स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं बिगुल वाजणार? 31 जानेवारीपूर्वी मतदान? आज 4 वाजता आयोगाची पत्रकार परिषद

0
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आज दुपारी चार वाजता एका महत्त्वाच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करणार आहे. ही पत्रकार परिषद राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांशी संबंधित असणार आहे. या परिषदेत निवडणुका कधीपर्यंत जाहीर केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. यासोबतच ३२ जिल्हा परिषदा आणि २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रमही या पत्रकार परिषदेत जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२५ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत आयोगाकडून निवडणूक कार्यक्र माचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाण्याची अपेक्षा आहे. ही घोषणा महाराष्ट्राच्या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे

पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन झालेल्या जमिनींसाठी शेतकऱ्यांना प्रति एकर एक कोटी मोबदला मिळणार

0
Newsworldmarathi Pune: पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन झालेल्या जमिनींसाठी शेतकऱ्यांना प्रती एकरी एक कोटी रुपये भरपाई तसेच घर, गोटा, विहीर, बोरवेल, पाईपलाईन, फळझाडे, वनझाडे इत्यादी घटकांसाठी त्याच्या मूल्याच्या दुप्पट रक्कम नुकसानभरपाई दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. भूसंपादन झालेल्या सात गावांतील शेतकरी प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, “शासनाने दिनांक १७ मार्च २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उचित भरपाई, पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण या दृष्टीने २०१३ च्या भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत अधिनियमाच्या तरतुदींनुसार तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून शासकीय नियमांनुसार मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले. ही बैठक एखतपूर, खानवडी, कुंभारवळण, मुंजवडी, पारगाव, उदाचीवाडी व वनपुरी या सात गावांतील शेतकऱ्यांसमवेत घेण्यात आली. बैठकीत शेतकरी प्रतिनिधींनी विविध मागण्या मांडल्या. चारपट ऐवजी पाचपट दर मिळावा अशी मागणी केली. जिल्हा नियोजन निधीतून गावांना अधिक निधी देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा गावागावात बैठक घेण्याची सूचना केली. बाजारभावानुसार एक कोटींचा दर अपुरा असल्याचे नमूद करून अधिक भरपाईची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या भूसंपादन प्रकरणातील निर्णयाचा संदर्भ देत उच्चतम बाजारमूल्यानुसार मोबदला द्यावा, तसेच विकसित प्लॉट मालकीहक्काने देण्यात यावेत अशी मागणी केली. प्रती एकरी ज्यादा मोबदला आणि ज्यादा विकसित भूखंड मिळावा अशी मागणी केली. या सर्व मागण्यांवर जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, “नियमांच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांना अधिकाधिक न्याय मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. संमतीने भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना मिळणारे शासननिर्धारित लाभ 1️⃣ संपादित जमिनीच्या क्षेत्राच्या 10% एवढा विकसीत भूखंड औद्योगिक/वाणिज्यिक/निवासी अथवा संमिश्र प्रयोजनाकरिता त्याच क्षेत्रात वाटप करण्यात येईल. (किमान 100 चौ.मी. भूखंडाची हमी) 2️⃣ प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे घर संपादन झाले असल्यास, एरोसिटी (Aero City) मध्ये 250 चौ.मी. निवासी भूखंड मोबदला दराने दिला जाईल. 3️⃣ भूमिहीन होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना 750 दिवसांच्या किमान कृषी मजुरी इतकी रोख रक्कम त्रैमासिक हप्त्यांमध्ये दिली जाईल. 4️⃣ अल्पभूधारक ठरणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना 500 दिवसांच्या कृषी मजुरीएवढी रक्कम मिळेल. 5️⃣ घर संपादन झालेल्या कुटुंबांना 40,000 रुपयांचे स्थलांतर अनुदान दिले जाईल. 6️⃣ जनावरांच्या गोठा/शेड स्थलांतरासाठी प्रती गोठा 20,000 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाईल. 7️⃣ प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका सदस्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येईल व पात्रतेनुसार नोकरीत प्राधान्य दिले जाईल.

विचार करण्याची शक्ती गमावली तर विनाश अटळ : दीपक घैसास यांचे मत

Newsworldmarathi Pune: “विचार करण्याची शक्ती हेच माणसाचे बलस्थान आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) काळात पुढची पिढी विचार करण्याची शक्तीच ‘आउटसोर्स’ करेल, अशी भीती आहे. विचार करण्याची क्षमता गमावली तर माणसाचे अस्तित्वच राहणार नाही. त्यामुळे ही शक्ती गमावू नये‘, असे मत ज्येष्ठ उद्योजक आणि अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांनी शनिवारी व्यक्त केले. ‘मायमिरर पब्लिशिंग हाऊस’च्या वतीने मनोज अंबिके लिखित ‘कर्णपुत्र आणि जन्मरहस्य’ या पुस्तकाचे प्रकाशन दीपक घैसास यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मन:शक्ती केंद्राचे प्रमोद शिंदे, लेखक मनोज अंबिके, लक्ष्मीकांत ढापरे, प्रसाद ढापरे आणि विद्या अंबिके, या वेळी उपस्थित होत्या. घैसास म्हणाले, ‘कादंबरीच्या माध्यमातून कथा सांगणे हा एक भाग झाला. पण, या लेखनात तत्त्वज्ञान आहे. सूड भावनेने केलेल्या कर्मातून विनाश अटळ आहे. जगावरचे अटळ संकट दूर करण्याचा उद्देश असेल तर केलेले कर्म हे सत्कर्म ठरते, हे तत्त्वज्ञान अंबिके यांनी सांगितले आहे. बीजात अहंकार असतो त्यावेळी ते द्वैत रूपात असते. पण जेव्हा मातीत मिसळून माती मुल होते तेव्हा ते द्वैताकडून अद्वैताकडे जाते आणि त्याचा वृक्ष होतो. कादंबरीतील नायक सुवेधदेखील द्वैताकडून अद्वैताकडे प्रवास करत आहे. कादंबरीत प्रत्येक प्रकरणात अगदी चिमटी चिमटीने लेखकाने तत्त्वज्ञान मांडले आहे. आजच्या राजकारणात इंद्राची झलक पाहायला मिळते कारण त्यांच्यात सतत भीती असते. आपली सत्ता कोणी काबीज करेल हे भय त्यांच्या मनात असते. धाराशिवमधील मुलांना पाहतो तेव्हा त्यांच्यात शंकराचे प्रतीक मला जाणवते. कारण त्यांच्याकडे काहीही नसते तरी ते शांत आणि आनंदी असतात. नारायण मात्र त्याच्याकडे सर्वकाही असूनही शांत आणि आनंदी आहे ही त्याची प्रवृत्ती आहे. त्याच नारायणाचं तत्त्वज्ञान लेखकाने मांडलं आहे. कोहम प्रश्न विचारल्यानंतर सोहम उत्तर मिळते तेव्हा आत्मज्ञान प्राप्त होतं. कादंबरीतील सुवेधही सतत कोहम प्रश्न विचारतो त्यामुळेच त्याला आत्मज्ञान होतं. व्यक्तीच्या मनात कायम द्वंद्व सुरू असते. त्याला सतत खऱ्या खोट्यातून चांगल्या वाईट यातून निवड करावी लागते. क्रोध, मत्सर बाजूला सारून जेव्हा निर्णय घेतला जातो तेव्हा तो योग्यच ठरतो, असेही विचार त्यांनी मांडले. शिंदे म्हणाले, ‘कादंबरीच्या शेवटामध्ये नव्या पुस्तकाच्या लेखनाचा आरंभ आहे. प्रारब्ध, संघर्ष आणि साहस ही लेखनाची त्रिसूत्री आहे. मानवी स्वरुपातील वैशिष्ट्य प्रत्येक पात्रामध्ये अधोरेखित होत असून, त्यामुळे वाचक रममाण होतात. कर्ण आणि त्याचे पुत्र युद्धात मारले गेले तर हा कर्णपुत्र कोण असा प्रश्न उपस्थित होतो. महाभारतामध्ये उल्लेख नसलेल्या कर्णपुत्राची माहिती या कादंबरीतून मिळते. प्रारब्ध काहीही असले तरी आपण आपले कर्म आपल्या हातात आहे. लेखक एक तत्त्वचिंतक आहे. निर्णय घेताना आपला हेतू काय आहे त्यावर त्या निर्णयाचे यश अपयश अवलंबून असते असेही ते म्हणाले. प्रसाद ढापरे यांनी प्रास्ताविक केले. मनोज अंबिके यांनी मनोगत व्यक्त केले. विद्या अंबिके यांनी आभार मानले. श्रद्धा अंबिके यांनी सूत्रसंचालन केले.

पर्वती विधानसभा मतदारसंघातील १ लाख २० हजार ५२४ दुबार नावे वगळण्याची अश्विनी कदम यांची मागणी

0
Newsworldmarathi Pune: पर्वती विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये तब्बल १ लाख २० हजार ५२४ दुबार नावे आढळल्याचा आरोप करत या नावांची तात्काळ वगळणी करण्याची मागणी पर्वती विधानसभा मतदारसंघातील अश्विनी नितीन कदम यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य निवडणूक आयुक्तांना दिलेल्या पत्रात कदम यांनी नमूद केले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाच्या अनुषंगाने पर्वती मतदारसंघात मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट नावे असल्याचे निदर्शनास आले असून, त्यांची संपूर्ण यादी आयोगाला ईमेलद्वारे पाठवण्यात आली आहे. कदम यांनी पुढे नमूद केले आहे की, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी या सर्व दुबार नावांची तपासणी करून त्यांची नावे तात्काळ वगळणी करण्यात यावी. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तातडीने निर्देश देऊन आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे पर्वती मतदारसंघातील मतदार याद्यांची विश्वसनीयता आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

यशराज टिळेकर यांची भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड

0
Newsworldmarathi Pune: भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी यशराज टिळेकर यांना मिळाली असून त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यशराज टिळेकर हे टिळेकर परिवारातील तिसऱ्या पिढीतील राजकीय कार्यकर्ते आहेत. त्यांच्या आजी श्रीमती रंजना (नानी) पुंडलिक टिळेकर या कोंढवा बुद्रुक परिसराच्या पहिल्या नगरसेविका होत्या. बालपणापासूनच त्यांनी टिळेकर परिवाराचा समाजसेवा व राजकीय प्रवास जवळून पाहिला आहे. संघ शाखेत नियमित सहभाग, संघ शिबिरात हजेरी, कॉलेजमध्ये हेड बॉय म्हणून जबाबदारी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) कार्यकर्ता म्हणून काम, कोंढवा नगर सहमंत्री आणि पुणे शहर एकलव्य संयोजक अशी विविध पदे त्यांनी समर्थपणे सांभाळली आहेत. गेल्या दोन वर्षांत विधानपरिषद सदस्य झाल्यानंतर त्यांनी भाजप संघटनेत सक्रिय काम सुरू केले आणि आता त्यांना युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे.
ही केवळ पदाची नव्हे, तर मोठ्या जबाबदारीची सुरुवात आहे. मला खात्री आहे की यशराज हे पदाच्या न्यायाने काम करतील, यशराज याने लहानपणापासून हातात घेतलेला भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन समाजसेवा करण्याची प्रतिज्ञा कायम ठेवली आहे.
योगेश टिळेकर आमदार

डॉ.संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी पुणे महिला काँग्रेस, डॉक्टर सेलचे आंदोलन

0
Newsworldmarathi Pune: फलटण मधील डॉ.संपदा मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी पुणे महिला काँग्रेस आणि डॉक्टर सेल यांच्या वतीने आज (शुक्रवारी) लाल महाल येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हकालपट्टीची मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी केले. आंदोलनात लता राजगुरु, स्नेहल पाडळे, अंजली सोलापुरे, हसीना अपा, राजश्री अडसूळ, रोहिणी मल्लाव, रेखा जैन, ॲड राजश्री आडागळे, सुविधा त्रिभुवन, आरती चव्हाण आदी महिला काँग्रेसच्या नेत्या आणि कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. फलटण येथे डॉ. संपदा मुंडे या निष्पाप, कर्तव्यनिष्ठ महिला डॉक्टरने काही अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सततच्या त्रासामुळे आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून ही थेट हत्या आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. दुर्दैव म्हणजे, घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री तत्काळ त्या ठिकाणी येऊन संबंधितांना क्लीन चिट देतात. अशी भूमिका घेतल्याने तपास प्रक्रियेवर दबाव येतो आणि पोलीस यंत्रणेचा निष्पक्षपणा धोक्यात येतो, असेही आंदोलकांनी यावेळी बोलताना सांगितले. राज्य सरकारचा तीव्र निषेधही आंदोलकांनी केला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी डॉ.मुंडे यांच्या मृत्यूबाबत सखोल चौकशी करण्याऐवजी डॉ.मुंडे यांच्या वर्तनाबाबतच संतापजनक विधाने केली आणि भाजपच्या नेत्यांना वाचवायचा प्रयत्न केला, हे धक्कादायक असून चाकणकर यांची आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी पुणे शहर महिला काँग्रेसने केली. काँग्रेस नेते आदरणीय राहुलजी गांधी अन्याय, असत्य आणि अत्याचाराविरुद्ध निडरपणे लढत आहेत, तसेच आम्हीही त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन प्रत्येक अन्यायाविरुद्ध लढत राहू, असा निर्धार महिला आंदोलकांनी व्यक्त केला. आगामी काळात महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी शहरभर मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभे केले जाईल, असे पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती शिंदे यांनी जाहीर केले.

३० जून पर्यंत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय : बच्चू कडूंच्या शिष्टमंडळासोबत राज्य सरकारची सकारात्मक बैठक

0
Newsworldmarathi Mumbai: शेतकरी कर्जमाफी आणि इतर विविध मागण्यांवर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची राज्य सरकारसोबत सुमारे दोन तास चर्चा झाली. या चर्चेनंतर राज्य सरकारने ३० जून २ पूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. ३०) सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक झाली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ही समिती सहा महिन्यांच्या आत अभ्यास करून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय सुचवेल. एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत म्हणजे ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल.” या बैठकीत बच्चू कडू आणि त्यांच्या शिष्टमंडळासोबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, बच्चू कडू यांनीही राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, “आम्हाला कर्जमाफीसंदर्भात निश्चित तारीख हवी होती, ती आता मिळाली आहे. त्यामुळे सध्या आंदोलन स्थगित केले असून समितीच्या निर्णयाची आम्ही वाट पाहू,” असे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार आणि शेतकरी संघटनांदरम्यान झालेली ही बैठक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरली असून आगामी काही महिन्यांत कर्जमाफीबाबतचा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बीव्हीजी व आम्ही पुणेकर संस्थेची भारतीय जवानांसोबत दिवाळी

0
Newsworldmarathi Pune: भारत विकास गृप (बीव्हीजी) व आम्ही पुणेकर संस्थेने जम्मू कश्मिर सिमेवरील बारामुल्ला, कुपवारा, दोडा, व रियासी येथिल भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. भारतीय जवान कुटूंबाला सोडून सिमेवर भारत मातेचे रक्षण करतात. सैनिकांच्या कर्तव्यदक्षतेमुळे भारतीय आपल्या कुटूंबासोबत सुरक्षीत दिवाळी साजरी करतात. सिमेवर तैनात असलेल्या जवानांना कुटूंबाची कमतरता भासू नये या उद्देशाने बीव्हीजी व आम्ही पुणेकर संस्थेने यंदाची दिवाळी जवानांसोबत साजरी करण्याचा संकल्प केला होता. दिपावली उत्सवासाठी सैनिकांचे कुटूंबीय उपस्थित होते. जम्मू कश्मिर आपत्कालीन वैद्यकीय सेवा, महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा बीव्हीजीच्या वतीने संचलीत केल्या जातात. ऑपरेशन सिंदुर दरम्यान जम्मू कश्मिर आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १०८ रुग्णवाहिकेने महत्वपुर्ण कामगिरी केली होती. रुग्णवाहिका सेवेचे प्रोजेक्ट हेड मुश्ताक अहमद यांच्या नियोजनाचे सैन्य अधिकाऱ्यांनी कौतुक केले. दिपावली उत्सवाच्या निमित्ताने, बीव्हीजी कर्मचाऱ्यांनी तयार केलेले शुभेच्छा संदेश व भेटवस्तु जवानांना देण्यात आल्या. आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने दिवाळी फराळ, पुणेरी चिवडा, लाडू सैनिकांना देण्यात आला. यासाठी पुना मर्चंट चेंबरचे विशेष सहकार्य लाभले. जम्मू कश्मिर येथिल काफीला फाऊंडेशन, जनरल जोरावर सिंग चॅरिटेबल ट्रस्ट यांनी दिपावाली उत्सवासाठी विशेष सहकार्य केले.
ऑपरेशन सिंदुर दरम्यान बीव्हीजीच्या वतीने संचालीत केली जाणाऱ्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या टीमने महत्वपुर्ण कामगिरी केली होती. आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या टीमने व माझ्या बीव्हीजीच्या सहकाऱ्यांनी यंदाची दिवाळी जवानांसोबत साजरी केल्याने मला मनस्वी आनंद होत आहे.
हणमंतराव गायकवाड चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक बीव्हीजी
आम्ही पुणेकर नावाची स्वंयंसेवी संस्था गेली अनेक वर्षे सैनिकांसोबत विविध सन साजरे करत असते. सिमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी बीव्हीजी व आम्ही पुणेकर विविध उपक्रम राबवणार आहे.
हेमंत जाधव अद्यक्ष आम्ही पुणेकर

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकाराने म्हातोबा देवस्थानच्या सभागृहाचे रुपडेच पालटले

0
Newsworldmarathi pune: मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने म्हातोबा देवस्थानच्या सभागृहाचे रुपडे पालटले आहे. कोथरुडकरांना मंगल कार्यासाठी अत्याधुनिक सोई सुविधांनी युक्त बँक्वेट हॉल उपलब्ध झाला असून, ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सुचनेनंतर सदर सभागृह अतिशय अल्पदरात मिळणार आहे. कोथरुड हे अतिशय झपाट्याने विकसित होत असलेले उपनगर म्हणून सर्वत्र परिचित आहे. त्यामुळे सर्वसामान्य कोथरुडकरांना इथल्या सोईसुविधांचा लाभ घेता यावा, यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे नेहमीच आग्रही असतात. कोथरुडमधील कष्टकरी कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी सातत्याने ‘अल्पदरात दिवाळी फराळ’ उपलब्ध करुन देणे, वस्ती भागातील मुलींच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी ‘मानसी’ उपक्रम, विवाह इच्छुक मुलींची सन्माने पाठवणी व्हावी यासाठी ‘झाल’, त्याशिवाय गरिब कुटुंबातील गरोदर महिलांचे बाळंतपण सुरक्षितपणे व्हावे यासाठी ‘सुखदा’, असे एक ना अनेक उपक्रम सातत्याने राबवित असतात. कोथरुडमधील प्रत्येक मुलीचे लग्न अतिशय थाटामाटात व्हावे. तसेच, त्यांनाही लग्न सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटता यावा; यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढकारातून कोथरुड देवस्थानच्या जागेतील गंगाराम सभागृहाच्या टेरेसचा लोकसहभागातून विकास करण्यात आला असून, अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त असा बँक्वेट हॉल उभारण्यात आला आहे. या मध्ये मंगल कार्यासाठी सहा हजार सक्वेअर फुटाचा प्रशस्त बँक्वेट हॉल, ५०० नागरिक एकाचवेळी जेवण करतील असा डॉयनिंग हॉल, वधू-वरांसाठी अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त स्वतंत्र कक्ष, प्रशस्त लॉबी, अशा एक ना अनेक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, गरिब कुटुंबातील मुलींची लग्ने या सभागृहात व्हावीत, अन् सर्वांनाच मंगल कार्याचा अभिमान वाटले, यासाठी अतिशय नाममात्र दरात हे सभागृह उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती ना. पाटील यांनी सर्व विश्वस्त मंडळांना केली होती. त्यांनीही ना. पाटील यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, नाममात्र दरात सभागृह उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कोथरुडकरांना अभिमान वाटेल, असा हा बँक्वेट हॉल उपलब्ध झाला आहे. दरम्यान, या नव्या बँक्वेट हॉलचे लोकार्पण दिनांक ३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि म्हातोबा देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ आणि कोथरुडकर ग्रामस्थांच्या उपस्थितीत सायं. ०५.०० वा. होणार आहे. तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन म्हातोबा देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जैन बोर्डिंग भूखंड घोटाळा : श्रीखंड खाणाऱ्यांवर व मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : रोहन सुरवसे पाटील

Newsworldmarathi Pune: ऐतिहासिक एच.एन.डी. जैन बोर्डिंगचा मौल्यवान भूखंड गोखले लँडमार्क एलएलपी या बिल्डरला विकला गेल्याच्या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हा व्यवहार समाजाच्या विश्वासाला तडा देणारा आहे. या प्रकरणातील ट्रस्टी, बिल्डर, धर्मादाय आयुक्त आणि राजकीय प्रभाव वापरून मदत करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करा,” अशी मागणी सुरवसे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारले की, “जैन बोर्डिंगचा भूखंड कायदेशीर दृष्ट्या रद्द कधी होणार?” हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. जैन बोर्डिंगचा भूखंड काही ट्रस्टींनी गुपचूप पद्धतीने खासगी बिल्डरला विकल्याचे उघड झाल्यानंतर जैन समाजात संताप उसळला आहे. समाजाने मोठा मोर्चा काढून या विक्रीविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. तरीदेखील गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. दस्तऐवजांनुसार या व्यवहारात कायदेशीर प्रक्रिया आणि पारदर्शकतेचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. काही राजकीय हस्तक्षेप झाल्याचाही संशय समाजात व्यक्त केला जात आहे. रोहन सुरवसे पाटील यांनी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला, “भूखंड पुन्हा ट्रस्टच्या नावावर करण्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क कोण भरणार?” ट्रस्टींच्या चुकीमुळे झालेल्या या व्यवहाराचा आर्थिक भार समाजावर टाकणे अन्यायकारक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात समाजाची फसवणूक करून फायदा घेणाऱ्या ट्रस्टी, बिल्डर, चॅरिटी कमिशनर तसेच राजकीय प्रभाव वापरणाऱ्या मास्टरमाइंड व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सुरवसे पाटील यांनी केली आहे.