“महाराष्ट्रात पावसाचा धडाका ! मुंबई, ठाण्यासह कोकणात आज रेड अलर्ट, पुढचे 24 तास ठरणार निर्णायक”

0
Newsworldmarathi Mumbai: Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा जोर धरला आहे. महाराष्ट्रात पुढील 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असून, रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातही जोरदार पावसाची शक्यता असून, या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, जळगाव, अहिल्यानगर, सांगली, संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांसह राज्याच्या इतर भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. हवामान खात्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. काळजी घ्या, सुरक्षित रहा! राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळपासूनच राज्यभर अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. ढगफुटीसदृश पावसाचे चित्र गेल्या दहा ते बारा दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश पावसाचे दृश्य दिसत आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुण्यात पावसाचा जोर कायम गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सायंकाळी पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला. पिंपरी-चिंचवड भागात 46 मिमी, तर शिवाजीनगर भागात 26.5 मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी(15 जून) साठी पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर भारतात उष्णतेचा कहर, दक्षिणेत मुसळधार पावसाने हाहाकार देशाच्या उत्तर आणि दक्षिण टोकांमध्ये हवामानाची स्थिती एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. उत्तर भारतात तापमानाने उच्चांक गाठताना, दक्षिण भारतात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तर भारतात उष्णतेची लाट राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि दिल्लीसह अनेक भागांत तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः हरियाणामधील ९ जिल्ह्यांमध्ये तापमान ४८ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण भारतात पावसाचा कहर तेलंगणामधील आदिलाबाद जिल्ह्यात वीज पडल्याने ६ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ५ महिला आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. हवामानाच्या या टोकाच्या स्थितीमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. उत्तर भारतात उष्माघाताचा धोका वाढला असून, दक्षिण भारतात पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे.

Air India Plane Crash : विमान अपघाताने हादरला महाराष्ट्र ! १२ जणांचा मृत्यू; पायलट, क्रू मेंबर्ससह प्रवाशांची धक्कादायक यादी समोर

Newsworldmarathi Gujrat : Air India Plane Crash : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 चा टेकऑफनंतर अवघ्या १२-१५ सेकंदांत भीषण अपघात झाला. मेघानीनगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर विमान कोसळल्याने २४१ प्रवासी, क्रू मेंबर्स आणि जमिनीवरील २४ जणांसह एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला. २४२ प्रवाशांपैकी केवळ एकजण, रमेश विश्वकुमार, चमत्काराने वाचला. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील १२ जणांचा मृत्यू झाला, ज्यामुळे राज्यभरात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्रातील मृतांची यादी कॅप्टन सुमीत सभरवाल (मुंबई, चांदिवली) – मुख्य पायलट. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. त्यांची बहीण रात्री उशिरा मुंबईत दाखल झाली. सिविक कुंदर (मुंबई, बोरिवली) – को-पायलट. अपर्णा महाडिक (मुंबई, मूळ चिपळूण) – क्रू मेंबर, राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुनील तटकरे यांच्या भाच्याच्या पत्नी. मैथिली पाटील (नवी मुंबई, न्हावा) – क्रू मेंबर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (१३ जून) सकाळी १० वाजता त्यांच्या घरी भेट देणार आहेत. रोशनी सोनघरे (डोंबिवली) – २७ वर्षीय क्रू मेंबर, राजाजी पथ येथील उमिया कृपा सोसायटीत कुटुंबासह राहत होत्या. दीपक पाठक (बदलापूर) – ११ वर्षांपासून एअर इंडियात क्रू मेंबर, कात्रप येथील रावल कॉम्प्लेक्समध्ये राहत होते. महादेव पवार (पंढरपूर, सध्या अहमदाबाद) – प्रवासी. आशा पवार (पंढरपूर, सध्या अहमदाबाद) – महादेव यांच्या पत्नी, प्रवासी. मयूर पाटील (महाराष्ट्र, माहिती अपुरी) – प्रवासी. यशा कामदार (नागपूर, सध्या अहमदाबाद) – पती, मुलगा आणि सासूसह लंडनला निघाल्या होत्या. रक्षा मोदा (नागपूर, सध्या अहमदाबाद) – यशा यांच्या सासू, प्रवासी. रुद्र मोदा (नागपूर, सध्या अहमदाबाद) – यशा यांचा १.५ वर्षांचा मुलगा, प्रवासी. करुण कहाण्या : सुमीत सभरवाल यांच्या घरी केवळ वडील राहत होते. त्यांची बहीण अहमदाबादला रवाना झाली आहे. अपर्णा महाडिक यांच्या मृत्यूने चिपळूण आणि मुंबईतील कुटुंबीय स्तब्ध झाले. रोशनी सोनघरे यांचे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झाले होते. दीपक पाठक यांनी टेकऑफपूर्वी आईशी बोलले होते, तोच त्यांचा शेवटचा संवाद ठरला. यशा कामदार यांचे कुटुंबीय नागपूरहून अहमदाबादला रवाना झाले आहेत. दरम्यान, DGCA आणि बोईंगने अपघाताच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. एक ब्लॅक बॉक्स सापडला असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. ब्लॅक बॉक्समधील माहिती अपघाताच्या कारणांचा उलगडा करेल, अशी आशा आहे. ही दुर्घटना महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी एक मोठा धक्का आहे. टाटा समूहाकडून 1 कोटींची मदत अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया फाइट AI‑171 च्या भयंकर अपघातानंतर, टाटा समूहाने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचाराचा खर्च या समूहाकडून निघणार आहे. तसेच बी.जे. मेडिकल कॉलेजचं वसतीगृह, पुन्हा बांधून देण्यात येणार आहे. असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले.

Air India Plane Crash : सीटसह बाहेर फेकला गेलो, एअर होस्टेस-काका-काकी जळत होते; बचावलेल्या रमेशचा थरारक अनुभव

Newsworldmarathi Gujrat: Air India Plane Crash : अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 चा अवघ्या १२-१५ सेकंदांत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २४१ प्रवासी आणि मेघानीनगर परिसरातील २४ रहिवाशांसह एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला. मात्र, या भयंकर अपघातातून एकमेव प्रवासी, ४० वर्षीय रमेश विश्वकुमार (सीट क्रमांक ११ए), चमत्कारिकरीत्या वाचला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन त्याची भेट घेतली. रमेशने आपला थरारक अनुभव सांगितला: “माझी सीट असलेला विमानाचा भाग इमारतीच्या खालच्या बाजूला आदळला. वरच्या भागात प्रचंड आग लागली होती, जिथे बरेच जण अडकले होते. मी सीटसह खाली फेकला गेलो. तुटलेल्या दरवाजातून रिकामी जागा दिसली, तिथून मी बाहेर पडलो. दुसऱ्या बाजूला भिंत होती, तिथून कोणीही बाहेर येऊ शकले नाही.” त्याने पुढे सांगितले, “माझ्या डोळ्यांसमोर दोन एअर होस्टेस, एक काका आणि काकू जळत होते.” रमेशचा डावा हात गंभीरपणे भाजला, पण तो चमत्काराने वाचला. दरम्यान, अपघातग्रस्त विमानाचा एक ब्लॅक बॉक्स (फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर) सापडला आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. या ब्लॅक बॉक्समुळे अपघाताच्या कारणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या भीषण दुर्घटनेच्या तपासाला दिशा मिळेल.

बकरी ईदनंतर काळाची झडप ! पिंपरीचा २२ वर्षीय इरफान विमान अपघातात गमावला, कुटुंबीयांचा आक्रोश

0
Newsworldmarathi Pune : अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 चा टेकऑफनंतर काही मिनिटांतच भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पिंपरी-चिंचवडच्या संत तुकारामनगर येथील २२ वर्षीय इरफान शेख, जो एअर इंडियाचा कॅबिन क्रू मेंबर होता, याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्ससह २४२ जण होते, यापैकी केवळ एक प्रवासी वाचला. या अपघाताने इरफानच्या कुटुंबावर आणि नातेवाईकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. इरफान गेल्या दोन वर्षांपासून एअर इंडियात कार्यरत होता. सुरुवातीला तो डोमेस्टिक फ्लाइट्सवर आणि नंतर आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर कॅबिन क्रू म्हणून काम करत होता. मूळचा साताऱ्यातील मेढा येथील असलेले शेख कुटुंब गेल्या ५० वर्षांपासून पिंपरीत स्थायिक आहे. इरफानच्या कुटुंबात आई-वडील, मोठा भाऊ, आजी-आजोबा आहेत. नुकताच बकरी ईद साजरी करण्यासाठी तो घरी आला होता, आणि कुटुंबासह आनंदाचे क्षण घालवून परतला. मात्र, त्याच्या जाण्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. विमान मेघानीनगर परिसरातील डीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले, ज्यामुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले आणि जमिनीवर २४ जणांचा मृत्यू झाला. एकूण २६५ जणांचा या अपघातात बळी गेला. इरफानचे पार्थिव ताब्यात घेण्यासाठी कुटुंबीय अहमदाबादला रवाना झाले असून, डीएनए तपासणीनंतरच ते सुपूर्द केले जाईल. अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी सांगितले की, एकमेव वाचलेल्या प्रवाशावर उपचार सुरू आहेत. इरफानच्या निधनाने पिंपरीसह संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव… ‘झेप’ उपक्रमाचा समारोप प्रेरणादायी वातावरणात संपन्न

0
Newsworldmarathi Pune: पद्मश्री महर्षी डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) संस्थापित ‘सप्तसिंधू’ महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था, संचलित ‘सन्मती बाल निकेतन”, मांजरी (बु.), पुणे येथे ‘झेप’ (वर्ष ३ रे ) उपक्रमाचा समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला. विलू पूनावाला फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जसविंदर नारंग सर यांची समारोप समारंभात प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षीय स्वरूपात विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्यासमवेत द सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे रोहित शिंदे आणि विजय कोल्हटकर, ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक गायकवाड, तसेच द मदर ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष विनय सपकाळ हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माईच्या कन्या व संस्थेच्या अध्यक्षा मा. ममता सिंधुताई सपकाळ यांच्या प्रास्ताविकाने झाली त्यांनी ‘झेप’ उपक्रमाच्या उद्देशांवर प्रकाश टाकत सांगितले की, “ही केवळ उपक्रमाची सांगता नसून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या आत्मविश्वासाचा आणि प्रगतीचा एक टप्पा आहे. नारंग सर यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “अनाथ मुलांना ते अनाथ असल्याची जाणीव न होऊ देता, त्यांना कुटुंबवत प्रेम, योग्य शिक्षण आणि सुविधा देणे हेच आदरणीय माई आणि आदरणीय आदर पूनावाला सर यांचे ध्येय आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी ही संस्था जवळून पाहत असून तिचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे” मान्यवरांच्या हस्ते संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, विविध भाषांमध्ये विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली, या प्रसंगी नेस वाडिया कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर यांनी यंदा पासून दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी रु. ५०००/- ची शिष्यवृत्ती सुरू केली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिनेश शेटे, पाहुण्यांचा परिचय प्रताप चिंचोले, तर आभार प्रदर्शन पद्मा शिंदे यांनी केले. ‘झेप’ उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य, आणि कलेच्या विविध अंगाचा विकास साधत त्यांच्यातील सुप्त गुणांना नवी दिशा दिली आहे. हा उपक्रम अधिकाधिक विद्यार्थी आणि समाजासाठी प्रेरणास्थान ठरेल, याची खात्री आहे.

व्हिसाचा आनंद अन् २ मिनिटांत काळरात्र ! डॉक्टर दाम्पत्यासह ३ मुलांचा मृत्यू , मन सुन्न करणाऱ्या करून कहाण्या समोर

Newsworldmarathi Gujrat: Dr. Pratik Joshi Family Death | अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एक हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे, ज्याने सर्वांचे मन हेलावून टाकले. राजस्थानच्या बांसवाडा येथील डॉ. प्रतीक जोशी, त्यांच्या पत्नी डॉ. कोनी व्यास आणि तीन मुलं प्रद्युत, मिराया आणि नकुल लंडनला नव्या आयुष्याच्या स्वप्नांसह निघाले होते. पण नियतीने त्यांचे सर्व स्वप्न अवघ्या दोन मिनिटांत उद्ध्वस्त केले. डॉ. प्रतीक २०१६ पासून लंडनमध्ये स्थायिक होते, तर डॉ. कोनी उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी कोनी यांनी नुकताच नोकरीचा राजीनामा दिला होता. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर व्हिसा मिळाल्याचा आनंद साजरा करत, गुरुवारी (१२ जून) ते एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 मधून लंडनला निघाले. विमानात बसताच त्यांनी उत्साहाने काढलेला सेल्फी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा फोटो ठरला, ज्यामध्ये नव्या सुरुवातीचा आनंद झळकत होता. मात्र, टेकऑफनंतर काही क्षणांतच विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळले. प्रचंड आगीच्या ज्वाळांमध्ये २४२ प्रवाशांपैकी २४० जणांचा मृत्यू झाला, यात डॉ. प्रतीक, डॉ. कोनी आणि त्यांच्या तीन निष्पाप मुलांचाही समावेश होता. केवळ एक प्रवासी वाचला. हा सेल्फी आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, बांसवाडा आणि उदयपूरमधील त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वत्र शोककळा पसरली आहे. ही घटना घडल्याचे कोणालाही विश्वास बसत नाही, आणि हे कुटुंब आता फक्त स्मृतींमध्ये उरले आहे.

शास्त्रीय संगीत-नृत्य, गायनाने सजला ‘गंगाधर स्वरोत्सव युव-रंग’

0
Newsworldmarathi Pune: मनमोहक कथक नृत्य, वैविध्यपूर्ण व मधुर गायकी, राग व बंदिशींचे भाव अन ठुमरीने झालेली सांगता अशा शास्त्रीय संगीत, नृत्य व गायनाने सजलेल्या ‘गंगाधर स्वरोत्सव युव-रंग’मध्ये युवा कलाकारांच्या बहारदार सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्वरनिनाद पुणे संस्थेच्या वतीने दोन दिवसीय शास्त्रीय संगीत महोत्सवाचे नुकतेच आयोजन केले होते. युवा पिढीतील प्रतिभावान कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारा हा महोत्सव आहे. या महोत्सवाला राहुल देशपांडे, अमोल निसळ, तेजस उपाध्ये, राजस उपाध्ये, रईस खान, अंजली दाते, गायत्री जोशी, धनंजय गोखले आणि मेहेर परळीकर यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांनी उपस्थित राहून युवा कलाकारांना प्रोत्साहन केले. वृषाली निसळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. पहिल्या दिवशी पंडिता शमा भाटे यांच्या शिष्या ईशा नानलच्या कथक नृत्याने महोत्सवाची सुरुवात झाली. ईशाने ‘वंदना’, ‘चौताल’ (तोडे, तुकडे, तत्कार) आणि ‘अभिनय पक्षात’ ‘एक और एकलव्य’ या कलाकृती सादर करत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या नृत्यातून कथक परंपरेची शुद्धता आणि अभिनयाची खोली दिसून आली. पंडित अजय चक्रवर्ती यांचे शिष्य अनुभव खमारूने यमन रागामध्ये विलंबित एकतालात ‘सुमरन तोरा’ ही बंदिश, ‘झपताल’मध्ये ‘चंद्रमा ललाट पर’ आणि ‘द्रुत एकताल’मध्ये ‘गुन नाही एको’ सादर केले. ‘द्रुत तीन ताला’मध्ये तराणा आणि ‘पिलू रागा’मध्ये ‘पिया के बोल ना बोल’ ही ठुमरी सादर केली. तबल्यावर यशद गायकी, हार्मोनियमवर अभिनय रवंदे यांनी साथ दिली. एस. आकाश यांच्या प्रभावी गायनाने पहिल्या दिवसाची सांगता झाली. रागेश्रीमध्ये आलाप, ‘झपतालात’ गत आणि ‘तीन ताला’मधील द्रुत गत सादर केली. त्यांना तबल्यावर आशय कुलकर्णी यांनी साथ दिली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात अथर्व वैरागकर यांच्या मधुर गायनाने झाली. गुरु ओंकार वैरागकर आणि गायत्री जोशी यांचे शिष्य असलेल्या अथर्वने ‘राग मधुवंती’मध्ये ‘विलंबित एकताल’मध्ये ‘कोयलिया बोले डाल’ आणि ‘द्रुत बंदिश’ ‘काहे छेडत बलिहारी’ सादर केली. तसेच त्यांनी ‘पहाडी रागा’मध्ये ठुमरी सादर करत आपल्या गायन कौशल्याची झलक दाखवली. त्यांना कार्तिकस्वामी आणि माधव लिमये यांनी साथ दिली. तेजस उपाध्ये यांचे शिष्य अमन वरखेडकरने ‘रागेश्री’मध्ये आलाप, जोड आणि झाला सादर केले. तसेच त्यांनी ‘रूपक ताल’ आणि ‘तीन ताला’मध्ये गत सादर करत रसिकांची दाद मिळवली. त्यांना कार्तिक स्वामी यांनी तबल्यावर साथ दिली. ‘स्वरनिनाद’च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक गायनाने दुसऱ्या दिवसात रंगत आणली. त्यांनी ‘खमाज थाटा’तील सरगम गीत सादर केले. ज्यात तिलककामोद ,देस, जयजयवंती, झिंझोटी, कलावती या रागांच्या छटा होत्या. त्यानंतर ‘कल्याण रागा’त तिल्लाना सादर करत त्यांनी उपस्थितांना आनंदित केले. तबल्यावर यशद गायकी, हार्मोनियमवर निषाद जोशी आणि व्हायोलिनवर आशिष बेहरे यांनी साथ दिली. महोत्सवाची सांगता शरयू दातेच्या प्रभावी शास्त्रीय गायनाने झाली. अश्विनी भिडे यांच्या शिष्या असलेल्या शरयूने ‘राग नंद’मध्ये ‘विलंबित एकताल’मध्ये ‘ढूंडु बन सैंया’ ही बंदिश आणि ‘द्रुत तीन ताला’तील ‘मोहे करून दे बिया’ ही बंदिश सादर केली. तसेच त्यांनी साडेसात मात्राच्या तालामध्ये ‘राग प्रतीक्षा’ सादर करत मैफिलीला उंचीवर नेले. त्यांना आशय कुलकर्णी आणि माधव लिमये यांनी साथ दिली.

पहिल्यांदा लंडनला मुलाच्या भेटीला निघालेले आई-वडील विमान अपघातात मृत्यू…

Newsworldmarathi Gujrat: गुजराथ अहमदाबाद शहरांमध्ये आज दुपारी विमान अपघात झाला. या विमान अपघातात प्राथमिक माहितीनुसार 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या विमान अपघातामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. महादेव तुकाराम पवार आणि आशा महादेव पवार अशी या विमानात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावं आहेत. हे दाम्पत्य सांगोला तालुक्यातील हतीद या मूळ गावातील आहे. मात्र ते कामानिमित्त गुजरातमध्ये नडीयाद इथं राहत होतं. विमान अपघातात या दोघांचा दुदैवी मृत्यू झाला आहे.. अपघातात आपले चुलते दगावल्याने पवार यांचे पुतणे सचिन पवार, पुतणी उषा चव्हाण व त्यांचे नातेवाईक हे त्यांच्या मूळ गावाहून पुण्याकडे जात असताना ते पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे थांबले होते.. ते पुण्याहुन गुजरातच्या अहमदाबाद येथे निघाले आहेत. मयत महादेव पवार व आशाबाई पवार यांचे पुतणे सचिन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की., गेली सात-आठ वर्षांपासून त्यांचा चुलत भाऊ म्हणजे मयत महादेव पवार व आशाबाई पवार यांचा मुलगा शैलेश हा लंडनमध्ये बेकरी व्यवसाय करीत आहे., आपल्या मुलाला भेटण्यासाठी ते दोघे पहिल्यांदाच परदेशात प्रवास करत होते. त्यांच्या मुलाने लंडनमध्ये एक बेकरी सुरू केली असून गेल्या सात आठ वर्षांपासून तो तिथेच वास्तव्य करत आहे.

अहमदाबाद विमान अपघात दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना टाटा समूहाकडून १ कोटीची मदत

Newsworldmarathi Gujrat : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया फाइट AI‑171 च्या भयंकर अपघातानंतर, टाटा समूहाने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचाराचा खर्च या समूहाकडून निघणार आहे. तसेच बी.जे. मेडिकल कॉलेजचं वसतीगृह, पुन्हा बांधून देण्यात येणार आहे. असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले. एअर इंडियानेही प्रवाशांसाठी सहानुभूती दर्शवत 12–14 जून दरम्यान ट्रॅव्हल तारखांमध्ये फीशुल्क बदल किंवा रद्दीकरणाची परवानगी जाहीर केली आहे. या दुर्घटनेत 242 प्रवासी-क्रूमध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगिज व 1 कॅनडियन नागरिक होते. विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि महाराष्ट्रातील तीन नागरिक अपर्णा महाडिक, दीपक पाठक, मैथिली पाटील यांचा समावेश आहे. एका ब्रिटिश-भारतीय प्रवाशाचे चमत्काराने वाचल्याचे नोंदवले गेले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी अपघातातील निष्पत्ती अंतरराष्ट्रीय नियमांनुसार विमान अपघात अन्वेषण विभागाकडून केली जाईल, अशी माहिती दिली. तसेच, केंद्रीय मंत्रालयात संभाव्य समन्वयासाठी एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, आपत्कालीन काळजी आणि संपर्कासाठी विविध हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत—079‑232‑51900, 9978405304, 011‑24610843 आणि 9650391859 . टाटाकडून 1 कोटी प्रमाणे मृतांच्या कुटुंबांना मदत, उपचार खर्च व हॉस्टेल पुनर्निर्मितीसह व्यापक पॅकेज Air India – ट्रॅव्हल रद्दीकरण/बदलावर मुक्तपणे परवानगी 265 लोकांचा दुःखद अंत (241 विमानातील + 24 जमिनीवरील नागरिक) ब्लॅक बॉक्स तपास – विमानसेवा संघटना व आंतरराष्ट्रीय मंडळींच्या सहभागाने शक्‍य केंद्र सरकार – एमजे नायडू – नियंत्रण कक्ष, समन्वय व चाचणी सुरळीत चालवण्याचं आश्वास

Sanjay Raut : सरकारला ना वेदना, ना पश्चात्ताप… मग यांना काय टाळता येतं?; संजय राऊतांच्या केंद्रावर हल्लाबोल

Newsworldmarathi Mumbai: शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी अहमदाबाद विमान अपघातावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. गुरुवार दुपारी टेकऑफ झाल्यावर काही सेकंदांतच कोसळलेला एअर इंडिया AI‑171 ने 265 जणांचा जीव घेतला. मृतांमध्ये 241 प्रवासी, 12 क्रू मेंबर्स आणि 24 मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी यांचा समावेश आहे. नेमकं काय म्हणाले संजय राऊत संजय राऊत म्हणाले, “एव्हिएशनमध्ये ‘ड्रीमलाइनर’सारखं अत्यंत सुरक्षित मानलं जाणारं विमान टेकऑफनंतर एका मिनिटाच्या आत कोसळतं आणि एक प्रवासी वगळता २४१ प्रवासी ठार होतात. इतक्या मोठ्या घटनांनंतरही तिथे वेदना, पश्चात्ताप, जबाबदारी कोठे आहे?” असा सवाल संजय राऊत यांनी सरकारला विचारला. ते पुढे म्हणाले, रेव्हलसे, पहलगामसारखे हल्ले, विमान अपघात… ‘असे मोठे अपघात टाळता येत नाही’ असा आपला दावा आहे; मग यांना काय टाळता येत नाही? संजय राऊतांनी एअर इंडियाचा खासगीकरण, ड्रीमलाइनर खरेदी, आणि दोन्ही इंजिन एकाच वेळी बंद पडल्यासंबंधी तांत्रिक दोषांवरही स्पष्टीकरण देत म्हणाले, मग या घटनांची जबाबदारी कोण घेणार? चौकशी होणार; ब्लॅक बॉक्स आल्यावर सर्व उघड होईल; पण काम झाले नाही; प्रधानमंत्र्यांच्या घोषणांनंतरही जबाबदारी कुठे? असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? ब्लॅक बॉक्स हे विमानात बसवले जाणारे एक अत्यंत मजबूत आणि डिजिटल उपकरण आहे, जे उहाणादरम्यान विमानाची तांत्रिक माहिती आणि पायलटचे संभाषण रेकॉर्ड करते. ब्लॅक बॉक्स हा चमकदार केशरी रंगाचा असतो जेणेकरून अपघातानंतर तो सहजपणे सापडू शकेल. ब्लैक बॉक्समध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) – विमानाचे वेग, उंची, दिशा, इंजिन माहिती रेकॉर्ड करतो आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) -पायलट व सह-पायलटचे संभाषण आणि केबिनमधील आवाज रेकॉर्ड करतो असे दोन मुख्य घटक असतात. विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सचे महत्त्व काय? अपघातानंतर ब्लॅक बॉक्समधील माहितीच्या आधारे अपघाताचे कारण शोधले जाते. ते विमान सुरक्षा तपासणीसाठी सर्वात महत्त्वाचे साधन आहे. अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित कसा राहतो? ब्लॅक बॉक्स टायटॅनियमसारख्या मजबूत धातूपासून बनवला जातो. तो उच्च तापमान, पाण्याचा दाब, धक्के सहन करू शकतो. त्यामुळे तो अपघातानंतरही सुरक्षित राहतो. संजय राऊत यांचे अपघाताच्या गंभीरतेवर लक्ष केंद्रित सरकारकडून दुःख, पश्चात्ताप आणि जबाबदारीचे अभाव ड्रीमलाइनर विमानाच्या तांत्रिक अडचणी व खरेदीच्या चौकशीची मागणी “अपघात टाळता येत नाही” असा सरकारचा धोरणात्मक दृष्टिकोन पुन्हा आणि पुन्हा सवालाखाली आणला आहे.