पुणे महापालिका प्रभाग निहाय आरक्षण जाणून घ्या एका क्लिकवर

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत अखेर जाहीर झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिलांसाठी राखीव जागांची विभागणी निश्चित करण्यात आली आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रातील एकूण जागांचे आरक्षण ठरविण्यात आले असून, यानुसार अनेक प्रभागांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. सोडतीनंतर संभाव्य उमेदवारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाला याचा फायदा होणार आणि कोणत्या भागात अडचणी निर्माण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे महापालिका प्रभाग निहाय आरक्षण प्रभाग क्रमांक १ कळस धानोरी अ अनुसूचित जाती महिला ब अनुसूचित जमाती क OBC महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २ फुलेनगर नागपूर चाळ अ अनुसूचित जाती महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ३ विमान नगर लोहगाव अ OBC महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ४ खराडी वाघोली अ अनुसूचित जाती ब OBC महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ५ कल्याणी नगर वडगाव शेरी अ OBC सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ६ येरवडा गांधीनगर अ अनुसूचित जाती ब OBC महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ७ गोखले नगर वाकडेवाडी अ अनुसूचित जाती महिला ब OBC महिला क सर्वसाधारण ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी अ अनुसूचित जाती ब OBC महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ९ सुस बाणेर पाषाण अ अनुसूचित जमाती महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक १० बावधन भुसारी कॉलनी अ OBC सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर अ OBC सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक १२ शिवाजीनगर मॉडेल कॉलनी अ अनुसूचित जाती महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक १३ पुणे स्टेशन जय जवान नगर अ अनुसूचित जाती ब OBC महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क घोरपडी मुंढवा अ अनुसूचित जाती महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक १५ मांजरी बुद्रुक केशवनगर अ अनुसूचित जाती महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक १६ हडपसर सातववाडी अ OBC महिला ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण ड सर्वसाधारण १७. प्रभाग क्रमांक १७ रामटेकडी माळवाडी वैदुवाडी अ अनुसूचित जाती ब OBC महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक १८ वानवडी साळुंखे विहार अ OBC सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक १९ कोंढवा खुर्द कौसर बाग अ OBC महिला ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २० शंकर महाराज मठ बिबवेवाडी अ OBC सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २१ मुकुंद नगर सॅलिसबरी पार्क अ अनुसूचित जाती ब OBC महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २२ काशेवाडी डायस प्लाॅट अ अनुसूचित जाती महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ नाना पेठ अ अनुसूचित जाती ब OBC महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती कमला नेहरू रुग्णालय केएमइ रुग्णालय अ OBC महिला ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई अ OBC महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २६ घोरपडे पेठ गुरूवार पेठ समताभूमी अ अनुसूचित जाती ब OBC महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ पर्वती अ अनुसूचित जाती ब OBC महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण २८ जनता वसाहत हिंगणे खुर्द अ अनुसूचित जाती महिला ब OBC महिला क सर्वसाधारण ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २९ डेक्कन जिमखाना हॅपी काॅलनी अ OBC सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ३० कर्वेनगर हिंगणे होन कॉलनी अ OBC ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ३१ मयूर काॅलनी कोथरूड अ OBC सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ३२ वारजे पाॅप्युलर नगर अ अनुसूचित जाती महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ३३ शिवणे खडकवासला धायरी पार्ट अ OBC महिला ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ३४ नर्हे वडगाव बुद्रूक धायरी अ OBC सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी माणिकबाग अ OBC महिला ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर पद्मावती अ अनुसूचित जाती ब OBC महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ३७ धनकवडी कात्रज डेअरी अ OBC सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर आंबेगाव कात्रज अ OBC महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण महिला इ सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुपर इंदिरानगर अ अनुसूचित जाती महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ४० कोंढवा बुद्रुक येवलेवाडी अ अनुसूचित जाती ब OBC महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ४१ महंमदवाडी उंड्री अ अनुसूचित जाती महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
Newsworldmarathi Mumbai: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. येत्या डिसेंबर महिन्यात ते आपला 90 वा वाढदिवस साजरा करणार होते. सोमवारी दुपारपासून त्यांची प्रकृती खालावली होती. ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर आली होती. परंतु आज (मंगळवार) त्यांची प्राणज्योत मालवली आहे. हेमा मालिनी, सनी देओल आणि मुलगी इशा देओल हे धर्मेंद्र यांच्याबरोबर रुग्णालयात असल्याचं कळतंय. देओल कुटुंबीयांच्या खासगीपणाचा आदर करावा, असं आवाहन त्यांच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. श्वसनाच्या त्रासामुळे धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत होते. त्यांचा शेवटचा ‘इक्किस’ हा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या पश्चात पहिली पत्नी प्रकाश कौर, दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि सहा मुलं- अभिनेता सनी देओल, बॉबी देओल, इशा देओल, अहाना देओल, अजिता आणि विजेता असा परिवार आहे.

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट; मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये स्फोट, तीन गाड्यांना आग, 8 जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

0
Newsworldmarathi Delhi: दिल्लीतील लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. हा स्फोट मेट्रो स्टेशनजवळ पार्क केलेल्या कारमध्ये झाला. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्फोटाची तीव्रता हाय इंटेन्सिटी असल्याचे पोलिसांनी सांगितले. एनआयएची टीम घटनास्थळी रवाना झाली असून दिल्ली पोलिस आणि अग्निशमन दलाने तपास सुरू केला आहे. फायर ब्रिगेडला सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी स्फोटाची माहिती मिळाली. जखमींना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर मुंबईत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा तपासणी वाढविण्यात आली आहे. दरम्यान, स्फोटात आठ गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून फॉरेन्सिक टीम तपासासाठी घटनास्थळी रवाना झाली आहे.

राजधानी दिल्ली हादरली; लाल किल्ला परिसरात स्फोट

0
राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटलेल्या आहेत. याचे काही फोटो समोर आले आहे. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. हा स्फोट मेट्रो स्टेशनजवळ पार्क केलेल्या कारमध्ये झाला. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्फोटाची तीव्रता हाय इंटेन्सिटी असल्याचे पोलिसांनी सांगितले. एनआयएची टीम घटनास्थळी रवाना झाली असून दिल्ली पोलिस आणि अग्निशमन दलाने तपास सुरू केला आहे. फायर ब्रिगेडला सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी स्फोटाची माहिती मिळाली. जखमींना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर मुंबईत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा तपासणी वाढविण्यात आली आहे. दरम्यान, स्फोटात आठ गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून फॉरेन्सिक टीम तपासासाठी घटनास्थळी रवाना झाली आहे. राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये मोठा स्फोट झाला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहेत. या स्फोटानंतरचे काही फोटो समोर आले आहेत. या स्फोटानंतर लगेचच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. कारमधील स्फोटानंतर आग लागली आसपास आल लागली आहे. ही आग विझविण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून केला जात आहे. बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. कारमध्ये स्फोट नेमका का झाला? यामागे काही घातपाताचा उद्देश तर नव्हता ना? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता शोधली जाणार आहेत

समाजसेवेच्या संकल्पातून वाढदिवस साजरा; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त व्यंकोजी खोपडे यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर

0
Newsworldmarathi Pune: “वाढदिवस हा केवळ आनंदाचा क्षण न राहता, समाजासाठी काहीतरी देण्याचा संकल्पदिवस ठरावा,” असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. पुण्यात रक्ताचा तुटवडा भासत असताना, वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरासारखे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. माजी सरपंच व्यंकोजी खोपडे यांच्या पुढाकाराने, गोरक्षस्मृती फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र. ३८ यांच्या वतीने कात्रज चौक भाजी मंडई येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिक, कार्यकर्ते आणि स्थानिक जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवली. या प्रसंगी बोलताना व्यंकोजी खोपडे म्हणाले, मुरलीधर मोहोळ यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवून जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. रक्तदान शिबिर हा या बांधिलकीचा एक छोटासा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, अरुण राजवाडे, संदीप बेलदरे, राणी भोसले, डॉ. सुचेता भालेराव, अभिजित कदम, महेश कदम,विकास फाटे, दिगंबर डवरी, संतोष ताठे, गणेश निंबाळकर, आबासाहेब मांगडे, सुनील मांगडे, गणेश काळे, विक्रम भिलारे, निलेश धनावडे, महेश धूत आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदानानंतर सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, “रक्तदान ही सर्वश्रेष्ठ मानवसेवा आहे. एका थेंब रक्ताने एखाद्याचे प्राण वाचू शकतात. व्यंकोजी खोपडे यांनी वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा हा उपक्रम राबवून एक आदर्श घालून दिला आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या सामाजिक उपक्रमामुळे कात्रज परिसरात “वाढदिवस म्हणजे समाजसेवेचा उत्सव” हा संदेश पोहोचला असून नागरिकांत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.

मंत्रिपद नसल्याने तानाजी सावंत वैफल्यग्रस्त : राष्ट्रवादीच्या रोहन सुरवसे पाटलांची टीका

0
Newsworldmarathi Pune: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. धाराशिव येथे शिवसेनेच्या कार्यक्रमात बोलताना, “राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसा तडफडतो तशी राष्ट्रवादीची अस्वस्था आहे” अशी टीका आमदार तानाजी सावंत यांनी केली. यावरून महायुतीत नवा वाद रंगला आहे. आमदार तानाजी सावंत मंत्रिपद नसल्याने वैफल्यग्रस्त झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला युतीधर्माबद्दल उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा एक डोस स्वतः प्यावा म्हणजे युती धर्मात मिठाचा खडा पडणार नाही. असा टीकात्मक खोचक सल्ला राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी सावंतांना दिला आहे. रोहन सुरवसे-पाटील म्हणाले, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपलं मंत्रिपद का काढून घेतलं? याच आत्मचिंतन सावंत यांनी करावं. महायुतीत एकत्र असताना महायुतीचे संस्कार पाळायचे नाही, मित्रपक्षावर पातळी सोडून टीका करत रहायची अशा कारणामुळेच त्यांना मंत्रिपद नाही. हे त्यांना अजून समजत नसेल तर मग अवघड आहे. महायुतीत असतानाही मित्रपक्षावर टीका केल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील तणावाचे वातावरण तयार होत आहे. तानाजी सावंत यांनी इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना भान ठेवून आणि जबाबदारीने बोलावे अन्यथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. जशास तसं प्रत्युत्तर देताना संकोच बाळगला जाणार नाही असा इशाराही सुरवसे-पाटील यांनी दिला.

श्री सद्गुरू जंगली महाराज देवस्थान येथे भव्य दीपोत्सव सोहळा

0
Newsworldmarathi Pune: श्री सद्गुरू जंगली महाराज देवस्थान येथे श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळाच्या वतीने भव्य दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या दीपोत्सवाला यंदा विशेष महत्त्व होते, कारण मंडळाच्या स्थापनेला यंदा ८० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मंदिराच्या परिसरात तब्बल १,००० दिव्यांची सजावट करण्यात आली होती. उजळलेल्या दिव्यांच्या प्रकाशात मंदिर परिसर उजळून निघाला आणि भक्तांनी जयघोषात वातावरण भारावून टाकले. भक्तगणांनी सामूहिक आरती, भजन आणि कीर्तनाद्वारे दिवाळी साजरी केली. मंदिराच्या प्रांगणात सुमारे पाच फूट आकारात श्री सद्गुरू माणिक प्रभू यांचे आकर्षक चित्र दिव्यांच्या सहाय्याने साकारण्यात आले होते. या चित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दीपोत्सवाचे आयोजन अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने पार पडले. कार्यक्रमानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. भजनी मंडळाचे कार्यकर्ते आणि स्थानिक भक्तांच्या सहकार्याने हा दिव्य सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला.

भाजपची निवडणूक तयारी वेगात; जिल्हा प्रभारी मुरलीधर मोहोळ तर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांची निवड

0
Newsworldmarathi Pune : भारतीय जनता पक्षाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवडणूक प्रभारी (जिल्हा प्रमुख)  म्हणून तर  माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांच्यावर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली आहे. मोहोळ यांनी पूर्वी स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून कार्यभार सांभाळला आहे तर बीडकर यांनी यापूर्वी नगरसेवक, गटनेता, स्थायी समिती अध्यक्ष तसेच सभागृह नेते म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली. त्यानुसार जिल्हा निवडणूक प्रभारी केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात बीडकर यांच्याकडे पुणे शहराच्या निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  ‘केंद्रात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे तर राज्यात मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. विकासाभिमुख धोरणांची आखणी आणि त्याची वेगवान अंमलबजावणी हे केंद्र आणि राज्य सरकारचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार नक्कीच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर विश्वास दाखवतील. पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप, महायुतीच सत्तेवर येईल,असे मोहोळ म्हणाले. पक्षनेतृत्वाने ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असेही मोहोळ यांनी नमूद केले. राज्यात भाजप व महायुतीला अनुकूल वातावरण आहे. पुणे महापालिकेत २०१७-२२ या काळात भारतीय जनता पक्षाचीच सत्ता होती. या पाच वर्षात पुणे शहराच्या भाजपने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. यंदाही पुणेकर भाजप व महायुतीच्याच पाठीशी राहतील, याची मला खात्री आहे. शहर निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केल्याबद्दल मी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आभारी आहे. २०१७ च्या निवडणुकीतही निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी माझ्याकडे होती. त्या वेळेप्रमाणेच यंदाही भाजप, महायुती सत्तेवर येईल,’असा विश्वास बीडकर यांनी व्यक्त केला.

जुन्नर व शिरूरमधील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करणार : वनमंत्री गणेश नाईक वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी महत्वाचे निर्णय

0
Newsworldmarathi Mumbai: पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांमुळे मनुष्यहानी होणे ही दुर्देवी घटना आहे. यावर दीर्घ व तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील. या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी 200 पिंजरे तातडीने लावण्यात येतील. आणखी एक हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करण्यात येणार आहेत. या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे तातडीने स्थलांतर करण्यात येईल. तसेच बिबट्यांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी सॅटेलाईट आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ‘अर्लट’ देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांच्या मानवावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज वनमंत्री श्री. नाईक यांनी मंत्रालयात बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, प्रवक्ते वसंतराव जाधव, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्यासह विविध लोकप्रतिनीधी तसेच वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) एम. श्रीनिवास राव, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे आदी उपस्थित होते. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा पोलीस प्रमुख संदीप सिंग गिल हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. वनमंत्री नाईक म्हणाले की, जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी व हल्ल्याच्या घटना घडू नयेत, यासाठी दीर्घ व अल्पकालीन उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील. युद्धपातळीवर या परिसरात वन विभागांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल. केंद्र शासनाच्या परवानगीने या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे स्थलांतर वनतारा, इतर राज्यात किंवा ज्यांना अधिकार आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सोय उपलब्ध आहे, तेथे पाठविण्यात येतील. वनाशेजारील शेतीला व गोठ्यांना विद्युत तारांचे कुंपण लावणे, एआयच्या माध्यमातून बिबट्यांची हालचालीची माहिती नागरिकांना कळविणे, शेतीला दिवसा पूर्ण ताकदीने वीज पुरवठा करणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना आज देण्यात आल्या आहेत. तसेच या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून तातडीने 200 पिंजरे खरेदी करण्यात येतील. त्याशिवाय वन विभागाच्या निधीतून आणखी 1 हजार पिंजरे तातडीने खरेदीसाठी 10 कोटींचा निधी देण्याचे निर्देश देण्यात आले असून आहेत. वन विभागाला लागणारी वाहने, पिंजरे व इतर साहित्य तातडीने पुरविण्याचे व त्यासाठी लागणारा निधी देण्याचे निर्देश श्री. नाईक यांनी यावेळी दिले. नागरिकांच्या जिवीताचा प्रश्न असल्याने यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता पडू न देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या परिसरातील बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता मिळण्यासाठी सर्वपक्षीय नेते व वन अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय वन मंत्री यांच्या भेटीसाठी घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या काही दिवसात या परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना आहे. कालच्या घटनेनंतर वन विभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. या बिबट्याचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच या घटनास्थळी भेट देऊन लोकप्रतिनीधींबरोबर चर्चा करण्यात येईल, अशी माहितीही श्री. नाईक यांनी यावेळी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं बिगुल वाजणार? 31 जानेवारीपूर्वी मतदान? आज 4 वाजता आयोगाची पत्रकार परिषद

0
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आज दुपारी चार वाजता एका महत्त्वाच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करणार आहे. ही पत्रकार परिषद राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांशी संबंधित असणार आहे. या परिषदेत निवडणुका कधीपर्यंत जाहीर केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. यासोबतच ३२ जिल्हा परिषदा आणि २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रमही या पत्रकार परिषदेत जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२५ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत आयोगाकडून निवडणूक कार्यक्र माचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाण्याची अपेक्षा आहे. ही घोषणा महाराष्ट्राच्या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे