Homeबातम्याअजितदादा घेणार मोठा निर्णय? धनंजय मुंडेच्या अडचणीत वाढ

अजितदादा घेणार मोठा निर्णय? धनंजय मुंडेच्या अडचणीत वाढ

अजित पवार यांनी केलेलं “चुकीची माणसं बाजूला करावी लागतात” हे विधान सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय बनलं आहे. विशेषतः, धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील ही वक्तव्यं असल्याचं मानलं जातंय.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप आणि त्यांचं राजकीय भविष्य यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. काहींनी असा अंदाज वर्तवला आहे की, लवकरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सुपूर्द होऊ शकतो. यामुळे अजित पवार गटाच्या अंतर्गत हालचालींवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

हे वक्तव्य पवारांच्या नेतृत्वाखालील गटातील शिस्त आणि जबाबदारी कायम ठेवण्याचा इशारा असू शकतो. मात्र, या वक्तव्यामुळे राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरतील.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल केल्यानंतर आणि त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांसह काही सत्ताधारी नेतेही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोरदारपणे करत आहेत.

अशा परिस्थितीत, अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर स्पष्ट भूमिका घेतली, ज्यामुळे मुंडेंना मोठा धक्का बसल्याचं दिसतंय. अजित पवार यांनी यापूर्वी मुंडेंची पाठराखण केली होती, परंतु आता त्यांच्या “चुकीची माणसं बाजूला करावी लागतात” या वक्तव्यामुळे संकेत मिळतात की, पवार गटाने याप्रकरणी आपली भूमिका कठोर केली आहे.

या घटनाक्रमामुळे मुंडेंच्या मंत्रीपदाचे भवितव्य धोक्यात आले असून, सत्ताधारी गटात अंतर्गत दबाव आणि अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. पुढील निर्णयांवर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.

नेमक अजितदादा काय म्हणाले?

वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आल्यानंतर माध्यमांनी अजित पवारांना घेरले. यावेळी त्यांनी पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित केला. त्यावर बोलताना अजित पवारांनी स्पष्ट भुमिका मांडली. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार…कुणाकडे काही पुरावे असतील त्यांनी आम्हाला द्यावे, त्यांच्यावर आम्ही कारवाई करु, मी पण शेतकरी आहे. शेतकरी म्हणूनच बोलतोय. चुकीची माणसं असतील तर बाजूला करावे लागते. आम्ही चौकशी कर…कोणालाही पाठीशी घालणार नाही, अस पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments