पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया : “ही दुर्घटना शब्दांपलीकडची वेदना!”
Newsworldmarathi Gujrat : भीषण दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की, “अहमदाबादमधील ही दुर्घटना स्तब्ध करणारी आहे. यातून होणाऱ्या वेदना शब्दांत सांगता येणार नाहीत. या दुःखद प्रसंगी माझ्या भावना सर्व पीडितांसोबत आहेत. संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असून मदतकार्य सुरू आहे.”
गुरुवारी (१२ जून) दुपारी अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केलेली एअर इंडिया फ्लाइट AI171 कोसळली. या भीषण अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.
एअर इंडियाने जाहीर केलेल्या प्रवासी यादीनुसार, एकूण २४२ प्रवासी या बोईंग ७८७ विमानात होते. यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगाल आणि १ कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. अपघातात अनेक जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, मात्र अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही.
विमानाने घेतली ‘मेडे कॉल’, पण… उत्तर न देता कोसळलं!
DGCA चा प्राथमिक अहवाल: टेकऑफनंतर थेट अपघात; विमानतळ बंद
दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथून AI171 फ्लाइटने टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच ‘मेडे कॉल’ देण्यात आला. मात्र त्यानंतर एटीसीकडून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, पण कोणतेही उत्तर मिळाले नाही. DGCA ने आपल्या निवेदनात सांगितले की, “विमानाने रनवे २३ वरून १३:३९ वाजता उड्डाण केलं. त्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेरच्या भागात कोसळलं.
‘ड्रीमलाइनर’चे डेंजरस लँडिंग: बोईंगच्या अत्याधुनिक विमानाची सर्वात मोठी दुर्घटना!
US बनावटीच्या बोईंग 787 ड्रीमलाइनरला भीषण अपघात; चौकशी सुरु
ही दुर्घटना बोईंग कंपनीच्या ‘ड्रीमलाइनर’ मालिकेतील विमानाच्या दृष्टीने आतापर्यंतची सर्वात गंभीर दुर्घटना मानली जात आहे. लंडनकडे निघालेलं हे विमान गुजरातमध्येच कोसळलं असून, या अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. विमानाने टेकऑफ घेतल्यापासून काही मिनिटांतच हा भीषण अपघात घड
सदर वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद
अहमदाबाद विमानतळावरील सर्व फ्लाइट ऑपरेशन्स तात्पुरते थांबवण्यात आले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत कोणत्याही उड्डाणास किंवा लँडिंगस परवानगी नाही.
विजय रुपाणी कोण होते?
Newsworldmarathi Gujrat : विजय रुपाणी यांनी ऑगस्ट २०१६ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत गुजरातचे १६वे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांचा जन्म रँगून (सध्याचे यांगून), म्यानमार येथे झाला होता. भाजपमधील ते एक महत्त्वाचे नेते होते.
मुख्यमंत्रीपदापूर्वी त्यांनी १९९६-९७ मध्ये राजकोटचे महापौर, २००६ ते २०१२ या काळात राज्यसभेचे खासदार म्हणून काम केले होते. २०१४ ते २०१६ या कालावधीत ते गुजरात सरकारमध्ये परिवहन, कामगार आणि जलपुरवठा मंत्री होते.
ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांनी आनंदीबेन पटेल यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. मात्र २०२१ मध्ये त्यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी सांगितले होते, “मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिला आहे. मला राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान आहे. पक्ष जे काम देईल, ते मी करत राहीन.”
या अपघातात त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात आणि पक्षात शोककळा
विमान अपघातात निधन
: लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI171 विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाले आहे. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. त्यांच्या उपस्थितीची पुष्टी त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी केली आहे.
गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “आमचे नेते आणि माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी लंडनला त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होते. तेही या दुर्घटनेचे बळी ठरले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भाजपसाठी ही एक मोठी हानी आहे.”
“आशीर्वाद खुशबू बेटा”; आई वडिलांना अश्रू अनावर
Newsworldmarathi Gujrat : खुशबू (वय २१), राजस्थानमधील नवविवाहित युवती, लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये होती. फ्लाइट AI171 उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळली, २०० हून अधिकांचा मृत्यू फ्लाइट एका सरकारी रुग्णालयाच्या वसतिगृहावर कोसळली, अपघातानंतर विमानाने पेट घेतला.
अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI171 मध्ये २४२ प्रवासी होते. त्यामध्ये राजस्थानच्या बाळोतरा जिल्ह्यातील २१ वर्षीय नवविवाहित खुशबू यांचाही समावेश होता. त्या आपल्या पतीकडे लंडनला जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांचे पती विपुल हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत.
खुशबू बुधवारी रात्री वडील आणि चुलत भावासोबत अहमदाबादला पोहोचल्या होत्या. विमानतळावरून वडील मदनसिंग यांनी तिच्यासोबतचा फोटो क्लिक करून व्हॉट्सअॅपवर शेअर केला होता आणि त्यासोबत लिहिले होते – “आशीर्वाद खुशबू बेटा, लंडनला निघाली आहे.”
खुशबू आणि विपुल यांचे लग्न जानेवारी महिन्यात झाले होते. विवाहानंतर दोन महिन्यांतच विपुल लंडनला परत गेले होते. त्यानंतर खुशबू आपल्या माहेरी व सासरी राहून प्रवासासाठी पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करत होती.
तिचा प्रवासाचा दिवस कुटुंबासाठी अत्यंत भावनिक होता. घरातून निघताना आई आणि भावंडांना मिठी मारताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिचे वडील, जे गावात मिठाईचे दुकान आणि शेती करतात, स्वतः कार चालवत अहमदाबादपर्यंत गेले होते. त्यांच्यासोबत पुतण्या होता.
स्थानिक भाजप युवा नेता दुर्गासिंह राजपूरोहित यांनी सांगितले की, कुटुंब बुधवारी गावातून निघाले आणि रात्री उशिरा अहमदाबादला पोहोचले. तिच्या मागे तिच्या दोन बहिणी आणि भाऊ असं कुटुंब आता अचानक झालेल्या या दुःखद घटनेने हादरून गेले आहे.
लंडनकडे निघालेलं AI171 हे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान गुरुवारी दुपारी १:३९ वाजता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण झालं. काही मिनिटांतच विमानाने “मेडे कॉल” दिला आणि जवळच्या एका सरकारी रुग्णालयाच्या वसतिगृहावर कोसळलं. अपघातावेळी विमानाला भीषण आग लागली आणि संपूर्ण परिसरात हाहाकार माजला.
अधिकार्यांनी सांगितले की या अपघातात २०४ जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण गंभीर जखमी झाले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितले की मृतांमध्ये तीन वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मृतांमध्ये भारत, यूके, पोर्तुगाल आणि कॅनडा येथील नागरिक होते.
सेना, एनडीआरएफ आणि सीआयएसएफ यांच्यासह सरकारी यंत्रणांनी मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम राबवली. विमानतळावरील उड्डाणे काही काळ थांबवण्यात आली आणि नंतर पुन्हा सुरू करण्यात आली. अपघाताचे कारण शोधण्यासाठी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून (AAIB) चौकशी सुरू आहे.
तटकरेंच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर, विमान दुर्घटनेत महाराष्ट्राची लेक
अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. टेक ऑफनंतर अवघ्या दोनच मिनिटांत विमान कोसळलं आणि परिसरात भीषण स्फोट झाला. या अपघातात 200 पेक्षा अधिकजणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या अपघातामध्ये राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांचे नातेवाईक प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे यांच्या भाच्याची पत्नी अपर्णा महाडिक या देखील होत्या. विमानातील क्रू मेंबर्सची नावे समोर आली असून यामध्ये क्लाईव्ह कुंदर-फर्स्ट ऑफिसर, सुमित सबरवाल, अपर्णा महाडिक, श्रद्धा धवन-केबिन एक्झिक्युटिव्ह 1, दीपक पाठक-केबिन एक्झिक्यूटिव्ह 2, इरफान शेख, नंथेम सिंगसेन, मैथिली पाटील असे आठजण होते. यापैकी अपर्णा महाडिक या तटकरे यांच्या नात्यातील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या. अमोल देखील स्वतः एअर इंडिया मध्ये पायलट आहेत. या अपघाताची माहिती मिळताच खासदार सुनील तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे हे आपल्या वहिनी राहत असलेल्या मुंबई गोरेगाव ईस्ट येथील निवासस्थानी पोहोचले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानामधून २४२ प्रवासी प्रवास करत होते, यातील सर्वांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अपघातग्रस्त विमानात होते या देशाचे नागरीक
गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान दुर्घटना विमानात 242 प्रवासी होते अशी माहिती एअर इंडियाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे. तसेच या विमानात 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते. या विमानाची धुरा कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती अशी माहिती डीजीसीएने दिली आहे.
एअर इंडियाच्या माहितीनुसार 242 पैकी 169 प्रवासी भारतीय होते, 53 ब्रिटिश नागरिक होते, 1 व्यक्ती कॅनेडियन होता तर 7 लोक पोर्तुगालचे होते.
अहमदाबाद झोन-4 चे डीसीपी कानन देसाई यांनी या परिसरात विमान अपघात झाल्याचे पीटीआयशी केलेल्या संवादात स्पष्ट केले आहे.
भरल्या ताटावरच विद्यार्थ्यांनी सोडलं प्राण; जेवत असतानाच विमान इमारतीवर कोसळलं अन्….
Newsworldmarathi Gujrat : एअर इंडियाचे विमान ज्या इमारतीवर कोसळले ती इमारत बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलची होती. दुपारची वेळ असल्याने सर्व इंटर्न डॉक्टर जेवणासाठी हॉस्टेलवर परतले होते. जेवत असतानाच ही दुर्घटना घडल्यामुळे अनेकांना आपला जीव भरल्या ताटावरच गमावावा लागला.
या अपघातात विमानातील प्रवाशांबाबत अद्याप माहिती समोर आलेली नसली तरी या हॉस्टेलमध्ये असलेले किमान २० इंटर्न डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हॉस्टेलच्या मेसच्या इमारतीवर हे विमान पहिल्यांदा आदळले होते. यावेळी बहुतांश डॉक्टर जेवण करत होते. या दुर्घटनेचे काही फोटो समोर आले असून मेसमध्ये जेवणाची ताटे तशीच टेबलवर असलेली दिसत आहेत. डॉक्टरांच्या मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
या अपघातग्रस्त बोईंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक आहेत.
ब्रेकिंग…! गुजरातमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं
Newsworldmarathi Gujrat: अहमदाबाद येथील मेघानीनगरच्या घोड़ा कॅम्प परिसरात आज सकाळी एक मोठी विमान अपघाताची घटना घडली. प्राथमिक वृत्तांनुसार प्रवासी विमान टेकऑफ दरम्यान कोसळले असून, ती दुर्घटना रहिवासी भागात घडली असल्याची माहिती मिळाली आहे.
दुर्घटनेनंतर तातडीने घटनास्थळी तीन अग्निशमन यंत्रणा, राज्य आणि स्थानिक बचाव दल, पोलीस, तसेच आपत्कालीन वैद्यकीय दल दाखल झाले. परिसरात दूरवर धुराचे लोट पसरले आहे. त्यामुळे नागरिंकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रथमशी येणाऱ्या अहवालांमधून असे दिसते की, विमानात 130 ते 180 प्रवासी यातील संख्या असावी, परंतु हे संख्यादेखील अधिकृत पुष्टीसाठी थांबलेली आहे . दुर्घटनेचा प्रकार मात्र अद्याप स्पष्ट नाही. काही अहवालांनुसार टेकऑफ दरम्यान तातडीच्या हालचालींमुळे विमान नियोजनाबाहेर गेले आणि जमीनाला आदळून हादरलं .
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ४ सप्टेंबरनंतर जाहीर होण्याची शक्यता
Newsworldmarathi Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. या निवडणुका ४ सप्टेंबरनंतर कधीही जाहीर होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेबाबतची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी ४ सप्टेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, या तारखेपर्यंत प्रभाग रचना पूर्ण करून ती अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीच्या प्रक्रियेला गती मिळेल.
राज्यभरातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये अनेक ठिकाणी सत्तांतर घडवून आणण्यासाठी राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. प्रभाग रचना ही निवडणुकीपूर्वीची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील नेतृत्व, पक्षांचे गटबाजी, उमेदवारांची शर्यत यामुळे निवडणुकीत रंगत येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
Ashadhi Yatra : राज्याच्या कोणत्याही गावातून मिळणार थेट बस; आषाढी यात्रेसाठी ५ हजार २०० विशेष बसेस
Newsworldmarathi pandharpur : आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
आषाढी यात्रा नियोजनासाठी पंढरपूर येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
यावेळी परिवहन मंत्री प्रतापसरनाईक म्हणाले, यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केली आहे.
आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी पंढरपुरात येतात. अनेक प्रवाशी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींबरोबर चालत दिंडीने येतात या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. ४० पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात या प्रवासात देखील ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.
तसेच बस चालकांना व वाहकांना कोणाची राहण्याची व्यवस्था करावी त्याचबरोबर त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून द्यावे. बस स्थानकातून बस प्रवाशांना घेऊन जाण्याअगोदर बसची देखभाल दुरुस्ती करावी. एसटी बसच्या तात्काळ दुरुस्तीसाठी ज्यादा तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी केल्या.
भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.
तसेच यात्रा काळात पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चहा – नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली. गतवर्षी वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त ५००० विशेष बसेस सोडल्या होत्या. याव्दारे यात्राकाळामध्ये सुमारे २१ लाख, भाविक – प्रवाशांची सुखरूप ने-आन एसटीने केली होती अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम
यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे अशा फुकटया प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवूनअसणार आहेत.
वाहतूकीच्या नियोजनासाठी एसटीची मदत
एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात अशा वेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होतो यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने ३६ पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस प्रशासनाला एसटीची मदत होणार आहे.
यात्रा कालावधीत चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठीयात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आदी सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचा मोठा निर्णय; स्कूल बसमध्ये महिला कर्मचारी, CCTV अनिवार्य..
Newsworldmarathi Pune : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठा निर्णय घेण्यात आले. दरम्यान आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीसांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर देण्याची योजना आखण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालकांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण उपंचालक यांची बुधवारी बैठक पार पडली. यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
शाळेच्या बसमध्ये 6 वर्षाखालील मुलांना ने-आण करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहनचालक, कंडक्टर, क्लीनर आदींची देखील पोलीस पडताळणी करुन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी असे आदेश सुद्धा पोलीस आयुक्तांनी दिले यावेळी दिले आहेत.
414 स्कूल बस व 208 इतर वाहने आढळली दोषी
शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने 1 जानेवारी ते 31 मे 2025 दरम्यान 1 हजार 321 स्कूल बस तसेच 650 इतर वाहनांची तपासणी केली. यामध्ये 414 स्कूल बस व 208 इतर वाहने दोषी आढळली असून या कारवाईत नियमांच्या उल्लंघनाबद्दल 55 कोटी 23लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
काय आहेत नियमावली?
शाळेत मुलांची ने-आण करणारी बस व इतर वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील याची खबरदारी संबंधित शाळेने घ्यावी. यासाठी प्रत्येक बस व इतर वाहनात सीसीटीव्ही लावणे अनिवार्य करावे
शाळेच्या बसमध्ये 6 वर्षाखालील मुलांना ने-आण करणेकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.
वाहनचालक, कंडक्टर, क्लीनर आदींची पोलीस पडताळणी करुन घ्यावी.
बसेसचे वाहनचालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असणारे असल्याची खात्री शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे. स्कुल बस चालक व अटेंडंट यांचे चारित्र्य पडताळणी, नेत्रतपासणी आणि वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
शिक्षण विभागामार्फत शाळा स्तरावर परिवहन समिती स्थापन केल्याबाबतचा आढावा घ्यावा.स्कुल बसेसची वाहनांची कसून तपासणी करावी. खाजगी वाहनातून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहिम राबवावी.
नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, स्कूल बसचे अपघात रोखण्यासाठी शाळा, परिवहन विभाग, पोलीस विभाग यांच्यामध्ये समन्वय असावा.

