बाजीराव पेशवे यांच्या युद्धनिती अंगिकारल्यास देशाच्या सीमा भविष्यातही सुरक्षित : अमित शहा

0
Newsworldmarathi Pune: मृत्यूपर्यंत पराजयाला जवळही येऊ न देणाऱ्या अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य अश्वारूढ पुतळा एनडीए येथे उभारला ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पुढील पिढीतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराजाची स्थापना केली त्यातून स्वराज्याचे संस्कार पेरले. ही ज्योत छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, धनाजी, संताजी, तानाजी यांनी तेवत ठेवली. हीच परंपरा पुढे चालवत थोरले बाजीराव पेशवे यांनी स्वराजाची मशाल पेटती ठेवली. युद्ध कौशल्याच्या माध्यमातून स्वराज्याची सीमा विस्तारण्याचे मोठे कार्य पेशवे यांनी केले आहे. मातृभूमी, धर्मभूमी आणि स्वराज्यासाठी सातत्याने युद्ध करणारे ते एकमेव अजेय आणि पराक्रमी योद्धा आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काढले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे साडेतेरा फुट उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्यावतीने उभारण्यात आला असून या पुतळ्याचे अनावरण आज (दि. 4 जुलै) केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, एनडीएचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंह, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण मंचावर होते. श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यास मोलाचे सहकार्य करणारे सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, शिल्पकार विपुल खटावकर, वास्तुविशारद अभिषेक भोईर यांचा या वेळी अमित शहा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करून लोकमान्य टिळक, वीर सावरकर यांच्या क्रांतिकारी विचारांना उजाळ देऊन अमित शहा पुढे म्हणाले, युद्ध नियम कालबाह्य नसतात. व्यूहरचना, त्वरा, समर्पणभाव, देशभक्ती, बलिदानाची वृत्ती योद्ध्याला नेहमीच प्रेरित करते आणि यश देते. या सर्वांचा संगम असलेले श्रीमंत बाजीराव पेशवे हे एकमेव लढवय्ये होत. त्यामुळे अवघ्या 19व्या वर्षी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर पुढील 20 वर्षात 41 लढाया लढूनही पेशवे एकही लढाई हरले नाहीत. ते पुढे म्हणाले, संरक्षण दलांमधील तीनही विभागांचे प्रशिक्षण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दिले जाते. या संस्थेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा कायम प्रेरणा देईल. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या युद्धनितीच्या कौशल्यातून देशाच्या सीमा भविष्याही सुरक्षित राहतील. छत्रपती शिवाजी महाराज तसेच श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे शौर्य वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. मला निराशा आली तर बाल शिवाजी, श्रीमंत बाजीराव पेशवे या वीर योद्ध्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आठवतो आणि माझी निराशा नाहीशी होते. देशासाठी समर्पण, बलिदान देणाऱ्या अनेक योद्ध्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडला गेला तसेच पुसलाही गेला. विकास आणि विरासत या पंतप्रधान मोदी यांच्या सूत्रातून प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा, वीर योद्ध्यांचा खरा इतिहास जगासमोर यावा यासाठी हा इतिहास भावानुवादीत होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही अमित शहा यांनी दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील नामांकित प्रबोधिनीत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे, ही आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजीगिषु वृत्तीने स्वराज्याची ज्योत सामान्य मराठी माणसाच्या रक्तात फुलविली ती अखंडित ठेवत तिचा विस्तार करण्याचे महान कार्य श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी केले. सर्व दिशांना हिंदवी स्वराज्य स्थापन करीत असताना त्यांनी वेगाची रणनिती अवलंबिली. आज अनेक महानायकांचा इतिहास पुसला गेला आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या भव्य पुतळा उभारणीतून मराठ्यांचा उज्ज्वल इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनित उभारलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याने पराक्रमाची पूजा बांधण्याचा अनुषेश भरून निघाला आहे. हा केवळ पुतळा नसून हे पराक्रमाचे स्मारक आहे. वीर सेनानींच्या पराक्रमाच्या गाथांचे विविध भाषांत अनुवाद व्हावेत ज्यायोगे विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला उजाळा मिळेल. प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण गोखले म्हणाले, वीर योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार असून देशासाठी आयुष्य समर्पित करण्याची भावना वाढीस लागणार आहे. सेवा परमो धर्म या भावनेतून कार्य करणाऱ्या देशाच्या सेनेला पेशवे यांच्या युद्धनितीची शिकवण मिळणार आहे. मान्यवरांचे स्वागत भूषण गोखले, कुंदनकुमार साठे, चिंतामणी क्षीरसागर, पुष्करसिंह पेशवा, श्रीपाद करमरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन शेटे यांनी तर आभार कुंदनकुमार साठे यांनी मानले.

पुण्याच्या पूर्व भागासाठी स्वतंत्र महानगरपालिकेची निर्मिती करावी : आ. योगेश टिळेकर यांची मागणी

Newsworldmarathi Mumbai: नव्याने समाविष्ट आणि हडपसर-वाघोली अशी पुण्याच्या पूर्व भागातील गावांची एकत्रित महानगरपालिका निर्माण करण्याची मागणी विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी लक्षवेधीद्वारे आज विधानपरिषदेत केली. वाढत्या नागरिकरणामुळे या समाविष्ट गावांना सुविधा पुरवण्यात महानगरपालिकेची कसरत होत असून, आर्थिक अडचणीही निर्माण होत आहेत. त्यामुळे शहराच्या पूर्व भागातील हडपसर, मांजरी, वाघोली आणि त्यालगतच्या गावांची एकत्रितपणे स्वतंत्र महानगरपालिका निर्माण करावी, अशी मागणी आमदार टिळेकर यांनी केली. योगेश टिळेकर म्हणाले, “पुणे शहराच्या हद्दीलगत असलेल्या ३२ गावांचा पुणे महापालिकेत समावेश झाल्यामुळे पुणे महापालिका प्रशासनावरील ताणही प्रचंड वाढला आहे. पुणे शहराचा चोहोबाजूंनी होत असलेला विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे शहराचे व्यवस्थापन करणे महापालिकेला अवघड होत आहे. त्यामुळे नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविणे महापालिकेला अशक्य होत आहे. वाढलेली हद्द आणि अपुरी प्रशासकीय व्यवस्था यामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पुणे महापालिकेत पूर्वी असलेल्या भागामध्ये आवश्यक त्या सुविधा पुरविणे अवघड असताना नवीन समाविष्ट गावातील नागरिकांनाही सोयीसुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेवर येवून पडली आहे. नवीन गावांमध्ये नियमबाह्य बांधकामे एक ते दीड गुंठ्यामध्ये चार ते पाच मजली उभ्या राहिलेल्या इमारती ही बांधकामे पालिकेत येण्यापूर्वीची असल्याने त्यावर पालिकेला कारवाई करताना अडचण निर्माण होत आहे.” शहराच्या पूर्व भागांत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. इथे राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे पुणे महापालिकेचे विभाजन करून नवीन महापालिका केल्यास अनेक समस्या मार्गी लागतील आणि या भागाचा नियोजनबद्ध विकास करता येईल यासाठी पुणे महानगर पालिकेचे विभाजन करून पूर्व पुण्यासाठी नवीन महानगर पालिका निर्माण करण्याची आवश्यकता आहे.राज्य सरकारने यावर तात्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे. महानगरपालिकेवरील वाढता ताण आणि पूर्व पुण्यातील उपनगरांच्या समस्या सोडवण्यासाठी, मी आज हडपसर-मांजरी-वाघोलीसाठी स्वतंत्र महानगरपालिकेच्या निर्मितीची मागणी केली आहे. या भागाची लोकसंख्या आणि आर्थिक क्षमता पाहता, हा निर्णय न्यायसंगत आणि आवश्यक आहे. यावर सरकारने तातडीने विचार करावा अशी मागणी केली. परंतु, सध्या नव्या महानगरपालिकेचा कोणताही प्रस्तावित निर्णय नसल्याने नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांना लागेल तेवढा निधी देण्याचा मंत्री महोदयांनी आश्वासन दिले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

उरुळी कांचन येथे भीषण अपघात; टेम्पोने सहा जणांना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

0
Newsworldmarathi Pune: सोलापूर महामार्गावर वाहनाची वाट पाहत बसलेल्या सहा जणांना एका भरधाव पिकअप चालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चौघेजण गंभीर जखमी आहेत. बुधवारी (ता. 0२) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौकात हा अपघात झाला. या अपघातात अशोक भीमराव (वय- २५, रा. बसनाळ सावली बिदर कर्नाटक), व मेहबूब रहमान मियाडे (वय-६७, रा. माकर वस्ती सहजपुर ता. दौंड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर या अपघातात भारती लक्ष्मण बापूराव रा. आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली), मैनुद्दीन लालमिया तांबोळी (वय ६७, रा. आंबा पिंपळगाव, लातूर), वैशाली भागवत बनसोडे (वय ४०,रा. सोरतापवाडी ता. हवेली, पुणे), भागवत बनसोडे वय-४५, हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे हादरलं! कोंढव्यात तरुणीच्या तोंडावर केमिकल स्प्रे मारून बलात्कार

0
Newsworldmarathi Pune: पुणे शहरातील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कोंढवा परिसरात (Kondhva) बुधवारी रात्री घडलेली घटना संपूर्ण शहराला हादरवून टाकणारी ठरली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर एका अज्ञात इसमाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने कुरिअर बॉय असल्याचं सांगत सोसायटीत प्रवेश मिळवला आणि तोंडावर केमिकल स्प्रे करत पीडितेवर अत्याचार केला. घटना २ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. तरुणी आपल्या भावासोबत कोंढव्यात राहत असून, मूळची अकोल्याची आहे. ती पुण्यातील कल्याणी नगरमधील एका कंपनीत काम करते. आरोपीने बँकेचं कुरिअर असल्याचं सांगून दरवाज्याशी बोलणी केली आणि सहीची जबाबदारी असल्याचं सांगून सेफ्टी डोअर उघडायला लावलं. त्याच क्षणी त्याने तोंडावर केमिकल स्प्रे करून तरुणीला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर बलात्कार केला.

राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती, बावधनमध्ये उभारली जाणार म्युझियम सिटी

Newsworldmarathi Mumbai: राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्तारित कामाला गती देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. बावधन बुद्रुक येथील ६ एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य संग्रहालय उभारण्यासाठी नामांकित आर्किटेक्चर नेमणुकीसाठी प्रशासकीय समितीची स्थापना, सविस्तर आराखड्यानंतर निधीची तरतूद करणे, तसेच नव्याने उभारल्या जाणाऱ्या ‘म्युझियम सिटी’ला राजा दिनकर केळकर यांचेच नाव कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे. वैभवशाली इतिहासाचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या केळकर संग्रहालयात १४ व्या शतकापासूनच्या २०,००० हून अधिक वस्तूंचा संग्रहीत ठेवा आहे. सध्या जागेअभावी केवळ ११% वस्तू सध्या जनतेसाठी खुल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संग्रहालयाच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडून यापूर्वीच बावधन बुद्रूक येथे ६ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, सांस्कृतिक कार्य अपर मुख्य सचिव विकास खरगे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्तीय सुधारणा सविच श्रीमती शैला ए, वित्त व नियोजन सचिव श्री. राजेश देशमुख तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी उपस्थित होते.
“नवीन संग्रहालयाचे बांधकाम दर्जेदार, आकर्षक आणि शाश्वत पद्धतीने व्हावे, अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून शिवकालीन, पेशवेकालीन आणि पुण्याच्या वैभवशाली वारशाच्या जतनासाठी माझा सतत प्रयत्न आहे. शनिवारवाड्यासह अनेक ऐतिहासिक वास्तूंना पुनरुज्जीवित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. भविष्यात या ‘म्युझियम सिटी’ची ओळख जागतिक पातळीवर पोहोचेल, असा विश्वास आहे”.
हेमंत रासने, आमदार

रमणबाग शाळेच्या शालाप्रमुख चारुता प्रभुदेसाई यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ

0
Newsworldmarathi Pune: न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेच्या कार्यक्षम व सृजनशील मुख्याध्यापिका चारुता शरद प्रभुदेसाई आपल्या ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३०जून २०२५ रोजी सेवानिवृत्त झाल्या.न्यू इंग्लिश स्कूल,रमणबाग प्रशालेमध्ये त्यांनी 33 वर्षे इंग्रजी व मराठी या विषयाचे अतिशय प्रभावीपणे अध्यापन तर केलेच पण त्याचबरोबर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम,नाट्यवाचन,वक्तृत्व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कवितालेखन हा त्यांचा आवडता छंद असून त्यांच्या आजवर अनेक कविता शाळेच्या कार्यक्रमांमध्ये चाल लावून सादर झालेल्या आहेत.त्यांनी स्वतः लिहिलेल्या अनेक प्रसंगानुरूप मजकूरांनी व कवितांनी शाळेचे फळे नेहमीच सजलेले असायचे. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात देखील त्यांची कविता समाविष्ट झालेली आहे.शाळेचा वार्षिक अंक तेजोनिधीचे अनेक वर्षे संपादिका म्हणून काम पाहिले आहे. मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे,शाळेच्या परिपाठाकडे शिस्त व अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले.त्यांच्या स्वरचित आरत्यांचे ‘आशय आरती’हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांसाठी कथादीप दिवाळी अंक,चंदर आणि इतर कथा अशी त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या सेवागौरवपूर्ती समारंभास पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी आवर्जून उपस्थित होत्या.व्यासपीठावर शाळासमिती अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर, अखिल भारतीय काँग्रेस समिती सदस्य गोपाळदादा तिवारी कार्यक्रमास उपस्थित होते. उपमुख्याध्यापक जयंत टोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिक्षक प्रतिनिधी प्रतिभा जक्का यांनी शिक्षकांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले.परिचय दीप्ती डोळे यांनी करुन दिला तर आभार पर्यवेक्षिका अंजली गोरे यांनी मानले.कार्यक्रमास पर्यवेक्षिका मंजूषा शेलूकर,सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी,तसेच माजी विद्यार्थी व हितचिंतक उपस्थित होते.

अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश : चंद्रकांत बावनकुळे यांनी दिले आदेश

0
Newsworldmarathi Pune: जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांकडून सामान्यजनांना मिळणारी वागणूक ही सर्वांना माहितच आहे. अशाच एका खासगी कामासाठी गेलेल्या एका कार्यकर्त्याला अधिकाऱ्यांकडून अपमानजनक वागणूक मिळाली. मात्र, या विषयी भारतीय जनता पक्षाचे महसूल मंत्री चंद्रकात बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली असताना त्यांनी तातडीने दखल घेत या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही अंकुश बसू शकतो या जाणीवेमुळे एक चांगली चपराक बसली आहे. रॉयल ग्रुपचे संचालक आणि भारतीय जनता पक्षाचे सभासद प्रफुल कोठारी हे आपल्या एका खासगी कामासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण लोकसेवक आहोत याची जाणीव न राहिल्याने कदम यांनी कोठारी यांना अपमानास्पद वागणूक दिली. अशा कामांसाठी सारखे सारखे पन्नास वेळा येऊ नका, इथं परत यायचं नाही, असे त्यांना कटू शब्दांत सुनावले. अधिकाऱ्यांनी अशी पद्धतीने चारचौघांत अवमानित केल्याने कोठारी यांना खूप वाईट वाटले. या घडलेल्या प्रकारांची दखल कोण घेणार असा प्रश्न त्यांना वाटू लागला. म्हणून त्यांनी महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांना एक मेसेज पाठवला आणि घडलेला प्रकार तक्रारीच्या स्वरुपात त्यांना कळवला. विशेष म्हणजे जागरुक असलेल्या बावनकुळे यांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेतली आणि संबंधित प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी अद्याप कारवाई झालेली नसली तरीदेखील कार्यकर्त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाते हा दिलासा मोठा असल्याचे कोठारी यांनी सांगितले. या विषयी ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांप्रति इतकी संवेदनशीलता खरोखरीच कौतुकास्पद आहे. या प्रकरणाविषयी मी फक्त एक मेसेज केलेला होता. परंतु त्याची तत्काळ दखल घेतली गेली आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याविषयी त्यांनी आदेश दिले. माझ्या सारख्या कार्यकर्त्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे सामान्य जनतेला कशीही वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांनीही यातून धडा घेऊन आपण लोकांना प्रतिसाद द्यायला हवा हे शिकले पाहिजे.

ज्येष्ठ सॅक्सोफोन वादक इक्बाल दरबार यांचे निधन

0
Newsworldmarathi Pune: ऑर्केस्ट्रा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे, ज्येष्ठ सॅक्सोफोन वादक आणि ‘दरबार बँड’ चे संस्थापक-संचालक इक्बाल दरबार (वय ७७) यांचे शनिवारी (२८ ऑक्टोबर) निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. महाराष्ट्रात ऑर्केस्ट्रा संकल्पनेला रुजवणाऱ्या मोजक्या कलावंतांमध्ये इक्बाल दरबार यांचा उल्लेख अत्यंत आदराने केला जातो. त्यांच्या वादनाचे चाहतावर्ग केवळ पुणे-मुंबईपर्यंतच मर्यादित नव्हते, तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही त्यांच्या वादनाने मंत्रमुग्ध झाले होते. एक प्रसंग आठवतो, जेव्हा पुणे महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा सन्मान करण्यात आला होता, त्या वेळी ‘मधुबन में राधिका नाचे रे’ हे गीत दरबार यांनी सॅक्सोफोनवर सादर केले. त्यांच्या या सादरीकरणाने दिलीप कुमार इतके प्रभावित झाले की, त्यांनी उभे राहून त्यांना दाद दिली आणि ‘वन्स मोअर’ची मागणी केली. दरबार यांचे कार्य संगीताच्या क्षेत्रापर्यंतच सीमित नव्हते. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सेवाभाव ही त्यांच्या कार्यशैलीची विशेष वैशिष्ट्ये होती. दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात त्यांच्या ‘दरबार बँड’द्वारे सादर केलेल्या आरतीनेच होत असे. त्यांनी सीमेवर जाऊन आपल्या वादनाने भारतीय जवानांची मने जिंकली आणि त्या कार्यक्रमातून मिळालेला निधी सैनिकांना कृतज्ञता म्हणून दिला. त्याचप्रमाणे, भोई फाउंडेशनच्या पुण्याजागर उपक्रमासाठीही त्यांनी कृतज्ञता निधी दिला. ‘मोहम्मद रफी आर्ट फाउंडेशन’च्या माध्यमातून गरजू कलाकारांना वैद्यकीय व आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी ते सतत कार्यरत होते. तसेच, भोई प्रतिष्ठानमध्ये ते समन्वयक म्हणून देखील कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे कला आणि संगीत क्षेत्रात एक मोठा शोक आहे.

भगवान जगन्नाथ रथयात्रेला गालबोट; ६०० भाविक जखमी

Newsworldmarathi Team: आषाढ शुद्ध द्वितीयेला पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रा असते. २७ जून २०२५ रोजी सकाळी रथयात्रा सुरू झाली. परंतु, या रथयात्रेला गालबोट लागले आहे. प्रचंड जनसमुदारामुळे येथील व्यवस्था फोल ठरली. प्रचंड गर्दीमुळे तब्बल ६०० जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेनंतर रथयात्रा थांबवण्यात आली असून, शनिवारी पुन्हा रथ ओढण्याचे काम सुरू होईल, असे म्हटले जात आहे. मिळालेल्या महितीनुसार, महाप्रभु जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथयात्रा उत्सवादरम्यान प्रचंड गर्दी झाल्यामुळे जखमी झाले. आरोग्याच्या समस्यांमुळे ६०० हून अधिक भाविकांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्रातील तीन तरुणांचा अमेरिकेत डंका; दोन वर्षांत 5 रेस्टॉरंट!

0
Newsworldmarathi Pune : कोरोना महामारीमुळे हाॅटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊन देखील संधी मिळताच आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील साहिल बढे व शिर्डीचा निरज फापाळे यांनी 2023 मध्ये अमेरिकेत ऑस्टीन येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी मिळवली. या हाॅटेलमध्ये एक वर्ष नोकरी केल्यानंतर ऑक्टोबरमध्ये खाजगी इंडियन रेस्टॉरंटमध्ये नोकरी करत असताना अमेरिकेत इंडियन रेस्टॉरंटमध्ये प्रचंड बिझनेस ग्रोथ व मोठी संधी असल्याचे साहिल व निरज यांच्या लक्षात आले.
Oplus_0
याच कालावधीत ठाण्याचे शेखर रिकामे यांची साहिल व निरज यांना साथ मिळाली. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील या तीन तरुणांनी एक नाही तर तब्बल पाच रेस्टॉरंट सुरू केले आहेत. साहिल बढे यांने पुण्यात एसएसपीएमएस काॅलेजमध्ये हाॅटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. शिक्षण सुरू असतानाच कोरोना महामारी आली व दोन वर्षे शिक्षणाला ब्रेक लागला. लाॅक डाऊनमुळे परदेशात इंटर्नशिपसाठी आलेली संधी व व्हीसा रद्द करावा लागला. परंतु 2023 मध्ये परिस्थिती सुधारल्यावर थेट नोकरीसाठी अमेरिकेतील ऑस्टीन शहरातील एक पंचतारांकित हाॅटेल मध्ये संधी मिळाली. येथेच साहिलीची ओळख शिर्डीचा निरज यांच्या सोबत ओळख झाली. या पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत असतानाच या दोन मित्रांनी अमेरिकन एक वाहन खरेदी करून नोकरी वरून सुटल्यानंतर कुरिअर, हाॅटेल पार्सल पुरविण्याचे काम देखील केले. या कामामुळे लवकर संपूर्ण ऑस्टीन शहर व लगतच्या परिसराचा चांगला परिचय व अभ्यास देखील झाला.
Oplus_0
एक वर्षांच्या जे- वान (J-1) व्हीसवर काम केल्यानंतर ऑस्टीन येथील एका खासगी इंडियन रेस्टॉरंटमध्ये साहिल व निरज ने नोकरी पत्करली. व्हीसचा विषय अंत्यत सफाई पणे हातळला. याच कालावधीत साहिल व निरज यांची शेखर रिकामे यांच्याशी ओळख झाली व ऑस्टीनमध्ये पार्टनरशिप मध्ये इंडियन रेस्टॉरंट सुरू करण्याची ऑफर दिली. साहिल व निरज यांची कष्ट करण्याची तयारी होती व शेखर रिकामे यांनी विश्वास दाखविल्यावर त्वरित पार्टनरशिपमध्ये हाॅटेल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पंचतारांकित हॉटेलचा एक वर्षांचा ऑस्टीन शहरातील अनुभव व कुरिअर सेवेमुळे झालेला शहराचा परिचय व खडानखडा माहिती नवीन हाॅटेल सुरू करताना खूप उपयोगी ठरले. शेखर रिकामे यांच्या सोबत साहिल व निरज यांनी ऑस्टीन शहरामध्ये पहिले . …” टीका हाऊस” नावाने पहिले रेस्टॉरंट सुरू केले. पहिल्या दोन तीन महिन्यांतच टीका हाऊस इंडियन रेस्टॉरंट ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अतिवृत्कष्ट जेवण, फास्ट सर्विस मुळे लगतच्या शहरांमध्ये टीका हाऊस ची चर्चा सुरू झाली व मागणी देखील वाढली. याच संधीचा फायदा घेत व शेखर रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली साहिल व निरज यांनी दोनच वर्षांत टिक्का हाऊस ऑस्टिन डाउनटाउन , टिक्का हाऊस कॉलेज स्टेशन , टिक्का हाऊस वाको , टिक्का हाऊस एक्सप्रेसवे, टिक्का हाऊस लेकवे रेस्टॉरंट सुरू करण्यात यशस्वी झाले. महाराष्ट्रातील या तीन तरुणांनी परदेशात जाऊन भारतातील व स्थानिक तब्बल 60_70 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.