केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून ‘नीट’च्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सराव व मार्गदर्शन

0
Newsworldmarathi Pune: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी (एपीएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सराव परीक्षा व मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये मॉक टेस्ट प्रश्नपत्रिका, तसेच ऑनलाईन लेक्चर्स घेतली जाणार आहेत, अशी माहिती ‘एपीएमए’च्या संचालिका डॉ. हिमानी तपस्वी यांनी दिली. डॉ. हिमानी तपस्वी म्हणाल्या, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची आशा बाळगून ‘नीट’ परीक्षेसाठी मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुणे शहरात लक्षणीय आहे. मात्र कोचिंग क्लासची फी परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय स्व-अध्ययनावर (सेल्फ स्टडी) भर देतात. नेमका अभ्यास कसा करावा, परीक्षेला सामोरे कसे जावे अशा प्रश्नाना त्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी गुणवत्ता असूनही केवळ पैशाअभावी हे विद्यार्थी मागे पडू नयेत, या उद्देशाने मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून ‘एपीएमए’ने हा उपक्रम हाती घेतला आहे.” ‘नीट’ परीक्षेच्या प्रवासात ‘एपीएमए’ या विद्यार्थ्यांसाठी सारथी म्हणून काम करेल. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सविस्तर उत्तरांसह पाच सराव प्रश्नपत्रिका www.apma.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जातील. भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री) आणि जीवशास्त्र (बायोलॉजी) या विषयांसाठी प्रत्येकी दोन, अशी एकूण सहा ऑनलाईन मार्गदर्शन व्याख्याने होतील. ही व्याख्याने झूम, तसेच युट्युबवर लाईव्ह पाहता येतील. ‘नीट’ परीक्षेची तयारी कशी करावी, परीक्षेचे नियम काय आहेत, यावर एक मार्गदर्शनपर व्याख्यानही होणार असल्याचे डॉ. तपस्वी म्हणाल्या. पुणे शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम पूर्णपणे मोफत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळून त्यांचा आत्मविश्वास आणि यशाची शक्यता निश्चित वाढेल, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी www.apma.co.in संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी व या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. १३ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना यासाठी नोंदणी करता येईल, असे त्यांनी सांगितले.

भारतीय विद्यार्थी रोबोटिक्स टीम ह्यूस्टनच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी रवाना

0
Newsworldmarathi Pune: मुंबईतील “टीम आर फॅक्टर 6024” ने USA मध्ये दोन प्रमुख पुरस्कार जिंकून ह्यूस्टनमधील FRC वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता प्राप्त केली आहे. ही वर्ल्ड चॅम्पियनशिप 16 ते 19 एप्रिल दरम्यान ह्यूस्टन, USA मध्ये होणार आहे. मुंबई स्थित “टीम आर फॅक्टर 6024” ने मार्च महिन्यात USA मध्ये झालेल्या “फर्स्ट रोबोटिक्स चॅलेंज” (FRC) मध्ये अत्यंत मान्यताप्राप्त ठरले आणि दोन प्रमुख पुरस्कार मिळवले. या टीममध्ये मुंबई, बंगलोर आणि पुणे येथील आठ शाळांतील 19 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे रोबोट प्रोग्राम, डिझाइन आणि अ‍ॅस्सेम्बल केले आहेत, ज्यासाठी त्यांना कोणतीही बाह्य मदत घेतली नाही. या विद्यार्थ्यांचा समूह 8वी ते 12वीच्या दरम्यान आहे. त्यांनी “माइंड फॅक्टरी” मुंबई येथे मार्गदर्शक निलेश शाह आणि पारुल शाह यांच्या नेतृत्वाखाली काम केले. त्यांच्या तयार केलेल्या रोबोटचे नाव “गोल्डफिश” आहे. टीममधील काही सदस्य हे मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी आहेत, ज्यात समृद्धी स्वरुप, रिनेसा देधिया, प्रपटी दोशी, रिधान देधिया, सक्षम गुप्ता, रचित जैन आणि अर्जुन वशिष्ठ यांचा समावेश आहे. तर, अन्य सदस्य हे मुंबईतील “डीएसबी इंटरनॅशनल स्कूल”, “पेस जूनियर कॉलेज”, “जामनाबाई नारसी स्कूल”, “विटी इंटरनॅशनल स्कूल”, “राजहन्स विद्यालय” आणि “सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल” येथील विद्यार्थी आहेत. पुण्यातील “विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी” आणि गोव्यातील “शारदा मंदिर स्कूल” येथील विद्यार्थ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. टीम आर फॅक्टर 6024 ने ‘2025 इमेजरी अवॉर्ड’ आणि ‘2025 इंजिनीअरिंग इन्स्पिरेशन अवॉर्ड’ मिळवले आहेत. इमेजरी अवॉर्ड इंजिनीअरिंग आणि व्हिज्युअल डिझाइनला मान्यता देतो, तर इंजिनीअरिंग इन्स्पिरेशन अवॉर्ड समुदायात इंजिनीअरिंगच्या क्षेत्रातील उत्साही भावना वाढविण्यासाठी दिला जातो. या पुरस्कारासाठी टीमने USA, मेक्सिको आणि टर्की येथील इतर टीम्सशी स्पर्धा केली. टीम 6024 ही FRC च्या इतिहासातील पहिली भारतीय टीम आहे, आणि त्यांचा उद्देश FIRST (For Inspiration & Recognition of Science & Technology) या नॉन-प्रॉफिट संस्थेचा भारतात आधार मजबूत करणे आहे. या टीमने आपल्या 10 वर्षांच्या कार्यकालात गरीब विद्यार्थ्यांना रोबोटिक्स शिकवले, पुण्यात FIRST टेक चॅलेंज (FTC) आयोजित केले आणि विविध सत्रांमध्ये आपल्या नवकल्पनांचे प्रदर्शन केले. टीम आर फॅक्टर 6024 च्या या यशाने भारतीय रोबोटिक्स क्षेत्रात एक नवीन आयाम निर्माण केला आहे आणि तेथील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरले आहे.

आळंदीत अवतरले हिमालयीन चैतन्य : ध्यानयोग शिबिरास उदंड प्रतिसाद

0
Newsworldmarathi Pune : वारकरी संप्रदायातील महान संत ज्ञानेश्वर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आळंदीच्या भूमीत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या हिमालयीन समर्पण ध्यान योग शिबिराला भारतासह जगभरातून हजारो साधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची, पुणे आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन, गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० ते १२ एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या दोन दिवसांमध्ये १५ ते २० हजार साधकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आध्यात्मिक अनुभूती घेतली. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन सोहळा आमदार अशोक पवार, डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, ओडिशा पोलिस दलातील आयपीएस, महासंचालक अधिकारी श्री दीक्षित, श्री संदीप पाटील, आयपीएस, पोलीस महानिरीक्षक, अति नक्षलविरोधी अभियान, महाराष्ट्र राज्य, श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनचे संचालक अंबरीश मोडक, चंदेली महाराज, जोग महाराज शिक्षण संस्थेचे सचिव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या पवित्र सान्निध्यात हिमालयातील गूढ आणि दिव्य चैतन्याचे दर्शन देणारे हे शिबिर, उपस्थित भक्तांसाठी अध्यात्मिक शांती, आत्मानुभूती आणि अंतर्मुखतेचा एक अद्वितीय प्रवास ठरले. गेली दोन दिवस हे आध्यात्मिक शिबिर साधकांसाठी अत्यंत आगळीवेगळी पर्वणी ठरत आहे. – स्वामीजींचे प्रवचन आणि आध्यात्मिक संदेश : शिबिरात श्री शिवकृपानंद स्वामीजींनी आपल्या प्रभावी वाणीने श्रोत्यांच्या अंतःकरणात आध्यात्मिक प्रकाश जागवला. त्यांच्या प्रवचनातील काही मोलाचे संदेश: “समाजातील विविध धर्म उपासना पद्धती आहेत, खरा धर्म मनुष्यधर्म आहे.” “परमात्मा ही विश्वचेतना आहे, जी निर्मळ माध्यमातून प्रकट होते. भारतात जिवंत परमात्म्याची परिकल्पना गुरूंच्या रूपात मान्य केलेली आहे.” “गुरु म्हणजे अंतर्मुखता देणारा दीपस्तंभ. जीवनात आध्यात्म्याचे बीज पेरले गेले तरच सकारात्मक परिवर्तन शक्य आहे.” “ध्यान म्हणजे वर्तमानात राहणे, अपेक्षांविना जगणे. नियमित ध्यान साधनेने जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात.” प्रवचनाच्या समाप्तीला स्वामीजींनी “मैं एक पवित्र आत्मा हूँ, मैं एक शुद्ध आत्मा हूँ” या मंत्राद्वारे सर्व साधकांकडून सामूहिक ध्यान करून घेतले. – थेट प्रक्षेपण आणि जागतिक प्रसारण: या दिव्य कार्यक्रमाचे “गुरुतत्त्व” यूट्यूब चॅनेलसह सुमारे ५० सॅटेलाइट व केबल टीव्ही चॅनेल्सवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले असून भारतासह ७० पेक्षा अधिक देशांतील साधक याचा लाभ घेत आहेत. आध्यात्मिक प्रदर्शनी विशेष आकर्षण: या शिबिरात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी आध्यात्मिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून, आयोजकांच्या मते, ही प्रदर्शनी ध्यानसाधनेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते आणि प्रत्येक साधकासाठी प्रेरणादायी ठरते. – संतभूमीत हिमालयाचे चैतन्य : आळंदी सारख्या संतपरंपरेने पावन झालेल्या भूमीत हिमालयाच्या दिव्य ऊर्जेची अनुभूती देणारे हे शिबिर भक्तांच्या स्मरणात दीर्घकाळ रेखाटले जाईल, यात शंका नाही. हे शिबिर म्हणजे भक्तांसाठी एक आत्मिक पर्वणीच ठरली.

“तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तुझ्या आई-वडिलांचे मुंडके उडवीन”; युवकाच्या धमकीमुळे विद्यार्थिनीचा टोकाचा निर्णय

Newsworldmarathi Pune : बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील एका तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुणाने पीडित मुलीला लग्नासाठी जबरदस्ती करत होतं. त्यास नकार दिल्यानंतर “तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तुझ्या आई-वडिलांचे मुंडके उडवीन” अशी धमकी दिली. या धमकीमुळे भयभीत झालेल्या मुलीने अखेर आपल्या आयुष्याचा अंत करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १५ वर्षीय मयत मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे त्याचे साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हा गेल्या अनेक महिन्यांपासून मयत मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. मेसेज वर धमक्या देत होता. माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकीन अशी धमकी देत होता. चारही आरोपी शस्त्र दाखवून मयत मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग आणि दमदाटीला मयत मुलगी कंटाळली होती. दरम्यान, ७ एप्रिलला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने मयत मुलगी भयभीत झाली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून संबंधित तरुणाविरोधात कठोर कारवाई होण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त 13 ते 19 एप्रिल दरम्यान रंगणार ‘जागर संविधानाचा’

0
Newsworldmarathi Pune: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचा संयुक्त कार्यक्रम ‘जागर संविधानाचा’  हा 13 ते 19 एप्रिल दरम्यान विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश संघटन सचिव  परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव दीपक म्हस्के, तानाजी तापकीर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना वाडेकर म्हणाले, ‘जागर संविधानाचा’ अंतर्गत विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल नागरिकांना तब्बल आठवडाभर अनुभवायला मिळणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनात पुणे महापालिकेच्या माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. महोत्सव समितीच्या वतीने यापूर्वी गणेश कला क्रीडा रंगमंच, शनिवार वाडा अशा विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले आहेत. यंदाचे  सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक, बोपोडी, पुणे येथे होणार आहेत. या उपक्रमांतर्गत दिनांक 13 रोजी रात्री बारा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव सोहळा 2025 हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये धम्मवंदना, भीमस्तुती, भीमस्मरण आणि नजरबंदी करणारी फटाक्यांची भव्य आतिषबाजी यांचा समावेश आहे. तिन्ही महापुरुषांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी दिनांक 14 रोजी सायंकाळी सहा वाजता ‘जयंती जल्लोष’ हा कार्यक्रम आयोजित केला असून त्यामध्ये भव्य लाईट अँड साऊंड शो प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आंबेडकरी चळवळीतील शाहीर मीराताई उमप यांच्या भारुड आणि आंबेडकरी जलसा चा कार्यक्रम दिनांक 15 रोजी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे तर, संगीतकार जॉली मोरे व शाहीर सीमा पाटील यांचा ‘वुई द पीपल’ हा संगीत महानाट्य आणि आंबेडकरी जलसा चा कार्यक्रम दिनांक 16 रोजी संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. लेखक, दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांच्या ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाचा प्रयोग दिनांक 17 रोजी संध्याकाळी सहा वाजता होणार असून उदय साटम लिखित आणि दिग्दर्शित ‘गौरव संविधानाचा’ हा कार्यक्रम 18 तारखेला संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. भारतीय संविधान आणि महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ याने या महोत्सवाची सांगता होणार आहे. या सर्व  कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परशुराम वाडेकर यांनी केले आहे. *‘फुले’  चित्रपटाला पाठिंबा* चित्रपट सेन्सॉर बोर्डने अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले‘ या चित्रपटात तब्बल 12 बदल सुचवले आहेत. महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे. जात, मनू, मांग, महार वगैरे शब्द, सावित्रीबाईंच्या अंगावर मुलांनी शेण फेकण्याचा प्रसंग, पेशवाईचा उल्लेख, तुमचे हात आणि पाय वेगळे केले असते हा संवाद चित्रपटातून काढा, असे या स्वतःला विद्वान समजणाऱ्या सेन्सॉर बोर्डाने  दिग्दर्शकाला सांगितले आहे. या मंडळींना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य आणि त्यांचे काम माहीतच नसणार. या सेन्सॉर बोर्डने आधी कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न एका दिग्दर्शकाला केला होता.  समाज सुधारकांचे कार्य लोकांच्या पुढे येऊ नये असे सेन्सॉर बोर्डाला वाटते, परंतु आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पक्ष ‘फुले’ चित्रपटाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे परशुराम वाडेकर यांनी सांगितले.

पार्थने ठरवलं की त्याचंही लग्न करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

0
Newsworldmarathi Pune : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार यांचा काल साखरपुडा अगदी थाटामाटात पार पडला. पार्थ दादा जय पवार यांच्यापेक्षा मोठे आहेत मग त्यांचं लग्न कधी असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला होता. अजित पवार यांनी त्यांच्या शैलीमध्ये उत्तर देत म्हणाले, की जयने त्याचं ठरवलं… पार्थने ठरवलं की त्याचाही लग्न करू… या उत्तरामुळे पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. जय पवार यांचा काल साखरपुडा संपन्न झाला. अजित पवारांच्या पुण्याच्या फार्महाऊसला हा शाही साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंब, काही ठरावीक मित्रमंडळी उपस्थित होते. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा आज पुण्यात संपन्न झाला. या सोहळ्याला अजित पवार यांचे सर्व कुटुंबीय ज्यामध्ये शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबीयातील सर्व सदस्य उपस्थित होते. पुण्यातील घोटावडे या ठिकाणी असलेल्या अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर मोजक्या लोकांमध्ये साखरपुडा सोहळा संपन्न. सोहळ्याला फक्त विशेष आमंत्रितांनाच बोलवण्यात आलं होतं.

असा आभाळ ज्योतिबा… त्याला मस्तकी मिरवा…

0
Newsworldmarathi Team: उपाशी पोटी सत्य शोधता येत नाही. बाकी सत्य शिव सुंदर आहे अशा रोमँटिक कल्पनाही लक्जरी व प्रिव्हीलेजचं काम आहे. ज्यांच्या घरी दिमतीला दास्यांची फौज होती अशा नोबेल प्राप्त कविंनी ते सत्य शोधावंही. महात्मा ज्योतीबा फुलेंनी येथल्या बहुजनांना चला आता सत्यशोधू गड्या.. असला कोणताही व्यक्तीगत कॅथरसिस केला नव्हता. त्यांना स्पष्टपणे माहित होतं की येथील सर्वच जात-धर्म ‘इन्स्टीट्युशन’ आपल्याला केवळ ‘ज्ञान’ किंवा ‘सत्य’ अशा कोणत्या अबस्ट्रॅक गोष्टीपासून अडवून ठेवत नाहीत तर त्यांचा मुख्यहेतू तुम्हाला सत्यापासून नाहीतर ‘सत्तेपासून’ दूर ठेवणं हा आहे. सत्ता ही येथल्या रिसोर्सेसवरील. पाण्यावरील, धान्यावरील होय इथल्या संपत्तीवरील. धंदा, उद्योगावरील. आता सत्य शोधत बसायचं की सत्ता शोधायची? काय आहे प्रॅगमॅटिक अप्रोच? सत्य शोधण्याचा संघर्ष कदाचित मोरल पातळ्यावर ज्यांनी शोधायचा त्यांनी शोधावा. पण सत्तेवर आणि थेट इथल्या सगळ्या रिसोर्सेवर क्लेम करायचा असेल तर तुम्हाला मोरलशी चर्चा करायला वेळ नसतो , कारण तुमच्यावर थेट हल्ले होत असतात. ज्या रस्त्यावरून ब्राम्हणेत्तरांना चालयलाही परवानगी नव्हती तीथं जोतीबा घोड्यावर बसून ऐटीत टापात तेबी लाऊडली जायचे. यासाठी जिगरा लागतो. कारखाने, कंत्राटं, स्टेटमध्ये संबंध, पैसे घालून प्रकाशन, पत्रकं, बॉडीगार्ड, हान की बडीव विषय होता डॉनचा. आता डॉन महात्मा फुलेंची इमेज मचूळ करून त्यावर नाटकं व सगळं हळहळी टाईप साक्षेपीछाप चालंलय. असो. सत्याचा शोध सत्तेच्या शोधाशिवाय शक्य नाही.. हेच पुढे महामानव बाबासाहेबात दिसत..पाण्याचा लढा म्हणजे काय? रिसोर्सेसवरचा हक्क.. शासनकर्ती जमात म्हणजे काय? सत्तेत वाटा.. मंग कुठं सगळा धुरळा बसल्यावर सत्य म्हणजे बुद्धाच्या दिशेने वैगेरे.. हे फक्त बाबासाहेबांना राईट कळलं होतं. असो. बहुजन पोरांनी ह्या वैचारिक,साहित्यिक, समतोली, साक्षेपी वैगेरे भंपक ग्रटीफिकेशनच्या नावाखाली भुरट्या युवा विचारवंताच्या, नाटक कंपन्या व लेखक सेलिब्रीटींना दिपून न जाता नीट झक मारली पाहिजे. आरं क्रिप्टो-फिप्टो जग कुठल्याकुठं चाललंय.. आपल्याला हाये ते इकून पुण्याकडं यावं वाटायलंय..अन पोराचं इकडं यगळंच गाणं वाजायलंय.. लेख वाचून कळवतो म्हणे.. दिर्घ लिहतो म्हणे..सिनेमा समिक्षा लिहतो म्हणे. तुम्हाला किंमत नसलेल्या व ज्यातली इॅकॉनॉमी संपलीये त्याच जागा घेण्याचा मोह वाटणं हे काही खरं आणि बरं नाही. कुणाल तात्या गायकवाड यांच्या फेसबुकहून साभार …

जय पवारच्या शाही साखरपुड्याला पवार कुटुंब एकत्र; सुप्रिया सुळे यांनी केले फोटो शेअर

0
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा संपन्न झाला. अजित पवारांच्या पुण्याच्या फार्महाऊसला हा शाही साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंब, काही ठरावीक मित्रमंडळी उपस्थित होते.
Oplus_131072
अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा आज पुण्यात संपन्न झाला. या सोहळ्याला अजित पवार यांचे सर्व कुटुंबीय ज्यामध्ये शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबीयातील सर्व सदस्य उपस्थित होते. पुण्यातील घोटावडे या ठिकाणी असलेल्या अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर मोजक्या लोकांमध्ये साखरपुडा सोहळा संपन्न. सोहळ्याला फक्त विशेष आमंत्रितांनाच बोलवण्यात आलं होतं.
Oplus_131072
साखपुड्यानंतर सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे काही खास फोटो शेअर करत नव्या जोडप्याला शुभेच्छा आणि नव्या सूनेचं कुटुंबात स्वागत केलं आहे. साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘जय मी तुझ्यासाठी प्रडंच आनंदी आहे… ऋतुजा तुझं स्वागत… दोघांनी देखील शुभेच्छा…’ सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मानसिक तणावाचा शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम होतो..

Newsworldmarathi team : मानसिक ताण हा आधुनिक जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे, परंतु त्याचा शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो, विशेषतः स्त्रियांमध्ये. स्त्रिया बर्‍याचदा अनेक भूमिका पार पाडतात—व्यावसायिक, काळजीवाहू, माता आणि गृहिणी, ज्यामुळे मानसिक ताण वाढतो. कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक दबाव हे ओझे वाढवतात, परिणामी शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. हे परिणाम समजून घेणे आणि तणाव कमी करण्यासाठी प्रभावी धोरणे स्वीकारणे हे एकूणच कल्याणासाठी महत्त्वाचे आहे. तणावाचा शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम होतो जेव्हा मन तणावाखाली असते तेव्हा शरीर शारीरिक बदलांसह प्रतिसाद देते. कॉर्टिसोल आणि एड्रेनालाईन सारख्या तणाव संप्रेरकांचे प्रकाशन, “लढा-किंवा-उड्डाण” प्रतिसादास चालना देते, जे दीर्घकाळापर्यंत, विविध शारीरिक कार्यांमध्ये व्यत्यय आणू शकते. 1. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या: तीव्र ताण रक्तदाब वाढवतो, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढवतो. उच्च पातळीच्या तणावाचा अनुभव घेणाऱ्या महिलांना उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका येण्याची अधिक शक्यता असते. 2. हार्मोनल असंतुलन: तणाव मासिक पाळीमध्ये व्यत्यय आणू शकतो, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) ची लक्षणे वाढवू शकतो आणि गर्भधारणेमध्ये गुंतागुंत होऊ शकतो. तीव्र ताणतणाव असलेल्या महिलांना लवकर रजोनिवृत्तीचा अनुभव येऊ शकतो. 3. कमकुवत प्रतिकारशक्ती: सततचा ताण रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो, ज्यामुळे शरीर संक्रमण, ऍलर्जी आणि स्वयंप्रतिकार विकारांसाठी अधिक असुरक्षित बनते. 4. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर: तणाव आतड्याच्या आरोग्यावर परिणाम करतो, ज्यामुळे इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS), ऍसिड रिफ्लक्स आणि अल्सर सारख्या समस्या उद्भवतात. 5. मानसिक आरोग्य विकार: दीर्घकाळापर्यंत तणावाचा सामना करणाऱ्या महिलांमध्ये चिंता, नैराश्य आणि निद्रानाश सामान्य आहेत. भावनिक त्रासामुळे अति खाणे, मादक पदार्थांचे सेवन करणे किंवा सामाजिक जीवनातून माघार घेणे यासारख्या अस्वास्थ्यकर सामना करण्याची यंत्रणा देखील होऊ शकते. 6. वजन चढउतार: तणाव भूक आणि चयापचय प्रभावित करते, ज्यामुळे कमी भूक आणि पाचन त्रासांमुळे तणाव खाण्यामुळे किंवा वजन कमी झाल्यामुळे वजन वाढते. 7. त्वचा आणि केसांच्या समस्या: पुरळ, एक्जिमा, केस गळणे आणि अकाली राखाडी होणे हे हार्मोनल असंतुलनामुळे तणाव-प्रेरित असतात. लेखक डॉ. मिलिंद भोई भाग – 1

पीएमआरडीला ‘डीपी’ रद्द करण्याची नामुष्की

0
Newsworldmarathi Pune :’पीएमआरडीए’ ने साडे तीन वर्षापूर्वी तयार केलेला व अमंलबजावणीसाठी प्रस्तावित ठेवण्यात आलेल्या डीपीला रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाडसी निर्णय घेऊन डीपीला रद्द ठरविण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी भविष्यात तयार करण्यात येणारा ‘डीपी’ राजकीय हस्तक्षेप विरहीत व दलालांचा हस्तक्षेप विरहीत असावा अशी अपेक्षा सामान्यांकडून होत आहे. पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचा डेव्हलपमेंट प्लॅनिंग अर्थात डीपी रद्द करण्याची परिस्थिती राज्य सरकारवर उद्भवली आहे. सुमारे साडे सहा हजार चौरस मीटर किलोमीटर क्षेत्रावर तयार करण्यात आलेला हा डीपी अक्षम्य चुका व पारदर्शकेचा आधारावर तयार करण्यात आला नसल्याचा ठपका ठेवत रद्द करण्याची परिस्थिती ओढवली आहे. हा डीपी रद्द करण्याचा धाडसी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असला तरी डीपीत सामाविष्ठ योजनेत अतिशय अन्यायकारक रचना सामान्यांवर लादल्याने डीपी रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढविली आहे. गेली दहा वर्षापासून पुणे शहराभोवतीच्या नियोजनबध्द विकासासाठी ‘पीएमआरडीए’ ची स्थापना झाली असली तरी या प्राधिकरणामार्फत कुठलाच धोरणात्मक विकासाचा हेतू सामाविष्ठ गावांच्या विकासातून दिसत नाही.या प्राधिकरणाने साडेसहा हजार चौरस किलोमीटर भागाचा सामाविष्ठ केला असला तरी विकासाऐवजी पीएमआरडीए कडून कुठल्याही प्रकारची रचनात्मक सुविधा न मिळता उलट या सामाविष्ठ भागातून भरमसाठ कर आकारून रचनात्मक विकासाचा हेतू साध्य न करता उलट मनस्तापाचे केंद्र म्हणून पीएमआरडीएकडे बघण्याची वेळ सामान्यांवर आली आहे. ‘पीएमआरडी’ च्या नियोजित हद्दीची रुपरेषा ठरल्यानंतर या प्राधिकरणाची जबाबदारी निश्चित झाल्यानंतर नागरीकांना या व्यवस्थेद्ववारे चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होऊन सुलभ विकसनशील परवाणग्या मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र प्राधिकरणाकडून सुंदर संकल्पना दृष्टीक्षेपात येण्याऐवजी या व्यवस्थेत क्लिष्ट प्रक्रिया, बांधकाम आराखडे मंजुरीसाठी मनस्ताप , अधिकाऱ्यांकडून परवानगीसाठी भरमसाट ‘अर्थिक’ पिळवणुकीची व्यवस्था तसेच अधिकाराचा बेलगामपणे वापर करुन सामान्य विकसकांना अर्थिक व्यवहारांसाठी छळ सुरू असल्याची चर्चा आहे. तर या प्राधिकरणाची अनधिकृत बांधकाम धारकांना भिती दाखवून नोटिस पाठवून सटलमेंट क्रिया करुन ‘चोरुन सोडून संन्यासाला अटक ‘ अशा प्रकार या विभागाचा कारभाराचा अनुभव नागरीकांना आहे. त्यामुळे या प्राधिकरणाचाडीपी बदलला असला तरी ‘खादाड’ पणाला वेसण कोन घालणार अशी सामान्यांना अपेक्षा आहे. प्राधिकरणाकडून तयार केलेला डीपी हा या सर्व विवादीत अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली तयार झाल्याने डीपी रद्द झाला तरी पुढील डीपी तयार होताना राजकीय व दलाली ही साखळी या डीपी पासून रोखण्याचे आव्हान असणार आहे. रद्द झालेल्या या डीपीत राजकीय व दलाल मंडळींनी अधिकारी हाताशी धरुन कोट्यवधींची उड्डाणे घेतल्याची उघड चर्चा दबक्या कारभारात आहे. नव्याने तयार होणाऱ्या डीपीत नगरविकास विभागाच्या सर्व नियम व अटींचे तंतोतंत पालन करुन पारदर्शक व्यवस्था करणे अपेक्षित आहे. पुढील डीपीचे धोरण ठरविताना भौगोलिक, नैसर्गिक व स्थानिक परिस्थितीचे अवलोकन करुन डीपी तयार व्हावा अशी माफक अपेक्षा सामाविष्ठ गावांत आहे.