एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी, थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग

Newsworldmarathi Team : शुक्रवार (13 जून) थायलंडमधील फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय 379 ला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानातील सर्व 156 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अंदमान समुद्रावरून प्रदक्षिणा घालल्यानंतर विमान फुकेत विमानतळावर परत उतरले. धमकी देणाऱ्या व्यक्तीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

माणुसकी ओशाळली…! विमान अपघातात रक्ताळलेल्या शीरासोबत बघ्यांनी सेल्फी काढली, हृदय पिळवटून टाकणारे दृश्य

Newsworldmarathi Gujrat: Air India Plane Crash : गुजरातमधील अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात गुरुवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत विमान मेडिकल कॉलेज परिसरात कोसळले. या भीषण दुर्घटनेत २६५ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर विमानाने पेट घेतल्याने अनेक मृतदेह जळून खाक झाले. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आणि विमानाचे तुकडे यामुळे घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पसरले होते. मात्र, या दुर्दैवी घटनेनंतर काहींच्या अमानवी कृत्याने माणुसकीला काळिमा फासला. एका महिला प्रवाशाचे रक्ताळलेले शीर रस्त्यावर पडलेले असताना, काहींनी त्यासोबत सेल्फी काढली, तर काहींनी व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केले. या संतापजनक कृतीमुळे नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “माणुसकी कुठे गेली?” असा सवाल उपस्थित करत अनेकांनी या अमानुष वर्तनाचा निषेध केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. विमानाचे तुकडे आणि पंखांचे अवशेष सर्वत्र पसरलेले दिसले. सध्या या अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.

राज्यातील ३८१ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता; 62 हजार 125 मेगावॅट वीज निर्मिती होणार?

Newsworldmarathi Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या जलसंपदा विभागाच्या बैठकीत राज्यातील सिंचन आणि पंप‑स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. 381 सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, या योजना राबवल्यास अंदाजे 30.68 लाख हेक्टर जमिनीवर सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. बैठकीत 45 पंप‑स्टोरेज (उदंचन) प्रकल्पांबाबतही चर्चा झाली. या योजनेद्वारे राज्यात 62,125 मेगावॅट वीज निर्मिती होईल आणि एकूण 96,190 रोजगार निर्माण होण्याचे अंदाज आहेत. याशिवाय खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील 15 कंपन्यांसोबत ₹3.41 लाख कोटी किंमतीच्या 24 सामंजस्य करारांचा (MoU) प्रारंभ झाला आहे. फडणवीस यांनी बैठकीत “सिंचन प्रकल्पांनी कृषी उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांना जीवनमानात सुधारणा करावी अशी अपेक्षा आहे, तर पंप‑स्टोरेज प्रकल्पांनी पर्यावरणपूरक वीज निर्मितीत मदत होईल; कामं वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे” असे स्पष्टपणे सांगितले . राज्य शासनाने ओळखलेल्या मागील दोन वर्षांच्या काळात एकूण 185 नवीन सिंचन कामांना मान्यता दिली, ज्यातून 26.66 लाख हेक्टर सिंचनात आले असून, विशेष दुरुस्तीच्या 196 कामांमधून आणखी 4.02 लाख हेक्टरची नळी सुलभ होणार आहे. हे निर्णय, करण्यात आलेले देय MoU आणि प्रशासकीय मान्यता यांच्या आधारे, महाराष्ट्रात कृषी, ऊर्जा व रोजगार या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये एकाच वेळी सशक्त उभारणी केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिलेल्या स्पष्ट निर्देशांमुळे या मोठ्या योजनांचा वेळेत व प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

पुण्यात खुनी खेळ, बालसुधारगृहात टॉवेलच्या दोरीने गळा घोटण्याचा प्रयत्न; 5 जणांकडून निर्दयी हल्ला

0
Newsworldmarathi Pune: पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र, येरवड्यातील बालसुधारगृहात (बारक न. 2) एक भीषण घटना समोर आली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या पाच अल्पवयीनांनी एका 17 वर्षीय मुलाला बाथरूम साफ करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मारहाण केली आणि नंतर त्याचा गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याचा गळा आवळण्यासाठी टॉवेल फाडून तयार केलेली दोरी वापरली आणि बेदम मारहाण करून जमिनीवर दाबून ठेवले. याबाबत संतोष किसन कुंभार (वय-४९, रा. चहोली, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पाचही आरोपी मुलांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये १७ वयोगटाचे दोन, १६ वयोगटातील दोन आणि १४ वर्षाचे एक अशा पाचजणांचा समावेश आहे. सदरचा प्रकार हा पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग मध्ये बराक क्रमांक दोन मध्ये घडला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विविध गुन्ह्यांमधील अल्पवयीन आरोपींना येरवडातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात ठेवण्यात येते. या ठिकाणी बराक क्रमांक दोनमध्ये बाथरुम साफ करण्यास नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलाला पाच जणांनी बेदम मारहाण केली.नाहीत, तर त्यांनी पीडित मुलाला जमीनीवर पाडून त्याचा दोरीने गळा आवळण्याचा देखील प्रयत्न केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो…तो ‘ब्लॅक बॉक्स’ नेमका काय असतो….

0
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? ब्लॅक बॉक्स हे विमानात बसवले जाणारे एक अत्यंत मजबूत आणि डिजिटल उपकरण आहे, जे उहाणादरम्यान विमानाची तांत्रिक माहिती आणि पायलटचे संभाषण रेकॉर्ड करते. याला ‘बबैंक बॉक्स का म्हणतात? तो खरंच काळा असतो का? नाव जरी ब्लॅक बॉक्स असले तरी तो काळा नसतो. तो चमकदार केशरी रंगाचा असतो जेणेकरून अपघातानंतर तो सहजपणे सापडू शकेल. ब्लॅक बॉक्सचे मुख्य भाग कोणते असतात? ब्लैक बॉक्समध्ये दोन मुख्य घटक असतातः १. फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) – विमानाचे वेग, उंची, दिशा, इंजिन माहिती रेकॉर्ड करतो. २. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) -पायलट व सह-पायलटचे संभाषण आणि केबिनमधील आवाज रेकॉर्ड करतो. विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सचे महत्त्व काय असते? अपघातानंतर ब्लॅक बॉक्समधील माहितीच्या आधारे अपघाताचे कारण शोधले जाते. ते विमान सुरक्षा तपासणीसाठी सर्वात महत्त्वाचे साधन आहे. अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित कसा राहतो? ब्लॅक बॉक्स टायटॅनियमसारख्या मजबूत धातूपासून बनवला जातो. तो उच्च तापमान, पाण्याचा दाब, धक्के सहन करू शकतो. त्यामुळे तो अपघातानंतरही सुरक्षित राहतो. ब्लॅक बॉक्स कुठे बसवलेला असतो? ब्लॅक बॉक्स विमानात मागच्या भागात बसवलेला असतो, कारण अपघातात विमानाचा शेवटचा भाग बऱ्याच वेळा कमी नुकसानग्रस्त होतो. ब्लॅक बॉक्स किती डेटा साठवू शकतो? त्यात सतत डेटा रेकॉर्ड केला जातो. जुना डेटा नवीन डेटाने ओव्हरराईट केला जातो. अनेक दिवसांचा आवाज व तांत्रिक डेटा यात साठवलेला असतो. भारतात कोणत्या संस्था ब्लॅक बॉक्स तपासतात? भारतात अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची तपासणी खालील संस्था करतात: १. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए), २. विमान अपघात तपास ब्यूरो (एएआयबी) ब्लॅक बॉक्सचा वापर फक्त अपघातातच केला जातो का? मुख्य वापर अपघाताच्या चौकशीसाठीच असतो, पण विमानांच्या नियमित सुरक्षा विश्लेषणासाठीही ब्लॅक बॉक्समधील डेटा उपयुक्त असतो. ब्लॅक बॉक्स सापडला नाही तर? जर ब्लॅक बॉक्स सापडला नाही, तर अपघाताचे कारण शोधणे अत्यंत कठीण होते. त्यामुळे तो शोधण्यासाठी विशेष शोध पथक पाठवले जाते.

मृत्यूला कवटाळतानाची स्थितप्रज्ञता; पायलट सुमित सभरवाल यांची त्यांना मिळालेल्या ४० सेकंदातली समय सूचकता

Newsworldmarathi Gujrat : संकटाच्या काळात, एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या स्थितीत कधीच गडबडून न जाता मन स्थिर ठेवत स्थितप्रज्ञ, याचा अर्थ आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्या मनस्थितीवर कुठलाही एका टोकाचा परिणाम होऊ न देता मन मध्यबिंदूवर स्थिर करत आपण परिस्थितीशी मुकाबला केला पाहिजे, व उद्भवलेल्या समस्येवर आलेल्या संकटावर उत्तमातला उत्तम पर्याय, सोल्युशन आउटपुट काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजेच आपण विचलित न होता स्थितप्रज्ञ अवस्थेला जाण्याचा सल्ला आपल्या महाभारतात भगवान श्रीकृष्ण ने दिला आहे. अहमदाबाद जवळ झालेल्या एअर इंडियाच्या विमाना ची दुर्घटनेतील मुंबई येथील पवईचे निवासी असलेले पायलट सुमित सभरवाल यांना जेव्हा लक्षात आलं की आता विमान उंचीवर नेणे अशक्य आहे आणि 304 किमी प्रति तासाच्या वेगाने ते जमिनीकडे झेपावत आहे केवळ 600 – 900 फुटाचे अंतर जमिनीशी विमानाच्या टकरावण्याचं बाकी असताना त्यांनी आजूबाजूला नजर फिरवत जिथे कमीत कमी डॅमेज होईल अशा ठिकाणी ते विमान वळवलं तिथे ते विमान पडलं. मी आता टीव्हीवर विविध चॅनेलवर चर्चा ऐकत आहे त्यातील तज्ञ सांगतात की जर का पायलट सुमित सभरवाल घाबरून जाऊ हडबडाहट मधे या विमानालाला कुठेही, कसेही पडू दिलं असतं तर 25000 अतिशय दाट लोक वस्तीवर हे विमान कोसळलं असतं मृत्यूचा आकडा भयानक राहिला असता. स्वर्गीय श्री सुमित सभरवाल यांना श्रद्धांजली देतानाच त्यांना आपण सलामही केला पाहिजे त्यांच्या या स्थितप्रज्ञ अवस्थेतील निर्णयासाठी. स्वर्गीय श्री सुमित सभरवाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात; ब्रेक दाबताच लोखंडी रॉड केबिनमध्ये घुसल्या, ड्रायव्हरचा तडफडून मृत्यू

0
Newsworldmarathi Pune: पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गंगाधाम चौकामध्ये नुकतेच ट्रकने उडवल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता शहरातील चांदणी चौकात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका कंटेनर ट्रकला मोठा अपघात झाला आहे. अर्टिगा कारला वाचवण्याच्या प्रयत्नात करकचून ब्रेक दाबल्यामुळे सळ्या केबिनमध्ये घुसून झालेल्या अपघातात ट्रेलर चालक आणि साथीदाराला प्राण गमवावे लागले. मुंबईकडून बंगळूरूकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळं चौकात मोठी वाहतूक कोंडीही निर्माण झाली आहे. या ट्रकमध्ये बांधकामासाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणावर लोखंडी रॉड्स होते. ही घटना मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर घडली आहे. ट्रक मध्ये असलेले लांब लोखंडी रॉड्स योग्य प्रकारे बांधले गेले नव्हते. ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबताच, मागील बाजूला असलेले रॉड्स जोरात पुढे सरकले आणि थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसले. यामध्ये चालक जागीच ठार झाला, तर क्लीनर गंभीर जखमी झाला आहे. ट्रक हे लांब लोखंडी रॉड्स घेऊन ते चांदणी चौकातून मुंबईच्या दिशेने निघाला होती. यावेळी अचानक ब्रेक दाबल्यानं यातील सळया किंवा लोखंडी बार हे थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसले. यामध्ये ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. नेमकं काय घडलं? लोखंडी सळ्या आणि पाईप वाहतूक करणारा हा ट्रेलर चांदणी चौकाच्या अलिकडे महामार्गाच्या सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाजवळ पोहोचला. इतक्यात एक अर्टिगा कार त्याला आडवी आली. अर्टिगा चालकाने या ट्रेलरसमोर येऊन आपलं वाहन विरुद्ध दिशेला वळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या ट्रेलर चालकाने अर्टिगा कारला वाचवण्यासाठी जोरात ब्रेक दाबला. त्यामुळे ट्रेलरमध्ये असणाऱ्या सळ्या आणि पाईप या थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसल्या. यातच चालकाचा आणि त्याच्या साथीदाराचा मृत्यू झाला. हा ट्रेलर मूळचा राजस्थानचा असून ट्रेलर चालक हाच याचा मालक असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं, अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. हा अपघात ट्रकमध्ये लोखंडी रॉड्स ठेवताना असलेली निष्काळजीपणा आणि वाहतूक सुरक्षिततेच्या नियमांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हिंजवडी पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

“एअर इंडिया दुर्घटनेची बातमी ऐकून मी आणि अक्षता सुन्न झालो आहोत”; ऋषी सुनक यांच्याकडून भावना व्यक्त

0
Newsworldmarathi London : गुरुवारी अहमदाबाद येथून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया AI171 या विमानाच्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून भारत आणि ब्रिटनमधील नागरिकांचा समावेश आहे. या दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया देताना ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “मी आणि अक्षता एअर इंडिया दुर्घटनेची बातमी ऐकून अत्यंत सुन्न झालो आहोत. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे.” ते पुढे म्हणाले, “भारत आणि ब्रिटन यांच्यातील नातं हे केवळ मैत्रीचं नव्हे, तर एक विशेष बंध आहे. या भीषण घटनेत जी कुटुंबं भारतीय आणि ब्रिटिश नागरिकांना गमावून बसली आहेत, त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्यासाठी आमच्या प्रार्थना आणि भावना आहेत. भारतातील आणि ब्रिटनमधील नागरिकांच्या एकजुटीचे प्रतीक – ऋषी सुनक यांचा भावनिक संदेश ऋषी सुनक यांनी या संदेशातून भारत आणि ब्रिटन यांच्यातील नात्याचा उल्लेख करत, दोन्ही देशातील लोकांसोबत सहवेदना व्यक्त केली. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे दोन्ही देशांतील नागरिकांच्या मनातील दुःखाला आधार मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

ज्येष्ठ पत्रकार संदीप रामदासी यांना देवर्षी नारद पुरस्कार जाहीर

Newsworldmarathi Mumbai: विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे (mumbai) प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या पत्रकारांचा दर वर्षी ’देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो. या पुरस्काराचे यंदाचे 25वे वर्ष आहे. त्या निमित्ताने प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडिया अशा प्रसारमाध्यमांच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या 11 जणांचा सन्मान केला जाणार आहे. 203 वर्षे जुन्या असलेल्या मुंबई समाचारचा पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल तसेच गेली 77 वर्षे कार्यरत असलेल्या हिंदुस्थान समाचार या बहुभाषिक न्यूज एजन्सीलाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने समीर कर्वे (प्रिंट मीडिया), संदीप रामदासी (इलेक्ट्रॉनिक मीडिया) व शैलेश गायकवाड (सोशल मीडिया) यांचा सन्मान होणार आहे. तर पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी (कविता) मयेकर यांचा सन्मान होणार आहे. या व्यतिरिक्त, सोशल मीडिया पुरस्कारांमध्ये यूट्यूबसाठी जय गगन, फेसबुकसाठी मृगा वर्तक, इन्स्टाग्रामसाठी सुनीता पावसकर व अमोल जामदारे यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारितेतील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सूरज चौगुले याचा सन्मान होणार आहे. हा पुरस्कार सोहळा शनिवार 14 जून 2025 रोजी एनएसई बिल्डिंग, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.) इथे होणार असून, त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून द इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका तर विशेष अतिथी म्हणून टाइम्स नेटवर्कच्या ग्रुप एडिटर व टाइम्स नाऊ नवभारतच्या एडिटर-इन-चीफ नाविका कुमार उपस्थित राहणार आहेत. रा.स्व.संघाच्या पश्चिम विभागाचे कार्यकारिणी सदस्य राजाभाऊ मुळे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असतील. दरम्यान, संदीप रामदासी हे दोन दशकांहून अधिक काळ पत्रिकारितेत कार्यरत असून टेलिव्हिजन मीडियात एबीपी माझा या वृत्तवाहिनीतून पत्रकारितेत आपलं योगदान देत आहेत.

पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा कहर

0
Newsworldmarathi Pune: गुरुवारी रात्री दहा वाजल्यापासून पुणे शहरात विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार ते अती मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागाने याबाबत आधीच अंदाज वर्तवला होता. पूर्वेकडून पश्चिमेकडे झपाट्याने आलेल्या पावसामुळे संपूर्ण शहराची झोप उडाली. पावसाच्या भीषण तडाख्यामुळे शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला, परिणामी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. जोरदार पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. अनेक रस्त्यांवर पूरस्थिती निर्माण झाली होती. पावसाचा जोर इतका होता की काही वेळेस दूरवर काहीच दिसत नव्हतं. नोकरीवरून घरी परतणारे नागरिक पावसात अडकले. काही जणांना मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावरच थांबावे लागले. गुरुवारी रात्री दहा वाजता हलक्या सरींनी सुरुवात झाली. पंधरा मिनिटात पाऊस थांबल्याने अनेकांनी घरी जाण्यास सुरुवात केली. पण अवघ्या दहा मिनिटातच आकाशात विजांचा कडकडाट झाला आणि पावसाने रौद्ररूप धारण केले. शहरातील पेठांपासून उपनगरांपर्यंत या पावसाचा मोठा प्रभाव जाणवला. आगामी तीन दिवस पुण्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने १३ ते १६ जूनदरम्यान पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून पुणे शहर व परिसरात विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांसाठी सूचना : • घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट सोबत बाळगावा • विजांच्या कडकडाटात झाडाखाली उभे राहू नये • मोबाईलवर बोलणे टाळावे • मोकळ्या जागांपासून दूर राहावे • सखल भागात जाण्याचे टाळावे हवामान खात्याच्या सूचनेनुसार नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.