Newsworldmarathi Pune : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातून दरवर्षी करोडो भाविक येतात . त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी ,शुद्ध व थंड पिण्याचे पाणी बाराही महिने भाविकांना कायम मिळावे यासाठी रसिकलाल एम धारीवाल फाऊंडेशन द्वारा “प्याऊ -जल प्रकल्प ” लोकार्पण करतांना मला अतिशय आनंद होत आहे , या निमित्ताने रुपये २६. ५० लक्ष निधीचा ,२००० लिटर क्षमतेचा आर ओ प्लांट उभारण्यात आला आहे व मंदिराच्या चारही मजल्यावर सर्वच ठिकाणी थंड व शुद्ध पाणी भाविकांना उपलब्ध होणार आहे आणि आज रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर आई भवानी मातेच्या चरणी हा प्रकल्प सेवाभावाने मी अर्पण करते अशी भावना फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांनी व्यक्त केली .
आर एम डी फाऊंडेशनद्वारा संपूर्ण भारतभर प्याऊ -शुद्ध व थंड पिण्याचे पाणी विविध ठिकाणी जसे शासकीय रुग्णालये ,शाळा महाविद्यालय , सार्वजनिक उद्यानं , बाजारपेठा तसेच धार्मिक ठिकाणी उपलब्ध करून दिल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली . श्री राणा जगजीत सिंह पाटील आमदार तथा विश्वस्त सदस्य यांनी मंदिरास “प्याऊ जल प्रकल्प “ उभारून आर एम डी फाऊंडेशन द्वारे भाविकांची शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची सोय केली याबाबत देवस्थानच्या व भाविकांच्या वतीने शोभाताई यांचा साडी, श्रीफळ , व भवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला व आभार मानले . कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी धाराशिव ,तहसीलदार ,कमांडंट श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय , देवस्थानाचे जनसंपर्क अधिकारी , प्राचार्य श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय, प्रदीप राठी, आकाश राठी अध्यक्ष लातूर अर्बन बँक , चंदकरण लड्डा , आर एम डी फाउंडेशन द्वारा माढा सोलापूर येथे माढा वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून लवकरच लोकार्पण होत असलेले शोभाताई धारीवाल शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे महेश डोके व श्री धनराज शिंदे पदाधिकारी व इतर मान्यवर तथा भाविकगण मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Newsworldmarathi Pune : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या प्रतिमेला सुरुंग लागणाऱ्या घटनांमुळे आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहता त्यांनी स्वेच्छेने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
तनिषा भिसे या रुग्णाच्या उपचारासंदर्भात झालेल्या वादानंतरच ही घटना घडल्याने, या प्रकरणाला अधिक गती मिळाली आहे. डॉ. घैसास यांनी रुग्णालय प्रशासनाला अधिकृतरित्या राजीनामा सुपूर्त केला असून, या राजीनाम्याची माहिती समोर येताच वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तनिषा भिसे या अल्पवयीन रुग्णाच्या उपचारासाठी डॉ. घैसास यांनी अमानत रक्कम (deposit) भरावी लागेल, अशी अट घातल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला होता.
या आरोपानंतर सोशल मीडियावर रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी अशा वर्तणुकीचा निषेध करत रुग्णालय व्यवस्थापनाकडून कारवाईची मागणी केली.
Newsworldmarathi Pune : रामनवमी उत्सव देशभरात विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला .पुण्यातील रामवाडी येथील रामनवमी उत्सव मात्र इक्रम खान यांच्यामुळे चर्चेत आला आहे .इक्रम खान हे दरवर्षी रामनवमी उत्सवात सहभागी होऊन वर्षानुवर्षे साजरी करीत आहेत .इक्रम खान यांचे आजोबा व मुसा खान त्यांनतर त्यांचे वडील इसा खान हे दरवर्षी रामवाडी येथील राम मंदिराच्या रामनवमी उत्सवात सहभागी होऊन सर्व प्रकारच्या मदतीने या उत्सवाचा प्रमुख भाग बनत आहेत .तीच परंपरा पूना गोल्फ क्लब चे कप्तान आणि उद्योजक इक्रम खान यांनी पुढे चालवली आहे .
सध्या देशाला सर्वधर्म समभावाच्या विचाराची गरज असताना खान कुटुंबाने मात्र १९३२ सालापासून रामनवमी उत्सव साजरा करून आणि त्यात हिरारीने सहभाग घेऊन समाजापुढे फार मोठा आदर्श निर्माण केल्याची भावना स्थानिक रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे .खान कुटुंबाच्या या कार्याचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे .आणि अशीच अपेक्षा सर्व धर्मातील बांधवाकडून व्यक्त केली जात आहे .यावेळी विजय गलांडे ,तोलेस्वर देवकर प्रमोद देवकर,संतोष देवकर सह राम मंदिर ट्रस्ट चे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते .
Newsworldmarathi pune : दिनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाने घेतलेली दखल आणि आरोग्य विभागाचा अहवाल सादर करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये बैठक बोलवण्यात आली आहे.
रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून, आरोग्य उपसंचालक व पोलिस आयुक्त या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत संबंधित राज्याच्या वतीनेची समिती नेमण्यात आलेली आहे या समितीने तयार केलेला अहवाल यावेळी सादर केला जाणार आहे. शिवाय पोलिसांनी जो जबाब नोंदवला आहे त्यात जबाबावर देखील चर्चा केली जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये झालेल्या गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी ही बैठक महत्त्वपूर्ण असणार आहे.
Newsworldmarathi Pune : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी आज महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली. यावेळी सविस्तर प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
चाकणकर म्हणाल्या, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची घटना घडली त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटताना दिसत आहेत. आरोग्य सुविधा ही मूलभूत अशी गरज आहे नागरिकांना धर्मादाय संस्थांनी चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा देण अपेक्षित असताना आणि तशी नियमावली असताना रुग्णाला त्यांनी उपचार देण्यासाठी टाळाटाळ केली. यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला.
रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये झालेली चर्चा ही गोपनीय असते पण रुग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी अहवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला आहे. आणि त्यामध्ये रुग्णच्या बऱ्याचश्या गोपनीय गोष्टी जाहीर केले आहे. हे अत्यंत चुकीचा आहे हा अहवाल रुग्णालयाने समिती समोर मांडायला पाहिजे होता. याबद्दल त्यांना कडक शब्दात समज देणार आहे. असे ही रुपाली चकणकर म्हणाल्या.
आज राज्य महिला आयोगाच्या वतीने पोलीस आयुक्तालयांमध्ये बैठक बोलवण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये राज्याच्या वतीने जी समिती केली आहे त्याचा अहवाल पोलिस आयुक्तालयात सादर केला जाणार आहे. शिवाय पोलिसांनी जो जबाब नोंदवलं आहे त्यावर सुद्धा चर्चा केली जाणार असल्याचे चाकणकर म्हणाल्या.
Newsworldmarathi pune : रामायणातील काही दुर्लक्षित व्यक्तिरेखांवर आधारित ‘रामपर्व’ या अनोख्या सांगीतिक कार्यक्रमाचे गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि व्यक्ताव्यक्त, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सायंकाळी ६:३० वाजता गांधर्व महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात होणार आहे.
रामायण हा भारतीयांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे.
प्रत्येक हिंदू माणसाच्या मनात प्रभू रामाचे अढळ स्थान आहे. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी पूर्ण झाल्यानंतर समस्त भारतीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रामायणात अशा काही व्यक्तिरेखा आणि प्रसंग आहेत ज्यावर कदाचित काव्य रचले गेलेले नाही. हाच दुवा धरून त्या व्यक्तिरेखा आणि प्रसंगावर आधारित काही काव्यरचना कवी अमित गोखले (पार्थ) यांनी रचल्या आहेत.
गीतरामायणातील अविट गोडी असलेल्या रचनांप्रमाणेच ‘रामपर्व’ कार्यक्रमातील रचनांना संगीतकार हेमंत आठवले आणि जान्हवी गोखले यांनी संगीतबद्ध केले असून ते रचना सादर करणार आहेत. शुभदा आठवले, केदार तळणीकर, अवधूत धायगुडे, वेधा पोळ साथसंगत करणार आहेत.
आपल्या मनात खोलवर रुजलेल्या या विषयाला एका वेगळ्या संहितेत बांधून रसिकांसमोर नवनिर्मितीचा आनंद ‘रामपर्व’द्वारे प्रकट करण्याचा मानस आहे, असे कार्यक्रमाचे संयोजक हेमंत आठवले यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. कार्यक्रम रसिकांसाठी खुला आहे.
Newsworldmarathi Pune: “आपल्या प्रश्नांची सोडवणूक होईल, हिताचे निर्णय होतील, या आशेने सामान्य नागरिक विधिमंडळाकडे पाहत असतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी करायला हवा,” असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. हा घरचा, गावकऱ्यांनी केलेला सत्कार भावस्पर्शी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
विधान परिषदेच्या सभापतिपदी निवड झाल्याबद्दल प्रा. राम शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. विधान परिषद आमदार योगेशअण्णा टिळेकर यांच्या पुढाकारातून कोंढवा बु. ग्रामस्थ, कर्जत-जामखेड, करमाळा रहिवाशी संघाच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. इस्कॉन मंदिर सभागृहात आयोजित सोहळ्यात योगेशअण्णा टिळेकर, माजी नगरसेविका रंजना टिळेकर, मनीषा कदम, वृषाली कामठे, नगरसेवक अनिल येवले, सतीश मरकड, तुषार कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, इस्कॉन मंदिराचे संजय भोसले, स्थानिक पदाधिकारी विरशेन जगताप आदी उपस्थित होते.
प्रा. राम शिंदे म्हणाले, “निवडणुकीत पराभूत होऊनही पक्षाने या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी दिली. हा मोठा बहुमान आहे. सभागृह चालवताना लोकांचे प्रश्न मांडत असलेल्या सदस्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो. माझ्यासह योगेश टिळेकर हेही विधानसभेला पराभूत झाले, परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस व पक्ष नेतृत्वाने आम्हाला जनतेसाठी काम करण्याची संधी दिली. मनात स्वच्छ, निर्मळ आणि लोकांप्रती संवेदना जागृत असतील, तर न्याय मिळतोच.”
“आम्हाला दोघांनाही कट कारस्थान करून पराभूत केले. मात्र मागे न सरकण्याची आमची भूमिका आहे. लोकांमध्ये राहणारा माणूस असल्याने पक्षाने आमचा सन्मान ठेवला. योगेश टिळेकर यांनी सभागृहात पोटतिडकीने आपल्या भागातील, तसेच राज्यातील जनतेच्या हिताचे प्रश्न, लक्षवेधी मांडल्या. त्यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच दालनात बैठका लावल्या असून, १५ ते २० दिवसात समान पाणीपुरवठा आणि कात्रज-कोंढवा रस्त्याचा प्रश्न सुटेल. माथाडी कामगारांवर अन्याय होणार नाही. विधेयकात काही तरतुदी बदलाव्या लागल्या, तर चर्चा करून त्यात सुधारणा केली जाईल.”
योगेशअण्णा टिळेकर म्हणाले, सामान्य कुटुंबातील आपला माणूस विधान परिषदेचा सभापती झाला, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांची सेवा करताना तुमचे प्रश्न जोरकसपणे मांडू शकतो, कारण तिथे शिंदे साहेब आता सभापती म्हणून बसले आहेत. त्यांच्या कार्यातून नेहमीच शिकत आलो आहे. अहमदनगरचे अहिल्यानगर होण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. राजमाता अहिल्याबाई यांचा आदर्श घेऊन शिंदे साहेब काम करत आहेत. चोंडीचा विकास करण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे. शिंदे, होळकर परिवाराचा वारसा यशस्वीपणे चालवत आहेत. संघटनेने, नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकला. आप्तस्वकीयांचा हा सत्कार आपल्याला ऊर्जा देणारा ठरेल. देवेंद्र फडणवीस आणि प्रा. राम शिंदे यांची जोडी महाराष्ट्राला दिशा देईल. आपल्या पाठिंब्याने कात्रज, कोंढवा भागातील प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास वाटतो.”
संजय भोसले, भूषण नहाटा यांनी मनोगते व्यक्त केली. गोकुळ बरकडे यांनी प्रास्ताविक केले. अमर हजारे यांनी सूत्रसंचालन केले. वीरशेन जगताप यांनी आभार मानले. मानपत्र वाचन अश्विनी कामठे यांनी केले.
Newsworldmarathi Team : पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला शुभम नवले या त्यांच्या सामाजिक कार्य आणि सोशल मीडियावरील सक्रियतेमुळे चर्चेत आहेत. वयाच्या २७व्या वर्षी त्यांनी कारेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवडून येण्याचा मान मिळवला. निर्मला नवले यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व यामुळे त्या अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. त्यांच्याशी आमच्या न्यूजवर्ल्ड मराठीच्या टीम ने केलेली ही खास बातचीत
Oplus_131072
राजकारणात सुरुवात कशी झाली?
“मी आयटी इंजीनिअर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. माझे वडील भारतीय सैन्यात आर्मी ऑफिसर कॅप्टन होते. त्यांनी 28 वर्ष देशाची सेवा केली. त्यामुळे समाजसेवेची आवड मला पहिल्यापासूनच होती. परंतु, लग्नानंतर माझे पती शुभम यांनी मला कार्य करण्याची प्रेरणा दिली. माझ्या सरपंचपदाच्या काळात गावाच्या विकासासाठी जे निर्णय घेतले, त्या काळात ते माझ्यासोबत उभे राहिले. ते नेमही म्हणतात समजासेवा ही एक जबाबदारी नाही, तर ती एक लोकांसाठी संधी आहे. तुला मिळालेला संधीचा उपयोग हा लोकांसाठी आणि समाजासाठी कसा करता येईल? त्या दृष्टीने काम कर”, असंही निर्मला नवले म्हणाल्या.
Oplus_131072
आयटी इंजीनिअर असतानाही राजकारणात एन्ट्री का केली?
मी हा विचार कधीच केला नव्हता. एक इंजीनिअर म्हणून चांगल्या कंपनीत जॉब मिळवायचा आणि काम करायचं, असाच निर्णय होता. परंतु, हे वेगळं फिल्ड आहे. मला लोकांसाठी काम करायची आवड पहिल्यापासूनच होती. मी या क्षेत्रात चांगल्या प्रकारे कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे, असंही
Oplus_131072
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंग कडे तुम्ही कसं बघता?
समाजामध्ये काम करत असताना विरोध हा होत असतो. आणि जे लोक वाईट कमेंट करतात त्यातून त्यांची पर्सनॅलिटी दिसून येते. त्यांचं कर्तुत्व काय असतं हे कोणालाच माहीत नसतं त्यामुळे मी त्या गोष्टींचा जास्त विचार करत नाही.
सामाजिक कार्य करत असताना घरच्यांचा सपोर्ट कसा असतो?
राजकारणाबद्दल एक भीती मनात होती पण मी माझे विचार घरच्यांना आणि माझे पती शुभम यांना सांगितले. मला राजकारणामध्ये काम करायचा आहे आणि यामुळे घरच्यांनी मला सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि पहिल्यांदा सरपंच पदाचा फॉर्म मी घरच्यांसोबतच भरला.
Oplus_131072
ग्रामपंचायतमध्ये काम करताना कामाचा अनुभव कसा आहे?
ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना हा सगळा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. माझ्या माहेरी आणि सासरी कोणताही राजकीय वारसा नसल्यामुळे मी कधीही राजकीय सभा किंवा कुठली मीटिंग बघितली नव्हती. पण खूप गोष्टी समजून घेऊन मी खूप गोष्टी मला यातून शिकायला मिळाल्या. सरपंच म्हणून अनेक ठिकाणी जावं लागतं योजना मंजूर करून आणाव्या लागतात ह्या गोष्टी मी नव्याने शिकले. माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी गावांमध्ये अनेक विकास कामे केली.
Oplus_131072
सरपंच म्हणून काम करत असताना कोणती अशी गोष्ट आहे जी मनाला खूप आनंद देते?
कारेगाव ग्रामपंचायतमध्ये पाण्याची खूप मोठी समस्या होती. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मी नळ पाणीपुरवठा योजना राबवून गावा मधील पाण्याची समस्या सोडवली याचा मला खूप आनंद वाटतो. तसेच एआय टेक्नॉलॉजी चा वापर करून मी गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. आणि स्पीकर देखील लावले आहेत तर त्या स्पीकर वरती रोज सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालीसा लावली जाते आणि यामुळे ग्रामस्थांना खूप चांगलं वाटतं.
आमदार खासदारकी पेक्षा गावातलं राजकारण वेगळं असतं याचा कसा अनुभव आहे?
काम करताना अनेक गाडी अडचणी येतात पण मी त्याकडे एक संधी म्हणून पाहते. मी कोणताही काम करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार स्मरणात ठेवून काम करते. योग्य नियोजन आणि कष्ट करण्याची ताकत असेल तर यश हे नक्की मिळते.
Oplus_131072
महिलांनी राजकारणात यावं का त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
महिलांनी राजकारणात येणं हे खूप महत्त्वाचा आहे आणि महिलांनी महिलांसाठी राजकारणात आलं पाहिजे. कारण महिलांना महिलांच्या समस्या या अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात त्या सोडवण्यासाठी महिला चांगले प्रयत्न करू शकतात. महिलाही घर उत्तम प्रकारे सांभाळते त्यामुळे ते देशही चांगल्या प्रकारे चालू शकते असं मला वाटतं त्यामुळे महिलांनी राजकारणात आलं पाहिजे.
Newsworldmarathi Pune : धर्म, जात, पंथ यांच्या सीमा ओलांडून भारतासह 108 देशांमधील नागरिक विश्वशांती आणि विश्वकल्याणाठी विश्व नवकार महामंत्र दिवसानिमित्त नवकार महामंत्राचे सामूहिक पठण करणार आहेत. करोडो लोकांचा सहभाग असणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. 9 एप्रिल रोजी सकाळी 7:02 ते 9:36 या कालावधीत करण्यात आले आहे, अशी माहिती जितोचे चेअरमन इंद्रकुमार छाजेड, चिफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी लक्ष्मीकांत खाबिया, प्रविण चोरबेले, अभिजित डुंगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अनिल भंसाळी, ॲड. विशाल शिंगवी उपस्थित होते. दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही सहभाग असणार आहे.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जितो) माध्यमातून पुणे येथील एस. पी. कॉलेज ग्राउंड, टिळक रोड येथे विश्व नवकार महामंत्र दिवसा निमित्त नवकार महामंत्राचा जप केला जाणार आहे. पुणे येथे आयोजित उपक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नामदार चंद्रकांत पाटील, नामदार माधुरी मिसाळ तसेच पुण्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले आहे.
सध्याच्या काळात संपूर्ण जगात अशांती, हिंसा आणि अराजक माजलेले दिसते. यातूनच सर्वत्र नकारात्मक उर्जेचा प्रभावही वाढत आहे. अशा अस्थिर काळात मनाला शांती देणारा प्रभावी महामंत्र म्हणजे नवकार मंत्र. या मंत्राच्या एकाच वेळी जगभरात होणाऱ्या स्मरण आणि पठणाने सकारात्मक उर्जेची निर्मिती होऊन प्रत्येक प्राणिमात्रात शांती, अहिंसा, सदाचाराची भावना रुजवली जाईल.
68 अक्षरांच्या या मंत्राचे पठण शरणागत भावाने एकाच वेळी करोडोंच्या संख्येने केले गेल्यास विश्वशांती आणि विश्वकल्याण होण्यास नक्कीच मदत होईल हे लक्षात घेऊन या अद्वितिय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे इंद्रकुमार छाजेड यांनी सांगितले.
विश्व नवकार महामंत्र दिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाचे माहात्म्य जाणून देश-विदेशातील अनेक धार्मिक गुरू, राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर त्या त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या साठी 100पेक्षा अधिक अनुष्ठान असणार असून सहा हजारांपेक्षा अधिक ठिकाणांहून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती दिनेश ओसवाल यांनी दिली.
नवकार महामंत्राच्या सामूहिक पठणाने संपूर्ण विश्वात शांतता प्रस्थापित होण्यास, सकारात्मकता आणि आध्यात्मिक उर्जा निर्माण होण्यास मदत होणार आहे. नवकार महामंत्राच्या सामूहिक पठणाने जागतिक विक्रम प्रस्थापित होईल. नवकार महामंत्र पठण कुठल्याही जाती, धर्म, व्यक्तीशी निगडित नसून याद्वारे ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ गुणांना वंदन केले जाते, असे लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले.
सामूहिक नवकार महामंत्र पठणाच्या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि विश्वशांती व विश्वकल्याणासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन प्रविण चोरबेले यांनी केले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 15 हजारांहून अधिक पुणेकरांनी नाव नोंदणी केली आहे.
पुणे: पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) यांच्या पत्नीबाबत ही प्रकार घडला असून, उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयाने प्रथम दहा लाख रुपये जमा करा, तरच दाखल करून उपचार सुरू केले जातील अशी भूमिका घेतली. दरम्यान प्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उससली यह. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी आमदारां अमित गोरखे आणि भिसे कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
भिसे कुटुंबाने भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज भिसेकुटुंबीयांनी माझी भेट घेतलेली आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याबाबत मी त्यांना आश्वस्त केले आहे. मी तयार केलेली कमिटी या ठिकाणी आलेली आहे. मी या प्रकरणात सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालणार आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.”
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “भविष्यात पुन्हा असे प्रकरण घडू नये म्हणून नियमावली करणे आवश्यक आहे. दिनानाथ मंगेशकर रूग्णालय हे स्वर्गीय लतादिदी आणि मंगेशकर कुटुंबाने खूप मेहनतीतून उभारलेले आहे. नावाजलेले रूग्णालय आहे. तिथे अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. त्यामुळे सगळे चूक आहे असे म्हणून चालणार नाही. मात्र काल घडलेला प्रकार हा असंवेदनशीलच होता.”