पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर
Newsworldmarathi Pune: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. एकूण ७३ गटांपैकी अनुसूचित जातीसाठी ७, अनुसूचित जमातीसाठी ५ आणि नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी १९ गट राखीव ठेवण्यात आले आहेत, त्यापैकी १० जागा महिलांसाठी आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ गट राखीव असून त्यापैकी २० गट महिलांसाठी राखीव आहेत. विविध प्रवर्गांनुसार सदस्यपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव गट
• इंदापूर – ७१ लासुरने
• इंदापूर – ७० वालचंदनगर
• बारामती – ६१ गुणवडी
• हवेली – ४१ लोणीकाळभोर
अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव गट
• जुन्नर – ८ बारव
• जुन्नर – १ डिंगोरे
• आंबेगाव – ९ शिनोली
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी राखीव गट
• खेड – २२ कडूस
• बारामती – ६० सुपा
• हवेली – ४० थेऊर
• शिरूर – १५ न्हावरा
• जुन्नर – ४ राजुरी
• जुन्नर – ६ नारायण
• जुन्नर – २ ओतूर
• पुरंदर – ५३ नीरा शिवतक्रार
• जुन्नर – ५ बोरी बुद्रुक
• इंदापूर – ६७ पळसदेव
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव गट
• हवेली – ३७ पेरणे
• वेल्हे – ५५ वेल्हे बुद्रुक
• खेड – २५ मेदनकरवाडी
• मुळशी – ३६ पिरंगुट
• शिरूर – २० मांडवगण फराटा
• दौंड – ४९ यवत
• आंबेगाव – १३ अवसरी बुद्रुक
• भोर – ५६ वेळू
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव गट
• खेड – २३ रेटवडी
• दौंड – ४७ पाटस
• बारामती – ६३ वडगाव निंबाळकर
• शिरूर – १९ तळेगाव ढमढेरे
• इंदापूर – ६९ निमगाव केतकी
• मावळ – ३१ खडकाळे
• आंबेगाव – ११ कळंब
• दौंड – ४४ वरवंड
• शिरूर – १८ शिक्रापूर
• आंबेगाव – १० घोडेगाव
• मावळ – ३० इंदुरी
• हवेली – ४२ खेड शिवापूर
• खेड – २६ पाईट
• इंदापूर – ६६ भिगवण
• शिरूर – १६ रांजणगाव गणपती
• खेड – २८ कुरुळी
• मावळ – ३३ सोमाटने
• इंदापूर – ७३ बावडा
• पुरंदर – ५० गराडे
• हवेली – ३८ कोरेगाव मुळ
जयराज ग्रुपचे संचालक डॉ.राजेश शहा यांना अमेरिकेच्या बर्लिंग्टन स्टेट विद्यापीठाची डि.लीट पदवी प्रदान
Newsworldmarathi Pune: पुण्यातील सुप्रसिद्ध व्यापारी, जयराज ग्रुपचे संचालक तसेच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य इत्यादी सर्वच क्षेत्रात अग्रस्थानी असलेले व्यक्तिमत्व, अन्नधान्याच्या व्यवसायात पंचक्रोशीमध्ये बासमती किंग म्हणून ओळख असलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.राजेश शहा यांना अमेरिकेतील नावाजलेल्या बर्लिंग्टन स्टेट विद्यापीठ, यूएसए’ कडून सामाजिक उद्योजकतेतील मानद डि.लीट ( बिझनेस मॅनेजमेंट अँड सोशल वर्क) विथ गोल्ड मेडल पुरस्काराने दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.
दिल्ली येथे सदर पदवी प्रदान सोहळ्या प्रसंगी बर्लिंग्टन स्टेट विद्यापीठच्या प्रतिनिधींनी बोलतांना डॉ.राजेश शहा यांना उद्देशून म्हंटले की, “आपल्या सामाजिक उद्योजकतेच्या क्षेत्रातील आपले अद्वितीय योगदान प्रेरणादायी ठरले आहे. मानवी जीवन व विविध समुदायांमधील परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपले प्रयत्न मोलाचे आहेत. डि.लीट पुरस्कार आपल्या नाविन्यपूर्ण आणि प्रभावी उपक्रमाद्वारे सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीला आम्ही समर्पीत करीत आहोत.
व्यवसायात एक उंची गाठली असली तरी डॉ.राजेश शहा हे सामाजिक क्षेत्रात कायमच अग्रेसर असतात. त्यांच्याच प्रयत्नांतून पुणे येथे भारतातील पहिलेच भव्य दिव्य असे गुजरात भवन – जयराज स्पोर्ट्स & कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे. त्याच्याच बाजूला गेल्या चार वर्षांपूर्वी PGKM विद्याधाम ही अत्याधुनिक सोयी सुविधा व क्रीडांगण असलेली बॅगलेस व डे स्कूल त्यांच्याच नेतृत्वात सुरु करण्यात आली आहे. डॉ.राजेश शहा यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळगावी पेढामली, ता. विजापूर, जिल्हा मेहसाना (गुजरात) येथे ‘कंचन-हिरा आयुर्वेदिक हॉस्पिटल व कॅन्सर रिसर्च सेंटर’ हे ६० बेड्सचे अत्याधुनिक हॉस्पिटल बांधले आहे. त्या ठिकाणी अत्यल्प किंवा मोफत दरात रुग्णांवर उपचार केले जातात.
आतापर्यंत डॉ.राजेश शहा यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे , त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन नुकतेच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी (पी.एचडी) देऊन सन्मानित केले आहे तसेच प्रतिष्ठित अशा फेअर बिझनेस प्रॅक्टीसेस करीता देण्यात येणाऱ्या जमनालाल बजाज पुरस्काराने तीन वेळा सम्मानित करण्यात आले आहे. याशिवाय समाजरत्न, आदर्श व्यापारी त्याचबरोबर जीवनगौरव पुरस्कार, व्यापार भूषण, राष्ट्रिय ऐकता पुरस्कार, कर्मवीर पुरस्कार, बेस्ट बिसनेसमॅन पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील सुप्रसिध्द उपक्रम लाडू-चिवडा चे ते जनक असून या उपक्रमासह डॉ.राजेश शहा यांचे गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदले आहे.
डॉ.राजेश शहा हे दि पूना गुजराती केळवणी मंडळ व या नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचे चेअरमेन आहेत. तसेच ते एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल चे अध्यक्ष असून श्री पूना गुजराती बंधु समाज या ११० वर्षे पासून कार्यरत संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. पुना मर्चंट चेंबरचे सुवर्ण महोत्सवी वर्षाततील अध्यक्ष, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे महासचिव या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिशयन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) चे गेल्या २५ वर्षांपासून वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत. त्याचबरोबर जनसेवा फाऊंडेशन चे खजिनदार म्हणून ही ते कार्यरत आहेत. याशिवाय अनेक संस्थांच्या विविध पदांवर डॉ.राजेश शहा कार्यरत आहेत.
दिल्ली येथे सदर पदवी प्रदान सोहळ्या प्रसंगी बर्लिंग्टन स्टेट विद्यापीठच्या प्रतिनिधींनी बोलतांना डॉ.राजेश शहा यांना उद्देशून म्हंटले की, “आपल्या सामाजिक उद्योजकतेच्या क्षेत्रातील आपले अद्वितीय योगदान प्रेरणादायी ठरले आहे. मानवी जीवन व विविध समुदायांमधील परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपले प्रयत्न मोलाचे आहेत. डि.लीट पुरस्कार आपल्या नाविन्यपूर्ण आणि प्रभावी उपक्रमाद्वारे सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीला आम्ही समर्पीत करीत आहोत.
व्यवसायात एक उंची गाठली असली तरी डॉ.राजेश शहा हे सामाजिक क्षेत्रात कायमच अग्रेसर असतात. त्यांच्याच प्रयत्नांतून पुणे येथे भारतातील पहिलेच भव्य दिव्य असे गुजरात भवन – जयराज स्पोर्ट्स & कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे. त्याच्याच बाजूला गेल्या चार वर्षांपूर्वी PGKM विद्याधाम ही अत्याधुनिक सोयी सुविधा व क्रीडांगण असलेली बॅगलेस व डे स्कूल त्यांच्याच नेतृत्वात सुरु करण्यात आली आहे. डॉ.राजेश शहा यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळगावी पेढामली, ता. विजापूर, जिल्हा मेहसाना (गुजरात) येथे ‘कंचन-हिरा आयुर्वेदिक हॉस्पिटल व कॅन्सर रिसर्च सेंटर’ हे ६० बेड्सचे अत्याधुनिक हॉस्पिटल बांधले आहे. त्या ठिकाणी अत्यल्प किंवा मोफत दरात रुग्णांवर उपचार केले जातात.
आतापर्यंत डॉ.राजेश शहा यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे , त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन नुकतेच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी (पी.एचडी) देऊन सन्मानित केले आहे तसेच प्रतिष्ठित अशा फेअर बिझनेस प्रॅक्टीसेस करीता देण्यात येणाऱ्या जमनालाल बजाज पुरस्काराने तीन वेळा सम्मानित करण्यात आले आहे. याशिवाय समाजरत्न, आदर्श व्यापारी त्याचबरोबर जीवनगौरव पुरस्कार, व्यापार भूषण, राष्ट्रिय ऐकता पुरस्कार, कर्मवीर पुरस्कार, बेस्ट बिसनेसमॅन पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील सुप्रसिध्द उपक्रम लाडू-चिवडा चे ते जनक असून या उपक्रमासह डॉ.राजेश शहा यांचे गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदले आहे.
डॉ.राजेश शहा हे दि पूना गुजराती केळवणी मंडळ व या नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचे चेअरमेन आहेत. तसेच ते एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल चे अध्यक्ष असून श्री पूना गुजराती बंधु समाज या ११० वर्षे पासून कार्यरत संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. पुना मर्चंट चेंबरचे सुवर्ण महोत्सवी वर्षाततील अध्यक्ष, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे महासचिव या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिशयन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) चे गेल्या २५ वर्षांपासून वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत. त्याचबरोबर जनसेवा फाऊंडेशन चे खजिनदार म्हणून ही ते कार्यरत आहेत. याशिवाय अनेक संस्थांच्या विविध पदांवर डॉ.राजेश शहा कार्यरत आहेत. lAS रुबल अग्रवाल यांची कमाल; मुंबईत ‘मुंबई वन’ ॲपची धमाल
Newsworldmarathi Pune: राज्याच्या वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्थेत कोणत्याही पदाच्या खुर्चीत असल्या तरीही; धडाकेबाज निर्णय आणि त्यांची परिणामकारक अंमलबजावणी करणाऱ्या महामुंबई मेट्रोच्या ‘मॅनेजिंग डायरेक्टर’ (एमडी) रुबल अग्रवाल यांच्या पुढाकारातून तयार झालेले ‘मुंबई वन’ अॅप मुंबईकरांनी अक्षरशः डोक्यावरच घेतले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करणाऱ्या तब्बल दीड लाख मुंबईकांनी पहिल्या तीन-साडेतीन दिवसांतच ‘मुंबई वन’ अॅप डाऊलोड करून हे अॅप नंबर वन ठरणार असल्याचे दाखवून दिले आहे. या अॅपमुळे आपोआप मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होऊन महसुलातही भर पडत आहेत. त्यामुळे हे मुंबई वन मेट्रोसाठी दुहेरी फायदा देणार, हे निश्चित आहे.
मुंबई शहरासह उनपगरांमध्ये विशेषतः ‘एमएमआरडीए’च्या हद्दीत नागरीकरण झपाट्याने विस्तारत असून, परिणामी वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडी नेहमीचच झाली आहे. यावर उपाय भ्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आणि सुरळीत करण्यावर सरकारी यंत्रणांचा भर आहे. त्यात, मेट्रोचे जाळे वाढवून ही सेवा सर्वत्र पुरविण्याचा प्रयत्न आहे. मुंबईसह पाच महापालिकांच्या हद्दीतील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा एका ‘मुंबई वन’ अॅपवर आणली आहे. मेट्रोसह मुंबई, उपनगरांमधील लोकल, मुंबईतील बेस्ट आणि इतर महापालिकांकडील बससेवा यांना हे अॅप जोडले आहे. त्यातून प्रवाशांना ऑनलाइन तिकीट सेवा उपलब्ध देत, रुबल अग्रवाल यांच्या पुढाकारातून महामुंबई मेट्रोने ‘मुंबई वन’ विकसित केले आहे.
या अॅपमुळे मेट्रो, लोकल, बसचे तिकीट बुक करता येणार आहे. या योजेनमुळे मुंबईकरांमध्ये उत्साह असून, अशा प्रकारे पहिल्यांदाच डिजिटल तिकीट मिळत असल्याने दर तासाला किमान दोन ते अडीच हजार मुंबईकर हे अॅप डाऊनलोड करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अॅपचे लाँचिंग शुक्रवार होताच, पहिल्या आठ तासांत तब्बल ३५ हजार मुंबईकरांनी अॅप घेतले. त्यानंतर हे आकड्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन, गेल्या साडेतीन दिवसांत सुमारे दीड लाख लोकांनी मुंबई वन आपले घेतले आहे. पुढच्या वर्षेभरात तब्बल ५० लाख मुंबईकरांच्या हातात हे अॅप असेल, असा दावा महामुंबई मेट्रोचा आहे. त्यामुळे मुंबईत या अॅपचा जलवा राहणार, हे नक्की.
अॅपचा फायदाच फायदा…
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा यंत्रणांचा प्रयत्न आहे. परंतु, गेल्या काही वर्षात या वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करीत असताना, प्रवाशांना जोडून ठेवणारी प्रभावी सुविधा नव्हती. मात्र, महामुंबई मेट्रो आणि रुबल अग्रवाल यांच्या प्रयत्नातून ‘मुंबई वन’ चा प्रभावी पर्याय प्रवाशांना मिळाला आहे. त्यामुळे बेस्ट आणि लोकलच्या प्रवाशांनाही ही सुविधा वापरता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होईल. विनातिकिट प्रवास करणाऱ्यांना चाप बसेल. दुसरीकडे मेट्रो आणि इतर वाहतूक व्यवस्थेचा महसूल वाढून आर्थिक स्थिरता येण्यास मदत होईल.
मुंबई वन अॅप लोकांना सहजरित्या वापरता यावे, विशेषतः त्यातील ज्या काही सेवा आहेत, त्यांच्या वापरासाठी मेट्रोने ‘वायफाय’ची व्यवस्था केली आहे. त्यामुळे अॅप हाताळण्यात कोणत्याही अडचणी राहणार नाही, याची काळजी घेतली आहे.
कार्यसिद्धी महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Newsworldmarathi Pune: आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गिरिराज तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून हे भव्य शिबिर महानगरपालिका मैदान, मोहननगर, धनकवडी येथे भरविण्यात आले आहे. या आरोग्य शिबिराच्या पहिल्या दिवशी सुमारे पाच हजार नागरिकांनी आरोग्य तपासणी सेवेचा लाभ घेतला.
दोन दिवसीय या शिबिरात पुणे, मुंबई आणि नाशिक येथील नामांकित रुग्णालये व तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले आहेत. शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे आद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून होणारी तपासणी, तसेच सर्वच विभागांतील समग्र आरोग्यसेवा हे आहे. आज दुपारी सुमारे १२ वाजता या शिबिराचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री व विधानसभेचे सदस्य प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते, तसेच चिंचवड विधानसभा सदस्य शंकर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
सावंत म्हणाले, आरोग्य क्षेत्रात मंत्री म्हणून काम करताना अनेक योजना राबविल्या, परंतु समाजाशी निगडित अशा लोकहितकारी उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवणे ही खरी लोकसेवा आहे. नगरसेवक किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा उपक्रमांद्वारे लोकांना आरोग्याचा लाभद्यावा. या वेळी माजी आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक विजय रेणुसे, विशाल तांबे, किशोर ऊर्फ बाळा धनकवडे, अभिजित कदम, आप्पा परांडे, श्रद्धा परांडे, शंकर कडू, कमल व्यवहारे, दिगंबर डवरी, मिलिंद पन्हाळकर, रेऊ गाडेकर, रावसाहेब कुंजीर उपस्थित होते.
या शिविराच्या माध्यमातून नागरिकांना हृदयरोग, डोळे, दंत, हाडे, मधुमेह, रक्तदाब, स्त्रीरोग, त्वचारोग, कॅन्सर तपासणी, नेत्र तपासणी अशा विविध विभागांतील मोफत सेवा दिल्या जात आहेत. तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी संदर्भपत्रे व सल्लाही देण्यात येत आहे. दक्षिण पुणे परिसरातील नागरिकांनी या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आरोग्य जनजागृतीचा संदेश पुढे नेला असून, सामाजिक बांधिलकीतून उभा राहिलेला हा आरोग्याचा महायज्ञ सर्वानि यशस्वी ठरत असल्याचे मत गिरिराज सावंत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय घोळवे यांनी तर मान्यवरांचे व नागरिकांचे आभार कुमार पाटील यांनी मानले.
किलीमंजारो च्या यशाने वयाच्या मर्यादेवर मात
Newsworldmarathi Pune: माऊंट किलीमंजारो हे शिखर टांझानिया या आफ्रिकेतील देशात आहे. या शिखराची उंची ५८९५ मीटर आहे. हे आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे. हे जगातील सर्वोच्च फ्री स्टॅंडिंग शिखर आहे. याच्या आजूबाजूला कुठलेही दुसरे शिखर नाही. हे शिखर लाव्हारसापासून बनलेले आहे.
सेवन समीट्स मधील हे एक शिखर आहे. त्यामुळे जगभरातून या शिखराच्या चढाईसाठी लोक येत असतात. गिर्यारोहक, ट्रेकर्स, टुरिस्ट असे सगळे या शिखराच्या चढाईचा आनंद घेण्यासाठी येतात. या वर्षी आम्ही द अल्पायनिस्ट संस्थेची टीम एव्हरेस्टवीर भगवान चवलेंच्या मार्गदर्शना खाली या शिखरावर जायचे ठरले. ५ सप्टेंबर ला १३ जणांच्या टीमने माऊंट किलीमंजारो च्या दिशेने प्रस्थान केले.
सुरुवातीची केनिया एअरलाईन्स ची तिकिटे काढली होती, पण ते विमान रद्द झाल्यामुळे इथिओपियन एअरलाईन्स च्या विमानाचे तिकीट काढले. खुप छान ही एअरलाईन्स आहे. मुंबई वरून सकाळी ११ वाजता आम्ही निघालो. साडेपाच तासांच्या प्रवासानंतर आम्ही इथिओपियातील अदीस अबाबा येथे पोहोचलो. येथे २ तासांचा लो-ओव्हर होता. यानंतर पुढे दिड तासांचा विमान प्रवास करून आम्ही किलिमंजारो येथे पोहोचलो. यलो फिवर चे वॅक्सिन येथे येण्यासाठी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी २ महिने अगोदर ची अपॅाइंटमेंट सरकारी दवाखान्यात घ्यावी लागते.
इमिग्रेशन ची सगळी प्रोसेस करून आम्ही बाहेर पडलो. आमचा गाईड चुवा आम्हाला न्यायला आलाच होता. मोशी मधील पनामा हॅाटेलवर आमची राहण्याची सोय केलेली होती. येथे जाण्यासाठी सगळी तयारी इकडूनच करून जायचे. त्यामुळे वेळ वाचतो. संध्याकाळी सगळ्यांचे ब्रिफिंग झाले. सर्व तयारी झालेली होतीच. दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा करून आमची टीम तयार झाली. आमच्या टीम मधे सर्वात कमी वयाची १२ वर्षांची युगा खवले ही ट्रेकर तर सुहास लुंकड काका ६८ वर्षांचे तर दिलीप पालवे काका ६४ वर्षांचे होते.
युगाचे आई बाबा पण या शिखराच्या चढाईसाठी तिच्या सोबत आलेले होते. आपल्या मुलीच्या स्वप्नासाठी झटणारे हे आई-वडिल होते. मचामे गेट या वाटेने आम्ही जाणार होतो. ७ दिवसांची ही वाट आहे. या शिखरावर चढाईसाठी ६ मार्ग आहेत तर ऊतरण्यासाठी माऊका गेट चा वापर करतात. तुम्ही कुठल्याही गेट ने जावा पण तुमची संपुर्ण तपासणी प्रत्येक गेट वर होते. तुम्ही नेलेला सर्व कचरा परत खाली येताना संपुर्ण बरोबर घेऊन यावा लागतो.
येथे स्वच्छता म्हणजे कमालीची आहे. शेकडो ने लोक या शिखरावर येतात पण कुठेही तुम्हाला कचरा केलेला नाही. कॅंप लावायच्या जागा फिक्स आहेत. प्रत्येक कॅंपवर पोहोचल्यावर तुम्हाला तेथील फॅारेस्ट च्या ॲाफिसमधे नोंद करावी लागते. सगळ्यांच्या बॅगा निघताना चेक केल्या जातात. काहीही संशयास्पद गोष्ट घेऊन जाण्यास परवानगी नाही.
आमचा रूट हा मचामे रूट होता. त्यामुळे मचामे गेट पासून आमचा ट्रेक सुरू झाला. अप्रतिम सृष्टी सौंदर्याने हा रूट सजलेला आहे. पहिल्या दिवशी ११ किमी चा ट्रेक करून आम्ही मचामे कॅंप ला मुक्कामी गेलो. साधारणतः २८०० मीटरवर हा कॅंप लागतो. ट्रेक सुरू होताना येथे खुप फॅारमॅलिटीज असल्यामुळे ट्रेक सुरू व्हायला दुपारचे २ वाजून गेले, त्यामुळे मचामे कॅंप ला आम्हाला पोहोचायला ७ वाजून गेले. हा रूट म्हणजे सृष्टीसौंदर्याचे अप्रतिम रूप होय. इतकं सुंदर जंगल जणू मी ॲमेझॅान च्याच जंगलात आहे की काय असे वाटत होते. रेन फॅारेस्ट चे हे जंगल आहे.
टांझानिया देशाचे लोकेशन विषुववृत्तीय प्रदेशात येत असल्यामुळे येथे पाऊस पण दोन वेळा असतो. सप्टेंबर शेवटी पाऊस सुरू होतो तो डिसेंबर अखेर बंद होतो तर मार्च ते में असा पुन्हा पाऊस असतो. त्यामुळे जंगल सुरेख वाढले आहे. टुरिझम वरतीच येथे व्यवसाय असल्यामुळे येथे किलीमंजारो आणि मेरू शिखरांवर गिर्यारोहण मोहिमा होतात तर जंगल सफारी फार प्रसिध्द आहेत. पहिल्या दिवशी जंगलामधे २ वेगवेगळ्या प्रकारची माकडे दिसली. काळ्या रंगाची आणि अंगावर मोठे केस असणारी. २ रा मुक्काम आमचा शिरा कॅंपला होता. शिरा कॅंप ३८०० मीटरवर आहे.
सकाळी आठ वाजता आम्ही निघालो, दुपारी दोन वाजता आम्ही येथे पोहोचलो. आरामात ६ तासांत आम्ही येथे आलो. अक्लमटायझेशन साठी आम्ही खुप सावकाश चालत होतो. सर्व कॅंपवर वायफाय कनेक्टिविटी येथे आहे. या ठिकाणी जो कावळा आढळतो तो आकाराने फार मोठा आहे. मानेवर आणि पोटाला पांढरा पट्टा असतो. तिसऱ्या दिवशी आम्ही लोवा टॅावर ४६०० मीटर पर्यंत चढाई केली. तेथे दुपारचे जेवण घेऊन परत खाली बरांको कॅंप ला ४००० मीटर पर्यंत उतरलो. येथे संध्याकाळी सोबत आणलेली कल्याण भेळ खाल्ली. त्यामुळे शरीरातील र फार छान अक्लमटाईझ झालो. हा संपुर्ण रूट खुपच सुंदर आहे.
विविध प्रकारची सुंदर फुले आणि झुडपे येथे आढळतात. एक छोटासा धबधबा या वाटेवर आहे. चवथ्या दिवशी चॅलेंज होते ते बरांका ॲालचे. खडी चढाई रॅाक फेस वरून करावी लागते. येथे चढाई दरम्यान गर्दी होते कारण सर्व पोर्टर आणि मेंबरला चढाईसाठी एकच मार्ग आहे. बरांका ॲाल चढून गेल्यावर मस्त कॅाफी साठी टेबल मांडलेला होता. एकदम भारी वाटले हा पाहुणचार पाहून. पुढे २ तासांतच आम्ही करांगा कॅंप ला पोहोचलो. करांगा कॅंप ला यायला ६ तास लागले. किलूमंजारो लाव्हा पासून बनलेला असल्यामुळे सर्व वाटेवर आणि कॅंपवर राखयुक्त माती खुप आहे.
पाचवा दिवस आम्ही बराफू कॅंप च्या दिशेने निघालो. वाटेत छान बिस्किट आणि कॅाफी साठी टेबल लावला होता. एका रिजवर बराफू कॅंप लागतो. बराफू कॅंपवर पाण्याची कुठलिही सोय नाही. पण तेथील पोर्टर खुप खालपासून येथे पाणी आणतात. आम्ही बराफू च्या ऐवजी १५० मीटर वर कोसोवो ला कॅंप लावला. यामुळे समीट साठी चढाईचा वेळ कमी लागेल हा यामागचा उद्देश होता. सगळी टीम हळूहळू येथे पोहोचली. कोसोवो कॅंप ४८७० मीटरवर आहे. येथे पोहोचताच स्नो फॅाल चालू झाला.
आज रात्रीच आम्ही समीट साठी निघणार होतो. त्यामुळे दुपारचे जेवण करून आम्ही थोडा आराम करायला गेलो. संध्याकाळी ७ वाजता जेवून आम्ही पुन्हा आराम करायला गेलो. रात्री १२ वाजता आमची आवराआवर सुरू झाली. सोबत थोडं स्नॅक्स, गरम पाणी घेऊन आम्ही एका रांगेत पुढे निघालो. छोटी युगा ला थोडी जास्तच थंडी वाजत होती. मधे मधे रडत होती, पण तिने जिद्द सोडली नाही. समीट साठी सर्व वाटेवरचे ट्रेकर्स येथून पुढे याच रूटवर येतात त्यामुळे खुप गर्दी येथे जाणवते.
जरी ५९०० मीटरचे शिखर असले तरी या शिखरासाठी तयारी चांगली करावी लागते. वाटेत कोणाला तरी अल्टीट्युड चा त्रास झाला म्हणून गाईड त्याला पकडून खाली आणताना दिसतात. शेवटची चढाई संपतां संपत नाही. सुरुवातीला खडी चढाई संपल्यावर आपण स्टेला पॅाईंट ला पोहोचतो. येथे पोहोचलो की समीट पुढे तासभर अंतरावर आहे. येथून सुर्योदय पाहण्याचा जो आनंद आहे तो फक्त डोळ्यांत साठवू शकतो. शब्दात व्यक्त करू शकत नाही. समीटवर बर्फ आहे. पण चालून चालून वाट पडलेली असते त्यामुळे ट्रेकिंगच्या बुटावर शिखरमाथा गाठता येतो.
समीट रिज खुप मोठी आहे. वाऱ्यामुळे येथे बर्फाचे खुप छान आकाराचे छोटे छोटे सुळके तयार झाले आहेत. सकाळी ७ वाजता तेजोमय सुर्यकिरणांच्या साक्षीने समीटवर पाऊले पडली होती. सगळीकडे वातावरण खुपच छान दिसत होते. ढगांची चादर सर्वत्र पसरलेली होती, जणू काही आम्ही त्या ढगांच्या चादरी वरूनच चालत होतो. इतका सुंदर परिसर आजपर्यंतच्या हिमालयीन मोहिमांत खुपच कमी वेळा पाहायला मिळाला. आमच्यातील ११ जणं समीटवर यशस्वी चढाई करू शकले. छोटी युगा खवले १२ वर्षांची तर दिलिप पालवे काका ६४ वर्षांचे होते.
पालवे काकांनी बर्गमॅान आयर्नमॅन पण केलेले होते. जवळ जवळ तासभर आम्ही समीटवर होतो. मनमुराद फोटो आणि व्हिडिओ पण काढले. युगा ने तर छत्रपती शिवाजी महाराजांची गारद पण समीटवर दिली. यानंतर आम्ही सर्व जण हळूहळू खाली उतरायला सुरूवात केली. मग माझ्यातील ट्रेल रनर जागा झाला. तसाही मी या मोहिमेच्या १ आठवडा अगोदर लद्दाखमधे २ शिखरे समीट करून आलेलो असल्यामुळे फुल अक्सयटाईज होतो. त्यामुळे स्टेला पॅाईंट पासून पळत कोसोवो कॅंप पर्यंत आलो. एक वेगळाच अनुभव घेतला. पण ५८०० मीटरवर पळणे इतकं सोपं नसंत हेही कळले.
आपल्याच शरीरावर वेगवेगळे प्रयोग करण्याची तशीही मला जास्तच खाज असते. पण मजा येते. ११ वाजेपर्यंत सर्व टीम खाली सुखरूप पोहोचली. जवळ जवळ १० तास लागले होते समीट कॅंप ते समीट आणि पुन्हा समीट कॅंप वर यायला. जेवण करून आम्ही पुढे मुक्कामी MNKA high camp ला निघालो. संध्याकाळी ५ पर्यंत आम्ही येथे पोहोचलो. उतराई एकदम उताराची आहे. सातव्या दिवशी मोइका गेटवर आम्हाला उतरायचे होते. एका दिवसांत खुप जास्त उतरायचे होते. उतरताना सगळे रेन फॅारेस्ट आहे. दाट जंगलातून उतरताना खुपच भारी वाटत होते.
मोइका गेटच्या अगोदर शिखरावरून आणलेला सगळा कचरा गोळा करण्यासाठी एक जागा आहे. येथे सगळा कचरा मोजून धावा लागतो. सगळे खाली उतरल्यावर तुम्हाला समीटचे सर्टिफिकेट मिळते. या मोहिमेत एकूण १३ जणं सहभागी झाले होते. मोहिमेचा नेता अनुभवी आणि कसलेला गिर्यारोहक श्री भगवान चवले, न्रिपेन गोगोई, रविंद्र सराफ, निखिल गद्रे, संतोष सावंत, किर्ती ओसवाल, दिलीप पालवे, युगा खवले, तोषल खवले, हेमलता खवले, सीमा मेहेंदळे, सुहास लुंकड आणि शंकर फडतरे. वेगवेगळ्या वयातील, वेगवेगळ्या क्षेत्रातील हा समन्वय होता.
मोशीत समीट चे सेलिब्रेशन केले. पुढे आफ्रिकेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सफारी. काही जणांनी १ दिवसांची सफारी केली तर काही जणांनी ४ दिवसांची सेरेनगेटी राष्ट्रीय उधानाची सफारी केली. किती प्राणी, किती पक्षी, काय ते सौंदर्य, हे सगळे पाहून मन तृप्त होऊन जाते. बाजूला जिराफ उभा असतो, सिंह, चित्ता तुमच्या गाडीच्या बाजूने येऊन बोनेटवर सुध्दा ऊभा राहून तुम्हाला सलामी काय देतो. शहामृग, झेब्रा, हत्ती, रानडुकरे यांचे कळपच्या कळपच सर्वत्र दिसतात. ही जंगल सफारी म्हणजे डोळ्यांचे पारणे फिटणे होय. टीव्हीवर डिस्कव्हरी मधे हे सगळे प्राणी पाहणे आणि स्वतः च्या उघड्या डोळ्यांनी हे सौंदर्य पाहणे यात जमीन अस्मान चा फरक आहे हे येथे गेल्यावर कळते. किलीमंजारो पुन्हा पुन्हा खुनावत राहणार यात शंका नाही.
अनुभव कथनः-
एव्हरेस्टववीर भगवान चवले, गिर्यारोहक
आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ युवा फाउंडेशनचा उपक्रम
Newsworldmarathi Pune: भारतीय जनता पार्टी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ युवा फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हे शिबिर आज कात्रज भाजी मंडई येथे संपन्न झाले. नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित या शिबिरात विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या.
या शिबिरात रक्तातील सर्व घटकांची तपासणी, रक्तदाब, साखर, कोलेस्टेरॉल, तसेच डोळ्यांची तपासणी (मोतीबिंदू व काचबिंदू) अशा विविध चाचण्यांचा समावेश होता. महिलांसाठी विशेषतः स्तन कर्करोग तपासणी करण्यात आली. याशिवाय दातांची तपासणी, सफाई, पॉलिश आणि सिमेंट फिलिंग या सेवा देखील मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.
या सर्व तपासण्या नागरिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य देण्यात आल्या. तपासणीचे रिपोर्ट राणीताई भोसले जनसंपर्क कार्यालय, बालाजीनगर, पुणे-४३ येथे मिळणार आहेत.
या उपक्रमात पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि भारतीय जनता पार्टीच्या शहर उपाध्यक्षा राणी रायबा भोसले तसेच रायबा भोसले (संस्थापक, राजगड ग्रुप) यांच्या पुढाकाराने शिबिर यशस्वीपणे पार पडले.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढून सामाजिक बांधिलकीचा संदेश दृढ झाला.
स्त्री शक्ती फाउंडेशनच्या प्रशिक्षण बॅचचा उत्साहात समारोप; संध्या टिळेकर यांचा कौतुकास्पद उपक्रम
Newsworldmarathi Pune : “स्त्री शक्ती फाउंडेशन” आयोजित रांगोळी, आरी वर्क, कुकिंग आणि बेकिंग या प्रशिक्षण बॅचचा समारोप समारंभ उत्साहात पार पडला. स्वतःच्या मेहनतीवर उभं राहण्याचा संकल्प केलेल्या या महिला आता स्वावलंबनाच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करत आहेत.
“स्वावलंबी महिला, सक्षम समाज” हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेला हा उपक्रम आज खऱ्या अर्थाने फळाला आला आहे, असे स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा संध्या योगेश टिळेकर यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, या प्रशिक्षणाद्वारे महिलांनी केवळ कौशल्य मिळवले नाही, तर आत्मविश्वास, धैर्य आणि आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण केली आहे.
या उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांनीही आपले अनुभव मांडताना सांगितले की, या प्रशिक्षणामुळे त्यांना केवळ हाताला कामच मिळाले नाही, तर समाजात स्वतःचं स्थान निर्माण करण्याची ताकद मिळाली आहे.
संध्या टिळेकर यांनी स्त्री शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. फाउंडेशनकडून महिलांसाठी शिवणकाम, आरी वर्क, रांगोळी, पाककला, मेकअप, बेकिंग यांसारख्या विविध कौशल्यविकास उपक्रमांचे आयोजन नियमितपणे केले जाते.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेले हे प्रयत्न समाजातील इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहेत. आत्मनिर्भरतेच्या मार्गावर चालणाऱ्या या महिलांनी आज नव्या उमेदीने आणि आत्मविश्वासाने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अशा उपक्रमांमुळे “स्त्री शक्ती फाउंडेशन” हे नाव महिलांच्या प्रगतीचा आणि सामाजिक सक्षमीकरणाचा पर्याय बनले आहे.
पुणे पत्रकार प्रतिष्ठानकडून पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ हजारांची मदत
Newsworldmarathi Pune: मराठवाड्यासह सोलापूर, नांदेड अन्य जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरग्रस्तांसाठी पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्यावतीने ५१ हजारांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे मदतींचा धनादेश करण्यात सुपूर्द करण्यात आला.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीने सोलापूर, मराठवाडा, नांदेड अशा अनेक भागात मोठी हानी झाली आहे. जीवित व वित्तहानी मुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पुरग्रस्ताना संघटनेच्या माध्यमातून मदत व्हावी या उद्देशाने पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने ५१ हजार रुपये निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. यापूर्वी राज्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळाच्या कालावधीत पत्रकार संघाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली होती.
दरम्यान सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून पुणे पत्रकार प्रतिष्ठानने केलेल्या मदतीबद्दल जिल्हाधिकारी डुडी यांनी आभार व्यक्त केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, कार्यवाह पांडुरंग सांडभोर, खजिनदार सुनीत भावे, विश्वस्त राजेंद्र पाटील, जेष्ठ पत्रकार उमेश शेळके, मुस्तफा अत्तार, गजानन शुक्ला आदी उपस्थित होते.
मल्हार सानपने दहा वर्षाखालील टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली
Newsworldmarathi Pune: सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पी एम डी टी ए (पुणे मेट्रोपॉलिटन डिस्ट्रिक्ट टेनिस असोसिएशन) यांच्या वतीने आयोजित दहा वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मल्हार सानपने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. उपांत्य फेरीत मल्हारने आहान नारगोळकर यांच्याविरुद्ध चुरशीच्या लढतीत ५-४ (३) असा टायब्रेकमध्ये विजय मिळवला.
मल्हारने संपूर्ण सामन्यात आक्रमक खेळ आणि कौशल्य दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत मल्हारने सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत आपली प्रतिभा सिद्ध केली. अंतिम सामन्यात मल्हारकडून आणखी सरस खेळाची अपेक्षा आहे. पी एम डी टी ए आयोजित ही स्पर्धा युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ ठरत आहे.
मल्हारच्या या यशाबद्दल त्याचे प्रशिक्षक आणि सहकारी खेळाडूंनी अभिनंदन केले आहे. अंतिम सामन्यात मल्हार कोणत्या रणनीतीने खेळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी १ कोटींचा निधी
Newsworldmarathi Pune: अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट आले आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री सहायता निधी‘साठी १ कोटी रुपयांच्या धनादेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच सुवर्णयुग सहकारी बँकेसह महाराष्ट्र बांधकाम व्यावसायिक संघटना, बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन तसेच कासार सोशल ग्रुपच्या वाटीने देखील यावेळी मदतीचा धनादेश आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी बोलताना ट्रस्टचे सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने म्हणाले, “आपला शेतकरी दिवस-रात्र मेहनत करून सर्वांना अन्नधान्य पुरवतो. कोरोनासारख्या संकटातही खंबीरपणे उभा राहिलेला बळीराजा आज अतिवृष्टीच्या तडाख्याने हवालदिल झाला आहे. या संकटाच्या काळात त्याला आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि तो पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास आहे.”
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस श्री. अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सहकार्याध्यक्ष सचिन आखाडे, संघटक मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने, प्रतीक घोडके, सुवर्णयुग सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश परदेशी, कासार सोशल ग्रुपचे चंद्रशेखर रासने, तुकाराम रासने, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष नितीन देशपांडे, उपाध्यक्ष गजेंद्र पवार, मिलिंद केळकर, बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनचे शिरीष राणे, दिलीप ठोंबरे आदी उपस्थित होते.
विविध संस्थांकडून लाखोंची मदत
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’मध्ये सुवर्णयुग सहकारी बँकेकडून २५ लाख, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना पुणेच्या वतीने ५१ लाख ५१ हजार, बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन यांच्या माध्यमातून ५ लाख, कासार सोशल ग्रुप पुणेच्या वतीने १ लाख २१ हजार, श्री. विठ्ठल दिनकर बोरकर यांच्या माध्यमातून १० हजार रुपये तसेच श्री. चंद्रशेखर तुकाराम झेडगे यांच्या माध्यमातून ५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला.

