आर्थिक ताण कमी करण्यासाठी काय करावे : लेखक डॉ. मिलिंद भोई
Newsworldmarathi Arogy : आर्थिक ताण कमी करण्यासाठी बजेट आणि बचत योजना विकसित करा.आर्थिक निर्णयांवर चांगले नियंत्रण मिळविण्यासाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम शोधा.
काय टाळावे
तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी सक्रिय उपाययोजना करताना, काही वर्तन टाळले पाहिजे:
स्वत: ची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करणे: एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने तणाव-संबंधित आरोग्य समस्या वाढतात.
भावना दडपून टाकणे: भावना कमी केल्याने नैराश्य आणि चिंता होऊ शकते; निरोगी मार्गाने भावना व्यक्त करणे आवश्यक आहे.
उत्तेजक पदार्थांवर जास्त अवलंबून राहणे: जास्त कॅफीन, अल्कोहोल किंवा धूम्रपान यामुळे तणाव आणि आरोग्य समस्या बिघडू शकतात.
विषारी संबंध: भावनिकदृष्ट्या निचरा होणाऱ्या नातेसंबंधांमध्ये राहिल्याने मानसिक ताण वाढतो आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
परिपूर्णतावाद: अवास्तव अपेक्षा आणि स्वत: ची टीका दीर्घकालीन तणाव आणि बर्नआउटमध्ये योगदान देतात.
निष्कर्ष
मानसिक ताण स्त्रियांच्या शारीरिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम करतो, विशेषत: जेव्हा कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक दबाव वाढतो. तणाव दूर करण्यासाठी स्वत: ची काळजी, भावनिक आधार आणि व्यावसायिक मार्गदर्शन यासह संतुलित दृष्टीकोन आवश्यक आहे. महिलांनी त्यांच्या कल्याणाला प्राधान्य दिले पाहिजे, निरोगी सीमा प्रस्थापित केल्या पाहिजेत आणि आवश्यकतेनुसार समर्थन शोधले पाहिजे. असे केल्याने, जीवनातील आव्हाने असूनही ते निरोगी, अधिक परिपूर्ण जीवन जगू शकतात.
लेखक
डॉ. मिलिंद भोई
इंस्टाग्रामचा शोध – एक कल्पना ते जागतिक लोकप्रियेपर्यंतचा प्रवास : लेखन – अक्षय बनकर
Newsworldmarathi special : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचे स्थान अतिशय प्रभावी आहे. फोटो आणि व्हिडीओ शेअरिंगच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या काही अॅप्सपैकी इंस्टाग्राम हे सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अॅप ठरले आहे. परंतु, याचे मूळ नेमके कसे आणि कुठून सुरू झाले?
ही गोष्ट आहे २०१० सालाची. केविन सिस्ट्रॉम नावाचा एक तरुण, स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिकलेला होता. तो एका लाईफ चेंजीग संधीच्या शोधात होता. खरतर त्याला फोटो शेअरिंग आणि लोकेशन बेस्ड अॅप तयार करायचे होते. त्याने सुरुवातीला निर्माण केलेले अॅप होते “Burbn” – हे अॅप वापरकर्त्यांना लोकेशन शेअर करण्यास, इव्हेंट प्लॅन करण्यास आणि फोटो शेअर करण्यास परवानगी देत होते .
केविनला लवकरच उमजले की अॅपमध्ये अनेक फिचर्स असूनही, लोक फक्त फोटो शेअरिंग फिचरच वापरत आहेत. म्हणून मग त्याने त्याचा मित्र माईक क्रिगरला सोबत घेतले आणि दोघांनी मिळून Burbn अॅपमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अॅपमधील इतर सगळ्या गोष्टी काढून टाकल्या आणि वापरायला एकदम सोप्पे (युजर फ्रेंडली) आणि जलद फोटो शेअरिंग अॅप तयार केले. ज्याला त्यांनी नाव दिले “Instagram”.
इंस्टाग्राम या नावाचा अर्थ. “Instagram” हा शब्द “Instant camera” आणि “Telegram” याचे संमिश्र रूप आहे. म्हणजेच, झटपट फोटोज शेअर व्हावेत हेच या अॅपचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. वापरकर्त्यांने(यूजर) केवळ फोटो अपलोड करायचा, त्यावर एखादा फिल्टर लावायचा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायचं – इतकं सोपं आणि सहज!
इंस्टाग्रामवर अपलोड झालेला पहिला फोटो कोणता होता माहितेय?१६ जुलै २०१० रोजी, केविन सिस्ट्रॉमने त्याच्या पाळीव कुत्र्याचा एक फोटो पोस्ट केला होता. तो Instagram वरील पहिला फोटो होता.६ ऑक्टोबर २०१० रोजी हे अॅप अधिकृतपणे iOS App Store वर लाँच झाले. अवघ्या २४ तासांत २५,००० युजर्स अॅपवर नोंदले गेले. एका आठवड्यात युजर्सची संख्या लाखांमध्ये पोहोचली. अशाप्रकारचे वेगवान आणि प्रभावी यश फारच थोड्या अॅप्सना मिळाले आहे.
Instagram चं वाढतं यश आणि लोकप्रियता पाहून, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी २०१२ मध्ये Instagram ला १ बिलियन डॉलर्स मध्ये विकत घेतलं. Instagram टीमने आपली स्वतंत्र ओळख राखत फेसबुक समवेत कार्य सुरू ठेवले .
आजचे इंस्टाग्राम ऍपचे आधुनिक रुपये हे केवळ अॅप नव्हे, तर एक प्रत्येकाची जीवनशैली ठरत आहे. आज Instagram फक्त फोटो शेअरिंग अॅप नाही, तर ब्रँडिंग, मार्केटिंग, कलाकारांची ओळख, छोट्या व्यवसायांसाठी एक प्लॅटफॉर्म, आणि तरुणाईसाठी अभिव्यक्तीचं माध्यम बनले आहे. Influencers, Reels, Stories, Live Sessions यांसारख्या सुविधांमुळे आज Instagram एक पूर्ण डिजिटल विश्व बनले आहे.
इंस्टाग्रामच्या जन्माच्या या गोष्टीवरून आपल्याला हे लक्षात येईल की “साध्या कल्पना जर अचूक ओळखल्या आणि योग्य दिशेने विकसित केल्या गेल्या, तर त्या जागतिक क्रांती घडवू शकतात.” केविन आणि माईकने फक्त एकच गोष्ट लक्षात घेतली.लोकांना काय आवडतंय आणि त्यानुसार सोपे, यूजर फ्रेंडली आणि वापरायला सहज असे रूप इंस्टाग्रामला दिले. हेच त्यांच्या यशाचे गमक ठरले.
लेखक
-अक्षय बनकर
“शाश्वत शेतीच्या माध्यमातून आता महिला शेतकरी सक्षम होणार”
Newsworldmarathi Pune: भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेच्या (ICSSR) सहाय्याने आयोजित “शाश्वत शेती पद्धतीद्वारे महिला शेतकऱ्यांना सक्षम करणे” या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद एस. पी. मंडळीच्या प्रिन्सिपल एल. एन. वेलिंगकर व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्था (PGDM), मुंबई यांनी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM), पुणे यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या संपन्न केला. या परिसंवादात तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी शाश्वत कृषी विकास आणि महिला शेतकऱ्यांचे सशक्तीकरण यावर चर्चा केली.
परिसंवादाच्या उद्घाटन सत्रात डॉ. हेमा यादव, संचालक, VAMNICOM यांनी आपल्या भाषणात ग्रामीण अर्थव्यवस्थेतील सहकारी संस्थांच्या परिवर्तनशील भूमिकेवर प्रकाश टाकला आणि महिला शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणातील त्यांच्या योगदानावर भर दिला. प्रा. डॉ. उदय साळुंखे, ग्रुप डायरेक्टर, वीस्कूल, मुंबई यांनी आपल्या भाषणात सहकारी संस्थांना बळकटी देण्यासाठी क्षमता विकास, संशोधन आणि नवकल्पना यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी संस्थात्मक सहकार्य, धोरणकर्ते आणि उद्योग नेत्यांमधील सुसंवादाची गरज नमूद केली, तसेच संशोधन, सल्लामसलत आणि ज्ञानवृद्धीद्वारे सहकारी व्यवस्थेच्या विकासासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
परिसंवादातील प्रमुख सत्रामध्ये डॉ. संगीता शेटे, लिंग व सामाजिक विकास विशेषज्ञ, SMART प्रकल्प, महाराष्ट्र शासन, आणि डॉ. के. सत्यलक्ष्मी, संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी महिला शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणाची भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी असलेली गरज अधोरेखित केली.
विकसित भारत 2047 या दृष्टीकोनाशी सुसंगत राहून, परिसंवादातील चर्चेमध्ये मजबूत धोरणे, तांत्रिक नवसंशोधन, आणि अनेक घटकांच्या सहभागाद्वारे ग्रामीण उपजीविकेचा विकास व कृषी वाढीला चालना देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. वीस्कूल आणि VAMNICOM यांनी ICSSR च्या सहकार्याने केलेले संशोधन या उद्दिष्टांमध्ये मोलाची भर घालते.
या परिसंवादाचा मुख्य उद्देश नाविन्यपूर्ण उपाययोजना, धोरणात्मक शिफारशी आणि सहयोगी उपक्रमांना चालना देणे हा होता. “शाश्वत कृषी व्यवसायांसाठी लवचिक उपजीविके” या विषयावर तज्ज्ञांचे पॅनेल चर्चासत्र परिसंवादाचा विशेष आकर्षण होते. या चर्चेमध्ये कृषी सहकारी संस्था, वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी, धोरण विचारमंच आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले. चर्चेमध्ये महिलांसाठी कृषी क्षेत्रातील आर्थिक प्रवेश सुलभ करणे, महिलांनी चालवलेल्या कृषी व्यवसायांना मदत करणे, तसेच तंत्रज्ञानाचा प्रभावी समावेश कसा करता येईल यावर सखोल चर्चा झाली.
शाश्वत कृषी आणि महिला सशक्तीकरणाच्या दिशेने संशोधनात्मक धोरणे आणि बहुउद्देशीय सहकार्याचे महत्त्व परिसंवादात अधोरेखित करण्यात आले. डॉ. वैशाली पाटील, वरिष्ठ सहयोगी अधिष्ठाता (संशोधन), वीस्कूल यांनी समारोपपर भाषणात महिला-केंद्रित कृषी धोरणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्यपूर्ण संवाद आणि कृतीशील संशोधनाचे महत्त्व स्पष्ट केले.
भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेने (ICSSR), शिक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने “शाश्वत शेती पद्धतीद्वारे महिला शेतकऱ्यांना सक्षम करणे: महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक संघटनांवरील एक अभ्यास” या महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पास मान्यता दिली आहे. हा संशोधन प्रकल्प डॉ. वैशाली पाटील, डॉ. हेमा यादव, डॉ. प्रविण घुंणार, डॉ. महेश कदम आणि डॉ. रचना पाटील यांना प्रदान करण्यात आला असून, महिला-केंद्रित कृषी संशोधन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची ही महत्वपूर्ण दखल आहे.
हा राष्ट्रीय परिसंवाद आणि संबंधित संशोधन प्रकल्प महिला सशक्तीकरणासाठी धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण सिफारशी विकसित करेल, जे विकसित भारत 2047 च्या समावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असतील.
भारतीय संविधान हे ‘ आम्ही भारतीय लोक’ यांना अर्पण आहे : मा. संजय आवटे
Newsworldmarathi Pune : मॉडर्न एज्युकेशन सोसायटी ,पुणे संचलित नौरोसजी वाडिया महाविद्यालय, नेस वाडिया महाविद्यालय, नेव्हिल वाडिया महाविद्यालय व कुसरो वाडिया टेक्निकल इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने छ. शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त महोत्सवाचे आयोजन ११ एप्रिल२०२५ ते १४ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आले आहे. यामध्ये मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व संस्थेचे विश्वस्त सहभागी असणार आहेत.
महात्मा फुले जयंती निमित्ताने ११ एप्रिल २०२५ रोजी प्रख्यात लेखक-वक्ते व संपादक मा. संजय आवटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपले मनोगतात मा. संजय आवटे म्हणाले की, ” तरुणांपर्यंत आजचे राजकारण पोहोचले पाहिजे. तरुणांना सजग करण्यासाठी छ. शिवाजी महाराज, म.फुले, राजश्री शाहू महाराज- डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महात्मा गांधी इ .महापुरुषांचा खरा इतिहास महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या माध्यमातून विद्यार्थी व समाजापर्यंत पोहोचायला हवा.
याबाबत महाविद्यालये ही मला शेवटची आशा वाटते. भारतातील संविधान हे कोणा एका विशिष्ट व्यक्तीला अर्पण केलं नसून ‘ we the people of India’ ‘ आम्ही भारतीय लोक’ यांना अर्पण केले आहे. आताचा काळ हा महापुरुषांच्या अपहरणाचा काळ आहे. आपल्या मिष्कील शैलीत मा. संजय आवटे म्हणाले की, एकवेळ मला लष्करे तोयबाची भीती वाटत नाही परंतु मला भीती वाटते ती होयबा करणाऱ्या लोकांची. आपल्या मुलांनी किती गुण मिळवले यापेक्षा तो उत्तम माणूस कसा बनेल याकडे समाजाने लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक मा संजय आवटे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्राचार्य डॉ. अशोक चांडक हे होते. आपल्या मनोगतात डॉ. चांडक म्हणाले की,” मॉडर्न एज्युकेशन सोसायटी सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्य विकसित करण्याकडे लक्ष पुरवते. संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्व प्राध्यापकांनी ‘ मी काय करतो ‘ याचे आत्मपरीक्षण करावे” असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वसंत बोरकर यांच्या पुढाकाराने संस्थेमध्ये तीस वर्षांपूर्वी संयुक्त जयंती महोत्सवाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ.बोरकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थिनी भावना बाठिया (लोकमत वार्ताहार) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुभाष अहिरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात डॉ. सुभाष अहिरे यांनी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी या संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली. प्रा.तन्वी झुरुंगे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. सदर कार्यक्रमास मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. डॉ. अशोक चांडक आणि विश्वस्त प्रा. सचिन सानप यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमास नेस वाडियाचे प्राचार्य डॉ. वृषाली रणधीर, नेव्हिल वाडिया कॉलेजच्या इनचार्ज डायरेक्टर डॉ. अनुराधा डी., डॉ. मनीषा डाले, उपप्राचार्य डॉ. समीना बॉक्सवाला- काळे, उपप्राचार्य डॉ. बी. बी. बहुले, उपप्राचार्य डॉ. प्रकाश चौधरी, प्रबंधक राजेंद्र तागडे, सर्व शाखांचे डीन, सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक आणि प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नम्रता जहागीरदार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. ज्योती अनिरुद्ध, प्रा.जयंत साळवे, प्रा. प्रमोद शिंदे, प्रा. विकास जाधव, प्रा. सोनाली मोरे-मधाळे, प्रा. करूणा जाधव, प्रा. सुहास जाधव व प्रा. सचिन कांबळे यांनी परिश्रम घेतलेत
Nilesh Ghayval: “टोळी युद्ध, गोळीबार, खंडणी… ‘बॉस’ निलेश घायवळचं कस विस्तारलं गुन्हेगारी साम्राज्य! वाचा स्पेशल रिपोर्ट”
Newsworldmarathi Team : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असणारा कुख्यात गुंड निलेश घायवळ याला शुक्रवारी रात्री सोलापूर जिल्ह्याच्या सीमेजवळील आंदरूड गावात झालेल्या कुस्ती स्पर्धेदरम्यान मारहाण झाली. आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमादरम्यान निलेश घायवळ एका पैलवानाची भेट घेण्यासाठी कुस्ती अखाड्यात गेला. यावेळी उपस्थित असलेला सागर मोहोळकर नावाचा पैलवान अचानक घायवळवर धावून गेला आणि त्याला मारहाण केली. सागर हा अहमदनगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी असून तो पेशाने पैलवान आहे.
घटनेनंतर सागर मोहोळकरने घटनास्थळावरून पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकारामुळे यात्रास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवलं असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
कोण आहे निलेश घायवळ?
“बॉस” या टोपणनावाने ओळखला जाणारा निलेश बन्सीलाल घायवळ हा पुणे शहरातील कुख्यात गुन्हेगारांपैकी एक मानला जातो. २००० ते २००३ या कालावधीत पुण्यात त्याचा गुन्हेगारीत दबदबा होता. निलेश घायवळ हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सोनेगाव गावचा रहिवासी असून शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर त्याचा गुन्हेगारीकडे ओढा वाढला.
पुण्यात आल्यावर त्याने कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या टोळीत सक्रिय सहभाग घेतला. त्याच काळात एका खून प्रकरणात त्याचा सहभाग सिद्ध झाला आणि त्याला सात वर्षांची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून परत आल्यावरही त्याची गुन्हेगारी कारकीर्द थांबली नाही. त्याच्यावर खून, जबरदस्ती वसुली, दहशत निर्माण करणे, धमक्या देणे अशा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सध्या निलेश घायवळ स्वतःची टोळी चालवत असल्याची माहिती असून पुण्यात त्याच्या नावाची दहशत अजूनही काही भागांत जाणवते. नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील आंदरूड गावातील कुस्ती स्पर्धेदरम्यान त्याला सागर मोहोळकर या पैलवानाने भर कार्यक्रमात मारहाण केल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पुण्याचा अंडरवर्ल्ड संघर्ष: मारणे विरुद्ध घायवळ टोळीयुद्ध
पुणे शहराने गेल्या काही दशकांत अनेक गुन्हेगारी टोळ्यांचा उदय आणि अस्त पाहिला आहे, पण त्यात सर्वाधिक गाजलेला संघर्ष म्हणजे गजानन मारणे आणि निलेश घायवळ या दोन कुख्यात गुंडांमधील रक्तरंजित टोळीयुद्ध.
निलेश घायवळने शिक्षेवरून सुटल्यानंतर गजानन मारणेची साथ सोडून स्वतःची टोळी स्थापन केली. त्यानंतर पुण्यात या दोन्ही टोळ्यांमध्ये वर्चस्वासाठी थेट संघर्ष सुरु झाला. या वादाला भीषण वळण तेव्हा मिळालं, जेव्हा घायवळ टोळीतील सदस्य पप्पू गावडेचा खून मारणे टोळीने केल्याचं समोर आलं.
या घटनेनंतर, २०१० मध्ये दत्तवाडी परिसरात निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी मारणे टोळीवर गोळीबार केला, ज्यात सचिन कुडलेचा जागीच मृत्यू झाला. या खुनानंतर दोन्ही टोळ्यांमध्ये तुफान संघर्ष पेटला आणि शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं.
या टोळीयुद्धामुळे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. दोन्ही गट एकमेकांच्या सदस्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर हल्ले करत होते. या संघर्षाचा काळ पुण्यातील गुन्हेगारी इतिहासात ‘रक्तरंजित पर्व’ म्हणून ओळखला जातो.
गुन्हेगारी विश्वातील मोठं नाव – निलेश घायवळवर तब्बल 10+ गंभीर गुन्हे
पुणे शहरासह आसपासच्या भागात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड निलेश बन्सीलाल घायवळ हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून खालीलप्रमाणे त्याच्या विरोधातील गुन्ह्यांचा इतिहास समोर आला आहे:
– खून
– जीवे मारण्याचा प्रयत्न
– खंडणी वसुली
– दरोडा
– गर्दी जमवून दंगा करणे
– गंभीर दुखापत करणे
– मारहाण
– अपहरण व खंडणी
– भिगवण पोलीस स्टेशन येथे दाखल प्रकरण
या सर्व गुन्ह्यांमुळे निलेश घायवळ हा पुणे पोलिसांच्या “वॉच लिस्ट”मध्ये असून त्याच्या हालचालींवर सातत्यानं नजर ठेवली जाते. त्याचे अनेक साथीदार पुणे, सोलापूर आणि अहमदनगर परिसरात सक्रिय असल्याचं समजतं. मध्यंतरी त्याच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यामुळे तो पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आला होता.
सुदर्शन कंपनीसह कर्मचाऱ्यांचे सामाजिक भान कौतुकास्पद : मंत्री अदिती तटकरे यांचे प्रतिपादन
Newsworldmarathi Pune : “आर्थिक दुर्बल घटकातील गरजू व हुशार मुलींना दत्तक घेऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज व सुधा सीएसआर फाऊंडेशनचा उपक्रम स्तुत्य आहे. सुदर्शन कंपनीसह येथील कर्मचाऱ्यांनी जपलेले सामाजिक भान कौतुकास्पद आहे. हा उपक्रम आता केवळ ‘सुधा सितारा’ राहिला नाही, तर खऱ्या अर्थाने ‘सुधा सितारे’ झाला आहे,” असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. हुशार व गरजू विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी सुधा सितारा शिष्यवृत्ती संजीवनी ठरत असल्याचेही अदिती तटकरे म्हणाल्या.
सुदर्शन केमिकलच्या वतीने सुधा सीएसआर अंतर्गत मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रोहा व महाड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील २३५ विद्यार्थ्यांना ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामध्ये १८५ मुली, ४९ मुले व १२ दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राठी स्कुलमध्ये आयोजित शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यावेळी सुदर्शन केमिकल्सच्या पीपल्स प्रॅक्टिस हेड शिवालिका पाटील, सुदर्शन रोहा साईट हेड विवेक गर्ग, सीएसआर हेड माधुरी सणस आदी उपस्थित होते.
राजेश राठी म्हणाले, “संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टयांना अनुसरून सुधा सीएसआर महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक विकास या क्षेत्रात कार्यरत आहे. या सीएसआर कार्यक्रमातून आजवर लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे काम झाले आहे. ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना व्यक्तिगत मार्गदर्शन, आत्मविश्वास वृद्धी आणि भविष्यातील येणाऱ्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्याची क्षमता विकसित केली जात आहे.”
विवेक गर्ग यांनीही उपस्थितांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात याआधी शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थिनींच्या यशोगाथा ऐकून उपस्थित भारावून गेले. विद्यार्थी, त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुदर्शन कंपनी आणि त्यांचे कर्मचारी समाजातील विषमतेची दरी कमी करण्यासाठी खूप चांगले काम करत आहेत, अशी भावना पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
स्वाती मोहिता आणि संजय कचरे यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. विशाल घोरपडे यांनी आभार मानले.
MPSC च्या विद्यार्थ्यांनी घेतली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात आज सकाळी ही भेट पार पडली.
काल रात्री पुण्यात विद्यार्थ्यांनी अचानक आंदोलन करत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लगेचच त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन सुमारे अर्ध्या तासाची सविस्तर चर्चा केली.
या चर्चेदरम्यान शरद पवारांनी विद्यार्थ्यांच्या समोरच थेट MPSC आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.
विद्यार्थ्यांवर पुन्हा आंदोलनाची वेळ का आली?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालात उडालेला गोंधळ, तसेच या प्रक्रियेमध्ये दिसून येणारी अपारदर्शकता या गोष्टींमुळे नाराज स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शास्त्री रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा आपला उद्वेग आंदोलनाद्वारे सरकारपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. कटऑफपेक्षा अधिक गुण मिळून देखील गुणवत्तायादीत नाव न् आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप बघायला मिळत आहे. परिणामी, परीक्षा पुढे ढकलण्यात यावी तसेच पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या जागांमध्ये वाढ करण्यात यावी या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.
‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’
Newsworldmarathi Team : मागील काही दिवसांपासून प्रेक्षक ज्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात होते, त्या ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘गुलकंद’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास सज्ज आहे.
चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी ढवळे फॅमिली म्हणजेच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांनी स्कुटरवर, तर माने फॅमिली म्हणजे ईशा डे आणि प्रसाद ओक यांनी बुलेटवर शानदार एंट्री घेतली. पुष्पवृष्टीने कलाकारांचे स्वागत करण्यात आले आणि ‘चल जाऊ डेटवर’ या धमाल गाण्यावर कलाकारांनी थिरकत रंगतदार माहोल निर्माण केला.
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये सई आणि प्रसाद यांच्या एका खास सीनमुळे प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा रंगली होती. आता ट्रेलरमधून “प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं” या प्रसादच्या संवादाने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कथेत ढवळेंची मुलगी मीनाक्षी आणि मानेंचा मुलगा ओंकार यांच्या लग्नासाठी दोन कुटुंबं एकत्र येतात. पण या भेटीत अजून एक वेगळंच नातं निर्माण होतं. आता ढवळे आणि माने कुटुंबांमध्ये काय गोंधळ उडणार? आणि ही गुंतागुंत सुटेल का? याचं उत्तर १ मे रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळणार आहे.
‘गुलकंद’ हा एक हलकाफुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून, नात्यांमधली गुंतागुंत, भावना, हास्य आणि गोडवा यांचा एक सुरेख मेळ ट्रेलरमध्ये दिसून येतो. ढवळे-माने कुटुंबांच्या संसारात मुरलेला ‘गुलकंद’ प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा अनुभव ठरेल, याची खात्री आहे.
चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, आणि शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी केली आहे.
दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणतात, “नातं जेव्हा एकसुरी होतं, तेव्हा त्यातला गोडवा टिकवणं महत्त्वाचं ठरतं, आणि हाच गोडवा ‘गुलकंद’ चित्रपटात आहे. प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलं वाटेल. आजवर आम्ही अनेक विनोदी प्रोजेक्ट्स केले, पण या चित्रपटात भावना, नाती, प्रेम आणि विनोद यांचा सुंदर संगम आहे. एव्हरेस्टचे संजय छाब्रिया या कुटुंबाचा भाग झाले, हे आमचं भाग्य. ही टीम एकमेकांना ओळखते, त्यामुळे ‘गिव्ह अँड टेक’ अप्रतिम झाला आहे. हाच अनुभव प्रेक्षकांना मिळेल.”
निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “‘गुलकंद’ हे आमचं एक खास सिनेमॅटिक गिफ्ट आहे. दर्जेदार आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा चित्रपट आम्ही आणत आहोत. कलाकार, दिग्दर्शक, सगळ्यांनी कमाल काम केलं आहे. मला विश्वास आहे की, प्रेक्षकांना या गोडसर अनुभवाचा नक्कीच आनंद मिळेल.”
पुण्यातील गुंड निलेश घायवळ याच्यावर कुस्तीच्या फडात जीवघेणा हल्ला
Newsworldmarathi Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील आंदरूड गावात आयोजित कुस्ती फडात पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर थेट हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घायवळ हा कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित असताना त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर वाशी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 351(2) आणि 351(3) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुस्ती सुरू असतानाच अचानक एक कुस्तीपटू धावत आला अन् त्याने निलेश घायवळवर हल्ला चढवला. हा हल्ला एवढा अनपेक्षित होता की, सुरुवातीचे काही क्षण नेमकं काय झालं हे कुणालाही समजलं.गर्दीचा फायदा घेत कुस्तीपटूने निलेश घायवळवर हल्ला केला. त्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. विशेष म्हणजे, हा हल्ला दुसऱ्या कुणाकडून नव्हे तर थेट एका पहिलवानाकडून करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
निलेश घायवळ: पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी इतिहास
निलेश बन्सीलाल घायवळ हा पुण्यातील कोथरूड परिसरातील कुख्यात गुंड असून त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खंडणी, अपहरण यांसारखे २३ ते २४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो गजानन मारणे या गुंडाच्या टोळीत कार्यरत होता, परंतु नंतर दोघांमध्ये वर्चस्वाच्या वादामुळे फूट पडली आणि त्यांनी स्वतंत्र टोळ्या स्थापन केल्या. या टोळ्यांमधील संघर्षामुळे पुणे आणि परिसरात अनेक हिंसक घटना घडल्या
कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक ताणातून अशी मिळावा मुक्तता : लेखक डॉ. मिलिंद भोई
अपेक्षांचे ओझेः कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक ताण
स्त्रिया कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये अपेक्षांचे महत्त्वपूर्ण ओझे सहन करतात, ज्यामुळे तणाव व्यवस्थापन आवश्यक होते.
कौटुंबिक ताणः महिलांनी काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या अखंडपणे संतुलित करणे अपेक्षित आहे. काळजी घेणे, घरगुती कामे आणि मुलांचे संगोपन या भावनिक श्रमामुळे, अनेकदा पुरेसा आधार नसताना, बर्नआउट आणि थकवा येतो.
सामाजिक ताणः सामाजिक नियम स्त्रियांवर देखावा, वर्तन आणि उपलब्धी यासंबंधी अवास्तव मानके लादतात. अनुरूपतेचा दबाव, सामाजिक तुलनांसह, आत्म-शंका आणि चिंता निर्माण करतो.
आर्थिक ताणः आर्थिक स्वातंत्र्य सशक्त होत आहे, तरीही आर्थिक भार जबरदस्त असू शकतो. घरगुती खर्च, शैक्षणिक खर्च किंवा कर्ज व्यवस्थापित करणाऱ्या महिलांना लक्षणीय ताण येतो, जो तीव्र थकवा आणि इतर आरोग्य समस्या म्हणून प्रकट होऊ शकतो.
तणाव-संबंधित आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय
चांगले आरोग्य राखण्यासाठी तणावाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. तणाव कमी करण्यासाठी आणि त्यांचे कल्याण सुधारण्यासाठी महिलांनी सर्वांगीण दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे.
1. स्वतः ची काळजी घेण्याच्या पद्धती तणाव संप्रेरक पातळी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, योग किंवा ध्यानात व्यस्त रहा. पुरेशी झोप आणि विश्रांती तंत्रांना प्राधान्य द्या. मानसिक आरोग्यास समर्थन देणारे पोषक तत्वांनी समृद्ध संतुलित आहार ठेवा.
2. भावनिक आणि सामाजिक समर्थन ओझे सामायिक करण्यासाठी आणि एकाकीपणाची भावना कमी करण्यासाठी कुटुंब आणि मित्रांकडून भावनिक आधार शोधा. समर्थन गटांमध्ये सामील व्हा किंवा आनंद आणि पूर्तता आणणाऱ्या सामाजिक क्रियाकलापांमध्ये सहभागी व्हा.
3. वेळ व्यवस्थापन आणि सीमा बर्नआउट टाळण्यासाठी काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यातील स्पष्ट सीमा सेट करा. जबाबदाऱ्या सोपवा आणि जास्त ओझे घेणे टाळा.
4. व्यावसायिक मदत जेव्हा तणाव जास्त होतो तेव्हा थेरपिस्ट किंवा समुपदेशकांचा सल्ला घ्या. तणाव-प्रेरित शारीरिक आजारांसाठी वैद्यकीय मार्गदर्शन घ्या.
लेखक
डॉ. मिलिंद भोई
भाग 2

