Homeबातम्यामहायुतीत मंत्रीपदावरून पेच

महायुतीत मंत्रीपदावरून पेच

Newsworld Mumbai :
महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वीच मंत्रिमंडळातील नावांवरून भाजप BJP आणि शिंदे गटामध्ये तणाव उफाळून आला आहे. मंत्र्यांच्या निवडीवरून सुरू असलेल्या या चर्चांमुळे महायुतीतील एकजूट आणि सत्तेची वाटणी यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मुख्य मुद्दे:

कलंकित चेहऱ्यांना भाजपचा विरोध:
– शिवसेनेने पाठवलेल्या मंत्र्यांच्या यादीतील संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, आणि दीपक केसरकर यांच्या नावांवर भाजपने आक्षेप घेतला आहे.भाजपची भूमिका आहे की, कलंकित किंवा वादग्रस्त नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ नये.

शिंदे गटाची नाराजी:
– भाजपने मंत्रिमंडळासाठी पाठवलेल्या शिवसेना नेत्यांची यादी फेटाळल्यामुळे शिंदे गटात असंतोष आहे. आमच्या मंत्र्यांची नावे भाजपच ठरवणार का? असा थेट सवाल शिंदे गटाने केला आहे. मुख्यमंत्रीपद गमावल्यानंतर शिंदे गटाने गृहखात्याचा आग्रह धरला आहे, मात्र त्यालाही भाजपकडून विरोध केला गेला आहे.

नेत्यांमधील चर्चा:
मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली.या बैठकीत मंत्र्यांची नावे आणि खाती यावर चर्चेचा मुख्य फोकस होता. अद्याप या चर्चेचा अधिकृत तपशील समोर आलेला नाही.

शपथविधीतील मंत्रिमंडळाची रचना:
गुरुवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात प्रत्येक पक्षाचे सात मंत्री शपथ घेतील, अशी शक्यता आहे. एकूण २१-२२ मंत्र्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात केला जाणार आहे.

महायुती सरकार स्थापन होण्यापूर्वीच भाजप आणि शिंदे गटातील तणाव उघड झाला आहे. शपथविधीपूर्वी या तणावावर तोडगा निघाला तरच सरकार स्थिर आणि प्रभावी होऊ शकेल.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments