भाजपचे नवे प्रदेश प्रभारी रविंद्र चव्हाण
Newsworldmarathi Mumbai : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची पक्षाने प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. या नव्या जबाबदारीमुळे ते राज्यातील पक्ष संघटनेच्या कार्यात अधिक सक्रिय भूमिका निभावतील.
रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, त्यांनी २००२ साली राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेला अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी डोंबिवली मतदारसंघातून चौथ्यांदा उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघातील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप महाराष्ट्रात आगामी काळात संघटनात्मक कार्यात अधिक बळकटपणा आणण्याचा प्रयत्न करेल, अशी अपेक्षा आहे.
पुण्यात होणार रोटरी मराठी साहित्य संमेलन
Newsworldmarathi Pune : सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या रोटरी क्लबतर्फे शनिवार, दि. 4 जानेवारी आणि रविवार, दि. 5 जानेवारी 2025 रोजी पुण्यात पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन, समारोप समारंभासह साहित्यिक चर्चा, विविध विषयांवर परिसंवाद, मुलाखती, गप्पा, कविसंमेलन, प्रहसने, सांगीतिक कार्यक्रम तसेच संगीत नाटकाची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे. रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड प्रदान समारंभही लक्षवेधी ठरणार आहे.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दोन दिवसीय संमेलन होणार असून संमेनलाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्याबरोबरच मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, मराठी वाचन संस्कृतीचे जतन व्हावे, ती प्रवाहित राहावी या संकल्पनेतून पहिल्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोटरी प्रांतपाल शितल शहा, संयोजन समिती कार्याध्यक्ष राजीव बर्वे, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष सूर्यकांत वझे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सावा हेल्थकेअरचे संचालक विनोद जाधव संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज हे या मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य यजमान असून पुण्यातील 15 रोटरी क्लब सहयजमान आहेत. पत्रकार परिषदेला डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर मधुमिता बर्वे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी मोहन चौबळ यांची उपस्थिती होती.
शनिवारी (दि. 4) सकाळी 9:15 वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून यात रोटरियन्सचा सहभाग असणार आहे. सकाळी 9:50 वाजता पदन्यास कथक डान्स ॲकॅडमीच्या रेणुका केळकर-टिकारे आणि सहकारी गणेशवंदना सादर करणार आहेत. सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला असून संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध क्रिकेटपटू पद्मभूषण चंदू बोर्डे यांच्या हस्ते होणार आहे. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे, नगरसेवक जयंत भावे, उपप्रांतपाल मोहन पालेशा, डि. लर्निंग जिल्हा प्रशिक्षक पंकज शहा, संतोष मराठे, नितीन ढमाले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
उद्घाटन समारंभानंतर सकाळी 11:30 वाजता संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून वैशाली वेर्णेकर, अभय जबडे हे विश्वास पाटील यांची मुलाखत घेणार आहेत. दुपारी 2:30 वाजता योगेश सोमण लिखित ‘ट्रेनिंग’ हे प्रहसन अविनाश ओगले आणि लीना गोगटे सादर करणार आहेत. दुपारी 2:45 वाजता ज्येष्ठ साहित्यिक शिवराज गोर्ले यांच्या अध्यक्षतेखाली ‘यशस्वी लेखनाची सूत्रे’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात ज्येष्ठ नाटककार श्रीनिवास भणगे, साहित्यिक वंदना बोकील-कुलकर्णी यांचा सहभाग असणार आहे. त्यांच्याशी राजेश दामले संवाद साधणार आहेत. दुपारी 4:15 वाजता संजय डोळे लिखित ‘मन:शांती’ हे प्रहसन राजेंद्र उत्तुरकर, सुनिता ओगले सादर करणार आहेत.
वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली रोटरियन्सचा सहभाग असलेले निमंत्रितांचे कविसंमेलन सायंकाळी 4:30 वाजता आयोजित करण्यात आले असून यात अंकाजी पाटील, विजय पुराणिक, सुप्रिया जोगदेव, स्नेहल भट, ममता कोल्हटकर, डॉ. अश्विनी गणपुले, नीता केळकर, जयश्री कुबेर, डॉ. आनंदा कंक, राहुल लाळे, मुरलीधर रेमाणे, शशिकांत शिंदे, प्रदीप खेडकर, हर्षदा बावनकर, तनुजा खेर यांचा सहभाग आहे. संयोजन निनाद जोग करणार असून सूत्रसंचालन डॉ. अंजली कुलकर्णी करणार आहेत. रात्री 8:30 वाजता भरत नाट्य संशोधन मंदिराची निर्मिती असलेल्या पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित आणि रवींद्र खरे दिग्दर्शित ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत असून अभय जबडे, रवींद्र खरे, अर्णव पुजारी, वज्रांग आफळे, विश्वास पांगारकर, निधी घारे, अनुष्का आपटे, ऋषिकेश बडवे आणि डॉ. चारुदत्त आफळे यांच्या भूमिका आहेत. राहुल गोळे, अथर्व आठल्ये, प्रज्ञा देसाई यांची साथसंगत असणार आहे.
रविवारी (दि. 5) सकाळी 9:50 वाजता पदन्यास कथक डान्स ॲकॅडमीच्या रेणुका केळकर-टिकारे आणि सहकारी शिववंदना सादर करणार आहेत. सकाळी 10 वाजता प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डने सन्मान करण्यात येणार असून पुरस्काराचे वितरण सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 11 वाजता अशोक नायगावकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार असून प्रा. मिलिंद जोशी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. दुपारी 2 वाजता सुप्रिया जोगदेव लिखित ‘ऑफिस ऑफिस’ हे प्रहसन शंतनु खुर्जेकर, अविनाश ओगले सादर करणार आहेत. माजी प्रांतपाल, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर यांच्या अध्यक्षतेखाली ए. आय.चा साहित्यावर परिणाम होईल का? या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात प्रदीप निफाडकर, कुलदीप देशपांडे, महेश बोंद्रे, डॉ. आदित्य अभ्यंकर यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 3:45 वाजता संजय डोळे लिखित ‘आगलावे वि. पेटवे’ हे प्रहसन संजय डोळे, पूजा गिरी, राजेंद्र उत्तुरकर, मधुर डोलारे सादर करणार आहेत. दुपारी 4 वाजता ‘अमृतसंचय’ हा ग. दि. माडगूळकर यांच्या गीतांवर आधारित सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मुग्धा ढोले, आसावरी गोडबोले, दीपक महाजन, श्रीकांत बेडेकर गीते सादर करणार आहेत. अनिल गोडे, मिलिंद गुणे, मिहिर भडकमकर, सचिन वाघमारे, स्वयम् सोनावणे, रोहित साने साथसंगत करणार आहेत. संयोजन मनिषा अधिकारी यांचे असून निवेदन स्नेहल दामले करणार आहेत.
सायंकाळी 5:30 वाजता प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि ‘असत्यमेव जयते’चे लेखक अभिजित जोग यांच्या समवेत मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती असणार आहे. त्यानंतर संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील आणि प्रांतपाल शितल शहा, सूर्यकांत वझे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
प्राजक्ताची सुरेश धस यांच्या विरोधात तक्रार
अभिनेत्री प्राजक्ता माळीवर काही दिवसांपासून राजकीय चर्चांमुळे टीका होत असून, तिचं नाव अनेकदा वादात उगाचच ओढलं जात असल्याचे दिसत आहे. बीडचे भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलिस अधीक्षकांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना प्राजक्ता माळी, सपना चौधरी, आणि रश्मिका मंदाना यांचा उल्लेख करून अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
याआधीही मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना करुणा मुंडे यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं, ज्यामुळे सोशल मीडियावर ती सातत्याने ट्रोल झाली. यामुळे प्राजक्ता माळी हिच्या चाहत्यांमध्ये नाराजी आणि चिंता व्यक्त केली जात आहे.
प्राजक्ता माळीने अथक परिश्रम करून मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. तिचं नाव अशा वादांमध्ये ओढणं तिच्या कामगिरीशी संबंध नसतानाही, ती एक राजकीय टार्गेट बनल्याचा भास होत आहे.
या सर्व घडामोडींवर प्राजक्ता माळीने अखेर तिची भूमिका मांडली असून, तिने अशा प्रकारच्या घटनांमुळे त्रास होतो असल्याचे सांगितले आहे. तिने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, समाजाने जबाबदारीने वागावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने भाजप आमदार सुरेश धस यांच्या टीकेविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. जर ही तक्रार दाखल झाली, तर सुरेश धस यांची अडचण वाढू शकते, आणि या प्रकरणाला आणखी राजकीय व कायदेशीर वळण मिळू शकतं.
महिला आयोगाच्या तक्रारीमुळे या प्रकरणाचा तपास अधिक गंभीरतेने केला जाईल. यामुळे महिला सक्षमीकरण आणि अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर संरक्षण मिळण्यावर जोर वाढेल.
प्राजक्ता माळीच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांनी पाठिंबा दर्शवला असून, अशा प्रकरणांमध्ये महिलांच्या अधिकारांची जाणीव महत्त्वाची ठरते. आगामी काळात महिला आयोगाच्या भूमिका आणि सुरेश धस यांचं प्रत्युत्तर काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष राहील.
मलेशिया चॅम्पियनशिप रॅली विजेती ठरली निकिता टकले खडसरे
Newsworldmarathi Pune : मलेशिया मध्ये मलाका येथे पार पडलेल्या मलेशिया चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्याच्या निकिता टकले खडसरे या युवतीने चॅम्पियनशिप रॅलीचे प्रथम पारितोषिक पटकावले. तब्बल साडेतीनशेहून अधिक रॅलीमध्ये सहभाग नोंदविलेल्या मुसा शरीफ निकिताचा सहचालक होता. राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळविलेली निकिता आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पणात चॅम्पियनशिप मिळवणारी पहिली युवती ठरली. स्पर्धेच्या चार विभागात निकिताने ट्रॉफी मिळविली आहे.
एम.आय.आर.सी रॅली ऑफ आशान, मलेशिया मध्ये मलाका येथे आयोजित चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारत, मलेशिया, इंडोनेशिया, चायना देशातील सुमारे 22स्पर्धक सहभागी झाले होते.
राज्यस्तरीय, राष्ट्रीय, पातळीवर स्पर्धेत अनेक वेळा भाग घेतला, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना अनेक अडचनींना निकिताला सामोरे जावे लागले, त्यात भाषा, तंत्रज्ञान, नियमावली या सर्व गोष्टींना तोंड द्यावे लागले, रॅली सूरु झाल्यावर पहिल्याच स्टेजमध्ये एक किलोमीटरला इलेक्ट्रिक समस्या झाली, कार दुरुस्त केली पुन्हा रॅलीत सहभागी होऊन पूर्ण केली, यामध्ये नऊ स्टेजमध्ये जास्त गुण मिळवून निकिताने सर्व समस्यांवर मात करत चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकाविली, सुमारे 365 रॅली त्यातील 86 आंतरराष्ट्रीय रॅलीत सहभाग असल्याने सहचालक मुसा शरीफ यांच्या अनुभवाचा खूप फायदा झाल्याचे निकिता आवर्जून सांगते.
दोन दिवसीय रॅलीमध्ये पाऊस असल्याने खूप उष्ण वातावरण निर्माण झाले होते, उष्माघात चा त्रास अनेकांना सहन करावा लागला, वातावरण रॅलीसाठी उपयुक्त नव्हते, अशा परिस्थिती मध्ये नवखी आणि प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या निकिताने यश मिळविले, मलेशिया चॅम्पियनशिप रॅली ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील अवघड रॅली मानली जाते, या रॅलीत सहभागी स्पर्धक जगातील कुठल्याही रॅलीत चांगल्या पद्धतीने सहभागी होऊ शकतात, त्यामुळे या रॅलीला अधिक महत्व आहे.
पामच्या झाडांमधून कार चालविताना फार सावध भूमिका घेत सहचालक मुसा शरीफ यांच्या सहकार्याने निकिता टकले खडसरेने चॅम्पियनशिप रॅलीत भारताचा झेंडा फडकविला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पणात चॅम्पियनशिप मिळविणारी निकिता पहिली स्पर्धक ठरली आहे.
आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केलेले संजय टकले, गौरव गिल, अरोर अर्जुन राव, कर्णाकदूर यांच्या रांगेत बसण्याचा मान निकिता टकले खडसरेने मिळविला आहे.
राष्ट्रीय स्तरावर अनेक रॅली जिंकल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वडील उद्योजक नितीन टकले, आई राजश्री यांचा मोलाचा वाटा असल्याचे निकिता आवर्जून सांगते. तसेच आंतरराष्ट्रीय डब्ल्यू आर सी रॅली जिंकण्याचा मानस तिने बोलताना व्यक्त केला
मा. नगरसेविका अर्चना पाटील यांचे काम कौतुकास्पद : केंद्रीय मंत्री मोहोळ
Newsworldmartahi pune : भवानी पेठ परिसरामध्ये अनेक विकास कामे नगरसेविका अर्चना पाटील यांनी त्वरित मार्गी लावली आणि भवानी पेठेचा कायापालट केला. आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे कामही त्यांनी केले असे गौरव उद्गार खासदार मुरलीधर मोहोळ यांनी काढले.
भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला आघाडीच्या मा. अध्यक्षा व मा. नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या विशेष कॅलेंडरचे प्रकाशन पुण्यनगरीचे लाडके खासदार व केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
हे विशेष कॅलेंडर लवकरच भवानीपेठ परिसरात वितरित केले जाणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी दिली.
यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष तुषार पाटील, डॉ. अमोल देवळेकर, सुमित नेमजादे, सतीश साठे, व युवराज आडसुळ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राजक्ता माळीला आहे हे व्यसन….
प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील एक गुणी अभिनेत्री असून, तिच्या अभिनय, नृत्यकौशल्य, तसेच होस्टिंगमधील खास शैलीमुळे ती नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेचा भाग राहते. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी शोचे होस्टिंग करत आहे. तिच्या विनोदी आणि मोजक्या, पण प्रभावी कमेंट्समुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि वक्तव्यांमुळेही प्राजक्ता सातत्याने चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या प्रवासाविषयी आणि आगामी प्रोजेक्ट्सविषयी माहिती दिली. तिच्या कामातील समर्पण आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे ती मराठी मनोरंजन विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे.
तिच्या या प्रवासातून प्रेरणा घेऊन अनेक तरुण कलाकार मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकण्यास प्रोत्साहित होताना दिसतात. प्राजक्ता माळीची ऊर्जा, तिचा उत्साह, आणि विविध कलाकृतींमधील प्रयोगशीलता यामुळे ती नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.
प्राजक्ता माळीने तिच्या मुलाखतीत दिलखुलासपणे स्वतःच्या आवडी-निवडी आणि सवयींविषयी सांगितले, ज्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी पैलू समोर आले. तिने म्हटल्याप्रमाणे, ती एक फूडी आहे, आणि जर ती अभिनेत्री नसती, तर तिचे वजन ७० किलो झाले असते. यावरून तिचा खाद्यप्रेमी स्वभाव स्पष्ट होतो.
तिने तिच्या तूळ राशीशी संबंधित खास निरीक्षणही शेअर केले, की तूळ राशीच्या व्यक्तींना एक तरी व्यसन असते. तिच्यासाठी हे व्यसन चहाचे आहे. प्राजक्ताने कबूल केले की तिला चहाचा त्रास होतो, तरीही ती चहा सोडू शकत नाही. मात्र, ती रोज फक्त दोनच कप चहा घेते.
तिच्या या विधानांमधून तिचा प्रामाणिकपणा आणि सामान्य जीवनाशी जोडलेला स्वभाव जाणवतो. तिच्या या गोष्टींमुळे तिच्या चाहत्यांना तिच्या व्यक्तिमत्त्वाशी नाते जोडण्यास सोपे जाते आणि ती आणखी प्रिय ठरते.
तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि वक्तव्यांमुळेही प्राजक्ता सातत्याने चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या प्रवासाविषयी आणि आगामी प्रोजेक्ट्सविषयी माहिती दिली. तिच्या कामातील समर्पण आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे ती मराठी मनोरंजन विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे.
तिच्या या प्रवासातून प्रेरणा घेऊन अनेक तरुण कलाकार मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकण्यास प्रोत्साहित होताना दिसतात. प्राजक्ता माळीची ऊर्जा, तिचा उत्साह, आणि विविध कलाकृतींमधील प्रयोगशीलता यामुळे ती नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.
प्राजक्ता माळीने तिच्या मुलाखतीत दिलखुलासपणे स्वतःच्या आवडी-निवडी आणि सवयींविषयी सांगितले, ज्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी पैलू समोर आले. तिने म्हटल्याप्रमाणे, ती एक फूडी आहे, आणि जर ती अभिनेत्री नसती, तर तिचे वजन ७० किलो झाले असते. यावरून तिचा खाद्यप्रेमी स्वभाव स्पष्ट होतो.
तिने तिच्या तूळ राशीशी संबंधित खास निरीक्षणही शेअर केले, की तूळ राशीच्या व्यक्तींना एक तरी व्यसन असते. तिच्यासाठी हे व्यसन चहाचे आहे. प्राजक्ताने कबूल केले की तिला चहाचा त्रास होतो, तरीही ती चहा सोडू शकत नाही. मात्र, ती रोज फक्त दोनच कप चहा घेते.
तिच्या या विधानांमधून तिचा प्रामाणिकपणा आणि सामान्य जीवनाशी जोडलेला स्वभाव जाणवतो. तिच्या या गोष्टींमुळे तिच्या चाहत्यांना तिच्या व्यक्तिमत्त्वाशी नाते जोडण्यास सोपे जाते आणि ती आणखी प्रिय ठरते. बलूनमुळे प्रदूषणाचा धोका; पुणेकरांनी केली कारवाईची मागणी
Newsworldmarathi Pune : पुणे शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर बलून सोडण्यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीबाबत पुणे महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली आहे.
पर्यावरणप्रेमी अनंत रामचंद्र घरत, अध्यक्ष- माय अर्थ संस्था आणि सदस्य- एन्वायरनमेंट क्लब ऑफ इंडिया, यांनी एका सविस्तर पत्राद्वारे प्रशासनाकडे ही तक्रार नोंदवली. त्यांनी बलून सोडण्याच्या प्रथेमुळे जलप्रदूषण, वन्यजीवांना धोका, नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा, हवामान प्रदूषण, आणि कचरा निवारणाच्या समस्या यावर भर दिला आहे.
पत्रात नमूद केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांनुसार, बलून हवेत सोडल्यावर अनेकदा जलाशयात किंवा जमिनीवर पडतात. यामुळे जलचर प्राण्यांवर प्रतिकूल परिणाम होतो. बलूनचे तुकडे गिळल्याने मासे, पक्षी, आणि प्राणी मृत्युमुखी पडतात. लॅटेक्स किंवा फॉयल बलूनच्या विघटनास अनेक वर्षे लागतात, त्यामुळे हे कचऱ्याचे प्रमाण वाढवतात.
बलून सोडणे हे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, २०१६ आणि पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ च्या नियमांचे उल्लंघन असल्याचेही या पत्रात नमूद आहे. याशिवाय, वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ नुसार वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे, ज्यावरही बलून सोडण्यामुळे विपरित परिणाम होतो.
सार्वजनिक सण-उत्सवांमध्ये बलून सोडण्यावर प्रतिबंध. पर्यावरणीय परिणामांविषयी जनजागृती मोहिम. पर्यावरणपूरक पर्यायांचा प्रसार, जसे बायोडिग्रेडेबल सजावट. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांची काटेकोर अंमलबजावणी. बलून सोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा मागण्या घरत यांनी प्रशासनालाकडे केल्या आहेत.
तक्रारीत पुढे नमूद केले आहे की, पुणे महानगरपालिका या समस्येवर तातडीने कार्यवाही न केल्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (NGT) दाद मागण्यात येईल.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन
Newsworldmarathi Delhi : भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या अखेरचा श्वास घेतला. त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
सरसत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात कोट्यवधी देशवासीयांच्या मनाला चटका देणारी बातमी समोर आली आहे. भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या अखेरचा श्वास घेतला. त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी एम्स रुग्णालयात दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. यावेळी मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली. डॉक्टरांनी लगेच मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरु केले. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तेव्हाच समोर आली होती. यानंतर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार प्रियंका गांधी या एम्स रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली. यानंतर आता मनमोहन सिंह यांचं निधन झाल्याची दुर्देवी बातमी समोर आली आहे.
मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी 1957 ते 1965 या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. तर ते 1969-71 या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर 1976 मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे 1982 ते 1085 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.
पंतप्रधान मोदींकडून फोनवरुन सिंह यांच्या कुटुंबियांची विचारपूस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंह यांच्या कुटुंबियांना फोन करुन विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा हे एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच अनेक दिग्गज नेते एम्स रुग्णालयात दाखल होत आहे. पोलिसांकडून आता दिल्लीतील एम्स रुग्णालयाचा परिसर मोकळा करण्याचं काम सुरु झालं आहे.
48 वर्षांच्या मोहिनी वाघ यांचं 32 वर्षांच्या इंजिनिअरसोबत अफेअर
Newsworldmarathi Pune : पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर (MLA Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांचं काही नऊ डिसेंबरला अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. शिवाय हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू होता. काहींना अटक देखील करण्यात आली होती. काल (बुधवारी) पोलीस तपासात (Pune Crime) सर्वात मोठा खुलासा समोर आला. शेजाऱ्यासोबत असलेल्या प्रेम संबंधात अडसर ठरत असलेल्या नवऱ्याची सुपारी देऊन पत्नीनेच काटा काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांची त्यांच्या पत्नीनेच पैसे देऊन हत्या करायला लावली आहे. मोहिनी वाघ (Mohini Wagh) असं या प्रकरणातील आरोपी पत्नीचे नाव आहे. दरम्यान ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याची धक्कादायक माहिती आहे.
सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्या मुलाच्या मित्रासोबत मोहिनी वाघचे असलेल्या अनैतिक संबंधातून पती सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्याचं उघड झालं आहे. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. मात्र, सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी करण्यात आलेल्या अपहरणातून नाही तर अनैतिक संबंधांतून झाल्याचं समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हीला काल (बुधवारी) अटक केली आहे. मोहिनी वाघचे वय सध्या 48 वर्षे असून तिचा प्रियकर अक्षय जावळकर हा 32 वर्षांचा आहे. अक्षय जावळकर हा मोहिनी वाघाच्या मुलाचा मित्र होता. मुलाच्या वयाचा असलेल्या अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणाला आली नाही. मात्र, सतीश वाघ यांना हे समजताच मोहिनी-सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये वाद सुरु झाले होते.अनेक वर्षे त्यांच्यातील वाद धुमसत होता आणि त्यातून सतीश वाघ त्यांची हत्या झाल्याची माहिती आहे.
सतीश तात्याबा वाघ यांच्याकडे आरोपी अक्षय हरीश जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहत होता. त्या वेळी मोहिनीसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. यासंबधीची कुणकुण सतीश वाघ यांना लागल्यामुळे त्यांच्या पत्नीकडूनच खुनाची सुपारी देऊन नवऱ्याचा काटा काढण्याचा डाव आखला. मोहिनी वाघने अक्षयला नवरा सतीश यांचा खून करण्यास सांगितले. त्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यापैकी दीड लाख रुपये तिने अक्षयकडे दिले होते. त्यानंतर अक्षयने चार महिन्यांपूर्वी सतीश यांना मारण्यासाठी पवनला सुपारी दिली होती. त्यानंतर पवनने त्याचा साथीदार नवनाथ आणि विकासला आपल्यासोबत सहभागी करून घेतले.अक्षयने आरोपींना दीड लाखाची रक्कम दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार टिळेकरांच्या मामीनेच दिली मामाची सुपारी….
Newsworldmarathi Pune : Breaking News पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर झालेल्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे.
सोमवारी सकाळी सतिश वाघ यांचं अपहरण करण्यात आलं होतं. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आले आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच सुपारी दिली होती . पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.
पुण्यातील मांजरी परिससरात ९ डिसेंबरला पहाटे साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या ही वैयक्तिकरणास्तव करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. पण हत्येचे नेमकं कारण समोर आले नव्हते. अखेर दीड महिन्यानंतर हत्येचे खरे कारण समोर आले असून प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याच उघड झाले. सतिश वाघ यांच्या पत्नीनेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे.
सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली होती. वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने हे सर्व कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आलं होते. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली.

