Newsworldmarathi Mumbai : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की, ईडीकडून अटक होण्याआधी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. शिंदे यांनी फोनवर विचारलं होतं, “मी वरती बोलू का? गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलू का?”
यावर राऊत यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं की, “नको, काही गरज नाही. तुम्ही वरती बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही.” हा संवाद स्वतः संजय राऊत यांनी आज माध्यमांपुढे उघड केला.
या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांचं “नरकातला स्वर्ग” हे नवीन पुस्तक आज प्रकाशित झालं. या पुस्तकातही त्यांनी अनेक खळबळजनक दावे केल्याचं समजतं.
संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, ईडी अटकेच्या काही काळ आधी शिंदे यांचा फोन येणं, आणि त्यात दिल्लीपर्यंत पोहोचून मदतीची ऑफर देणं, हा प्रकार अत्यंत गंभीर असून, त्यामुळे राजकीय दबाव आणि यंत्रणांच्या वापराबाबत नवे प्रश्न निर्माण होतात.
राऊत यांनी हेही स्पष्ट केलं की, अशा कोणत्याही दबावाला ते बळी पडणार नाहीत आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडत राहतील. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.


Recent Comments