Newsworldmarathi Mumbai: राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये सौम्य वाढ होत असून, २३ मे रोजी एकूण ४५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक ३५ रुग्ण, पुण्यात ४, कोल्हापूर व रायगड येथे दोन, तर ठाणे व लातूर येथे एक असे रुग्ण आढळून आले आहेत.
यामुळे २२ मेपर्यंत मुंबईतील एकूण कोरोना रुग्णसंख्या १८३ वर पोहोचली आहे. जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण ६,८१९ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून, त्यांपैकी २१० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एकट्या मुंबईत १८३ रुग्ण सापडले आहेत.
त्यापैकी आतापर्यंत 81 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
सर्दी, खोकला आणि तापसदृश लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये कोविडबाधित रुग्ण आढळल्यास त्याला पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच काही उपनगरातील रुग्णालयात रुग्णांसाठी विशेष बेड आणि विशेष खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.


Recent Comments