डॉ. राजेश शहा यांची गुजरात सरकारच्या विशेष समितीवर निवड
Newaworldmarathi Pune : देशभर तसेच गुजरात राज्याबाहेर वास्तव्यास असलेल्या गुजराती समाजाला एकत्र आणण्यासाठी गुजरात सरकारने विशेष समितीची स्थापना केली असून, या समितीवर सामाजिक कार्यात सक्रिय असलेले डॉ. राजेश शहा यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ. राजेश शहा यांच्या निवडीचे अधिकृत आदेश गुजरात सरकारच्या वतीने जिल्हाधिकारी विनेश सिंह यांनी पाठवले आहेत. ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी असून, या कालावधीत देशभरातील गुजराती समाजाचे संघटन, विविध संस्थांशी समन्वय आणि समाजहिताचे उपक्रम राबविण्याची जबाबदारी समितीवर राहणार आहे.
गुजराती समाजाच्या संघटनासाठी आणि त्यांच्या क्षमतेचा देशाच्या विकासासाठी उपयोग करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या समितीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी समितीच्या माध्यमातून गुजरातबाहेरील गुजराती समाजाशी थेट संपर्क साधून त्यांना सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक कार्यासाठी एकत्र आणण्यावर भर दिला जाणार आहे.
गुजराती समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षमतेचा उपयोग राष्ट्रीय प्रगतीसाठी व्हावा, या उद्देशाने ही समिती कार्य करणार आहे. विविध राज्यांत कार्यरत असलेल्या गुजराती संस्था, उद्योजक, युवक आणि व्यावसायिक यांना एकत्र आणून देशाच्या उत्कर्षात योगदान देणे, हे या समितीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. डॉ. शहा यांच्या अनुभवामुळे समितीच्या कामकाजाला अधिक प्रभावी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
आतापर्यंत डॉ.राजेश शहा यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे , त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन नुकतेच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी (पी.एचडी) देऊन सन्मानित केले आहे तसेच प्रतिष्ठित अशा फेअर बिझनेस प्रॅक्टीसेस करीता देण्यात येणाऱ्या जमनालाल बजाज पुरस्काराने तीन वेळा सम्मानित करण्यात आले आहे. याशिवाय समाजरत्न, आदर्श व्यापारी त्याचबरोबर जीवनगौरव पुरस्कार, व्यापार भूषण, राष्ट्रिय ऐकता पुरस्कार, कर्मवीर पुरस्कार, बेस्ट बिसनेसमॅन पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे.
पुण्यातील सुप्रसिध्द उपक्रम लाडू-चिवडा चे ते जनक असून या उपक्रमासह डॉ.राजेश शहा यांचे गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदले आहे.डॉ.राजेश शहा हे दि पूना गुजराती केळवणी मंडळ व या नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचे चेअरमेन आहेत. तसेच ते एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल चे अध्यक्ष असून श्री पूना गुजराती बंधु समाज या ११० वर्षे पासून कार्यरत संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. पुना मर्चंट चेंबरचे सुवर्ण महोत्सवी वर्षाततील अध्यक्ष, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे महासचिव या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिशयन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) चे गेल्या २५ वर्षांपासून वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत. त्याचबरोबर जनसेवा फाऊंडेशन चे खजिनदार म्हणून ही ते कार्यरत आहेत. याशिवाय अनेक संस्थांच्या विविध पदांवर डॉ.राजेश शहा कार्यरत आहेत.
ज्ञानमंदिर कळंबोली शाळेने पटकवले ‘मएसो क्रीडा करंडक २०२६’चे विजेतेपद
नवामहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) क्रीडावर्धिनी आणि कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मएसो क्रीडा करंडक २०२६’ या राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मएसो ज्ञानमंदिर कळंबोली या शाळेने पटकवले. यासह ही फिरता करंडकाचीही मानकरी ठरली. या स्पर्धेचे हे १४ वे वर्ष होते.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही तीन दिवसीय निवासी क्रीडा स्पर्धा बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, मयूर कॉलनी कोथरूड येथे पार पडली. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी झाले. प्रसंगी ‘मएसो’चे उपाध्यक्ष प्रदीप नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, क्रीडावर्धिनी व शाला समितीचे अध्यक्ष विजय भालेराव, ‘मएसो’चे सचिव अतुल कुलकर्णी, सहसचिव सुधीर भोसले, शाला समिती महामात्र डाॅ. नेहा देशपांडे, मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी, मंजुषा दुर्वे, सायली देशमुख यांच्यासह संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते.
तेजल हसबनीस म्हणाल्या, “विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या असतात. त्यांच्यात संघभावना, शिस्त, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती विकसित होते. चांगला माणूस होण्यासाठी खेळांतून प्रोत्साहन मिळते.”
प्रदीप नाईक यांनी अध्यक्षीय मनोगतात सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भविष्यात तुमच्यातील काही विद्यार्थी ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील वर्षीचा ‘मएसो क्रीडा करंडक’ पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके महाविद्यालय येथे आयोजिला जाणार असल्याचे विजय भालेराव यांनी घोषित केले.
बाबासाहेब शिंदे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. डाॅ. वैशाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मंजुषा दुर्वे यांनी आभार मानले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या सर्व शिक्षिका, क्रीडाशिक्षक यांनी क्रीडास्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
——————————–
या शाळा ठरल्या विजेत्या
यामध्ये मुले व मुली या गटांत सूर्यनमस्कार, लंगडी, डॉजबॉल आणि गोल खो-खो या सांघिक मैदानी स्पर्धा झाल्या. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सांघिक व वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. सूर्यनमस्कार स्पर्धेत मुलांमध्ये ज्ञानमंदिर कळंबोली, पब्लिक स्कुल कळंबोली, दामोदर शंकर रेणावीकर विद्यामंदिर अहिल्यानगर, तर मुलींमध्ये ज्ञानमंदिर कळंबोली, पब्लिक स्कुल कळंबोली, बालविकास मंदिर सासवड, लंगडी स्पर्धेत मुलांमध्ये निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, इंग्लिश मिडीयम स्कुल शिरवळ, ह. ग. देशपांडे बारामती, तर मुलींमध्ये इंग्लिश मिडीयम स्कुल शिरवळ, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, विद्यामंदिर बेलापूर, डॉजबॉल स्पर्धेत मुलांमध्ये विद्यामंदिर बेलापूर, ज्ञानमंदिर कळंबोली, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, तर मुलींमध्ये बालविकास मंदिर सासवड, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, इंग्लिश मिडीयम स्कुल शिरवळ, गोल खोखो स्पर्धेत मुलांमध्ये निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, ज्ञानमंदिर कळंबोली, इंग्लिश मिडीयम स्कुल शिरवळ, तर मुलींमध्ये ज्ञानमंदिर कळंबोली, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, बालविकास मंदिर सासवड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला.
अंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो : डॉ राजेश शहा
Newaworldmarathi Pune: द पुना गुजराती केळवणी मंडळाच्या हरिभाई व्ही देसाई महाविद्यालयातील देसाई करंडक स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविणाऱ्या डी वाय पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आणि पी व्ही जी महाविद्यालयाच्या विशेष प्राविण्याबद्दल समारोप प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व संस्थेचे चेअरमन डॉ राजेश शहा यांनी ‘आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक वाव मिळतो आणि त्यांच्यातील कल्पक शक्ती वाढीस लागते’ असे प्रतिपादन केले.
द पूना गुजराती केळवणी मंडळाच्या हरिभाई व्ही. देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात देसाई करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक व बिगरतांत्रिक अशा एकूण १३ विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
पी. व्ही. जी. महाविद्यालय, डी. वाय. पाटील महाविद्यालय, इंदिरा महाविद्यालय, सरहद महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, पूना कॉलेज, हुजूरपागा यांसह पुण्यातील ६२ महाविद्यालयांतील सुमारे १००० विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी या तीन दिवसीय कार्यक्रमाची सांगता पारितोषिक वितरण समारंभाने झाली. द पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेशभाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी तीन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन देसाई करंडक स्पर्धांचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडला. पुणे ग्रँड टूर या सायकल मॅरेथॉन च्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात विक्रमी संख्येने येऊन सहभाग घेणाऱ्या तरुणांचे व त्यांच्या लढवय्या वृत्तीचे प्राचार्यांनी विशेष कौतुक केले. डॉ. राजेशभाई शहा यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक करताना स्वतःचे अनुभव कथन केले तसेच स्पर्धेतील विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यंदाच्या वर्षी डी. वाय. पाटील महाविद्यालय, पिंपरी हे देसाई करंडकाचे मानकरी ठरले, तर पी. व्ही. जी. महाविद्यालयाला सर्वाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविल्याबद्दल विशेष करंडक प्रदान करण्यात आला.
या पारितोषिक वितरण समारंभास द पूना गुजराती केळवणी मंडळाचे सचिव श हेमंत मणियार, सहसचिव दिलीप जगड व विनोद डेडिया हे मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी संयोजन मोनिका धोत्रे व रुता वैद्य यांनी केले.
साने गुरुजी प्राथमिक शाळेत तिळगूळ समारंभ उत्साहात साजरा!
Newaworldmarathi Pune: राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचे साने गुरुजी बालक मंदिर व प्राथमिक शाळेमार्फत आयोजित तिळगूळ समारंभ उत्साहात साजरा झाला.मा शिक्षणाधिकारी मा.अनिल गु़ंजाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी अनमोल विचार मांडत त्यांनी उपस्थित पालकांना जबाबदार पालकत्वाची विनोदी शैलीत जाणिव करुन दिली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव शिवाजी खांडेकर उपस्थित होते. त्यांनी व्यक्तिगत आयुष्यातील काही उदाहरणे देत समजदार व जागरूक पालक कोणाला म्हणता येईल याबाबत विचार मांडले.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका मीना काटे, सेवाज्येष्ठ शिक्षक सोपान बंदावणे, व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सुषमा शिंगाडे,शिक्षणप्रेमी अविनाश खंडारे उपस्थित होते. यावेळी सर्व पालकांना मुख्याध्यापिका मीना काटे यांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू तसेच शिक्षणप्रेमी अविनाश खंडारे यांनी दरवर्षीप्रमाणे तिळगूळ वड्या दिल्या.यावेळी स्त्री व पुरूष पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय ससे, विठ्ठल शेवते, शितल खेडकर, लक्ष्मी कांबळे , मोनिका पोटे, शितल रुपनूर, निशा नाईकनवरे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मीना काटे यांनी केले. सूत्रसंचालन संगिता गोवळकर यांनी तर आभार सोपान बंदावणे यांनी मानले.
मंडई उजळली; नव्या विद्युत दिव्यांची सोय बाप्पु मानकर यांच्याकडून तीन दिवसात नव्या प्रकाश व्यवस्थेची सोय
Newsworldmarathi Pune: पुण्याच्या मध्यवस्तीतील मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा फुले मंडईत अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे झालेली अडचण अवघ्या तीन दिवसात दूर करण्यात आली आहे. नवनिर्वाचित नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी येथील पाहणी केल्यानंतर, आता नवे विद्युत दिवे बसवण्यात आले असून, पुरेसा प्रकाश उपलब्ध झाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
१३५ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली महात्मा फुले मंडई पुण्याची मुख्य बाजारपेठेपैकी एक आहे. तीन दिवसांपूर्वी येथे समस्या जाणून घेण्यासाठी राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नुकतीच भेट दिली होती. त्यावेळी व्यापाऱ्यांनी प्रकाश व्यवस्थेची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली. येथील विद्युत दिव्यांची क्षमता कमी झाल्याने, तसेच अनेक दिवे नादुरुस्त झाल्याने व्यापारी व नागरिकांना सायंकाळच्या वेळी अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यावर उपाय म्हणून तातडीने हे दिवे बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम तीन दिवसांत पूर्ण करण्यात आल्यानंतर आज मंडई येथे बाप्पु मानकर यांनी भेट दिली.
‘व्यापाऱ्यांना नागरिकांना भेडसावणारी ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने काम हाती घेतले. येथील अनेक दिव्यांची क्षमता कमी झाल्याने नवे ५० दिवे बसवण्यात आले आहेत. आता पुरेशी प्रकाश व्यवस्था झाली आहे. तातडीची गरज म्हणून हे काम करण्यात आले आहे. लवकरच संपूर्ण मंडई परिसरातील विद्युत दिव्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. स्थानिकांसोबतच संपूर्ण शहरातून नागरिक येथे खरेदीसाठी येतात. त्यामुळे मंडईतील इतर समस्यांबाबतही नेहमी कटिबद्ध राहणार असल्याचे, प्रभाग २५ चे नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर सांगितले.
यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले की, ‘मंडईतील जुने झालेले विद्युत दिवे आणि अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे व्यापारी तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता. बाप्पु मानकर यांना ही बाब निदर्शनास आणून देताच, त्यांनी त्वरित हे काम सुरू केले. वेगाने हे काम पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आम्ही समाधानी आहोत.’ यावेळी उपस्थित व्यापारी व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी बाप्पु मानकर यांचे आभार मानले.
१३५ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली महात्मा फुले मंडई पुण्याची मुख्य बाजारपेठेपैकी एक आहे. तीन दिवसांपूर्वी येथे समस्या जाणून घेण्यासाठी राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नुकतीच भेट दिली होती. त्यावेळी व्यापाऱ्यांनी प्रकाश व्यवस्थेची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली. येथील विद्युत दिव्यांची क्षमता कमी झाल्याने, तसेच अनेक दिवे नादुरुस्त झाल्याने व्यापारी व नागरिकांना सायंकाळच्या वेळी अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यावर उपाय म्हणून तातडीने हे दिवे बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम तीन दिवसांत पूर्ण करण्यात आल्यानंतर आज मंडई येथे बाप्पु मानकर यांनी भेट दिली.
‘व्यापाऱ्यांना नागरिकांना भेडसावणारी ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने काम हाती घेतले. येथील अनेक दिव्यांची क्षमता कमी झाल्याने नवे ५० दिवे बसवण्यात आले आहेत. आता पुरेशी प्रकाश व्यवस्था झाली आहे. तातडीची गरज म्हणून हे काम करण्यात आले आहे. लवकरच संपूर्ण मंडई परिसरातील विद्युत दिव्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. स्थानिकांसोबतच संपूर्ण शहरातून नागरिक येथे खरेदीसाठी येतात. त्यामुळे मंडईतील इतर समस्यांबाबतही नेहमी कटिबद्ध राहणार असल्याचे, प्रभाग २५ चे नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर सांगितले.
यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले की, ‘मंडईतील जुने झालेले विद्युत दिवे आणि अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे व्यापारी तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता. बाप्पु मानकर यांना ही बाब निदर्शनास आणून देताच, त्यांनी त्वरित हे काम सुरू केले. वेगाने हे काम पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आम्ही समाधानी आहोत.’ यावेळी उपस्थित व्यापारी व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी बाप्पु मानकर यांचे आभार मानले.
फळांचा राजा पुण्याच्या बाजारात दाखल! एका पेटीची किंमत तब्बल १५ हजार
पुणे : पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) मध्ये आंब्याची यंदाची पहिली आवक दाखल झाली आहे. रत्नागिरीतील जलाल काझी जैतापूर येथून आणलेल्या हापूस आणि केशर आंब्याच्या चार पेट्यांनी बाजारात हजेरी लावली. यातील दोन पेट्या हापूस आणि दोन पेट्या केशर आंब्याच्या होत्या. मे. सुधीर बबनराव मनसुख यांच्या गाळ्यावर ही पहिली आवक झाली आणि यंदाच्या सर्वाधिक उच्चांकी भावात पहिली पेटी १५ हजार रुपयांना विकली गेली. ही पेटी युवराज काची यांनी खरेदी केली. एका पेटीत ३ डझन आंबे असून, हा भाव मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला आहे.
ऑक्टोबरच्या अखेरीस आलेला मोहर जपून ठेवल्यामुळे आंबे लवकर काढता आले. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, यंदाचा आंबा सीझन फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरळीत सुरू होईल आणि १५ मार्चपासून आवक पूर्ण गतीने वाढेल. सध्या मार्केट यार्डमध्ये आंब्याची सुरुवातीची आवक दाखल होत असून, व्यापारी आणि फळविक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याच्या या पहिल्या आवकेने पुण्यातील बाजारपेठेत नववर्षाची सुरुवातच उत्साही झाली आहे. हापूस आणि केशर या दोन्ही जातींना चांगला भाव मिळाल्याने यंदाच्या हंगामाबाबत व्यापाऱ्यांमध्ये आशावाद आहे. मार्केट यार्डमधील व्यापारी आता मोठ्या प्रमाणात आवकेची प्रतीक्षा करत आहेत.
पुण्याच्या महापौरपदासाठी अर्चना पाटील यांचे नाव चर्चेत; अनुभव, चाणक्य नीती आणि जनसेवेची भक्कम पार्श्वभूमी
Newaworldmarathi Pune : पुणे महानगरपालिकेत ११९ जागांसह निर्विवाद बहुमत मिळवलेल्या भारतीय जनता पार्टीकडून महापौरपदासाठी कोणाची निवड होणार, याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. अनुभवी नेत्याला संधी दिली जाणार की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘धक्कातंत्र’ वापरत नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच पुण्याच्या महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, यंदाचे महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे. त्यामुळे उच्चशिक्षित, अनुभवी आणि जनतेशी थेट नाते असलेल्या नगरसेविका अर्चना पाटील यांचे नाव महापौरपदासाठी अग्रक्रमाने चर्चेत आले आहे.
पुणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी महानगरपालिका असल्याने, मुंबईनंतर पुण्याचा महापौर कोण होणार याला विशेष राजकीय महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर अर्चना पाटील यांची कामगिरी आणि अनुभव लक्षवेधी ठरत आहे. एमबीए फायनान्ससारखे उच्च शिक्षण घेतलेल्या अर्चना पाटील यांनी २०१७ साली भवानी पेठेत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी करत माजी मंत्री रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे यांचा पराभव केला होता. चाणक्य नीती, अचूक रणनीती आणि लोकसंपर्काच्या बळावर मिळवलेला हा विजय भाजपसाठी ऐतिहासिक ठरला होता.
२०२६ च्या निवडणुकीतही त्यांनी सुनियोजित कामकाज, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि विकासकामांची ठोस पोचपावती मिळवत दणदणीत विजयाची पुनरावृत्ती केली.
प्रभाग क्रमांक २२ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र अर्चना पाटील यांनी सातत्यपूर्ण जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांची सोडवणूक आणि विकासकामांच्या जोरावर हा बालेकिल्ला भेदत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित केले. सलग दुसऱ्यांदा निवडून येत त्यांनी आपली लोकप्रियता आणि नेतृत्वगुण ठामपणे सिद्ध केले आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे भवानी पेठेतील काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला असून, त्या परिसरातून भाजपचे दोन नवखे उमेदवार मृणाल कांबळे आणि विवेक यादव विजयी करण्यातही अर्चना पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
नगरसेविका म्हणून अर्चना पाटील यांनी झोपडपट्टी भागात विशेष लक्ष केंद्रित करत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी प्रभावी काम केले आहे. कॅन्टोन्मेंट क्षेत्रात सत्ता असूनही कोणतेही लाभाचे पद न मिळाल्याची तक्रार न करता त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला.
अर्चना तुषार पाटील यांनी केवळ आपल्या प्रभागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण पुणे शहरात आपली संघटनात्मक क्षमता सिद्ध केली आहे. भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा म्हणून त्यांनी पक्षबांधणी, महिला संघटन आणि जनसंपर्क या माध्यमातून प्रभावी कामगिरी केली आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य म्हणून काम करताना त्यांना प्रशासकीय कार्यपद्धती, आर्थिक नियोजन आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण अनुभव मिळाला आहे.
भविष्यात कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक किंवा विलीनीकरण झाल्यास, अर्चना पाटील महापौर झाल्या तर पुण्याला सक्षम, दूरदृष्टीचे आणि विकासाभिमुख नेतृत्व मिळेल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या अर्चना पाटील यांना महापौरपदाची संधी द्यावी, अशी जोरदार मागणी जनतेतून होत असून, याचा भाजपलाही राजकीयदृष्ट्या निश्चितच लाभ होईल, असा सूर राजकीय वर्तुळात उमटत आहे.
सस्पेन्स संपला! पुणे महापालिकेत महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी…
Newaworldmarathi Pune: पुणे महानगर पालिका ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी महानगर पालिका आहे. मुंबईनंतर पुण्याचा महापौर कोण होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र आता अखेर महापौर पदाचा सस्पेन्स संपला आहे. पुण्याच्या महापौर पदाचं आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलं आहे. यंदाचं हे पद खुला महिला प्रवर्गासाठी सोडण्यात आलं आहे.
१६५ सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत भाजपनं तब्बल १२० जागा जिंकल्या आहेत. पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतरच पुण्यात कोणत्या पक्षाचा महापौर होणार हे निश्चित झालं होतं. पण आता अखेर आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.
पुणे महापालिकेत भाजपची शतकी खेळी पुणे महानगरपालिकेत भाजपने विरोधकांचा अक्षरशः सुपडा साफ केला आहे. एकूण १६५ जागांपैकी भाजपने स्वबळावर १२० जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या ‘पुणे व्हिजन’ला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसला २७ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेस १५ जागांपर्यंत पोहोचू शकली. शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शप) यांसारख्या पक्षांचे अस्तित्व या निकालात अत्यंत नगण्य राहिले.
श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पहाटेपासूनच गर्दी
Newsworldmarathi Pune: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच आज बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. विनायक अवतार असलेला हा गणेशजन्म सोहळा यंदा देखील सुवर्णपाळण्यामध्ये दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर, नगरप्रदक्षिणा असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.
संपूर्ण मंदिराला आकर्षक पुष्पसजावट व विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. आज पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाले याशिवाय गणेशसुक्त अभिषेक देखील मंदिरात सुरु असणार आहे तसेच सकाळी ६ ते १० आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ५ यावेळेत गणेश याग होणार आहे
मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. यावेळी गणेशाची मंगल आरती होईल. नगरप्रदक्षिणा मिरवणूक सायंकाळी ६ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता श्रीगणेशाची मंगलआरती होईल.
रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे. गणेशजन्माच्या दिवशी पहाटे ३ वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे. तरी भाविकांनी विविध कार्यक्रमांत सहभागी होत दर्शनाचा लाभ घ्यावा, असे ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे.
ऐतिहासिक महात्मा फुले मंडईतील समस्यांचे निराकरण प्राधान्याने करणार : राघवेंद्र बाप्पू मानकर
Newsworldmarathi Pune: १३५ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली महात्मा फुले मंडई पुण्याचा मानबिंदू आहे. येथील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विद्युत दिवे आणि स्वच्छतेच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यात येतील. येथील विद्युत दिव्यांच्या समस्या येत्या दोन दिवसात सोडविली जाईल, असे आश्वासन प्रभाग २५ चे नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी दिले. महात्मा फुले मंडई येथील व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या आढावा दौऱ्यात ते बोलत होते.
यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले की, मंडईतील जुने झालेले विद्युत दिवे आणि अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे व्यापारी तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच स्वच्छतेच्या समस्येबाबतही व्यापाऱ्यांनी गारऱ्हाणे मांडले.
यावर बोलताना मा. राघवेंद्र बाप्पू मानकर म्हणाले की, “व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रकाशव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तातडीने हे दिवे बदलण्याचे काम येतोय दोन दिवसात पूर्ण केले जाईल. तसेच मंडईच्या स्वच्छतेसाठी प्रशासनासोबत यंत्रणा कार्यरत करून कचरा साठणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे बाप्पू मानकर यांनी सांगितले.

