पुरंदर येथील विमानतळाच्या ड्रोन सर्वेक्षणाला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध; पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आंदोलनाला हिंसक वळण
Newsworldmarathi Pune : पुरंदर तालुक्यात आतंरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. मात्र, याला शेतकऱ्यांकडून मोठा विरोध होत आहे. सध्या शासनाकडून आतंरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र, या विमानतळामुळे बाधित सातही गावांमधील शेतकऱ्यांकडून या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध केला जात आहे. यावेळी सर्वेक्षणादरम्यान अधिकाऱ्यांची वाट अडवल्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. यामध्ये अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाले आहेत. शासन-प्रशासनाच्या य अमानुष कारवाईचा शेतकऱ्यांनी व स्थानिकांनी जाहीर निषेध केला आहे.
सध्या पुरंदर विमानतळासाठी सुरू असलेल्या ड्रोन सर्वेक्षणाला स्थानिक शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे. ड्रोन सर्वेक्षण सुरू असताना आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यात जनावरे तसेच बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करून अधिकाऱ्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत होता. तेंव्हा आंदोलनकारी शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांनी आणि स्थानिकांनी जाहीर पोलिसांनी केलेल्या अमानुष कारवाईचा निषेध केला आहे.
पुरंदर विमानतळामुळे बाधित होणाऱ्या गावांमध्ये सध्या तणावाची परिस्थिती दिसत आहे. तेथील शेतकरी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी शेतकऱ्यांकडून प्रशासनावर अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं.
लाकडी दांडक्याने मारहाण करत जावयाने केला सासऱ्याचा खून; उल्हासनगर येथील घटना
Newsworldmarathi Mumbai: पत्नी व मुलांना माझ्यासोबत पाठवा, असा हट्ट धरत असलेल्या जावयाला सासऱ्याचा नकार सहन न झाल्याने त्याने चक्क सासऱ्याचा लाकडी दांडक्याने मारहाण करून जागीच खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर येथे घडली असून आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांनी हत्या व अन्य गंभीर आरोपांत गुन्हा दाखल केला आहे.
सुशीलसिंह गौंड सरदार (वय ५२) असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बोलासिंह जगदीशसिंह भवर (वय-३५) असं आरोपीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोलासिंह जगदीशसिंह भवर हा जळगावचा रहिवासी आहे. तो बुधवारी उल्हासनगरमध्ये आपल्या सासऱ्याच्या घरी आला होता. त्याची पत्नी व मुले सासरी राहत होती आणि जावयाने त्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कौटुंबिक वादामुळे सरदार यांनी आपल्या मुलीसोबत नातवंडांना देण्यास स्पष्ट नकार दिला
यामुळे संतप्त झालेल्या भवरने सासऱ्याशी जोरदार वाद घातला. रागाच्या भरात लाकडी दांडका उचलून सरदार यांच्यावर हल्ला केला. या अमानुष मारहाणीत सरदार यांचा जागीच मृत्यू झाला. इतक्यावरच न थांबता, त्यांच्या पत्नीने मध्ये पडून बचाव करण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावरही भवरने हात उगारला आणि त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला.
धक्कादायक…! दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने केला आईचा खून; घटनेने परिसरात खळबळ
Newsworldmarathi Beed : दारू पिण्यासाठी वृद्ध आईने पैसे दिले नाही म्हणून पोटच्या मुलाने तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा गावात घडली आहे. चोत्राबाई भानुदास सोन्नर (वय-७२) असं मृत वृद्धेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा, सून, नातवंडासह चोत्राबाई गावात राहत होती. त्यांचा मुलगा अमृत यास दारूचे व्यसन असून तो नेहमी दारू पिल्यानंतर गोंधळ घालत व शिवीगाळ करत होता. या त्रासाला घरातील सर्व कुटुंबीय वैतागले होते. नेहमीप्रमाणे त्याने गुरुवारी रात्री दारूसाठी आईला पैसे मागितले. आईने पैसे नसल्याने असमर्थता दर्शविली.
याचा राग मनात ठेवून त्याने मध्यरात्री आई झोपलेली असताना तिच्या डोक्यात दगड घातला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. या घटनेने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे १९ जूनला प्रस्थान; यंदा लोणंदला एकच मुक्काम
Newsworldmarathi Pune: श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे गुरुवार, १९ जून रोजी प्रस्थान होणार आहे. यंदा तिथीचा क्षय झाल्याने सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे सोहळा एकच दिवस मुक्कामी राहणार असल्याची माहिती सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे हे १९३ वे वर्ष आहे.
माऊलींचे निस्सीम भक्त गुरू हैबतबाबा आरफळकर यांनी माऊलींचा पालखी सोहळा सुरू केला. त्यावेळी त्यांना श्रीमंत शितोळे सरकार, वासकर, आळंदीकर, देहूकर आदी वारकरी मंडळींनी साथ दिली. पूर्वी हा सोहळा आळंदी, पुणे, शिरवळ मार्गे लोणंद येथे होता व तेथून तो फलटण, नातेपुते, माळशिरस वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी मार्गे पंढरपूरला जात होता.
पुढे वेळापूरला मानाचे भारुड वाल्ह्याचे कृष्णाजी मांडके यांनी नीरा नदीवर दगडी पूल बांधून दिल्याने सोहळा सासवड, जेजुरी, वाल्हे, नीरामार्गे लोणंदला येऊ लागला. यंदा माऊलींच्या सोहळ्याचा २० व २१ जून रोजी पुण्यात, २२ व २३ जून रोजी सासवड, २४ जून जेजुरी, २५ जून वाल्हे, २६ जूनला निरा स्नानानंतर सातारा जिल्हा प्रवेश व लोणंद मुक्कामी सोहळा राहील.
२७ जूनला चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होईल व सोहळा तरडगाव मुक्कामी पोहोचेल. २८ जूनला फलटण, २९ जूनला बरड, ३० जूनला धर्मपुरी येथे सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होईल व सोहळा नातेपुते मुक्कामी पोहोचेल. १ जुलै माळशिरस, २ जुलै वेळापूर, ३ जुलै भंडीशेगाव, ४ जुलै वाखरी, तर ५ जुलैला सोहळा पंढरपूर मुक्कामी पोहोचेल. ६ जुलैला पंढरपूर येथे आषाढीचा सोहळा पार पडेल. १० जुलैला पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होईल व २० जुलैला सोहळा आळंदीत पोहोचेल.
नवले ब्रिजवर पुन्हा अपघात; ट्रेलरचा ब्रेक फेल, एकाचा मृत्यू
Newsworldmarathi Pune: शहरातील नवले ब्रिजवर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून, ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने तीन वाहनांना जोरदार धडक बसली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघात इतका भीषण होता की वाहनांचे पुढचे भाग चकनाचूर झाले. घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. सध्या अपघातग्रस्त वाहनं बाजूला करण्याचे काम सुरू असून, अधिक तपास सुरू आहे.
नवले ब्रिजवर याआधीही अनेक वेळा अशा प्रकारचे अपघात घडले आहेत. वाहनांची गती, वाहतूक नियमनाची कमतरता आणि उताराचा रस्ता हे सर्व घटक वारंवार होणाऱ्या दुर्घटनांना कारणीभूत ठरत आहेत. स्थानिक नागरिकांनी या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे.
महिला, बालकांची सुरक्षा व आरोग्यासाठी गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह्स आणि होप फाउंडेशन कडून गाड्यांचे वाटप
Newsworldmarathi Pune : चाकण एमआयडीसीमध्ये स्थापित असलेल्या सुप्रसिद्ध अशा गेस्टॅम्प आॅटोमोटिव्ह्ज इंडिया कंपनी आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन च्या वतीने आपली समाजिक जबाबदारी लक्षात घेऊन महिला व बालकांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी आरोग्य विभाग ,पुणे, ग्रामीण पोलीस आयुक्तालय कार्यालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सरकारी विभागांसाठी ५ स्कोडा कायलॅक गाड्यांचे वाटप यावेळी फीत कापून तसेच हिरवा झेंडा दाखवून या गाड्या संबंधित विभागांकडे रवाना करण्यात आल्या.
या कारवाटप कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून गेस्टॅम्पच्या आशिया विभागाचे सीईओ अँटोनियो लोपेझ उपस्थित होते. याशिवाय जिल्हा रुग्णालय, औंधचे सिव्हिल सर्जन डॉ. नागनाथ एस. यम्पल्ले, डॉ. अमित लवेकर , मानसोपचार तज्ज्ञ, सहायक सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय, औंध. गेस्टॅम्प आॅटोमोटिव्ह्जचे कंट्री सीईओ आणि अध्यक्ष ग्लिन जोन्स, कंट्री सीएफओ व प्रादेशिक वित्त संचालक अजय चौधरी, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनच्या सीईओ डॉ. कॅरोलिन ओडीअर दि वॉल्टर, भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अनुराधा पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे म्हाळुंगे पोलीस स्टेशन यांच्यासह कंपनीचे इतर अधिकारी, तसेच पोलिस व आरोग्य खात्यातील अधिकारी उपस्थित होते.
गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह्सचे आशिया विभागाचे सीईओ अँटोनियो लोपेझ म्हणाले, “गेस्टॅम्पमध्ये आम्ही असा विश्वास ठेवतो की शाश्वत विकासाची सुरुवात समुदायांच्या सक्षमीकरणातून होते. होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनसोबतच्या या भागीदारीद्वारे आम्ही केवळ वाहनेच देत नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानासाठी गुंतवणूक करत आहोत.”
या उपक्रमामुळे मोबिलिटी, आऊटरिच व आपत्कालीन प्रतिसाद क्षमतेत वाढ होऊन, विशेषतः महिलांचे व बालकांचे आरोग्य व सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मदत होईल आणि अधिक सुरक्षित, निरोगी समुदाय घडवता येईल.
डॉ. कॅरोलिन ओडीअर दि वॉल्टर, सीईओ, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांनी सांगितले,”हा उपक्रम हे सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे की आरोग्य व संरक्षण सेवा गरजूंना सहज उपलब्ध होतील. गेस्टॅम्पसोबत मिळून आम्ही मजबूत व सुरक्षित समुदाय घडवण्याचा प्रयत्न करत आहोत, जिथे प्रत्येक मूल व प्रत्येक महिला सन्मानाने व आशेने जगू शकेल.”
गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह्स इंडिया आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५–२६ या वर्षासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा अजेंडा अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिला आणि बालकांच्या आरोग्य व संरक्षण क्षेत्रात क्षमता निर्माण करून एक सशक्त समुदाय घडवण्याचा आहे.
समाज कल्याणासाठी आणि सातत्यपूर्ण वचनबद्धतेचा भाग म्हणून गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह्स आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या वतीने पाच स्कोडा कायलॅक कार महत्त्वाच्या शासकीय संस्थांना देणगी म्हणून प्रदान केली गेली. यामध्ये पोलिस यंत्रणा व आरोग्य यंत्रणांचा समावेश आहे.
मी शाकाहारी आहे, पण खात मिळालं मांसाहारी : मंत्री पंकजा मुंडे यांची खंत
Newsworldmarathi Parali : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात बोलताना आपल्या शाकाहारी जीवनशैलीविषयी आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीबाबत खंत व्यक्त केली. “मी शाकाहारी आहे, मला खात मिळालं मांसाहारी. मी जेवायला गेल्यावर मांसाहारीचं जेवण समोर येतं. कुठेही गेले तरी लोक म्हणतात – कोंबडे खा, मासे खा,” असं स्पष्टपणे सांगत त्यांनी या गोष्टीची आठवण करून दिली.
पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हास्याची लाट तर निर्माण झालीच, पण त्यांनी सामाजिक बदलाची सूचक टीकाही केली. त्या म्हणाल्या की, “माझ्यासारख्या शाकाहारी व्यक्तींना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी शाकाहारी पर्याय उपलब्ध नसतात.” त्यांच्या या वक्तव्यातून शाकाहारी व्यक्तींविषयी असलेली अनास्था अधोरेखित झाली.
पशूसंवर्धन विभाग आणि राष्ट्रीय पशूधन अभियानातंर्गत पशूपालकांसाठी आयोजित एकदिवसीय कार्यशाळेचे उदघाटन करून मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पशूपालक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून तरुणांना स्वावलंबी बनवणाऱ्या योजना आम्ही राबवित आहोत. दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत. ग्रामीण भागातील तरुणांना पशूपालनाशी निगडित प्रकल्प आणि उद्योगांच्या माध्यमातून ‘ग्रामीण उद्योजक’ बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. असेही मुंडे म्हणाल्या.
पशूसंवर्धन विभागातंर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांना शेतीचा दर्जा देण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत. तरुणांनी पशूपालनाच्या अनेक योजनांमध्ये सहभागी होऊन योजनांचा लाभ घ्यावा. इतर उद्योगांप्रमाणेच पशूपालनातून मोठा फायदा मिळतो. तुमचे हात मजबूत करण्यासाठी शासन या योजना राबवत आहे, योजनांचा लाभ घ्या आणि इतरांनाही योजनांची माहिती दया’ असे आवाहन मुंडे यांनी उपस्थित पशूपालकांना केले.
दुर्दैवी घटना…! विहिरीत बुडून दोन मुलांचा मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ
Newsworldmarathi Solapur: सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील एका विहिरीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना १ मे रोजी घडली आहे. सलग १० तास शोधकार्य करून दोन्ही मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. दोघांचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. भीमरत्न राजगुरू (वय-१४) आणि नैतिक माने (वय-१५, दोघेही रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या बोरामणी गावातील शेळके यांच्या विहिरीत गुरुवारी दुपारी काही शाळेतील मुलं पोहायला गेली होती. साडे बारा वाजण्याच्या सुमारास मुलं पोहत असताना, विहिरीचा कठडा घसरला आणि त्यांच्या अंगावर पडला. भीमरत्न आणि नैतिक ही दोन्ही मुलं ढिगाऱ्याखाली दबली गेली. बाकीची मुलं कशीबशी बाहेर आली. वाचलेल्या मुलांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून घेतले.
या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, जिल्हा ग्रामीण पोलीस प्रशासन आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत माहिती जाणून घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी त्याठिकाणी तळ ठोकून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत अथक परिश्रम करून दोन मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळवले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या घटनेने बोरामणी गावात शोककळा पसरली आहे.
कचऱ्यातून निर्माण केलं निसर्गाचं सौंदर्य; साई जनसेवा प्रतिष्ठान आणि PMCचा अनोखा उपक्रम
पुणे : पुणे शहरामध्ये वाढत्या शहरीकरणाबरोबरच लोकसंख्येचा विचार केला तर सध्या असलेली उद्यानांची संख्या अगदीच अपुरी आहे. मात्र योग्य नियोजनातून आपल्याच घराच्या, ऑफिसच्या टेरेसवर घरातील टाकाऊ वस्तू आणि ओल्या कचऱ्यापासून सुंदर आणि हिरवेगार टेरेस गार्डन आपण स्वत: तयार करू शकतो याचा आदर्श घालून देत पुणे महानगरपालिका, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय आणि साई जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या ८०० चौ. फुट टेरेसवर मनमोहक टेरेस गार्डन तयार करण्यात आले आहे. याचे उद्घाटन नुकतेच अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी पी आणि उपायुक्त, परिमंडळ क्रमांक ४ जयंत भोसेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
पुणे महानगरपालिका, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर या पर्यावरणपूरक गार्डनची निर्मिती करण्यात आली असून या गार्डनमध्ये टाकाऊ टायर, ड्रम आणि विटांचा उपयोग करून ८०० चौरस फूट जागेत फळे, फुले, भाज्या आणि शोभेच्या झाडांनी ही बाग फुलवण्यात आली आहे. या टेरेस गार्डनमध्ये शेवगा, कारले, संत्रा, पपई, कांचन, बहावा, चाफा, जास्वंद, सदाफुली, कर्दळी, तगर, गुलाब, बांबू, ऊस, शोभेची रोपे अशी फळझाडे, फुलझाडे आल्याने ही बाग अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत आहे. यासोबतच उन्हाची दाहकता लक्षात घेवून पक्षासाठी केलेली पिण्याचे पाणी व्यवस्था तसेच परिसरात केलेली नागरिकांसाठीची बैठक व्यवस्था सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
यावेळी बोलताना अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी पी म्हणाले कि, “ पुणे महानगरपालिका ही संस्था नागरिकांशी निगडीत असून तिचे ब्रिदवाक्य वरं जनहितं ध्येयम असे आहे. आपण केलेल्या कामाचा प्रभाव हा नागरिकांवर होत असतो व नागरिकांकडून आपल्या सेवेबाबत मिळणारे समाधान आणि कौतुक हे आपल्या कामाची पोचपावती असते आणि हि पोचपावती कोंढवा येवलेवाडी कार्यालयास मिळाली आहे” याप्रसंगी कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांचेसह सहाय्यक आयुक्त दिपक राऊत, जगले, मंदार वेदक, अपेक्स कमिटी मेंबर, नेराळे मॅडम, तंवर मॅडम, मोहल्ला कमिटी सदस्य, धायभर तसेच उपअभियंता चौधरी मॅडम , प्रशासन अधिकारी मोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दुल्लम व कदम व कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व साई जनसेवा प्रतिष्ठानचे सुरज लोखंडे यांचेसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
पुणे महानगरपालिका, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर या पर्यावरणपूरक गार्डनची निर्मिती करण्यात आली असून या गार्डनमध्ये टाकाऊ टायर, ड्रम आणि विटांचा उपयोग करून ८०० चौरस फूट जागेत फळे, फुले, भाज्या आणि शोभेच्या झाडांनी ही बाग फुलवण्यात आली आहे. या टेरेस गार्डनमध्ये शेवगा, कारले, संत्रा, पपई, कांचन, बहावा, चाफा, जास्वंद, सदाफुली, कर्दळी, तगर, गुलाब, बांबू, ऊस, शोभेची रोपे अशी फळझाडे, फुलझाडे आल्याने ही बाग अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत आहे. यासोबतच उन्हाची दाहकता लक्षात घेवून पक्षासाठी केलेली पिण्याचे पाणी व्यवस्था तसेच परिसरात केलेली नागरिकांसाठीची बैठक व्यवस्था सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
यावेळी बोलताना अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी पी म्हणाले कि, “ पुणे महानगरपालिका ही संस्था नागरिकांशी निगडीत असून तिचे ब्रिदवाक्य वरं जनहितं ध्येयम असे आहे. आपण केलेल्या कामाचा प्रभाव हा नागरिकांवर होत असतो व नागरिकांकडून आपल्या सेवेबाबत मिळणारे समाधान आणि कौतुक हे आपल्या कामाची पोचपावती असते आणि हि पोचपावती कोंढवा येवलेवाडी कार्यालयास मिळाली आहे” याप्रसंगी कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांचेसह सहाय्यक आयुक्त दिपक राऊत, जगले, मंदार वेदक, अपेक्स कमिटी मेंबर, नेराळे मॅडम, तंवर मॅडम, मोहल्ला कमिटी सदस्य, धायभर तसेच उपअभियंता चौधरी मॅडम , प्रशासन अधिकारी मोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दुल्लम व कदम व कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व साई जनसेवा प्रतिष्ठानचे सुरज लोखंडे यांचेसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतीना पंकजा मुंडेंचा भावनिक उजाळा
Newsworldmarathi Mumbai : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या काकांना, भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांना त्यांच्या स्मृतिदिनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंकजा यांनी प्रमोद महाजन यांचा एक जुना फोटो शेअर करत त्यांच्या आठवणी जागवताना आपल्या भावना व्यक्त केल्या. या पोस्टमध्ये त्यांनी कोणताही राजकीय मुद्दा न मांडता केवळ कुटुंबीय नात्यातून आठवणींना उजाळा दिला.
पंकजा मुंडे यांनी लिहिले की, “तुमचं आयुष्य, तुमचा प्रवास, तुमचं नेतृत्व… सर्व काही आजही प्रेरणादायी आहे. तुम्ही दिलेला वारसा माझ्यासाठी मार्गदर्शक आहे.”
या भावनिक पोस्टवर अनेक भाजप समर्थक, कार्यकर्ते आणि सामाजिक माध्यमांवरील अनुयायांनी प्रतिसाद दिला असून, प्रमोद महाजन यांचे राजकीय योगदान आणि दूरदृष्टी याची आठवण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
प्रमोद महाजन हे भाजपा पक्षाच्या स्थापनेपासून संघटनात्मक बांधणीसाठी झटणारे नेते होते. तंत्रज्ञान, संवाद आणि धोरण यामध्ये त्यांचा प्रभाव मोठा होता. आजही त्यांचे कार्य अनेकांना प्रेरणा देते.

