक्याजवळच लोड व ब्रेक तपासणी करणे, स्पीड गन्स वाढवून कारवाई करणे, रम्बलर्स वाढवणे आणि सेवा रस्ते पूर्ण क्षमतेने विकसित करणे आदींचा समावेश आहे. तसेच अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने पुढे पाठवता येण्याविषयी चाचपणी केली जाईल. यासंदर्भात पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि पीएमआरडीए या सर्व घटकांची एकत्रित बैठक शनिवारी घेण्यात येईल. या सर्व यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव दिसल्यास कारवाई केली जाईल, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.
नवले पूल येथे गुरुवारी झालेल्या अपघातानंतर शुक्रवारी सकाळी मोहोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम आदी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, ‘२०२२ मध्ये येथे मोठा अपघात झाला होता. त्यानंतर जांभूळवाडी ते वडगावपर्यंत सातत्याने होणारे अपघात थांबविण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. त्यातील रम्बलर्सची संख्या वाढवणे, स्पीड गन्स वाढवणे, पंक्चर्स बंद करणे यासारख्या काही अल्पकालीन उपाययोजना अमलातही आणल्या गेल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षात अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु, गुरुवारच्या दुर्दैवी अपघातात आठ जणांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे कायमस्वरूपीच्या उपाययोजनांना गती देणे आवश्यक आहे,’.
‘मागील अपघातानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत पुण्यात तसेच दिल्लीतही बैठक झाली होती. त्यात जांभूळवाडी ते सुतारवाडी व सुतारवाडी ते रावेत या ३२ किलोमीटर लांबीच्या व सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रोड) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा ‘डीपीआर’ही मंजूर झाला आहे. त्यामुळे येथील अपघात थांबविण्यासाठीच्या या दीर्घकालीन उपाययोजनेला गती देण्यासंदर्भात गडकरीजींची भेट घेऊन पाठपुरावा केला जाईल, असे मोहोळ यांनी नमूद केले.
‘अल्पकालीन उपाययोजनांमध्ये या मार्गावरून येणाऱ्या ट्रक्सची खेड शिवापूर टोल नाक्याजवळच लोड व ब्रेक तपासणी करणे, स्पीड गन्स वाढवून कारवाई करणे, रम्बलर्स वाढवणे आणि सेवा रस्ते पूर्ण क्षमतेने विकसित करणे आदींचा समावेश आहे. तसेच अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने पुढे पाठवता येण्याविषयी चाचपणी केली जाईल. यासंदर्भात पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि पीएमआरडीए या सर्व घटकांची एकत्रित बैठक शनिवारी घेण्यात येईल. या सर्व यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव दिसल्यास कारवाई केली जाईल, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले. श्रीनाथ भिमाले यांचा वाढदिवस आगळा वेगळा उपक्रम; प्रेमनगर परिसरातील लाडक्या बहिणींना आपुलकीची भेट
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक २१ सॅलिसबरी पार्क – मुकुंदनगर (ड गट – सर्वसाधारण) येथील प्रेमनगर परिसरात पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी व म.न.पा.चे माजी सभागृहनेते श्रीनाथ यशवंत भिमाले यांच्या वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणींना भेटवस्तू दिल्या.
यावेळी प्रभागातील महिलांनी मोठ्या उत्साहात श्रीनाथ भिमाले यांचे स्वागत केले. अनेक ठिकाणी भगिनींनी औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. भिमाले यांनी प्रत्येक भेटीत आपुलकीचा संवाद साधत महिला वर्गाशी संवाद साधला आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
या प्रसंगी भिमाले म्हणाले, “प्रभागातील नागरिकांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हाच माझा खरा ठेवा आहे. बहिणींनी दाखवलेली आत्मीयता ही माझ्यासाठी अनमोल भेट आहे.”
प्रेमनगर परिसरात झालेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिक, महिला मंडळे व युवा वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभर चाललेल्या या भेटीच्या कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाल्याचे भिमाले यांनी सांगितले.
भारतात्मा वेद पुरस्कार सोहळा १७ नोव्हेंबर रोजी पुण्यात होणार
Newsworldmarathi Pune: स्वर्गीय श्री अशोकजी सिंघल जी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या भारतात्मा वेद पुरस्काराचे वितरण १७ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. पुण्यातील दादासाहेब दरोडे सभागृह, आगरकर रोड, बीएमसीसी कॉलेंज जवळ , शिवाजीनगर येथे होणाऱ्या समारंभात परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत आणि परमपूज्य आचार्यजी श्री प्रद्युम्नजी महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. भारतात्मा वेद पुरस्काराच्या माध्यमातून वैदिक शिक्षण आणि विद्वत्तेचा गौरव करण्यात येतो.
विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक सदस्य असलेल्या स्व. सिंघल यांनी श्रीराम जन्मभूमी चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले. ते भारताच्या प्राचीन ज्ञानाचे एकनिष्ठ अनुयायी होते तसेच वैदिक ज्ञान परंपरा आणि गुरुकुल शिक्षण प्रणालीच्या पुनरुज्जीवन आणि प्रसारासाठी अत्यंत कटिबद्ध होते. स्व. सिंघल यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात वेदांचा अभ्यास आणि आचरण यांचे जतन व त्याला प्रोत्साहन देण्यासाठी अमूल्य योगदान दिले.
भारतात्मा वेद पुरस्काराचे गेल्या आठ वर्षांपासून दरवर्षी प्रदान केला जात असून हे त्याचे नववे वर्ष असून आहे. तीन श्रेणींमध्ये असामान्य योगदानांचा या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव करण्यात येतो.
•उत्कृष्ट वैदिक विद्यार्थी – ₹३ लाख रोख
•आदर्श वैदिक शिक्षक – ₹५ लाख रोख बक्षीस
•उत्कृष्ट वैदिक संस्था – ₹७ लाख रोख बक्षीस
प्रत्येक पुरस्कृताला प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हही प्रदान करण्यात येईल.
या समारंभात वेद अर्पित जीवन सन्मान म्हणजेच जीवनगौरव वैदिक समर्पण पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे. वैदिक ज्ञानाचा अभ्यास, अध्यापन आणि सराव करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या विद्वानांना हा सन्मान दिला जातो. रोख ५ लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
याच समारंभात भारतात्मा वेद पुरस्कार २०२५ च्या विजेत्यांची घोषणा केली जाईल.
“अँजिओग्राफीच्या रिपोर्टने खचलेल्या जगदीश मुळीक यांना देवाभाऊंचा फोन येताच परतला आत्मविश्वास!”
Newsworldmarathi Pune: भाजप नेते जगदीश मुळीक यांची नुकतीच अँजिओग्राफी पार पडली, दुसऱ्या दिवशी बायपास सर्जरी करण्यात आली, या दरम्यान त्यांनी भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्र्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेला फोन आणि आलेला अनुभव मुळीक यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे विसरता येत नाहीत. या सर्व प्रसंगात देवाभाऊंनी ज्या प्रकारे माझी काळजी घेतली, ती खरंच लहान भावासारखी होती.
मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील माणूस म्हणून त्यांनी दाखवलेली तत्परता, आत्मीयता आणि जिव्हाळा मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यांनी डॉक्टरांशी स्वतः संवाद साधला, उपचाराची तातडीने व्यवस्था केली आणि आज, ऑपरेशननंतर काही दिवसांनी, स्वतः भेट द्यायलाही आले. त्यांच्या या भेटीतून मिळालं ते फक्त आशीर्वाद नव्हे, तर मानसिक बळ आणि आत्मविश्वासाचा अनमोल आधार असं म्हणत त्यांनी संपूर्ण प्रंसग सांगितला आहे.
जगदीश मुळीक यांची सोशल मिडीया पोस्ट
देवेंद्रजी फडणवीस हे फक्त नेता नाहीत, तर कार्यकर्त्यांना भावासारखे समजणारे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राला अशाच नेतृत्वाची गरज होती आणि ते नेतृत्व आपल्याला देवभाऊंच्या रूपाने लाभले आहे.
लग्नसोहळ्यात रक्तदानाचा अनोखा उपक्रम; सामाजिक बांधिलकीचे अद्वितीय उदाहरण
Newaworldmarathi Pune: लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि नव्या आयुष्याची सुरुवात. अनेकजण या शुभप्रसंगी संगीत, डीजे किंवा वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतींनी हा दिवस साजरा करतात. परंतु, श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष तथा राज्य कार्यकारिणी सदस्य श्री माऊली खाडे यांनी त्यांच्या शुभविवाहात एक वेगळाच सामाजिक संदेश देत, एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला.
हडपसर येथे पार पडलेल्या त्यांच्या विवाह सोहळ्यात, श्री माऊली खाडे यांनी ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ या विचाराला प्रत्यक्ष कृतीत आणत विवाह प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिराचा शुभारंभ श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री भूषण सुर्वे यांनी स्वतः रक्तदान करून केला.
या शिबिरात एकूण 51 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले, ज्यामुळे हा उपक्रम केवळ प्रतीकात्मक न राहता प्रभावी सामाजिक कार्याचे उदाहरण ठरला.
या अनोख्या उपक्रमाचे उपस्थित पाहुण्यांकडून तसेच ट्रस्टच्या सर्व सदस्यांकडून भरभरून कौतुक करण्यात आले. श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टने सामाजिक बांधिलकीची परंपरा जपण्याचे कार्य अनेक वर्षांपासून सातत्याने केले आहे. विवाहासारख्या वैयक्तिक आनंदाच्या क्षणी समाजाप्रती जबाबदारीची जाणीव जपण्याचा हा उपक्रम ट्रस्टच्या सामाजिक जाणिवेचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे.
या निमित्ताने रक्तदान चळवळीला एक नवा उर्जावान संदेश मिळाला असून, समाजातील तरुण पिढीसाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
मोदी सरकारची पुणेकरांना मोठी भेट; पुण्याला १००० ई-बस मंजूर: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश
Newsworldmarathi Pune: पुणे-पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने पीएम-ई ड्राईव्ह योजनेंतर्गत पुणे शहरासाठी एक हजार ‘ई-बस’ खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे लवकरच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात या बस समाविष्ट होतील. परिणामी, पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक भक्कम होऊन, कोंडी कमी होईल तसेच प्रदूषण नियंत्रणासाठीही मदत होईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या हद्दीसह ‘पीएमआरडी’च्या हद्दीत सेवा देणारी पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. पीएमपीकडे सध्या २००० बस आहेत. त्यातील सुमारे ७५० स्वमालकीचा तर उर्वरित ठेकेदारांच्या आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यात किमान तीन हजार बस असणे आवश्यक आहे. म्हणून पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्या बस दाखल करण्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी राज्य सरकारसह केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. यासाठी मोहोळ यांनी एच.डी. कुमारस्वामी यांच्या वेळोवेळी प्रयत्न भेटी घेऊन पाठपुरावा केला होता, ज्याला आता यश आले आहे. या प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साथ महत्त्वाची ठरली.
‘या बसेससाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक असलेले पत्र राज्य शासनाकडून रिझर्व्ह बँकेला पाठवले जावे, यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर तातडीने तसा प्रस्ताव राज्य शासनाकडून रिझर्व्ह बँकेला पाठविण्यात आला. त्यानंतर या १००० ‘ई-बस’ साठीचा प्रस्ताव पीएमपीएमलमार्फत केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. त्याला गती मिळावी, यासाठी पंधरा दिवसांपूर्वीच मी एच. डी. कुमारस्वामी यांची नवी दिल्लीत भेट घेत सविस्तर चर्चा केली होती. त्यांनीही तातडीने या प्रस्तावाला गती देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे पीएमपीला १००० ई बस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मोहोळ म्हणाले.
‘पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्यावर आमचा भर आहे. सध्या शहरात ३२ किलोमीटर मार्गावर मेट्रो धावते आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोही लवकरच धावू लागेल. याशिवाय मेट्रोच्या विस्तारित मार्गांनाही मान्यता मिळाली आहे. त्याचजोडीला पीएमपीएमएलचे सक्षमीकरण करणे हा माझा प्रमुख अजेंडा आहे. पीएमपीच्या ताफ्यात अधिकाधिक बस याव्यात, यादृष्टीने मी सातत्याने प्रयत्नशील होतो. या पाठपुराव्याला यश मिळाले असून लवकरात लवकर या बस पीएमपीच्या ताफ्यात याव्यात, याला माझे प्राधान्य राहील,’असे मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने कायमच शहरांच्या सर्वांगीण, सुनियोजित आणि शाश्वत विकासावर भर दिला आहे. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्ताराला प्राधान्य दिले गेले आहे. त्यानुसार पुणे-पिंपरी चिंचवड शहरासाठी एक हजार नव्या ‘ई ंबस’ खरेदीसाठी मान्यता दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी पुणेकरांच्या वतीने आभार मानतो. यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी धन्यवाद देतो,’ असे मोहोळ यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांपैकी 83 जागा महिलांसाठी आरक्षित
Newsworldmarathi pune: राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. आज पुण्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (Pune Mahanagarpalika Election 2025) आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. 165 जागांसाठी ही आरक्षण सोडत महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत जाहीर झाली. आरक्षण सोडतीवर हरकत आणि सूचना दाखल करण्यासाठी 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर, अशी मुदत देण्यात आली आहे.
महापालिकेच्या 165 जागांसाठी अनुसूचित जातीसाठी 22 जागा, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 44 जागा, सर्वसाधारण 97 जागा आरक्षित केल्या होता. त्यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी 11 जागा, अनुसूचित जाती सर्वसाधारण 11 जागा, अनुसूचित जमाती महिला 1 जागा, अनुसूचित जमाती सर्वधारण 1 जागा, नागरिकांचा मागासवर्ग महिलांसाठी 22 जागा, नागरिकांचा मागासवर्ग सर्वसाधारण 22 जागा, सर्वसाधारण महिलांसाठी 49 जागा, सर्वसाधारण 48 जागा चिठ्ठीद्वारे आरक्षित करण्यात आल्या आहेत. प्रारूप आरक्षण सोडत 17 तारखेच्या आधी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्रभाग निहाय हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी हा 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरच्या दुपारी 3 पर्यंत राहणार आहे. महापालिका येथील निवडणूक कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालयात हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहे. ईमेल आणि गठ्ठ्याद्वारे हरकती आणि सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत. पुण्यातील गणेश कला क्रीडामंच येथे आज 11 वाजता महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

