जैन सोशल ग्रुपच्या वतीने “उत्तुंग भरारी” सन्मान सोहळा

0
Newsworldmarathi Pune: समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान म्हणजे समाजाला मिळणारी प्रेरणा. जैन सोशल ग्रुप पुणे पश्चिम यांच्या वतीने आयोजित “उत्तुंग भरारी सन्मान सोहळा” नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात आनंद भंडारी (जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालक भुमी), शेखर मुंदडा (अध्यक्ष, महाराष्ट्र गो सेवा आयोग), विजय बाविस्कर (ग्रुप एडिटर, लोकमत महाराष्ट्र-गोवा), अभिजीत डुंगरवाल (एडिटर, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क व महाराष्ट्र जैन वार्ता), संदीप गादिया (सायबर क्राईम इन्वेस्टिगेशन एक्सपर्ट), प्रकाश धोका (उद्योगपती व समाजसेवक) आणि नंदिनी वाग्यांनी (सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे शहर) यांचा गौरव करण्यात आला.
Oplus_131072
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय भंडारी (अध्यक्ष, जीतो अपेक्स) होते. प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती,कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांची विशेष उपस्थिती होती. २५ एप्रिल २०२५ रोजी, शुक्रवार, संध्याकाळी ६.३० वाजता, शराव लॉन्स, तुळजा भवानी मंदिर समोर, एम.आय.टी. कॉलेज रोड, कोथरूड, पुणे येथे हा भव्य सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे संयोजन रामलाल शिंगवी (संस्थापक अध्यक्ष, जैन सोशल ग्रुप पुणे पश्चिम) आणि प्रकाश भंडारी (अध्यक्ष) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पंचवटकर यांनी केले, तर अनिल लुंकड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मंचावर दिलीप मेहता, डॉ. सुमतीलाल लोढा, सचिन लोढा, प्रदीप गांधी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
“समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा व्यक्तींनी केलेल्या अथक परिश्रमांना व त्यांच्या सेवेला आदराने मान्यता देणं ही आपल्या संस्कृतीची परंपरा आहे. ‘उत्तुंग भरारी’ सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही या मान्यवरांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्याचा प्रयत्न केला आहे.”
– विजय भंडारी अध्यक्ष, जीतो अपेक्स
“समाजासाठी काहीतरी सकारात्मक करणे हीच खरी उन्नती आहे. आजच्या या सन्मान सोहळ्यात सहभागी होताना विशेष आनंद वाटतो आहे. अशा कार्यक्रमांमुळे प्रेरणा मिळते आणि नव्या पिढीसमोर आदर्श व्यक्तिमत्त्वे उभी राहतात. समाज उन्नतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.”
– कृष्णकुमार गोयल, उद्योगपती,कोहिनूर ग्रुपचे प्रमुख

नवी मुंबई हादरली…! ‘या’ प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या

Newsworldmarathi Mumbai :नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिकाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गुरुनाथ चिंचकर असं बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. चिंचकर यांनी ९ एमएमच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. चिंचकर यांची दोन्ही मुले अमली पदार्थ तस्करीत सहभागी होती. यामुळे चिंचकर यांना पोलिसांकडून सतत चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. चिंचकर यांना हा त्रास सहन झाला नाही आणि त्यामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चिंचकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली असून, त्यात त्यांनी याबाबत स्पष्ट उल्लेख केला आहे.
Oplus_131072
गुरुनाथ चिंचकर हे एनआरआय पोलीस स्टेशनच्या पाठीमागील गुरुकिरण सोससायटीत राहण्यास होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तळमजल्यावर आले होते. त्यानंतर त्यांनी कार्यालयात स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. काय आहे संपूर्ण प्रकरण? काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईत मोठं ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलं होतं. मुंबईच्या अमली पदार्थ पथकाकडून नवी मुंबईत मोठी कारवाई करत 200 कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणात मयत गुरू चिचकरच्या दोन्ही मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका मुलाला अटक केली होती, तर दुसरा मुलगा फरार झाला होता. अटकेतील मुलगा सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. याच ड्रग्ज प्रकरणात गुरू चिचकर यांना NRI पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. याच चौकशीच्या विवंचनेतून चिचकर यांनी आत्महत्या केल्याचे समजत आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत.

साखर झोपेतच बिबट्याचा वृद्धेवर हल्ला; इनामगावात घराबाहेर झोपलेल्या वृद्धेचा अंत

Newsworldmarathi Shirur : शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील कौल वस्तीत घराच्या पढवीत झोपलेल्या वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला चढवित शिकार समजून ७०० फूट फरफटत नेले. यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. उन्ह्यळ्यात घराबाहेर झोपलेल्या वृद्धेचा साखर झोपेतच दुर्देवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लक्ष्मीबाई बबन भोईटे (वय ८२), असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवार (दि.२५) पहाटे साडेचारच्या दरम्यान घडली. इनामगाव येथे पहाटेच्या सुमारास सुरुवातीला बिबट्याने घरासमोर असलेल्या कुत्र्यावर झडप घातली. मात्र, सावध असलेला कुत्रा हा बिबट्याच्या हल्ल्यातून निसटून पळून गेला. बिबट्याचे लक्ष लक्ष्मीबाई भोईटे यांच्याकडे गेले. त्याने त्यांना घराच्या मागील डांबरी रस्त्यापलीकडील ७०० फूट अंतरावर उसाच्या शेतात ओढून नेले. घराच्या पढवीत झोपलेल्या लक्ष्मीबाई या दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. सकाळी ही माहिती ग्रामस्थ विक्रमसिंग नलगे यांनी वनविभागाला दिली. शिरूरचे वनपाल व पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभाग ॲक्शन मोडवर वनविभागाच्या पथकाने पंचनामा करून मृतदेह न्हावरे येथे ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवले. घटनेनंतर वन अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थ व सरपंच-उपसरपंचांसमवेत चर्चा केली. दरम्यान, हल्ला करणाऱ्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने ड्रोन, ९ ट्रॅप कॅमेरे, ५ पिंजरे, ४ अनायडर आणि २ फिरते कॅमेरे बसवले आहेत. परिसरात रात्रीची गस्त वाढवली आहे

‌‘सरहद शौर्याथॉन‌’मधून शांती, एकात्मता, सद्भावनेचा संदेश : अजित पवार

0
Newsworldmarathi Pune: कारगील युद्धात भारतीय सेनेने दाखविलेले धैर्य, साहस आणि बलिदान याच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेली आंतरराष्ट्रीय ‌‘सरहद शौर्याथॉन‌’ ही फक्त क्रीडा स्पर्धा नसून भारतातील सर्व धर्मीयांना व संस्कृतींना एकत्र आणण्याचा मोलाचा उपक्रम करीत आहे. या स्पर्धेद्वारे शांती, एकात्मकता आणि सद्भावनेचा संदेश दिला जात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. झोजी ला युद्ध विजय अमृत महोत्सव आणि कारगील युद्ध विजय रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने 13 जे. के. रायफल्स आर्मी युनिट, द्रास टाऊन, कारगिल डिस्ट्रिक, लडाख यु. टी. यांचे युनिट, सरहद, पुणे आणि अर्हम्‌‍ फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 22 जून 2025 रोजी लडाख येथील झोजी ला वॉर मेमोरिअल ते कारगिल वॉर मेमोरिअल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‌‘सरहद शौर्याथॉन‌’ 2025 स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते आज (दि. 25) व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृह येथे झाले. त्या वेळी पवार बोलत होते. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, अर्हम्‌्‌‍ फाऊंडेशन, पुणेचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, रेस डायरेक्टर सुमंत वाईकर, टेक्निकल रेस डायरेक्टर वसंत गोखले, सरहदचे विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, लेशपाल जवळगे, संतोष बालवडकर, अर्हम्‌्‌‍ फाऊंडेशन, पुणेचे विश्वस्त स्वराज पगारिया आदी उपस्थित होते. दिनेश कोल्हे यांनी संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. काश्मीरमध्ये सरहद संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक करून अजित पवार पुढे म्हणाले, युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणाप्रित्यर्थ 2017 पासून ‌‘सरहद शौर्याथॉन‌’चे आयोजन करण्यात येत असून स्पर्धा देशवासीयांसाठी प्रेरणादायी आहे. पहलगाम येथे झालेल्या नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून अजित पवार म्हणाले, या घटनेचा भारतातूनच नव्हे तर जगभरातून तीव्र निषेध नोंदविला जात आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात बदल्याची भावना आहे. सर्व जण पेटून उठले आहेत. पंतप्रधानांनी तातडीने पावले उचलली आहेत. स्पर्धेविषयी माहिती देताना सुमंत वाईकर म्हणाले, जगाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू या स्पर्धेत सहभागी होतात. या वर्षी अडीच ते तीन हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्त्री व पुरुष विभागासाठी पाच, दहा आणि 21 किमी तर मुली आणि मुलांसाठी तीन किमीची स्पर्धा आयोजित करण्यात येते. स्पर्धेतील विजेत्यांना भरघोसे बक्षीस देऊन गौरविले जाते. स्पर्धेसाठी 13 जे. के. रायफल्स आर्मी युनिट, द्रास टाऊन, कारगिल डिस्ट्रिक्ट, लडाख यु. टी. युनिटचे मुख्य अधिकारी कर्नल राजेश बांदे यांचे सहकार्य लाभले आहे. वर्ल्ड ॲथेलेटिक आणि इंडियन ॲथेलेटिक यांच्या नियमानुसार ही स्पर्धा होत आहे. पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सरहद संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्याची माहिती देताना संजय नहार म्हणाले, काश्मीरमधील युवकांच्या सहकार्याने अडकलेल्या पर्यटकांना निवास, भोजनासह अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर समाजमाध्यमांद्वारे काश्मीरमधील सामाजिक स्थितीबाबत अयोग्य माहिती पसरविली जात आहे. पण सरहदच्या माध्यमातून पुण्यात शिक्षण घेऊन परतलेल्या काश्मिरी युवकांनी केलेल्या मदतीमुळे लोकभावना बदलली असून सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाची स्पर्धा पहलगाम येथे शहीद झालेल्या नागरिकांना समर्पित करण्यात आली आहे.

बेकायदेशीर बिअर शॉपीविरोधात नागरिकांचा तीव्र संताप; तत्काळ परवाना रद्द करण्याची मागणी

0
Newsworldmarathi Pune: गगन अदिरा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, वाघोली येथील ‘Booze Craving Beer And Wine Shop’ या बिअर शॉपीला दिलेला परवाना पूर्णपणे बेकायदेशीर आहे, अशी नागरिकांची ठाम भूमिका असून, सदर शॉपीविरोधात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. सदर बिअर शॉपीस परवाना देताना स्थानिक सोसायट्यांचे व नागरिकांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) घेण्यात आलेले नाही. तसेच शासकीय नियम धाब्यावर बसवून, अनधिकृतपणे परवाना प्राप्त करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या बिअर शॉपीमुळे परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांवर विपरीत सामाजिक व मानसिक परिणाम होत असून, परिसरातील शांतता व सुरक्षितता धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर 25 एप्रिल 2025 रोजी भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सातव यांच्या नेतृत्वाखाली संबंधित बिअर शॉपीसमोर गगन अधिरा, मॅजेस्टिक मेनहॅटन, पार्कलेन प्रीमियर, स्कायलाईट आदी सोसायट्यांतील नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. तत्पूर्वी, 23 एप्रिल 2025 रोजी संदीप सातव यांनी पुणे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूड्डी तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिकारी श्री. राजपूत यांच्याकडे नागरिकांचा हरकत नामा व स्वाक्षरीसह निवेदन सादर केले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळेच नागरिकांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारत, परवाना रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रतींसह संपूर्ण पुरावे सादर करण्यात आले असून, प्रशासनाने तत्काळ योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

…तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याला घेराव घालणार; बच्चू कडूंचा इशारा

Newsworldmarathi sambhajinagar: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, लाडक्या बहिणीचे मानधन २१०० रुपये आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू, असं वचन महायुती सरकारने दिले होते. मात्र सत्ता मिळताच त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे जून महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्याला घेराव घालण्यात येईल, असा इशाराच प्रहारचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. शहरातील संत एकनाथ रंगमंदिर येथे प्रहारचा विभागीय कार्यकर्ता मेळावा व संताजी धनाजी सन्मान पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. नेमकं काय म्हणाले बच्चू कडू बच्चू कडू म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, लाडक्या बहिणीचे मानधन २,१०० रुपये करू आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू, असे वचननाम्यात जाहीर केले होते; परंतु सत्ता मिळताच सरकार वचननामा पाळण्यास तयार नाही. त्यामुळे जून महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्याला घेराव घालण्यात येईल. पुढे म्हणाले, राज्यात निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने देऊन महायुतीच्या नेत्यांनी मते मिळवली. परंतु आता ते बोलण्यास तयार नाही. त्यामुळे आता या नेत्यांना सळो की पळो करून सोडण्याची वेळ आली आहे. यापूर्वी मंत्र्यांच्या घरासमोर मशाल आंदोलन केले. आता १४ मे रोजी कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री यांच्या घरासमोर रक्तदान शिबीर आयोजित केले जातील. हे अभियान प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदारपणे राबवावे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास सरकार तयार नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दिव्यांगांचे मानधन पंधराशे रुपयांवर करण्यास सरकार तयार नाही, किमान वचननाम्याची तरी पूर्तता करा, असं बच्चू कडू यांनी यावेळी सरकारला बजावले आहे.

यंदा राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचा डिजिटल सर्वे; दलालांची साखळी मोडीत निघणार

Newsworldmarathi Mumbai : राज्य शासनाने शेतकऱ्यांना अधिक सुलभरीत्या शासकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि दलालांची साखळी मोडीत निघावी, यासाठी अॅग्रिस्टॅक प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५-२६ मध्ये कृषी उन्नती योजनेंतर्गत अॅग्रिस्टॅक प्रकल्पातील डिजिटल क्रॉप सर्व्हे होणार आहे. या वर्षात ८७३३.९७ लक्ष निधीच्या वार्षिक कृती आराखड्यातून खर्च होणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच व शेतांचे भू-संदर्भीकृत यांचा माहिती संच एकत्रितरीत्या तयार करण्यात येत आहे. त्यामधील हंगामी पिकांचा माहिती संचअंतर्गत डिजिटल पीक सर्वेक्षण (डिजिटल क्रॉप सर्व्हे) राबविण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतीत यांत्रिकीकरणाबरोबरच अनेक बदल होत आहेत. कृषी उन्नती योजनेंतर्गत २०२५-२६ साठी अॅग्रिस्टॅक प्रकल्पातील डिजिटल क्रॉप सव्हे हा घटक राबविण्यासाठी केंद्र हिस्सा ६० टक्के (५२४०.३८ लाख) आणि राज्य हिस्सा ४० टक्के म्हणजे ३४९३.५९ लाख असा एकूण ८७३३.९७ लाख एवढ्या रकमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता दिली आहे. राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या दि. २४ मार्चला आयोजित बैठकीत झालेल्या निर्णयानुसार २०२५-२६ साठी कृषी उन्नती योजनेंतर्गत अॅग्रिस्टॅक प्रकल्पातील डिजिटल क्रॉप सर्व्हे या घटकासाठी केंद्र हिस्सा ५२४०.३८ लक्ष आणि राज्य हिस्सा ३४९३.५९ लक्ष निधीच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी दिली आहे.

Ajit Pawar : महायुती सरकारचे काम चालते तीन शिप्टमध्ये; अजित पवारांनी दिनचर्याच सांगितली

0
Newsworldmarathi Pune : पुण्यात आज राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र या इमारतीचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. याशिवाय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नव्या 20 दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अजित पवारांनी जम्मू-कश्मिरमधील पहलगाममधील हल्ल्याबाबत भाष्य करत सरकार 24 तास कार्यरत असलेल्या वेळापत्रकाची माहिती दिली. काय म्हणाले नेमकं अजित पवार? पुणे येथे एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमचे सरकार 24 तास जनतेच्या सेवेत असते. तसेच त्यांनी त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिनचर्या सांगितली. ते म्हणाले. मी पहाटे 4 वाजता उठतो. फिरतो, व्यायाम करतो. पहाटे ४ वाजता उठून कामाला सुरुवात करतो. यानतंर 10 ते 11 पर्यंत काम करतो. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 11 ते 2 काम करतात. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 2 ते 4 या वेळेत काम करतात. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे सरकार सदैव तत्पर आहे, असं अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना म्हणाले, राज्य सरकारची कोणतीही कार्यालये भाडेतत्त्वावर ठेवायची नाहीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनतेला उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी महायुती सरकार काम करत आहे. येत्या दोन-तीन वर्षात सर्व इमारतींचे काम पूर्ण झाले पाहिजे. मला सरकारी कार्यालये चांगली करण्याची आवड आहे. नागरिकांना आवश्यक सुविधा मिळायला पाहिजेत. पार्किंगची समस्या मोठी आहे. त्यामुळे आता बांधल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था केली जाईल, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. दादा नेहमी आमच्या परीक्षा घेतात : प्रकाश आबिटकर प्रकाश आबिटकर म्हणाले, कामाची पध्दत, वेळ आणि जी गोष्ट आवडली नाही त्यावर तिथेच रिऍक्ट होतात, असे तुम्ही एकमेव राजकारणी आहात असं म्हणत अजित पवारांचं कौतुक केलं. आजही दादांनी परीक्षा घेतली की, सकाळी आठ वाजता ते आले. दादा नेहमी आमच्या परीक्षा घेतात आणि आमची अडचण होते, असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.

आरोग्य सेवेसाठी पुणे राज्यातील दुसरे सर्वात महत्त्वाचे ठिकाण : मंत्री प्रकाश आबिटकर

0
Newsworldmarathi Pune: आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पुणे हे राज्यातील दुसरे सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. पुण्यात आरोग्य विभागाची अनेक राज्यस्तरीय कार्यालये आहेत. राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमुळे आरोग्य विभागाची एकाच छताखाली येणार आहेत. यामुळे आरोग्य विभागाची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आल्यानंतर प्रशासकीय कामांमध्ये गतिमानता आणि दर्जेदार पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा देण्यास मदत होणार आहे, असं आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले. कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील नवीन ४३ आपला दवाखान्यांच्या लोकार्पणप्रसंगी मंत्री प्रकाश आबिटकर बोलत होते. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज या इमारतीमध्ये प्रशिक्षण हॉल, व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल, अभिलेख कक्ष, वाहनतळ, आदी पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे, या इमारतीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे. आज लोकार्पण करण्यात आलेल्या नवीन आपला दवाखान्यांपैकी पुणे शहरात सात दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून शहरी भागात झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब नागरिकांना अधिक गतिमान आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असे मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सार्वजनिक आरोग्य विभागाचे काम समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत विविध महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातही आपल्या सेवा पुरविल्या आहेत. या पुढील काळातही आरोग्य विभाग चांगली कामगिरी करून लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवेल, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

१७ वर्षीय तरुणाची ५ जणांकडून गळा चिरून हत्या; नांदगाव परिसरात खळबळ

Newsworldmarathi Nandgao: नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारातुन एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी मारहाण करत १७ वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री वखारी परिसरात घडली आहे. रवींद्र उर्फ मुन्ना दिपक आहिरे (वय-१७, रा. बोधे.) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी रवींद्र अहिरे याचे वडील दिपक आहिरे (वय-४२) यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चौकशीची सूत्रे वेगाने फिरवत चार संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे नाव घेतल्याच्या पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वाखारी शिवारातील जंगलात या तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, मृतदेह ताब्यात घेऊन नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. रवींद्र ऊर्फ मुन्ना आहिरे यास पूर्ववैमनस्यातून आकाश शरद सोनवणे, ऋषिकेश शरद पवार, विनोद शरद पवार, विजय एकनाथ सोनवणे, वींद्र अंकुश गायकवाड (सर्व रा. मोरवाडी साकुरी झाप, ता. मालेगाव) यांनी संगनमत करून ठार मारण्याचा कट रचून त्याच्या अंगावरील शर्ट फाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. तसेच त्याचा गळा धारधार शस्त्राने कापून त्यास तेथे सोडून पळून गेल्याचे मुलाच्या वडिलांनी फिर्यादीत नमूद केले आहे.