दादावाला कॉलेजच्या लोकनृत्य स्पर्धेला प्रतिसाद

0

Newsworld Pune : दादावाला ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन अभिजया लोकनृत्य स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद दि पूना गुजराती केळवणी मंडळाच्या ए. एस. डी. बी. दादावाला जुनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिजया आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेचे आयोजन नेहरू मेमोरियल हॉल पुणे येथे करण्यात आले होते. या स्पर्धेद्वारे विविध शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोकनृत्य कला सादर करण्याची संधी मिळाली. स्पर्धेचे उद्घाटन तथा पारितोषिक वितरण दि पुना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष राजेश भाई शाह, उपाध्यक्ष जनक भाई शाह, सचिव हेमंत भाई मणियार, सहसचिव प्रमोद भाई शाह, संदीप भाई शाह, दिलीप जगड, विनोद देडिया यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्राचार्या सोनल बारोट, उपप्राचार्य विश्वनाथ पाटोळे उपस्थित होते. आंतरशालेय इयत्ता 8वी ते 10 वी मधील गटात अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल प्रशालेला प्रथम पारितोषिक, विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कूल प्रशालेला द्वितीय पारितोषिक, हुजूरपागा गर्ल्स हायस्कूल लक्ष्मी रोड प्रशालेला तृतीय पारितोषिक, तसेच आरसीएम गुजराती हायस्कूलने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.

आंतर महाविद्यालयीन इयत्ता 11वी ते 12वीमधील गटात प्रथम पारितोषिक ए. एस. डी. बी. दादावाला कनिष्ठ महाविद्यालयाने, द्वितीय परितोषिक हुजूरपागा कात्रज महाविद्यालयाने, तृतीय पारितोषिक आर डी कनिष्ठ महाविद्यालयाने पटकावले, तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक एनसीएल कनिष्ठ महाविद्यालयाने पटकावले. या स्पर्धेचे आयोजन पर्यवेक्षिका माधुरी पाटील, अर्चना बारोट, सविता कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक पर्यवेक्षिका शमा गद्रे यांनी केले. अर्चना काळे, उषा चव्हाण, अनुजा सेलोट, सौ. शिल्पा मुदगी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कात्रज पीएमपीएलचा बसस्टॉप हलवणार

0

Newsworld Pune : कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाने कात्रज बसस्थानकांमधील बस मार्गांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.हा निर्णय वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला असून नवीन व्यवस्थेमुळे पीएमपी बस मार्गांमध्ये सोमवार (दि.२) पासून रात्री १२ नंतर बस मार्गात आणि बसस्थानकात बदल करण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

चालाल तर चालाल

0

रोज सकाळी आपल्याला अनेक जण Morning Walk करताना दिसतात. मात्र आपण अनेकदा आळस करतो अथवा सकाळच्या घाईत वेळ काढणं शक्य होत नाही. हे जरी खरं असलं तरीही सकाळी स्वतःच्या निरोगी आरोग्यासाठी अर्धा तास काढायला हवा. सकाळीच उपाशीपोटी चालण्याचे अनेक फायदे आहेत.

1) चालल्यामुळे शरीराला योग्य व्यायाम मिळतो. त्यामुळे रात्री चांगली झोप लागण्यास मदत होते. याशिवाय मेंदू तरतरीत राहिल्याने आणि सकाळी उठून चालल्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने दिवसभर क्रिएटिव्हिटीसह काम पूर्ण होते. तुम्ही सकाळी चालण्याचा व्यायाम सुरू केला तर यामुळे शरीरातील डोपामाईन नावाचे हार्मोन रिलीज होते, जे तणाव कमी करण्याचे काम करते.

2) तसंच तुम्हाला नैराश्य येत असेल तर ते कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. शरीरातून निघणारे सेरोटोनिन हार्मोन हे तुमची झोप अधिक गडद बनवून तुमचा मूड चांगला राखण्यास मदत करते.उपाशीपोटी चालण्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. तर हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास फायदा होतो. तसंच सांधेदुखीची समस्या दूर ठेवण्यास मदत होते.

3) मजबूत करण्यासाठी, मेंदूचे कार्य अधिक चांगले करण्यासाठी चालण्याचा शरीराला फायदा मिळतो. त्यामुळे रोज सकाळी उपाशीपोटी किमान अर्धा तास चालावे. १ तास चालण्यासाठी वेळ काढल्यास, अधिक उत्तम ठरते.

देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब

Newsworld marathi Mumbai : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून सोमवारी किंवा मंगळवारी त्यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती होईल अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री म्हणून ज्या नावाची घोषणा करतील त्याला पाठिंबा असेल असं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आधीच जाहीर केलंय. दरम्यान, आझाद मैदानावर 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.

महायुतीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेणार – शिंदे

Newsworld marathi Satara : गृहमंत्रीपदासह सर्व विषयांवर महायुतीच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असून त्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारे स्थिर सरकार देण्याला आमचे प्राधान्य असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. सातारा येथील दरे गावातून मुंबईला परतण्यापूर्वी त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आपले हे मत व्यक्त केले. यावेळी बोलताना, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दररोज 8 ते 10 सभा करत असल्याने प्रचंड धावपळ झाली होती. यातून थोडासा आराम करण्यासाठी दरे मुक्कामी आलो असून आपली प्रकृती थोडी खराब होती मात्र आता आपली प्रकृती ठीक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. राज्यातील जनतेने आजवर कधीही कुणाला दिले नाही एवढे भरभरून मतदान आम्हाला केले आहे. राज्यभर लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांनी मतांचा अक्षरशः वर्षाव केला आहे. या निवडणुकीत त्यांना आम्ही काही आश्वासने दिलेली होती. आता ती पूर्ण करण्यासाठी एक मजबूत आणि स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न महायुती म्हणून आम्ही करू असे सांगितले.

बेशिस्त वर्तन करून पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर काँग्रेसची कारवाई

Newsworld marathi Mumbai : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन करून पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर कडक करवाई करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. बेशिस्त वर्तन करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांवर प्रदेश काँग्रेसकडून कारवाईच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार बंटी शेळके यांना काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोटे आरोप करून पक्षशिस्तीला काळीमा फासला असून त्यांना निलंबित का करू नये यासंदर्भात २ दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विचारमंथन करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे दिनांक २८ नोव्हेंबर रोजी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर टिळक भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्षांबाबत खोटी व बदनामी करणारी विधाने केली आहेत. त्यांनी काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे, पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाची प्रतिमा मलिन करणा-यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.

Mohan Bhagwat: दोन किंवा तीन मुले जन्माला घाला ; डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान

0

Newsworld Marathi Nagpur : Mohan Bhagwat : लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी असेल तर तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो. त्यामुळे दोन पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्य असावेत, असे अत्यंत महत्त्वाचे विधान करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. नागपुरात कठाळे कुल संमेलनात ते बोलत होते. या संमेलनात मोहन भागवत यांच्या आधी वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींनी सध्या अनेक तरुण दांपत्य एकही अपत्य जन्माला घालण्यास तयार नाही, असा उल्लेख करत चिंता व्यक्त केली होती. त्याच मुद्द्याला पुढे घेऊन जात सरसंघचालकांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले.हिंदूंच्या संख्येत 7.8 टक्क्यांनी घट पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने 1950 ते 2015 या काळात भारतात हिंदू बहुसंख्य होते, असं स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे आता हिंदूंची लोकसंख्येत 7.8 टक्क्यांनी घट झाल्याचेही स्पष्ट केले आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये त्या देशातील प्रमुख धर्मियांची लोकसंख्या वाढत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. शिवाय, यूपीएससीत मराठी यशवंतांचा टक्क घसरल्याचेही समोर आले आहे.

‘फुलवंती’ चित्रपटाचे नाना पाटेकरांनी केले कौतुक

Newsworld marathi : Nana Patekar on Prajkta Mali : प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं कौतुक केलं आहे. तसेच गश्मीर महाजनी याने फुलवंती सिनेमात केलेल्या कामाचंही नाना पाटेकर यांनी कौतुक केलंय.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ ही कादंबरी आता चित्रपटरूपात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सिनेमात ‘फुलवंती’ या मध्यवर्ती भूमिकेत अभिनेत्री प्राजक्ता माळी आहे. तर व्यंकट शास्त्री यांची अतिशय सशक्त व्यक्तिरेखा अभिनेता गश्मीर महाजनी याने साकारली आहे. या सिनेमाचं वरिष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी कौतुक केलं आहे.एका मुलाखतीदरम्यान नाना पाटेकर यांनी मराठी सिनेमे हिंदी भाषेत डब करण्याबाबत प्रतिक्रिया दिली. सगळे दाक्षिणात्य सिनेमे हिंदीमध्ये डब होत असतात. ते तुम्ही पाहता की नाही. मग मराठी सिनेमे का डब होत नाही? सगळेच नाही पण काही अतिशय टुकार दाक्षिणात्या सिनेमे हिंदीमध्ये डब केले जातात. मग प्रश्न पडतो की हे सिनेमे कसे काय चालले आणि हे सिनेमे का पाहावेत? असे टुकार सिनेमे देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहिले जातात. मराठीमध्ये इतकं सकस सगळं निर्माण होतं. ते का डब केलं जात नाही?, असं नाना पाटेकर म्हणाले आता परवा एक ‘फुलवंती’ हा सिनेमा आला. तो सिनेमा पाहताना मला तो इतका छान आणि गोड वाटत होता. आमच्या रविंद्र महाजनींचा मुलगा गश्मीरने आणि प्राजक्ताने काय काम केलंय… व्हिज्युअली काय गोड दिसत होतं. अतिशय छान आणि श्रीमंत वाटावं अशी ही कलाकृती… मग का नाही हिंदीत डब केली जात?, असं म्हणत नाना पाटेकर यांनी मनातील खंत बोलून दाखवली.

माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांचा खून

Newsworld Marathi Pune : Crime Pune शिक्रापूरचे माजी उपसरपंच व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले (वय ५१) यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी (दि. १) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. गिलबिले यांची मालमत्ता अथवा अनैतिक संबंधाच्या कारणांमधून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत. दत्तात्रय गिलबिले हे दुपारच्या वेळेस आपल्या बंगल्याच्या आवारात खुर्चीमध्ये बसलेले असताना आरोपींनी धारदार शास्त्राने त्यांच्या मानेवर वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला.

ईव्हीएमची आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करा – चव्हाण

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. महाविकास आघाडीचे नेते सातत्याने ईव्हीएम मशीनवरून टीकास्त्र सोडत असून, मोठ्या प्रमाणावर उमेदवार फेरमतमोजणीसाठी अर्ज करताना दिसत आहेत. यातच महाविकास आघाडी ईव्हीएमविरोधातील मोहीम तीव्र करताना पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ईव्हीएमची आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.